ईरा कोल्हापूर संंमेलन २०२५ विशेष …!!
ईरा सर्वेसर्वा संजना इंगळे यांचे कुटुंब म्हणजे प्रेमाचा निखळ झरा…!!
आपल्या संस्कृतीची महान देणगी म्हणजे कुटुंब ..! प्रत्येक माणूस जिथं प्रेमानं रमतो आणि जीवन समृद्ध करतो असे कुटुंब हवेहवेसे वाटते. ! कुटुंब हे केवळ एकत्र राहणारे लोक नसून त्यांच्यात प्रेम, नातेसंबध , जबाबदारी, परंपरा आणि मूल्य यांचा गुंफलेला एक संगम असतो.
नैतिक शिक्षण व मूल्यांचा वारसा,संकटात एकमेकांना साथ,आर्थिक,भावनिक पाठबळ ,संस्कृती वा परंपरेचे जतन हे आपल्या कुटुंबसंस्थेचे आगळेवेगळे महत्व आहे. या सगळ्यांचा परिपाक आदरणीय संजना इंगळे यांच्या कुटुंबात दिसला. जीवनात शीघ्रतेने यश मिळवायचे असेल तर प्रथम कुटुंबातील सर्वांचा पाठिंबा हवा असतो याबाबतीत संजना मॕडम मात्र भाग्यशाली आहेत. आपली मुलगी साहित्याचे एक व्यासपीठ चालवते आहे, नवे लेखक घडवते आहे,स्री लेखिकांना वैचारिक सक्षमता देते आहे, समाज बदलायला व सकारात्मक विचारांना प्रेरणा देते आहे ही गोष्ट संजना मॕडम यांच्या आईवडीलांनी इतकी मनावर घेतली की प्रत्येक गोष्टीत त्यांना सहकार्य व प्रेरणा दिली. ही गोष्ट आम्ही लेखकांनी जवळून अनुभवली आहे आणि खरोखरच बदलत्या कुटुंब व्यवस्थेत आमुलाग्र बदल होत असताना या कुटुंबाचे हे विलोभनीय कृत्य अभिमानास्पद वाटते.
ईराची संमेलन आत्ता दरवर्षी होत आहेत. ईराचे पहिले संमेलन पुणे येथे झाले त्यावेळी संजना मॕडम यांच्या कुटुंबाने छान स्वागत केले.प्रत्येक लेखकांना भेटले , चांगला संवाद साधला, सर्वात मिळूमिसळून राहिले त्यामुळे त्यांचा सहवास खूपच भारी वाटला.यानंतर नाशिकला दुसरे संमेलन झाले.तिथे तर आम्ही सुरेशसरांच्या घरी गेलो.तिथे त्यांनी छान आदरातिथ्य केले त्यानंतर संमेलनात सर्व लेखकाबरोबर मनसोक्त गप्पा मारल्या आणि खेळात आनंदाने सामिल झाले.संमेलन संपेपर्यंत त्यांचा उत्साह टिकून होता. लेखकांना निरोप देताना ते अगदी भारावून गेले होते. इतकं भावनेने गुंफलेलं हे कुटुंब लेखकांना कायम आपलेसे वाटते.जणू कांही पहिले ऋणानुबंध जोडलेले आहेत असा प्रत्यय त्यांच्या सहृदयी कृतीतून जाणवतो.
अशा प्रेमळ कुटुंबाची वाट आम्ही कोल्हापूर संमेलनात पहात होतो ; पण हे सगळे कुटुंब एकदिवस अगोदरच कोल्हापूरात डेरेदाखल झाले होते.श्री.अंबाबाई ,जोतिबा पन्हाळा व रंकाळा या सा-या प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊन संंमेलनात यांनी हजेरी लावली होती. पांढरा,तांबड्या रश्यावर ताव मारणारा व मिशीला पिळ देणारा रांगडा कोल्हापूरकर या कुटुंबापुढे नतमस्तक झाला होता. संमेलनात या कुटुंबाचे जंगी स्वागत करण्यात आले.सर्वाँना कोल्हापूरी फेट्याने सजवून अख्ख कुटुंब कोल्हापूरच्या प्रेमात पडले.इथला निसर्ग , माणुसकी व आदरातिथ्य आवडले.सगळे संमेलन संपेपर्यंत त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता.सर्वांच्यासोबत त्यांचे झालेले संवाद खूप प्रेरक होते.
या कुटुंबातील संजना मॕडम या कल्पकतेने व चतुरतेने त्यांनी ईरा व्यासपीठ सांभाळले आहे यावरुन त्यांचा व्यासंग समजतो. सरोजसर यांनी संजना मॕडम यांना समर्थ साथ दिली आहे. त्यांचा दिलखुलास स्वभाव सर्वांना भावतो. छोटा रुद्र बाल ईराचा नवा शिलेदार आहे. सुरेशसर म्हणजे नम्रता व आदर यांचा मिलाफ आहे. आईसमान वंदनाजी म्हणजे साक्षात लक्ष्मीचे रुप आहे. प्रत्येक संंमेलनात त्यांनी केलेल्या चकल्या भेट म्हणून मिळतात. कुणी आवडीने मागणी केली असता घरपोच दिल्या जातात. चवीचा हा नजराणा घरी देणाऱ्या वंदनाजी प्रेमळ सुगरण आहेत.पार्थचे आगमन या संमेलनात उत्साह देणारे ठरले.त्याचा स्वभाव खूपच चांगला असून सर्वाबरोबर मिळूमिसळून वागण्याची त्याची शैली आवडली. सुनंदा बोरसे यांनी शांत व सयंमाने या संमेलनातचा आनंद घेतला. सुरेशसरांचे भाऊ हे सुद्धा तितकेच प्रेमळ व सोज्वळ वाटले. या दोघांचा वाढदिवस कोल्हापूर संमेलनात साजरा करण्याची संधी मिळाली.ही या संमेलनाची संस्मरणीय आठवण आहे.या कुटुंबातील बरेचजण या कुटुंबाची व ईराची शानआहेत.
या कुटुंबाकडून आदर व मानसन्मान ,आपलेपणाची भावना, सांस्कृतिक , धार्मिक मुल्यांचे पालन,संस्कार व सतत हसतमुख राहणे अशा गोष्टी शिकायला मिळाल्या.या सगळ्या गोष्टींचे अनुकरण केले असता जीवन नक्कीच समृद्ध होईल. या संमेलनात याचा प्रत्यय सर्व लेखकांना आला.जे लेखक आले नाहीत त्यांनी पुढील संमेलनाला याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा.
एका साहित्यिक व्यासपीठाला या कुटुंबाची सोनेरी किनार लागली आहे. नवे लेखक येतात व येथे मनमुराद लिहतात , त्यांना जिव्हाळ्याचे कौटुंबिक आदरातिथ्य देणारे साहित्यक्षेत्रातील पहिले व्यासपीठ असावे. संजना मॕडम यांच्या या सर्व कुटुंबाचे मनःपूर्वक आभार ..! अशीच आपली सदैव भेट होत राहो. तुमच्या सर्व कुटुंबाला सुखी जीवनासाठी सर्व लेखकांकडून खूप शुभेच्छा ..!!
© नामदेव पाटील
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा