शाब्बास रवी -भाग २
आठवड्याचा सोमवार उजाडला. रवी शाळेत जाण्याची तयारी करू लागला. शेतात जाण्याच्या नादात बाईंनी दिलेला गृहपाठ करण्याची त्याला आठवण सुद्धा राहिली नाही. त्या पिल्लांच्या आठवणीतच तो मग्न होता.
ए रवी,' इकडे ये'! रवी कावरा बावरा होऊन वडिलांच्या पुढ्यात उभा! 'आपल्या म्हशींना हौदा वर घेऊन जा. पाणी पाजून आण'. 'बाबा, शाळेला उशीर होणार ना'! 'जा म्हणतो ना! एक दिवस शाळेत गेला नाही तर काही फरक पडत नाही'.
ग्रामीण भागात मुलांच्या शिक्षणासाठी पालक जागृत नसतात. त्यांच्या शाळे विषयीच्या अनास्थेला सुद्धा काही कारणे असतात. शाळेत वेळ घालवण्यापेक्षा घराला आर्थिक हातभार लागणे त्यांना जास्त महत्त्वाचे वाटत असते. घरात खाणारी तोंडे जास्त असल्यामुळे, आपल्या अपत्याची मदत ग्रामीण कुटुंबात महत्त्वाची असते. त्यामुळे शाळा त्यांच्यासाठी दुय्यम असते.
रवीने रागातच शेजारीच ठेवलेल्या लाकडाच्या ओंडक्या वर दप्तर आपटले. आणि म्हशींना पाणी पाजायला सार्वजनिक हौदा वर घेऊन गेला.
त्याच्या मनात विचार आला, 'बाई आज नक्कीच आपली आठवण काढतील. शाळेच्या स्नेहसंमेलनात आपली राजाची भूमिका आहे ना! बाई म्हणतात, तू छान दिसतोस राजाच्या भूमिकेत!' त्याला वाटले, अशाच म्हशी सोडून द्याव्यात. आणि पळतच शाळेत जावे. पुन्हा त्याला वाटले, नको! आधीच शाळेला उशीर झाला आहे. त्यातच त्या पिल्लांच्या आठवणीने तो पुन्हा अस्वस्थ झाला झाला.
त्याच्या मनात विचार आला, 'बाई आज नक्कीच आपली आठवण काढतील. शाळेच्या स्नेहसंमेलनात आपली राजाची भूमिका आहे ना! बाई म्हणतात, तू छान दिसतोस राजाच्या भूमिकेत!' त्याला वाटले, अशाच म्हशी सोडून द्याव्यात. आणि पळतच शाळेत जावे. पुन्हा त्याला वाटले, नको! आधीच शाळेला उशीर झाला आहे. त्यातच त्या पिल्लांच्या आठवणीने तो पुन्हा अस्वस्थ झाला झाला.
म्हशींना घरी आणून सोडल्यावर तो उदास बसून होता. आई-वडील दोघेही कामावर गेलेले. घरी फक्त आजी घराचं राखण करायला. तो आजी जवळ जाऊन बसला.
रव्या! 'काऊन असा बसला? काय झालं तुले'? 'आजी एक गोष्ट विचारु'? 'कोनती गोष्ट'? त्याने आजीला त्या पिल्लांबद्दल सांगितले. तसे आजीने त्याला म्हटले, 'एक काम कर'. 'त्या महेश सोबत जाय. अन् पाहून ये ते पिल्लं'! 'तुया मनाले शांती भेटन'... 'पन मले वाटते, त्या पिल्लांयले त्यायच्या मायनं खाऊ पिऊ घातलं असन'.' जगातली कोनतीच माय आपल्या पिल्लाले दूर सारत नाही. मंग ते मानसाचे पिल्लू असो का जनावराचे पिल्लू. नाही तर कोण्या पक्षाचे'...
रव्या! 'काऊन असा बसला? काय झालं तुले'? 'आजी एक गोष्ट विचारु'? 'कोनती गोष्ट'? त्याने आजीला त्या पिल्लांबद्दल सांगितले. तसे आजीने त्याला म्हटले, 'एक काम कर'. 'त्या महेश सोबत जाय. अन् पाहून ये ते पिल्लं'! 'तुया मनाले शांती भेटन'... 'पन मले वाटते, त्या पिल्लांयले त्यायच्या मायनं खाऊ पिऊ घातलं असन'.' जगातली कोनतीच माय आपल्या पिल्लाले दूर सारत नाही. मंग ते मानसाचे पिल्लू असो का जनावराचे पिल्लू. नाही तर कोण्या पक्षाचे'...
रवीला आजीशी बोलून फार बरे वाटले. त्याने दुसऱ्या दिवशी पहाटेच महेशला हाक मारली. दोघेही कुणालाही न सांगता गुपचूप त्या झाडाजवळ गेले.तेथे पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. पहाटेचा गार वारा अंगाला झोंबत होता. त्या दोघांनाही उत्सुकतेपोटी कशाचीही पर्वा नव्हती.
महेश गुपचूप झाडावर चढला. ती पक्षिण त्या पिल्लांसाठी चारा आणायला बाहेर पडली होती. ती पिल्लं सुरक्षित असल्याचे पाहून महेश झरझर खाली उतरला. तसा रवी त्याला म्हणाला, 'मी सुद्धा पाहून येतो'. त्याने सुद्धा घरट्यात शांततेने पहुडलेली पिल्ले बघितली. त्याला खूप आनंद झाला. त्याच्या डोक्यावरचं मणभर ओझं उतरविल्या सारखं त्याला झालं...
महेश गुपचूप झाडावर चढला. ती पक्षिण त्या पिल्लांसाठी चारा आणायला बाहेर पडली होती. ती पिल्लं सुरक्षित असल्याचे पाहून महेश झरझर खाली उतरला. तसा रवी त्याला म्हणाला, 'मी सुद्धा पाहून येतो'. त्याने सुद्धा घरट्यात शांततेने पहुडलेली पिल्ले बघितली. त्याला खूप आनंद झाला. त्याच्या डोक्यावरचं मणभर ओझं उतरविल्या सारखं त्याला झालं...
खरेच! छोटी मुले किती निरागस असतात. त्यांची मनं खूप संवेदनशील असतात. पुढील आयुष्यातील दुनियादारी त्यांनी अजून अनुभवलेली नसते.
रवीची कामगिरी बघूया पुढील भागात भाग ३ मध्ये
छाया राऊत बर्वे अमरावती
८३९००८६९१७
८३९००८६९१७
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा