" मिस्टर विश्वास तुम्ही पण माझ्यासोबत चला ना.... " ती जागेवर उठली तरीही मिस्टर विश्वास तसेच बसलेले आहे हे पाहून ती स्वतःच पुढे येऊन त्यांना विचारते....
आत्ता पुढें,
मिस्टर विश्वास यांना मनातून खूप राग आलेला असतो कारण इतकं वाईट वागूनही तिला अजूनही त्या रोहण आणि धर्मेशला भेटण्याची इच्छा आहे... मुळात तिने तर त्यांचे तोंडही पाहिले नाही पाहिजे आणि इतर त्यांना भेटण्याची इच्छा सांगत आहे... त्यांची इच्छा नसतानाही तिच्या आग्रहाखातर ते शांतपणे उठून उभे राहतात....
" चला, " हवालदार या दोघांकडे पाहून त्यांना आपल्या सोबत यायला सांगतात हवालदाराच्या मागे हे दोघेही जातात.... हवालदार त्यांना एका जेलच्या जवळ घेऊन जातो.... पावलांचा आवाज ऐकून रोहनी बसले जागेवरूनच त्या दिशेला पाहू लागतो... समोर उभ्या असलेल्या भार्गवी कडे पाहून मात्र रोहनच्या मध्ये आशेचा किरण जागा होतो.....
" भार्गवी... भार्गवी बरं झालं तू आलीस... अग मी तुझा जवळचा मित्र आहे ना तू मला अशी जेलमध्ये नाही टाकू शकत.... " रोहन तिच्याकडे पाहून गयावया करू लागतो...
" मला आजपर्यंत तर हेच वाटत होतं की, तू माझ्या सगळ्यात जवळचा मित्र आहे पण हे सगळं खोटं आहे ते तू स्वतः सिद्ध करून दाखवलं... " भार्गवी शांत नजरेने त्याच्याकडे पाहून उत्तर देते...
" भार्गवी हे बघ माझं खरंच चुकलं मी त्या घरमेची बाजू घ्यायला नको होती... तू मला एक संधी दे मी पुन्हा तुला असं निराश नाही करणार... माझ्यासाठी नाही निदान मेघा साठी तरी मला एक संधी दे... मेघा तुझी चांगली मैत्रीण आहे तिने कधीच तुझ्या बद्दल वाईट विचार केला नाही... तू ही तिच्या मनाचा विचार कर.... मेघा माझ्यावर खूप प्रेम करते आणि मी पण मेघा भर खूप प्रेम करतो... जर मला काही झालं तर मेघाचं कसं होईल ? तुझ्या मैत्रिणीला झालेला त्रास तुला तरी बघणार आहे का ? " रोहन मुद्दामून भार्गवीच्या मनामध्ये मेघा बद्दल काळजी भरून तिला विचार करण्यासाठी भाग पाडतो... भार्गवी पण मेघाचा विचार करू लागते....
" मला माहित आहे की, भार्गवी कधीच माझ्याबद्दल वाईट विचार करणार नाही , पण तिच्यासोबत वाईट करणाऱ्या माणसांना आम्हीही माफ करू शकणार नाही... " अचानक एका दिशेने त्यांना आवाज ऐकू येतो तसं ते सगळेच त्या दिशेला पाहू लागतात.... मेघा तिकडे येऊन उभी असते....
" मेघा , बरं झालं तू आलीस.. अग मी इतक्या दिवसापासून कधी सांगितलं नाही पण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला हेही माहित आहे की तुझं ही माझ्यावर तितकच प्रेम आहे.... मेघा यापुढे कधीही वाईट वागणार नाही.. कोणाबद्दलही काही वाईट विचार करणार नाही, मी हे सगळे चुकीचे काम सोडून नव्याने आयुष्य सुरू करेल... मला फक्त एक संधी द्या... तुम्ही दोघी पण माझ्या जवळच्या मैत्रिणी आहेत मला एकदा समजून घेण्याचा प्रयत्न करा.... " रोहन त्या दोघींकडे पाहून त्यांच्याकडे आपल्या आयुष्याची भीक मागू लागतो...
त्याचं बोलणं ऐकून मेघा रागानेच पुढे येऊन त्याच्या एक जोरदार कानाखाली मारते... तिच्या अशा वागण्याने सगळे आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागतात.... रोहन ही गोंधळलेल्या नजरेने तिच्याकडे पाहू लागतो.....
" मला लाज वाटत आहे की मी तुझ्यासारख्या नीच माणसावर प्रेम केले.... तू विचारत कसा करू शकतो की तुला आम्ही एक संधी देऊ... तू आपल्या जवळच्या मैत्रिणीला फसवले तर आहेस त्यासोबत आपल्या देशातील इतर लोकांनाही हानी पोहोचवली आहेस.... तुम्ही लोक देशातल्या मुलींना बाहेरगावी विकत होते इतका नीच कृत्य करताना तुला लाज नाही वाटली आणि तरीही तुला असं वाटत आहे की आम्ही तुला एक संधी देऊ.... अरे तुझ्यासारखी बेईमान माणसं संधी देण्याच्या लायकीची नसतात तर अशा जेलमध्ये चढण्याच्याच लायकीचे असतात.... मी तर देवाकडे प्रार्थना करेल की कोर्टात तुला जास्तीत जास्त शिक्षा मिळावी... " मेघा रागा रागाने त्याच्याकडे पाहून घडाघडा बोलू लागते... जरी तिने त्याच्यावर मनापासून प्रेम केले असले तरीही त्याच्या वाईट कृत्याबद्दल समजल्यावर मात्र तिच्यामध्ये त्या प्रेमाचा तिरस्कार निर्माण होतो....
" मेघा.... " भार्गवी तिच्या चेहऱ्यावर असलेले दुःख आणि डोळ्यातले अश्रू पाहून तिच्या खांद्यावर हलकाच हात ठेवते....
" भार्गवी तू अगदी योग्य केल आणि चुकून सुद्धा या नराधमांना आता जेल मधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नको.... या लोकांनी तुझी काय अवस्था केली होती , तुझ्या लक्षात आहे ना..... अगं यांच्यासारखी माणसं आपल्या देशासाठी हानिकारक असतात त्यामुळे यांना असेच जेलमध्ये सडत ठेवले पाहिजे... तू माझी अजिबात काळजी करू नको... माझ्यासोबत तुझ्यासारखी मैत्रीण असताना मला अशा तुच्छ माणसांची गरज नाही..... " मेघा भार्गवीकडे पाहून समजावण्याच्या स्वरात बोलते....
" मेघा मला खरंच मनापासून अभिमान वाटतो की तुझ्यासारखी चांगली मुलगी माझी मैत्रीण आहे.... " भार्गवी शांतपणे तिच्याकडे पाहून बोलते....
" खरंतर अभिमान मला वाटायला पाहिजे तुझ्यासारखी धाडसी मैत्रीण माझ्या आयुष्यात आली म्हणून.... या लोकांनी तुला किती त्रास दिला तरीही तो सगळा त्रास सहन करून या लोकांचा खरा चेहरा जगासमोर आणलास... मिस्टर विश्वास खरं तर त्या दिवशी पण रोहननेच मला जबरदस्ती केली होती आणि म्हणून आम्ही तुमच्या घरी भार्गवीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो.... तेव्हा मला वाटले होते की रोहनला भार्गवीची काळजी आहे म्हणून तो असे करत आहेत पण आता त्याचे खरे रूप समजले.... त्याला भार्गवी बद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे होती ती कुठे लपली आहे हे जाणून घ्यायचे होते आणि म्हणूनच तो तुम्हाला भेटायला आला होता...
याच्या आधी पण त्याने ऑफिसमध्ये मला भार्गवी बद्दल बोलू दिले नाही धर्मेश बोलत होता तर मला पाठी थांबवून ठेवले... मला फोटो कुठे सांगून त्याच्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न केला... एकदा आम्ही भार्गवीला भेटण्यासाठी वेश बदलून इकडे पोलीस स्टेशन मध्ये आलो होतो तेव्हा खरं तर मी जबरदस्ती केली म्हणून त्यांनी तो पेन ड्राईव्ह भार्गवीला दिला होता... खर तर त्याला भार्गवीची कोणी मदत करत आहे का हे पाहायचे होते.... जर तुम्ही तेव्हा त्या पेन ड्राईव्ह बद्दल सांगितले असते तर या लोकांना तुम्ही भार्गवीची मदत करत आहात हे समजले असते आणि मग त्यांनी तुम्हाला त्रास देऊन भार्गवीपासून लांब केले असते..... या सगळ्या गोष्टी मला तेव्हा समजले नाही पण आता सगळ्या गोष्टी लक्षात येत आहेत.... " मेघा पहिल्यापासून घडलेल्या सगळ्या गोष्टी मिस्टर विश्वास आणि भार्गवी या दोघांना सांगू लागते....
" मला तर खूप आधीपासूनच याच्या वागण्यावर शंका येत होती परंतु ती शंका कन्फर्म करण्यासाठी आणि याच्या विरोधात पुरावे शोधण्यासाठीच मी मुद्दामून याच्या शब्दात अडकलो आहे असे दाखवले.... त्याला भार्गवीच्या मार्गावर तिकडे जंगलामध्ये पाठवू नये हा सगळाच माझ्या या सगळ्या प्लॅन चा एक भाग होता.... तो तिकडे गेल्यावर भार्गवी सोबत कसा वागतो याच्यावरच त्याच्याबद्दल समजणार होते म्हणून आम्ही त्याच्या पूर्ण हालचाली टिपत होतो... " मिस्टर विश्वास एक नजर रोहन कडे पाहून भार्गवी आणि मेघा दोघींनाही सांगू लागतात....
ते बोलतच असताजाते, अचानक पोलीस स्टेशनच्या दरवाजा मधून दोन-तीन हवालदार धर्मेशला घेऊन येत असताना त्या तिघांचेही लक्ष धर्मेश कडे जाते.... धर्मेश च्या एका हाताला , दोन्ही पायांना आणि डोक्याला पट्टी लावलेली असते त्यामुळे त्याच्या जखमा स्पष्टपणे दिसून येत असतात....
भार्गवी , रोहन, मेघा आणि मिस्टर विश्वास सगळेच धर्मेश कडे पाहत असतात.... ते हवालदार धर्मेशला त्या जेलच्या दिशेनेच घेऊन येऊ लागतात..... धर्मेश तोंडाने कण्हत असतो, चला भाऊ ते खूपच त्रास होत होता... त्यांच्या दिशेने पुढे येत असतानाच धर्मेशची नजर समोर उभ्या असलेल्या भार्गवी वर जाते...
" भार्गवी... मला माहित होतं की तू माझ्यावर इतकं प्रेम करतेस की माझ्याशिवाय राहू शकत नाहीस... तुम्हाला भेटण्यासाठीच इकडे जेलमध्ये आली आहेस ना ? " तिला समोर पाहून धर्मेश लगेच प्रेमाने बोलू लागतो....
" हो, खर तर तुला भेटण्यासाठीच मी इकडे आले आहे.... " भार्गवी पण त्याच्या चेहऱ्यावरचा बदल पहात लगेच बोलते....
" भार्गवी हे बघ मला माहित आहे तू माझ्यावर खूप प्रेम करते आणि माझ्यासाठी काहीही करू शकते..... फक्त एकदा मला या सगळ्या मधून सोडव... मी तुला वचन देतो की आपण आपले नव्याने आयुष्य सुरू करू... मी आधीचे सगळे काळे धंदे सोडून देईल..... माझ्याकडे भरपूर पैसा आहे आपण आपलं चांगलं लाईफ जगू शकतो... मी तुझ्यावर भरभरून प्रेम करेल, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल.... फक्त एकदा माझी साथ दे... माझे अभिरोदात केलेली कंप्लेंट मागे घे.... मी तुझा नवरा आहे आणि तू एक भारतीय नारी आहे.... भारतीय स्त्री आपल्या नवऱ्यासाठी काहीही करू शकते, ती कधीच त्याला दुःखात पाहू शकत नाही, तुम्ही अगदी तशीच आहेस ना म्हणून मला माहित आहे तू माझ्या विरोधात केलेले कंप्लेंट मागे घेण्यासाठीच इकडे आली आहेस ना..... " धर्मेश अगदी आनंदाने तिच्याकडे पाहून तिला विचारू लागतो....
.
..
...
To be continued....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा