" आई सगळ्यांना माझे गाणे खूप आवडले. मला माझ्या कामा बद्दल ट्राॅफी दिली बघ ही."
" खूपच छान झाले."
" शैलजाची आई ऐकलत का जरा."
" बोला ना."
" शैलजाकरता एक स्थळ उत्तम चालून आले आहे."
" बाबा, मला इतक्यात लग्न नाही करायच."
" योग्य वयात लग्न झालेल चांगले असते पोरी."
" पण माझ्या सारख्या मुलीला कोण पसंत करेल."
" कोणाची हिंमत माझ्या सोन्यासारख्या मुलीला नाही म्हणायची."
" माझी तब्येत यासगळ्यात मधे आली तर."
" आता लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोण बदलला आहे."
" जो मला माझ्यातल्या गुणांवरुन पसंत करेल तोच खर माझा नवरा होईल."
" बरोबर बोलली तू."
" काय हो, पाहुणे तर पाहूण गेले. पण अजून काही निरोप नाही आला."
" अग त्यांनी नकार सांगितला आहे."
" कारण काय बोलले ते."
" तिची तब्येत जास्त आहे."
" आजच्या काळात पण अशी लोक आहेत का? जी बाह्यरुपाला महत्व देतात. व्यक्तिच्या गुण आणि कर्तृत्वाला कवडीमोल समजतात."
" भरपूर स्थळ आहे जगात. तसेही बर झाल आताच कळाले त्यांचे खर काय."
" शैलजाला काय सांगणार आपण स्थळा बाबत."
" त्यांनी आधी पण एक मुलगी पाहिली होती. तिला पसंत केले सांगायचे."
" तसही तिच्या डोक्यात हा प्रश्न येणारच नाही."
" बरोबर आहे तुमचे."
" जोशीचा राहूल काल कॅनडा वरुन आला आहे. त्याने आपल्याला घरी जेवायला बोलवले आहे."
" शैलजा, उद्या आपल्याला तुझ्या बाबांच्या मित्राकडे जेवायला जायचे आहे."
" आई, तुम्ही दोघ जावून या. मी जरा हे पुस्तक वाचते."
" नंतर वाच ग. चल जरा बाहेर तेवढेच तुला बर वाटेल."
" जोशी आलो बर का तुला भेटायला."
" तुमचीच वाट पाहत होतो. "
" राहूल ये रे इकडे. हा माझा खास मित्र रानडे. ह्या त्यांच्या मिसेस आणि हि त्यांची मुलगी शैलजा आणि हा मुलगा मोहन."
" ओके. तुम्हा सर्वांना भेटून आनंद झाला खूप. काय करता तुम्ही शैलजा आणि मोहन."
" माझी पी.एच.डी झाली आणि मी काॅलेजमधे लेक्चरर आहे."
" माझी काॅर्मस मधे मास्टर डिग्री झाली. मी बॅंकेत नोकरीला आहे."
" छान शैलजा तुमचे खूप अभिनंदन. या काळात कोण शिक्षणा बाबत एवढे सिरीयस नाहीत. मोहन तुमचे देखील अभिनंदन."
" गप्पा झाल्या असतील तर जेवण करुन घेवूयात आणि परत पुन्हा गप्पा मारुयात."
शैलजा आणि राहूल गप्पा मारत खूप वेळ बोलत बसतात.
" अहो, शैलजा आधी यायला तयार नव्हती आता बघा राहूल सोबत किती गप्पा मारत आहे."
" निघायच का आता शैलजा आणि मोहन."
" हो जावूया बाबा."
" कोणीतरी यायला तयार नव्हते. तिथे मात्र गप्पा मारत घरातून निघावस वाटत नव्हते कोणाला."
" मोहन, तुझे आपले काहीतरीच. आमचे प्रोफेशनल बोलणे चालले होते. त्याला देखील पी.एच. डी करायची आहे. त्या बद्दलच बोलत होतो."
शैलजाच्या मदतीने राहूल तीन वर्षात पी.एच. डी ची परीक्षा पूर्ण करतो.
" शैलजा मला एक तुम्हांला सांगायचे आहे."
" सांगा की."
" माझ तुमच्यावर खूप प्रेम आहे. पहिल्याच नजरेत मला तुम्ही आवडले होते."
" खर का."
" अस का विचारता."
" मी दिसायला अशी. तुम्ही तर कॅनडा वरुन आला आहात. तिकडे असेलच तुमची एखादी मैत्रीण."
" मैत्रिणी खूप आहे. पण बायको मात्र एकच असते ना."
" तुम्हांला मी पसंत आहे ना."
" सांगेल मी एक-दोन दिवसात."
" एवढे दिवस वाट पाहावी लागेल का मला."
" आता मला जायला हव. "
" हो. निरोप सांगाल मला."
" जोशी जरा उद्या तुम्ही सगळे आमच्याकडे जेवायला या."
" हो येतो ना."
" तर आपल्या पोरांनी एकमेकांना पसंत केले आहे. लग्नाचा बार लवकर उडवून द्यायला हव."
" खर का? राहूल."
" अ ते... हो ते आपल. "
" काय ओ तुम्ही घरच्यांसमोर माझी बोबडी वळवलीत."
" माझ्या पोरीला समजून घेणारा. तिच्या गुणांना प्राधान्य देत तिच्यावर प्रेम करणारा जोडीदार मिळाला. अजून काय हव. "
राहूल आणि शैलजाचे लग्न दणक्यात पार पडले होते. त्यांचा सुखाचा संसार सुरु झाला होता.
समाप्त:
विषय : होते कुरुप वेडे
जलद लेखन फेब्रुवारी
जलद लेखन फेब्रुवारी
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा