Login

कथा-आधार भाग २

A Story About Little Girl
कथा-आधार भाग २


'ए मीरा, वर्गात बसायचं नाही का'? बाईंनी मीरा ला हाक मारली.तशी मीरा निमुटपणे वर्गात येऊन बसली. तिच्या चेहऱ्यावरचे उदास भाव बाईंच्या लक्षात आले होते. त्यांना तिच्या घरच्या परिस्थितीची पूर्ण कल्पना होती.


सर,' मला तुमच्याशी थोडी चर्चा करायची आहे'. मीराच्या वर्ग शिक्षिका मुख्याध्यापकांच्या कार्यालयात येऊन म्हणाल्या. 'कशावर चर्चा करायची आहे तुम्हाला? यांना बसा'
अहो सर, 'शाळेच्या गणेशोत्सवाला फक्त दहा दिवस उरलेत. त्यासाठीची लगबग, मुलांचा उत्साह, दरवर्षी दिसतोच की आपल्याला'. हो तर !'आपण दरवर्षी हा उत्सव आपल्या शाळेत साजरा करीत असतो' . मुख्याध्यापक म्हणाले.
पण सर, मी काय म्हणते, यावर्षीपासून आपण हा उत्सव शाळेत साजरा नको करायला!
अहो मॅडम, 'काय सांगत आहात ?दरवर्षी आपली व्यवस्थापन समिती यात पुढाकार घेते. तसंच गाव काय म्हणेल'? 'मागील कितीतरी वर्षांपासून आपल्या आधीच्या शिक्षकांनी या गणेशोत्सवाची परंपरा जपली आहे'.
'सर, ही परंपरा गाव काय म्हणेल या भीतीनेच ना'... आपल्यावर गावाचा रोष नको." चालते आहे तर चालू द्या." यातील कुणीही ,गावातील एखाद्या सुज्ञ व्यक्तीने किंवा शिक्षकांनी हा विचार केला का?
कोणता विचार? मुख्याध्यापक संभ्रमात पडले. हे बघा सर!' गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्ही शाळेत येता. शाळेतील काही दहा-बारा मुले गोळा करून गणपतीची स्थापना करता. यानंतर दररोज गणपतीची आपण आरती करतो प्रसाद वाटतो इथपर्यंत ठीक आहे'. मुख्याध्यापक
म्हणाले, मग हे सर्व नको का करायला? 'मी तसे म्हणत नाही. सर्व धर्मांची मुले या शाळेत येतात. त्यांना बळजबरीने ही आरती म्हणावी लागते. तसेच सर्व मुले मुली चुकीची आरती म्हणतात. याचे तुम्ही निरीक्षण केले का'?
'सुखकर्ता दुख हर्ता म्हण ण्या ऐवजी, ते सर्रास सुखकर्ता दुख कर्ता असे म्हणतात. आणखी बऱ्याच काही चुका असतात .बरं, एवढंच नाही, गणपतीसाठी ची आरती, हार ,त्याची सजावट, इत्यादीसाठी बराच वेळ खर्च होतो. विद्यार्थ्यांचा वेळ किती मौल्यवान आहे, हाच वेळ आपण त्यांच्या अभ्यासासाठी कारणी लावला तर'! सर, 'विद्यार्थी शाळेत शिकायला येतात. आरत्या म्हणायला नाही. तसेही आपल्या आपल्या धर्माप्रमाणे प्रत्येक जण आपल्या घरी गणपतीची स्थापना करतोच की! शाळेत पुस्तकांची, ग्रंथांची पूजा करावी या मताची मी आहे. तसेही तुम्ही गणेश चतुर्थीच्या दिवशी शाळेत येऊन स्वतःच्या घरच्या गणेश स्थापनेला मूकताच. नाही का!'

हे सर्व ऐकत असताना मुख्याध्यापकांना मॅडमचे म्हणणे पटायला लागले होते... बर मी काय म्हणते सर, इतर शिक्षकांना माझा हा मुद्दा आपण पटवून द्याल अशी आशा करते.
आपला मुद्दा इतर शिक्षकांना पटेल की नाही या विचारातच त्या वर्गात गेल्या.

आज मुख्याध्यापकांनी शाळा सुटल्यानंतर सर्व शिक्षकांना शाळेतच थांबण्याची सूचना केली. सर्व शिक्षक आज काय विशेष! असं म्हणून कार्यालयात आले. मुख्याध्यापकांनी गणेशोत्सवा बाबत चर्चा करायची आहे ,असे म्हणून बोलायला सुरुवात केली. त्यांनी बाईंचे सर्व मुद्दे शिक्षकां समोर ठेवले.
आणि जाहीर केले की या वर्षीपासून आपल्या शाळेतला गणेशोत्सव बंद. एका शिक्षकाने शंका उपस्थित केली की, सर गावकरी नाराज होतील. कशाला त्यांच्याशी वैर घ्यायचे... तशा बाई बोलायला उभ्या झाल्या. सर, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण गावकऱ्यांची नाराजी कशी दूर करायची, हे तुम्ही माझ्यावर सोपवा. गावकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे द्यायची जबाबदारी पूर्णपणे मी सांभाळीन. शाळेवर व पर्यायाने आपल्यावर या निर्णयाचा कोणताही परिणाम होणार नाही याची मी खात्री देते.


शाळेतील गणेशोत्सव बंद होतो का पाहूया पुढच्या भागात भाग तीन मध्ये


छाया बर्वे राऊत अमरावती