Login

प्रेमाचे क्षण गवसले भाग 20

प्रेमाचे क्षण
प्रेमाचे क्षण गवसले

भाग 20


"हळूहळू बोल त्यांना ऐकू गेले की तमाशाच पुन्हा.." शशु

"मला तर वाटते स्वतः कमवावे आपण..ह्यांच्या कडून काही हौस मौज पूर्ण करता येणार नाही..थोडे कॅफे मध्ये काय खाऊन आलो तर बाऊ करणारी आपली संस्कृती आहे..." समर्था सोफ्यावर जाऊन बसते..

तिचे बोलणे ऐकताच बाबा लगेच तीचा हात धरून तिला शशु सोबत उभे करतात..

"बाबा काय हे ,हात का ओढत आहात तुम्ही असा ,त्रास होतंय... नीट सांगा ना काय सांगायचे ते...लांब उभे राहून ही सांगू शकतात ना..?"


समर्था चिडून बोलली ,तेव्हा ती बाबांवर असे ओरडते हे पाहून शशु ही आवक झाला ,त्याला तिचा राग आला ,त्याने तिला पाठीत ठेवली.आणि तिचे तोंड दाबून सांगितले ,"खबरदार समू आज हे ऐकून घेतोय पुन्हा नाही हा हे ऐकून घेणार ,बाबा आहेत ते आपले..मर्यादेत रहा..मला काही बोल पण आता जे बाबांसोबत बोललीस ते पुन्हा घडता कामा नये.."

त्याने स्वतःच्या चुका मान्य करत बाबांच्या पुढे हळूहळू मान खाली घालुन उभा राहत त्यांच्या पायाशी पडून ,पाय पकडून चुकी बद्दल माफी मागितली

"बाबा अहो आम्ही चुकलो हो..इतके टोकाला गेले ते आमच्या मूर्खपणा मुळे.." शशु

बाबा शांत होता ,आई शांत होती ,आजी ही तोंड वळवून आत निघून गेली..कोणाला ही माफ करण्याची इच्छा होत नव्हती

शशु माफी मागत होता ,त्याला बाबांनी बघू न बघितल्या सारखे केले..दरवेळी माफ करून टाकणारे बाबा आज मात्र मन अतोनात दुखावले गेल्याने माफी देणार नव्हते...त्यांनी पाय मागे सरकवले...पण त्याला उठवले नाही..त्याचा स्पर्श ही पायाला होऊ द्यायचा नाही असे ठरवले..

"बाबा ओ बाबा.." तो रडत

"बाबा मेला, मारलं तुम्ही त्याला.."

"नाही नाही ओ बाबा..आम्ही मूर्ख आहोत मान्य आहे पण तुम्ही माफ करा..पुन्हा कधीच कधीच इतका मोठा अपराध नाही होणार...मी जबाबदारी घेतो आमच्या दोघांची..आज मला कळलं जेव्हा आपल्या पेक्षा छोटे उलट बोलल्यावर काय होते ते ,किती लागते मनाला ते ...मी बिघडलो म्हणून समर्था बिघडली..मी तिला संस्कार शिकवायला हवे होते...तिला ही माफ करा.."

आता मात्र बाबांच्या कठोर वागणुकीला बघून आईला कीव आली..बाबांना समजून सांगायला आणि माफी करा म्हणून सांगत येणार तोच..

"माफ करावे वाटते रे मला ही. " सासू

"हो माफ करा ,ते म्हणत आहेत ना पुन्हा नाही होणार असे मग सोडून देऊ.." श्रुती

"तुम्ही दोघी ही ह्या बाबतीत मध्ये पडू नका.." बाबा आईला आणि श्रुतीला रागवत म्हणाले

तिकडे शशु आणि समर्था ही शांत उभे होते ,बाबा आता काय ऐकवणार असतील हे बघत होते..

श्रुतीला ही हे थांबणार नाही ,आता दोघांना रागावून भलतेच काही होऊ नये ही भीती वाटत होती..मुलं आहेत काही रागाच्या भरात करून घेतले तर ,तसे ही आजकाल आई वडील जरा बोलले तर मुलं टोकाची भूमिका घेतात..