Login

आखरी वळण ( भाग 4 ) भय कथा

खेळ थांबलेला नाही .....
समीरचा आत्मा मुक्त झाला असा सगळ्यांना भास होतो.
श्रेयस कॅमेरा हातात घेतो आणि म्हणतो –

“हे सगळं आपण जगलो… रेकॉर्ड केलं… आता शेवट करायचा आहे.”


करिश्मा थोडी शांत झाल्यासारखी वाटत असली तरी तिच्या डोळ्यांत अजूनही तोच रिकामेपणा होता.

सागर त्याच्या नोट्स तपासतो. डायरीतलं शेवटचं वाक्य त्याला अस्वस्थ करतं –


“जर खेळ थांबवायचा असेल… तर खेळ पूर्ण करावा लागतो.”



तितक्यात श्रेयसला खोलीतून काहीतरी हालचाल जाणवते. तो कॅमेरा ऑन ठेवून मागे वळतो…

तिथं अनिल उभा असतो!

डोळे रिकामे, अंगावर काळसर झिंग, ओठ निळे…
तो फक्त हळूहळू म्हणतो –

“आम्ही खेळतोय… अजून संपलेलं नाही.”


करिश्मा त्याच्याकडे धावत जाते, पण सागर तिला थांबवतो –


“तो अनिल नाही… तो आता फक्त पिंजरा आहे.”




अचानक वाड्याचे दरवाजे बंद होतात. सगळीकडे अंधार पसरतो.
जिन्यांच्या आडून लहान मुलांचे पाय दिसतात. वाऱ्याच्या झुळकीत भिंतींवर चित्रं बदलतात – हसणाऱ्या चेहऱ्यांपासून ते आक्रोश करणाऱ्या आत्म्यांपर्यंत.

एक मुलाचा चेहरा झोपाळ्यावर झुलतो…

“तुम्ही सुटलात असं वाटतं? खेळ संपत नाही.
खेळ… तुमचं जीवन आहे आता.”



श्रेयस, सागर आणि करिश्मा पुन्हा त्या तळघरात जातात.
झोपाळा तुटलेला, पण पिंजरा आता रिकामा आहे.

किंवा… तसा वाटतो.

पण नंतर पिंजऱ्यातून झोपाळ्याच्या तुकड्यांपासून एक काळसर धुरासारखा जीव निर्माण होतो.

तो एक लहान मुलाच्या आकृतीसारखा आहे, पण डोकं फिरवलेलं, डोळ्यांत उलटा प्रकाश.
तो म्हणतो –

“तुमचं आत्मा… माझं खेळणं आहे आता.”



सागर त्याच्या कडेवरील राख, जपमाळ, आणि नंदीचं ताबीज घेऊन समोर उभा राहतो.

तो म्हणतो –
“मी आता संपवतो हा खेळ.”


समीर त्याच्यावर झेप घेतो… आणि त्या पिंजऱ्याजवळ सागर स्वतःची उर्जेची आहुती देतो.

अचानक वाड्यात जोरदार स्पंदन होतात – जणू भूकंप. झोपाळा जळायला लागतो, पिंजरा विरघळतो. आणि त्या भस्मातून समीरचा चेहरा पुन्हा एकदा दिसतो –

“माझं झोपाळा ...माझं घर… आता खरंच हरवलं.”


समीरचा आत्मा हळूहळू प्रकाशात मिसळतो.


वाड्यात आता शांतता असते . दरवाजे उघडतात. श्रेयस आणि करिश्मा बाहेर पडतात.

श्रेयस म्हणतो –

“सागर… त्याने आपल्याला वाचवलं.”


ते दोघं गावाकडे परततात. गावकरी त्यांच्या पाया पडतात.
वाडा अखेर शांत झाल्याचं सर्वांना वाटतं…




त्या रात्री श्रेयस त्याच्या यूट्यूब चॅनेलवर शेवटचा व्हिडीओ अपलोड करतो:
“आखरी वळण – सत्य कथा”

तो अंघोळ करून बाहेर येतो… आणि पाहतो –
करिश्मा त्याच्या बेडवर बसलेली असते .

तिच्या हातात तोच खेळण्याचा घोडा आहे…

ती हळूच म्हणते —

“तू जिंकलास श्रेयस…
पण आता माझा खेळ सुरू होतो…”



करिश्मामध्ये समीर परत आलाय का? का तिच्या माध्यमातून नवीन वळण सुरू होणार? वाडा खरंच शांत झालाय ? की आता वाडा चालत फिरणार?

🎭 Series Post

View all