सासू.....सुन.......
सासू म्हणजे सारख्या सूचना व सुन म्हणजे सूचना नको
हा वाद प्रत्येक पिढी मधे दिसून येतो आजकाल तर व्यक्तिस्वातंत्र्य चे पेव च फुटले आहे .त्या मुळे पूर्वीच्या सासू सारख्या आताच्या सासवा नाहीत आणि पूर्वीच्या सूने सारखी आताची सुन नाही. दोघींनाही व्यक्तिस्वातंत्र्याचा अभिमान. प्रत्येकीला स्वतःची अशी space हवी, त्यामूळे होत काय की जे आपल्याकडे आहे ते न बघता दुसऱ्याचे चांगलें वाटायला लागते. म्हणजे एखादीची सासू कामात मदत करत असेल ,सगळी घरातली व्यवस्था बघत असेल तर सुनेला वाटते ,काय यांची लुडबुड ,? आम्ही कधी शिकणार ? आणि एखाद्या सासूने घरतल्या जबाबदारीतून अंग काढून घेतले तर सून म्हणणार पहा जसं काही मी यायचीच वाट पहात होत्या. कशाला..... म्हणुन हात लावत नाहीत. जबाबदारी टाळतात. नाहीतर बाजूच्या नीलिमाच्या सासू बाई बघा? किती अजूनही सगळे सगळ्यांचं करत असतात. म्हणजे काय आपल्या कडे आहे ते सकारात्मक दृष्टीने पहायचे च नाही.
तूम्ही कधी सासरे बुवा व जावई बापु यांचे भांडण झालं अस ए कल आहे का ? ते कसे एकमेकांस समजावून घेतात. ?त्यांचे नाही कुठे इगो दुखावत ते?पण खर कारण तर "सत्ता ".....हाच वाद असण्याचे कारण .प्रत्येकाला स्वतःची सत्ता हवी असते.मी इतकी वर्षे एक एक पै करुन या वस्तु जमवल्या आणि आता ही आली हक्क सांगायला? अशी सासूची अवस्था असते. तर नवीन सूनबाई म्हणत असते केला न पई पई करुन संसार आता आम्हाला करू द्या. करा की जरा आराम सारख्या काय सूचना द्यायच्या. आम्हाला ही स्वतंत्र मत आहेत ?आम्ही ही कमावतो ? आमचे निर्णय आम्हीच घेणार. आम्ही ठरवणार आम्हाला आमच जीवन कस घडवायचं आहे ?आमच्या मुलांचे आयुष्य कसे घडवायचे ?ते . यात सासू सुने मधे ढोलकी मात्र होते नवरा v सासरा यांची त्यांना कळतच नाही कोणाची बाजू घ्यावी ते.खूप ठिकाणी वाद चालू झाले की पुरुष मंडळी बाहेर फिरायला गेलेली दिसतात. कोणाचीच बाजू घ्यायला नको.
पण सासूने जर समजून घेतले "सांस भी कभी बहू थी" आणि सुनेने समजून घेतले अजून किती दिवस राहीले आहेत यांचे...? आपण दुसरी काय करतेय ते पाहूच नाही आपल्याला जमेल ते आपण करावे व न बघितल्या सारखे ,न ऐकल्या सारखेच वागावे. तरच सासू सुनेचे नाते "विळ भोपळा" चे न रहाता आई मुलीचे होईल यात शंकाच नाही.
तूम्ही कधी सासरे बुवा व जावई बापु यांचे भांडण झालं अस ए कल आहे का ? ते कसे एकमेकांस समजावून घेतात. ?त्यांचे नाही कुठे इगो दुखावत ते?पण खर कारण तर "सत्ता ".....हाच वाद असण्याचे कारण .प्रत्येकाला स्वतःची सत्ता हवी असते.मी इतकी वर्षे एक एक पै करुन या वस्तु जमवल्या आणि आता ही आली हक्क सांगायला? अशी सासूची अवस्था असते. तर नवीन सूनबाई म्हणत असते केला न पई पई करुन संसार आता आम्हाला करू द्या. करा की जरा आराम सारख्या काय सूचना द्यायच्या. आम्हाला ही स्वतंत्र मत आहेत ?आम्ही ही कमावतो ? आमचे निर्णय आम्हीच घेणार. आम्ही ठरवणार आम्हाला आमच जीवन कस घडवायचं आहे ?आमच्या मुलांचे आयुष्य कसे घडवायचे ?ते . यात सासू सुने मधे ढोलकी मात्र होते नवरा v सासरा यांची त्यांना कळतच नाही कोणाची बाजू घ्यावी ते.खूप ठिकाणी वाद चालू झाले की पुरुष मंडळी बाहेर फिरायला गेलेली दिसतात. कोणाचीच बाजू घ्यायला नको.
पण सासूने जर समजून घेतले "सांस भी कभी बहू थी" आणि सुनेने समजून घेतले अजून किती दिवस राहीले आहेत यांचे...? आपण दुसरी काय करतेय ते पाहूच नाही आपल्याला जमेल ते आपण करावे व न बघितल्या सारखे ,न ऐकल्या सारखेच वागावे. तरच सासू सुनेचे नाते "विळ भोपळा" चे न रहाता आई मुलीचे होईल यात शंकाच नाही.
सौ. माधुरी बर्वे ,(तारापूर,)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा