Login

आखरी वळण ( भाग 3 ) भय कथा.

तो खर्च मुक्त झाला का ? ....
bhag 3


आखरी वळण – भाग ३




अनिल गायब झाल्यानंतर वाड्यात एक विचित्र शांतता पसरते. श्रेयस, सागर आणि करिश्मा त्याला शोधायला बाहेर पडतात. तळघर, जिने, गच्ची, मागच्या विहिरीपर्यंत सर्व ठिकाणी ते पाहतात.
ते विहिरीजवळ पोहोचतात, आणि त्यांना तिथं अनिलचा चपला आणि घड्याळ सापडतं.

श्रेयस जवळ गेल्यावर त्याला पायथ्याशी काहीतरी चमकतं दिसतं — एक मोठ्ठं लोखंडी पिंजऱ्यासारखं जाळं.. विहिरीच्या तळाशी असते .
आणि त्या तळामध्ये काहीतरी हालतंय…

करिश्मा धडधडत्या आवाजात म्हणते,

“ती विहीर... हे काही फक्त पाणी नाही हे गिळतं.”


सागर डायरीचे मागचे काही पानं वाचतो. त्यात स्पष्ट लिहिलं असतं की वाड्याच्या आत एक "शापित पिंजरा" आहे, ज्यात समीरचा आत्मा अडकलेला आहे.

"त्याने मला बंद केलं. अंधारात. माझं घोडा आणि मी... आम्ही एक झालो."
"तो झोपाळा आता माझं शरीर आहे... आणि माझं मन त्या पिंजऱ्यात बंद."


सागर विचार करतो की जर तो पिंजरा शोधून त्याचा फुगा फोडला, तर कदाचित आत्मा मुक्त होईल.


अचानक करिश्मा हळूहळू वेगळी वागू लागते. ती एकटीच बसून भिंतींशी बोलू लागते, गालांवर लहान मुलासारखा गोंजारी हसत म्हणते —

“हो ना? मी तुला वाचवेन…”


श्रेयस तिच्या जवळ जातो.
करिश्मा त्याच्याकडे बघते… पण तिच्या डोळ्यात आता करिश्मा नाही… समीर असतो .

“तुला वाटतं का की तू मला मुक्त करशील? पण का? मी मरणार नव्हतो! मला खेळायचं होतं!”


श्रेयस घाबरतो. सागर पटकन पवित्र जल करिश्मावर शिंपडतो, आणि ती शुद्धीत येते .

ती रडत म्हणते,

“तो माझ्या आत होता… त्याचे विचार… त्याचं दु:ख… मी जगले ते.”



तळघरात त्या झोपाळ्याखाली रक्ताचे ठसे दिसतात. श्रेयस आणि सागर पिंजऱ्याचा शोध घेतात आणि भिंती मागून एक गुप्त दार सापडतं. दार उघडल्यावर त्यांना दिसतं – एक खोली… मध्यभागी लटकवलेला पिंजरा.
त्याच्या आत एक खेळण्याचा घोडा आणि त्यावर लहानसा कंकाल!

त्यांचं अंग थरथरतं.
त्या खोलीतच जमिनीवर मंत्राने लिहिलं असतं –

“हा खेळ अधुरा आहे. पूर्ण होईल तेव्हा आत्मा मुक्त होईल.”


पण तितक्यात दरवाजा आपोआप बंद होतो. खोलीतील दिवे एकामागून एक बंद होतात. आणि समोर फक्त झोपाळा हलतो.



एक आवाज घुमतो —
“तुम्ही माझ्या खेळात आलात… आता बाहेर जाणं शक्य नाही.”


समीरचा आत्मा प्रकट होतो – त्याच्या चेहऱ्यावर राग, दु:ख आणि निरागसतेचा एक विचित्र मिलाफ.

तो सांगतो –
“माझा बाप म्हणाला की मी देवाला भेटणार… पण मी भेटलो अंधाराला.”
“मी काहीच मागितलं नव्हतं. फक्त खेळणं… फक्त आई…”


श्रेयस चिडून म्हणतो,
“समीर! आम्ही तुझी मदत करायला आलो आहोत.”


पण समीर उत्तरतो:

“उशीर झालाय... आता वाड्याची रक्त प्यायची वेळ झालीये.”



सागर त्याच्या अंगठीत भरलेली राख काढतो – ती शुद्ध राख असते, जी आत्म्याला शांत करण्यासाठी उपयोगी असते.

श्रेयस आणि तो त्या राखेचा झोपाळ्यावर आणि पिंजऱ्यावर वापर करतात.
आवाज प्रचंड वाढतो… समीर ओरडतो…

“माझं घोडा ....माझं घर… माझं आयुष्य तुम्ही नष्ट करताय! मी तुम्हाला झुलवणार!”


त्याच वेळी करिश्मा दुसऱ्या बाजूने त्या पिंजऱ्यावर दिव्याचा प्रकाश टाकते…
आणि एकदम पिंजरा हलायला लागतो. आत असलेला आत्मा थरथरतो… आणि भुईवर आदळतो…



वाड्यात एक विस्फोटासारखा आवाज होतो. झोपाळा हलायचा बंद होतो . हवा शांत होते. सगळं थांबल्यासारखं वाटतं…

पण…

श्रेयस कॅमेरा घेतो आणि बाहेर निघतो.

करिश्मा त्याच्यापाठी येताना एकदम थांबते.

तिच्या चेहऱ्यावर आता एक लहानसं हास्य होत … आणि तिच्या मागे वाड्याच्या सावलीत, झोपाळ्यावर समीर पुन्हा हलायला लागतो.



समीरचं आत्मा निघाला का? वाडा शांत झाला… की अजून खेळ बाकी आहे ?अनिल कुठे गेला? आणि करिश्माच्या डोळ्यांमधून कोण बघतोय? जाणून घेण्यासाठी वाचत राहा आखरी वळण.

🎭 Series Post

View all