Login

अजब गजब लग्न - भाग 51 अंतिम भाग

पाखी आणी राज एकत्र येतील का? त्यांच्या आणी तिच्या आजोबांना सगळे समजेल का? त्यांचे पुढे काय होईल.
दीर्घकथा लेखन स्पर्धा  डिसेंबर- जानेवारी 2025-26
अजब गजब लग्न - भाग 51 अंतिम भाग


असेच दिवस हातातून निसटत होते…
आनंद, गप्पा आणि नव्या नात्याच्या ओलाव्यात.

राज आणि पाखीचं बोलणं आता औपचारिक राहिलं नव्हतं.
सकाळ “गुड मॉर्निंग”ने सुरू व्हायची
आणि रात्री “आज खूप आठवण आली”वर संपायची.
एकमेकांच्या सवयी, हसू, शांतता… सगळं हळूहळू जवळ येत होतं.

राशी आणि रवी पाखीला भेटून गेले.
राशीने पाखीला मिठीत घेतलं,
“आता तुझ्या चेहऱ्यावरचा गोंधळ नाहीसा झालाय,” ती हसत म्हणाली.
रवी दूर उभा राहून सगळं पाहत होता…
मनातून निश्चिंत.

राज आणि पाखीच्या भेटी वाढत गेल्या. कधी कॉफी, कधी मंदिर, तर कधी लग्नाच्या खरेदीसाठी मार्केट.
राज पाखीसाठी साडी निवडताना जास्त गोंधळायचा,
आणि पाखी त्याला पाहून हसायची.

“हे लग्न माझं आहे की तुझं?” ती चिडवत म्हणायची.
“आपलं आहे,” राज शांतपणे उत्तर द्यायचा.

लग्नाची तयारी जोरात सुरू झाली होती. कपडे, दागिने, निमंत्रणं, घरभर गडबड आणि हशा.

पाखीचे आजोबा घरी परत आले होते. घरात त्यांची उपस्थिती म्हणजेच धीर. ते प्रत्येक कामात रस घेत होते,
कधी राजशी चर्चा, कधी पाखीशी गप्पा.

“हे लग्न फक्त विधी नाही,” आजोबा म्हणाले,
“हे दोन मनांचं पुनर्मिलन आहे.”

घर पुन्हा एकदा हसऱ्या आवाजांनी भरून गेलं होतं. आणि पाखीला जाणवत होतं…

काही वेळा आयुष्य उशिरा उत्तर देतं,
पण जेव्हा देतं… ते अगदी योग्य क्षणीच देतं.

......

असेच छान दिवस गेले.. लग्नाचा दिवस उजाळला होता.

आज लग्न होतं…
आणि आज सगळंच वेगळं, सगळंच खास होतं.

मंडप फुलांनी सजलेला होता,
हवेत अगरबत्तीचा सुवास आणि मंगलाष्टकांचा गूंज.
पाखी लाल साडीमध्ये अतिशय सुंदर दिसत होती, डोळ्यांत थोडी लाज, थोडा आनंद आणि खूपसं प्रेम.
कपाळावरचं कुंकू तिच्या आयुष्याच्या नव्या सुरुवातीसारखं चमकत होतं.

राज शेरवानीमध्ये देखणा वाटत होता. पाखीकडे पाहताना त्याच्या डोळ्यांत अभिमान, प्रेम आणि दिलासा सगळंच होतं.
“शेवटी तू माझ्याच समोर उभी आहेस,”
असं त्याचं मन हळूच म्हणत होतं.

मंगलाष्टकं सुरू झाली…
प्रत्येक शब्दासोबत दोघांची मनं जवळ येत होती.
अक्षता उधळल्या गेल्या,
आणि त्या क्षणासोबत जुन्या गैरसमजांचा शेवट झाला.

सप्तपदी घेताना पाखीचा हात थोडा थरथरत होता,
राजने तो घट्ट पकडला. तो स्पर्शच जणू म्हणत होता
“आता कधीच सोडणार नाही.”

आजोबांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते.
दोन्ही घरांत समाधान होतं.
जे नातं आधी कागदावर बांधलं गेलं होतं,
ते आज मनाने, प्रेमाने आणि विश्वासाने पुन्हा जुळलं होतं.

आज त्यांचं फक्त लग्न नव्हतं…
आज दोन हरवलेली मनं
शेवटी एकमेकांत विसावली होती.


आज त्यांचं लग्न झालं होतं…
पण हे लग्न वेगळं होतं.

कधी काळी त्यांनी अजब-गजब, घाईत आणि न समजलेल्या भावनांत लग्न केलं होतं.
तेव्हा नात्याला नाव होतं, पण ओळख नव्हती.
हातात हात होते, पण मनं दूर होती.

आज मात्र सगळं बदललं होतं.

आज त्यांनी एकमेकांना ओळखून, समजून,
माफी मागून, माफी देऊन पुन्हा लग्न केलं होतं.
आज हे नातं कागदावर नाही, तर हृदयात घट्ट रुजलं होतं.

पाखी राजकडे पाहून हसली…
तो हसण्यात तिला सगळं आयुष्य दिसलं.
राजने पाखीचा हात धरला,
आणि तो हात सोडणार नाही, हे मनाशी पक्कं केलं.

आजोबांचे आशीर्वाद, घरच्यांचा आनंद,
आणि दोघांच्या डोळ्यांत स्वप्नांनी भरलेलं भविष्य…

ज्या कथेची सुरुवात गोंधळाने झाली होती,
तिचा शेवट मात्र प्रेमाने झाला.

कारण काही नाती
वेळेआधी जुळतात…
पण योग्य वेळीच खऱ्या अर्थाने बांधली जातात.


राज आणि पाखी एकमेकांचे झाले…
फक्त लग्नाने नाही, तर मनाने.

जे तुटले होते ते प्रेमाने जोडले गेले,
जे न बोलले गेले ते डोळ्यांतून व्यक्त झाले.
आता प्रश्न नव्हते, शंका नव्हत्या
फक्त ते दोघे होतं.

हातात हात घेऊन त्यांनी ठरवलं,
पुढचं प्रत्येक पाऊल एकत्र चालायचं.
दुःख आलं तर वाटून घ्यायचं, आनंद आला तर अधिक घट्ट धरायचं.

राज आणि पाखी एकमेकांचे झाले…
आणि ही गोष्ट इथेच संपली नाही,
इथूनच त्यांच्या खऱ्या संसाराची सुरुवात झाली.


समाप्त



"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all