आखरी वळण – भाग १ : "वाड्याची चाहूल"
"जगात सर्वात भयानक गोष्ट कोणती?"
"ती गोष्ट… जिथे मृत्यूचा आवाज ऐकू येतो, पण मृत्यू दिसत नाही!"
ही कहाणी आहे एका वाड्याची… जिथे एकदा पाऊल टाकलं की परतीचा रस्ता बंद होतो.
आणि त्या बंद वळणावर , तुमचं आयुष्य एका झोपाळ्यावर झुलत राहतं.
आणि त्या बंद वळणावर , तुमचं आयुष्य एका झोपाळ्यावर झुलत राहतं.
श्रेयस जोशी, एक प्रसिद्ध हॉरर यूट्यूबर. त्याचं चॅनेल , भय संपले नाही लाखो सब्सक्रायबर्सनी भरलेलं. तो आणि त्याचे तीन मित्र... अनिल (टेक्निकल), सागर (कॅमेरामन), आणि करिश्मा (रिसर्च) – नेहमी एखाद्या अज्ञात जागेचं रहस्य शोधायला जात असतात .
एका रात्री करिश्माला एका जुन्या वाड्याविषयी माहिती मिळते – "समीर वाडा… जिथे गेल्यानंतर कुणीही परत आलं नाही."
गावाचं नाव – कुंभाळवाडी.( कल्पनीक )
त्या वाड्याबद्दल कोणतीच माहिती ऑनलाइन उपलब्ध नव्हती . पण त्या वाड्याच एकच छायाचित्र नेटवर उपलब्ध असते ...झाडांनी झाकलेला वाडा, वरती काळसर ढग, आणि त्या वाड्याच्या एका खोलीतून डोकावतं एक लहानगा चेहरा…
त्या वाड्याबद्दल कोणतीच माहिती ऑनलाइन उपलब्ध नव्हती . पण त्या वाड्याच एकच छायाचित्र नेटवर उपलब्ध असते ...झाडांनी झाकलेला वाडा, वरती काळसर ढग, आणि त्या वाड्याच्या एका खोलीतून डोकावतं एक लहानगा चेहरा…
श्रेयस एकदम उत्साहित होतो –
"हा आपला पुढचा भाग असेल. पण या वेळी... काहीतरी वेगळं आहे हे मात्र नक्की ."
ते चौघं गावात पोहोचले . गाव पूर्ण शांत, जणू काळात अडकलेलं. तिथे पोहोचल्यावर गावकऱ्यांचे चेहरे पाहूनच त्यांना काहीतरी विचित्र वाटल .
त्यांनी विचारल्यावर गावचे सरपंच बोलतात ,
"ते घर नाही... तिथे गिळणारा अंधार आहे."
एक म्हातारी बाई त्यांच्यावर ओरडते –
"तो झोपाळा हलू लागला की मृतांचा खेळ सुरू होतो... समीर अजूनही झोकतो तिथं."
शिवाय, एक गावकरी सांगतो –
“त्या वाड्याच्या आत एक खोली आहे जिथं वेळ थांबतो… आणि जिथं आत्मा झोपायला जात नाही.”
पण भय विसरून श्रेयस म्हणतो:
"हीच तर खरी गोष्ट आहे. आपण शोध घेऊ. लोकांना दाखवू की ही केवळ अफवा आहे!"
गावाबाहेर दोन किलोमीटरवर, जाड झाडांनी वेढलेला, काळसर डोंगराच्या कुशीत – समीर वाडा.
त्याच्या प्रवेशद्वारावर एक मोडकळीस आलेली नंदीशिला – त्यावर गडद रंगात फक्त एक नाव:
"समीर"
"समीर"
ते आत जातात. सडलेले जिने, तुटलेली खिडकी, जमिनीवर अर्धवट जळलेली चित्रं, आणि भिंतीवर एक शब्द –
"माझा खेळ पूर्ण झाला नाही."
"माझा खेळ पूर्ण झाला नाही."
त्यांना वाटतं की ही गमतीसाठी लोकांनी घातलेली सजावट असेल, पण मग झोपाळ्याचा आवाज यायला लागतो…
टक... टक... टक...
अनिल हसत म्हणतो, "घाबरू नका, वाऱ्यामुळे असेल."
पण मग करिश्माच्या हातात झोपाळ्याचं एक तुकडा आपोआप पडतो –
जणू कोणी त्या लाकडातून बाहेर यायचा प्रयत्न करत आहे.
जणू कोणी त्या लाकडातून बाहेर यायचा प्रयत्न करत आहे.
ते सर्वजण वाड्याच्या मुख्य सभागृहात कॅम्प सेट करतात. श्रेयस कॅमेरा चालू ठेवतो.
मध्यरात्री करिश्मा उठते – तिला एका लहान मुलाचा आवाज येतो:
“ताई... मला खेळायला घेऊन चल…”
मध्यरात्री करिश्मा उठते – तिला एका लहान मुलाचा आवाज येतो:
“ताई... मला खेळायला घेऊन चल…”
तिच्या समोर एक मुलगा दिसतो – काळसर चेहरा, डोळ्यांत पाणी नाही, हातात टेडी बिअर.
ती किंचाळते – आणि बाकीचं टीम धावत येतं.
" काय झालं ?" .....श्रेयस बोलतो
"मी... मी काहीही नाही बोलली. पण… तो होता."...करिष्मा अगदी घाबरली होती .
श्रेयस क्लिप पुन्हा पाहतो… आणि खऱ्या कॅमेऱ्यावर त्या मुलाचा अंधुक चेहरा दिसतो.
दुसऱ्या दिवशी सकाळी दरवाजावर एक खेळण्याचा घोडा ठेवलेला दिसतो. तो कोणीच आणलेला नसतो.
श्रेयस त्याला उचलतो… आणि त्याच्या हाती एक चिठ्ठी .... "तू आलास... आता मी झोपणार नाही."
पार्श्वभूमीत त्या झोपाळ्याचा आवाज पुन्हा सुरू होतो…
टक… टक… टक…
टक… टक… टक…
पुढील भागांत काय उलगडेल?
समीर कोण आहे?
त्याचं बलिदान का दिलं गेलं?
वाडा स्वतः जिवंत आहे का?
आणि सर्वात महत्त्वाचं – हे सगळं सत्य आहे की फक्त खेळ?
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा