Login

संत श्री गजानन महाराज माहिती Gajanan Maharaj information in Marathi

संत श्री गजानन महाराज माहिती Gajanan Maharaj information in Marathi
संत श्री गजानन महाराज माहिती Gajanan Maharaj information in Marathi
गजानन महाराज माहिती मराठीमध्ये- gajanan maharaj information in marathi


शेगाव (बुलढाणा जिल्हा), महाराष्ट्र, भारत येथील गजानन महाराज हे दत्तात्रेय परंपरा (संप्रदाया)चे भारतीय गुरू होते. महाराजांच्या जन्म संबंधित कुठलाही ठोस पुरावा नाही म्हणून तिथिही सांगता येत नाही.
परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या तरुण वयात म्हणजे वयाच्या ३० व्या वर्षी १८७८ च्या फेब्रुवारी महिन्यात २३ तारखेला दिसले. त्यांचे भक्त ही तिथी गजानन महाराज प्रकट दिन म्हणून, आणि ऋषीपंचमी हा दिवस त्यांची पुण्यतिथी म्हणून पाळतात. गजानन महाराज हे आधुनिक काळातील थोर संत आहे

या लेखाच्या माध्यमातून आपण संत श्री गजानन महाराज यांच्या बद्दल सोबतच श्री गजानन महाराज संस्थान शेगाव बद्दल माहिती घेणारच आहोत . पण एक व्यक्ती विशेष म्हणून त्यांच्या आयुष्यातल्या काही आख्यायिका ऐतिहासिक घटना जर जाणून घेण्याची इच्छा असेल. तर महाराजांचा आयुष्याचा लेखाजोखा असणारा ग्रंथ म्हणजे श्री गजानन विजय ग्रंथ आहे.
" गजानन महाराज यांचे जीवन वर्णन करणारा हा ग्रंथ श्री. दासगणू महाराज यांनी लिहिला असून त्याचे नाव "श्री गजानन विजय असे आहे. या ग्रंथात महाराजांच्या आयुष्यातील अनेक आख्यायिका आणि ऐतिहासिक घटना वाचायला मिळतात "

गजानन महाराज भक्त परिवारात या ग्रंथाचे पारायण म्हणून खूप ठिकाणी वाचन होते हे वाचन सामूहिक पद्धतीने किंवा घरी कलश स्थापना करून केले जाते.
गजानन महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या विविध घटना काव्य कथानक स्वरूपात या ग्रंथात नमूद आहेत तुम्हाला महाराजांविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असेल तर हा ग्रंथ नक्कीच वाचू शकता .
पण आजच्या विषयाप्रमाणे आपण महाराजांच्या बद्दल आणि आजचा गायतागायत अगदी गौरव पूर्ण रीतीने कार्यभार सांभाळत असणाऱ्या शेगाव संस्थान बद्दल जाणून घेऊया.

वर नमूद केल्याप्रमाणे अगदी तरुण वयात संत श्री गजानन महाराज शेगावात दिसू लागले. त्यानंतर त्यांची भटकंती सुरू राहिली पण परत येण्याचे ठिकाण मात्र शेगाव बनून राहिलं.
संत श्री गजानन महाराज योगी होते त्यांना योगक्रिया अवगत होत्या.
योगाच्या सहाय्याने अगदी मानवी कल्पनांच्या बाहेर असणाऱ्या अनन्यसाधारण गोष्टी महाराज घडवून आणत.
सोबतच त्यांच्या कार्याला सामाजिक जोड दिली तर ते फार चांगल्या प्रतीचे विचारीक व्यक्ती होते असा आपल्याला दिसेल.
मग पहिल्याच भेटीत उष्ट्या पात्रवाळी वरच अन्न वाया न जाऊ देतात ते खाणे किंवा जनावरांसाठी असलेले पाणी अगदी निर्माण चित्ताने ग्रहण करणे ,अशा गोष्टी असो किंवा मग आत कीर्तन चालू असताना द्वार घोड्याच्या पायामध्ये जाऊन झोपणे आणि त्या जनावराला शांत करणे.
अशा अनेक घटनाक्रमान मधून महाराजांचा भक्त परिवार वाढत गेला लोकांची त्यांच्यावरची श्रद्धा वाढत गेली.
शिवाय गजानन महाराजांच्या स्वभावातला सगळ्यात चांगला गुण म्हणजे त्यांना कुठल्याही दान , धर्म ,दक्षिणेचा लोभ नव्हता.
त्यामुळे भक्तांचे त्यांच्यावरील प्रेम दिवसेंदिवस वाढतच गेले.
वर नमूद केल्याप्रमाणे विजय ग्रंथात अशा अनेक घटनांचे सविस्तर विश्लेषण आपल्याला पाहायला मिळते.

खाली महाराजांच्या काही निवडक भक्तांची नावे देत आहे हे फक्त मुख्यतः शेगाव किंवा त्याच्या जवळील असे होते आणि महाराजांच्या जीवनकाळात मोठ्या प्रमाणात यांनी सेवा कार्य केले.
त्यामध्ये बंकटलाल अग्रवाल,,पितांबर सैतवाल ,,भास्कर पाटील
सेवाधारी बाळाभाऊ ,हरी पाटील ,बाळकृष्ण बीडवाई,,पुंडलिक भोकरे, डॉ.भाऊ कवर, बापूंना काळे इत्यादी

वेळोवेळी महाराजांनी केलेले दैवी चमत्कार आणि त्यांना आध्यात्मिक जोड असल्याने ,देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्त महाराजांसोबत जोडले गेले.
पण त्यामुळे कधीही त्यांच्या वृत्तीमध्ये लोभीपणा किंवा स्वार्थीपणा आला नाही.
ते कायम जसे होते तसे राहिले. कदाचित हीच सर्वात खास गोष्ट असावी की ते असेपर्यंत आणि आता ते समाधीस्थ आहेत तरीसुद्धा त्यांच्या नावे चालणाऱ्या कुठल्याही कार्यात घोटाळेपणा किंवा लालसी वृद्धी दिसत नाही कुठल्याही प्रकारचं शुल्क तिथे बंधन नाही.
एकीकडे जिथे भक्तीचा बाजार होताना दिसतो तिथे महाराजांचा निर्लोभीपणा भक्तांना अधिक आकर्षित करत होता.

8 सप्टेंबर 1910 रोजी महाराजांनी आपले नश्वर देह सोडून अंतिम मुक्ती अवस्थेत महासमाधी घेतली. त्यांच्या जाण्याने त्यांच्या भक्तांच्या हृदयात एक खोल पोकळी निर्माण झाली, परंतु त्यांची शिकवण आणि उपस्थिती कायम आहे.

महाराजांच्या जीवनकार्यात त्यांच्यासोबत जोडल्या गेलेली हजारो भक्त मंडळी होती तेव्हा महाराजांनी समाधी घेतली त्या अगोदर त्यांनी समाधीसाठी जागा निश्चित करून दिली होती.
काही प्रमाणात जमीन सरकारकडूनही देण्यात आली आणि मठाचे बांधकाम महाराज जिवंत असतानाच सुरू झाले होते.

महाराजांच्या शिकवणीतून हे कार्य पुढे जात होते त्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारचे घोटाळे किंवा जबरदस्ती झाली नाही अगदी स्वच्छने ज्या भक्तांकडून जी मदत होईल ती देण्यात आली आणि तिचा स्वीकार झाला.
विविध ठिकाणहून शेती मालाच्या विक्रीसाठी ज्या गाड्या येत त्यावर प्रत्येक गाडीमागे रुपया दोन रुपये असे पैसे भक्ती कर म्हणून लावण्यात आला देणाऱ्यासाठी ही रक्कम फार छोटी असे म्हणून त्यांना आनंद होत असते. आणि अशातून महाराजांचे भव्य असे संस्थान स्थापन झाले.

आजच्या स्थितीत जर कोणी श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावला भेट देईल तर तो परिसर आणि तिथली व्यवस्था पाहून आश्चर्यचकित होईल अर्थातच हे काम हळूहळू पण सतत होत राहिल्याने आज इतकी भव्य व्यवस्था तिथे पाहायला मिळेल.
आज महाराजांचे करोडो भक्त देशात तसेच विदेशात आहेत आणि त्यांच्याकडून लाखोंची देणगी दर दिवशी संस्थांना दिली जाते यातून संस्थांतर्फे विविध प्रकारचे सार्वजनिक कार्य केले जातात.

या कार्यांमध्ये आरोग्य विषयक शैक्षणिक वृद्धाश्रम गौशाला अश्या अनेक कार्याचा समावेश आहे.
आज बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. श्री गजानन महाराज यांचे वास्तव्य लाभलेले हे ठिकाण विदर्भातील पंढरपूर असे संबोधले जाते.
जमहाराजांच्या समाधीस्थळावर एक भव्य मंदिर बांधले गेले असून त्याची व्यवस्था तेथील 'गजानन महाराज संस्थान' पाहते. तेथील संस्थानाच्या 'भक्त निवास' मध्ये अल्प दरात मुक्कामाची सोय केलेली आहे. तेथे ७०० खोल्यांची व्यवस्था असून, गर्दीच्या वेळेस त्याव्यतिरिक्त ५००० बिछाने देखील पुरविण्यात येतात. येथे येणाऱ्या भक्तांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या निवासाची व्यवस्था येथे आहे. याच संस्थानाने आनंदसागर, शेगाव हे प्रेक्षणीय स्थळ सुमारे ३५० एकर जागेपैकी सध्या १२० एकर जागेवर निर्माण केले असून पर्यटकांमध्ये ते अत्यंत लोकप्रिय आहे. त्याच्या विस्ताराचे काम खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे. ते शेगाव-बाळापूर रस्त्यावर, शेगावपासून सुमारे २.५ कि.मी. अंतरावर आहे. तेथे जवळच 'आनंद सागर विसावा' येथेही भक्त निवास असून तेथेही राहण्याची व भोजनाची सोय आहे

दर दिवशी मंदिरात येणाऱ्या हजारो भक्तांसाठी सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत निशुल्क भोजनाची व्यवस्था असते.
अर्थातच मोठ्या प्रमाणात अन्नदान येथे होते.

या संस्थानातर्फे सेवार्थ बस सेवा, निःशुल्क महाप्रसाद, अल्पदरात भोजन व्यवस्था, विविध वैद्यकिय सेवा इत्यादी अनेक प्रकल्प राबविण्यात येतात. शेगाव रेल्वे स्थानक मुंबई-भुसावळ-नागपूर मार्गावर आहे. शेगावची लोकसंख्या ३२,८२४ आहे. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरातून शेगावकडे राज्य परिवहन मंडळाच्या व खाजगी बसेस उपलब्ध असून मुंबई-नागपूर मार्गावरील सर्व प्रमुख रेल्वे गाड्या येथे थांबतात.

तर अश्या या शेगाव नगरी तुम्ही एकदा तरी भेट द्या.

शेगाव संस्थान बद्दल एक सर्वात कुतुलाची आणि आश्चर्याची बाब सांगायची झाली तर तिथे होत असणारी स्वयंसेवकांची नेमणूक.
एवढा मोठा संस्थान चा परिसर आणि एवढे मोठे स्वामी कार्य नक्कीच हे भक्ती संप्रदायाचे कार्य आहे कुठलीही खाजगी कंपनी नाही तेव्हा हे कार्य इतके वर्षांपासून कसे चालत आहे याबद्दल प्रश्न तर म्हणत असतीलच.

तर मंडळी महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यातून दर काही ठराविक दिवसांनी वेगवेगळ्या ठिकाणचे भक्तगण सेवेसाठी येतात ही व्यवस्था पूर्णपणे ऐच्छिक स्वरूपात चालते आणि या सेविकाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा पगार दिला जात नाही.
(अर्थातच आता त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी त्यांना वेळोवेळी मानधन आणि इतर वस्तू भेट म्हणून दिल्या जातात पण तो पगार नाही)
ही गोष्ट आवर्जून याकरिता सांगावीशी वाटते कारण ही फक्त मंडळी तितक्याच आवडीने आणि कुठल्याही स्वार्थाशिवाय इथे सेवा देण्यासाठी येतात.
संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतात कदाचित शेगाव संस्थान एक मात्र संस्था नसेल जिथे संपूर्ण कार्य व्यवस्थाही स्वयंसेवक पद्धतीने चालते.

पण असे असले म्हणजे इथल्या व्यवस्थेत कुठल्याही कामचुकारपणा किंवा अव्यवस्था, बेशिस्तीपणा आढळून येत नाही.आणि हा वारसा इथून पुढेही असाच चालत राहील याची शाश्वती देता येते.

ही माहिती तर तुम्हाला शेगाव संस्थान बद्दल एक छटा दाखवण्याच्या प्रयत्नात दिली गेली . पण मला विश्वास आहे तुम्ही प्रत्यक्ष शेगाव संस्थानला जेव्हा भेट द्याल तेव्हा यापेक्षाही भव्य सुव्यवस्था तुम्हाला तिथे पाहायला मिळेल.

वेळोवेळी ऋषिपंचमी प्रकट दिन आणि एकादशी निमित्त लाखोंच्या संख्येने भक्त शेगावची वाट धरतात आणि तरीसुद्धा त्यांची कुठली उडत नाही खरंच व्यवस्था आणि नियोजन याचे उत्तम उदाहरण आहे शेगाव संस्थान.
सोबतच या खास प्रसंगी वेगवेगळ्या ठिकाणाहून दिंड्या महाराजांच्या दर्शनासाठी येतात. त्यांची ही व्यवस्था संस्थांनतर्फे चोख पार पाडली जाते. एकूणच बाराही महिने शेगाव संस्थाने भक्तिमय रंगात रंगून गेलेले असते.

लक्ष देण्यासाठी गोष्ट आहे की शेगाव संस्थांच्या या विस्तारामुळे अनेक लोकांना रोजगार प्राप्त झाला आहे. अनेक भक्तमंडळी देशा विदेशातून इथं दर्शनासाठी येतात म्हणून स्थानिक मंडळींचे लहान मोठे उद्योग धंदे ही भरभराटीने चालतात.

महाराजांच्या भक्तांनी फुलवलेला हा भक्तीचा मळा ,,आज हजारोंची घर आनंदाने चालावीत म्हणून कार्यरत आहे. आणि हा वारसा असाच निरंतर चालत राहो ही महाराजांच्या चरणी ही प्रार्थना.


संत श्री गजानन महाराज माहिती Gajanan Maharaj information in Marathi
गजानन महाराज माहिती मराठीमध्ये- gajanan maharaj information in marathi