#कौटुंबिककथा
पूर्ण कथा काल्पनिक आहे याचा वास्तवाशी कोणताही संबंध नाही..
आभाळमाया (१)
संजीवनी लग्न करून आपल्या घरी म्हणजेच सासरी आलेली. तिला भीती वाटत होती की सासर कस असेल ? सगळे मला सांभाळून घेतील का की जे आतापर्यंत मारहाण, टोमणे घडत आल आहे तसच. सासू , सासरे , दिर, जाऊबाई कसे असतील यांचा स्वभाव कसा असेल ? असे अनेक प्रश्न तिच्या मनात घोळत होते.
उद्या सत्यनारायण असल्याने सगळे लवकर झोपले होते. कारण उद्या लवकर उठून खूप काम करायची होती. जेवून झाल्यावर सगळे आपापल्या खोलीत झोपायला निघून गेले. संजीवनी आणि जाऊबाई एका खोलीत तर तिचा नवरा आणि दिर एका खोलीत झोपणार होते.
खोलीत आल्या आल्या संजीवनीने लग्नाची साडी काढून एक साधी साडी घातली आणि उद्या लवकर उठायचं म्हणून तशीच झोपून गेली. तिची जाऊबाई जेव्हा खोलीत आल्यावर तिला अस झोपताना बघून त्यांनी तोंडच वाकड केले.
जाऊबाई मनात " ही तर खोलीत आल्या आल्या झोपून गेली. जसं काय ही हीचीच खोली आहे. साधं माझी वाट पण बघितली नाही. सासूबाई तर खूपच वाहवा करत होत्या आज. उद्या बघते हिला. असा खेळ मांडेल ना की सासूबाई हीच जीवन नरकमय नाही केल ना बघ. " मनात काहीतरी विचार करून त्या कपडे बदलण्यासाठी निघून गेल्या.
संजीवनीने जाऊबाईची म्हणजेच शैलाची खूप वाट पाहिलेली पण उद्या लवकर उठायचं म्हणून काही विचार न करता कपडे बदलून तशीच झोपून गेलेली.
शैलाला सासूबाईंनी लग्नात प्रत्येकवेळी संजिवनीची वाहवा केलेलं आवडल नव्हत. तेव्हापासूनच तिच्या मनात संजीवनी विषयी तिच्या मनात विष निर्माण झाल. आधी सासूबाई तिच्या प्रत्येक कामात प्रशंसा करायच्या यामुळे तिला प्रशंसेची सवय झालेली. अचानक सासूबाई संजीवनीची प्रशंसा करू लागल्या. हे बघून शैलाला सासूबाईच वागणं खटकत होत आणि सोबत द्वेष निर्माण होत होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी...
संजीवनीला सवय असल्याने ती सकाळी लवकरच पाच वाजता उठली. तिच्यासोबत शैला पण उठली.
संजीवनीला बाथरूमच्या जाताना बघून शैला पटकन " संजीवनी.. "
शैलाच्या आवाजाने संजीवनी जागीच थांबली आणि मागे वळून " काय झालं ताई ? "
शैला " ह.. मी आधी आवरून घेऊ का ? कारण खूप कामे पडली आहेत. "
संजीवनी " हो चालेल ताई. तुम्ही घ्या आवरून. "
संजीवनीचा होकार ऐकून शैला लगेच आपले कपडे घेऊन बाथरुममध्ये गेली. आत येताच तिच्या चेहऱ्यावर राक्षसी हसू पसरल. शैला स्वतःशीच " आता बघ संजीवनी तुझी सासू आता कशी टोमणे मारते. " एवढ बोलून शैलाने पटकन आवरून घेतल आणि राक्षसी हसतच खोलीतून बाहेर निघून गेली.
थोड्यावेळाने संजीवनी आवरून बाहेर आली. बघते तर सगळे नाश्त्याला बसले होते. संजीवनी सगळ्यांसमोर येत " माफी असावी आई. खूप उशीर झाला. "
सासूबाई " अग... काही हरकत नाही. ये बस हे ज्यूस आणि काही फळे खाऊन घे. "
संजीवनी सासू काही बोलली नाही म्हणून तिला हायस वाटल आणि गप्पपणे सासूच्या बोलण्यावर नाश्ता करायला बसली.
तर इथे शैलाच्या मनात रागाचा ज्वालामुखी बरसत होता. ती मनातच " इतक करून पण सासूबाई काही बोलल्या नाहीत."
काहीवेळापूर्वी...
शैला आवरून बाहेर आली तेव्हा सासूबाई सोफ्यावर बसून काहीतरी करत होत्या. संधी बघून शैला त्यांच्या जवळ येऊन शेजारी बसली.
शैला " आई.. संजीवनीला खूपच उशीर झाला बघा ना. तिच्या आईने तिच्याबद्दल काय काय सांगितल होत आणि इथे बघा उशिरा उठते काय , लवकर झोपते काय. काल तर मला न विचारता झोपली. " एवढ बोलून तिने त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल. त्या कसला तरी विचार करत होत्या. तिला वाटल संजीवनीबद्दल विचार करत असणार. म्हणजे आपल बोलण त्यांना पटल असेल म्हणून त्या इतका विचार करत आहेत.
संजीवनीबद्दल सासूच्या मनात विष घोळून काहीच फायदा नाही झाला. हे बघून शैलाला खूपच राग येत होता. संजीवनीला उशीर व्हावा म्हणून तिने साबण आणि ब्रश अश्या ठिकाणी लपवून ठेवलं होत की तिला शोधायला खूप वेळ लागेल. पण हे करून पण काही फायदा नाही झालेला.
सर्वांचा नाश्ता झाल्यावर थोड्याच वेळात पूजा सुरू झाली. पूजा तीन तास चालू होती. पूजा संपल्यावर संजीवनी आणि तिचा नवरा ऋषीने मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन नव्या नात्यांना , नव्या जीवनाला सुरुवात केली.
प्रसादाचा लाभ घेऊन एक एक करून पाऊणे जात होते. थोड्याच वेळात सगळे पाऊणे गेल्यावर सासूबाईंनी आपल्या दोन्ही सूनांना आपल्याजवळ बोलवून घेतलं.
दोघी त्यांच्या समोर आल्या तस दोघींना आपल्या बाजूला बसवून दोघींच्या हातात काही कागद दिली. कागदात काय असेल म्हणून दोघींनी ते कागद वाचायला सुरुवात केली. कागदात लिहिलेलं वाचत असताना संजिवनीच्या चेहऱ्यावर हसू पसरत होत. पण शैलाच्या मनात राग खदखदत होता. तिचा चेहरा निर्विकार होता. तिच्या मनात काय चालू आहे हे कोणालाच समजत नव्हत.
क्रमशः
©भाग्यश्री परब
©भाग्यश्री परब
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा