गरुड कधीच थव्यात उडत नाही… आणि म्हणूनच तो वेगळा असतो....लेखक: सुनिल जाधव पुणेTM 9359850065.
“तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही”
अशी भीती मनात कधीच बाळगू नका.
कारण थव्याने उडणाऱ्या पक्ष्यांपेक्षा गरुडाची झेप नेहमीच मोठी असते.
अशी भीती मनात कधीच बाळगू नका.
कारण थव्याने उडणाऱ्या पक्ष्यांपेक्षा गरुडाची झेप नेहमीच मोठी असते.
इतिहास, समाज आणि जीवन याकडे नीट पाहिलं तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते, मोठे बदल नेहमी एकट्या माणसामुळेच घडले आहेत. गर्दीने क्रांतीला आकार दिला असेल, पण त्या क्रांतीचा पहिला विचार, पहिली ठिणगी नेहमी एका एकट्या मनातच पेटलेली असते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाहा.
संपूर्ण समाजविरोध, अपमान, बहिष्कार, उपेक्षा… तरीही ते थांबले नाहीत. त्या काळात त्यांच्यासोबत उभं राहणारे मोठे थवे नव्हते. होते ते फक्त त्यांचं ज्ञान, त्यांचा अभ्यास आणि त्यांच्या मनात पेटलेली समानतेची ज्योत. एकट्याने संविधान लिहिण्याचं धैर्य त्यांनी दाखवलं, कारण त्यांना माहीत होतं, इतिहास थव्याने घडत नाही, तो विचारांनी घडतो.
संपूर्ण समाजविरोध, अपमान, बहिष्कार, उपेक्षा… तरीही ते थांबले नाहीत. त्या काळात त्यांच्यासोबत उभं राहणारे मोठे थवे नव्हते. होते ते फक्त त्यांचं ज्ञान, त्यांचा अभ्यास आणि त्यांच्या मनात पेटलेली समानतेची ज्योत. एकट्याने संविधान लिहिण्याचं धैर्य त्यांनी दाखवलं, कारण त्यांना माहीत होतं, इतिहास थव्याने घडत नाही, तो विचारांनी घडतो.
सावित्रीबाई फुले…
आज त्यांचं नाव आदराने घेतलं जातं, पण त्या काळात त्यांचा प्रवास किती एकाकी होता याची कल्पनाही आजच्या पिढीला येणं कठीण आहे. शाळेत जाताना अंगावर शेण, दगड फेकले जात होते. समाजाने स्वीकारलं नाही, अपमान केला. तरीही त्या थांबल्या नाहीत. कारण त्यांना माहीत होतं, माझ्या एकट्या पावलांमुळे उद्याच्या हजारो मुली चालायला शिकतील. हा गरुडाचा आत्मविश्वास होता.
आज त्यांचं नाव आदराने घेतलं जातं, पण त्या काळात त्यांचा प्रवास किती एकाकी होता याची कल्पनाही आजच्या पिढीला येणं कठीण आहे. शाळेत जाताना अंगावर शेण, दगड फेकले जात होते. समाजाने स्वीकारलं नाही, अपमान केला. तरीही त्या थांबल्या नाहीत. कारण त्यांना माहीत होतं, माझ्या एकट्या पावलांमुळे उद्याच्या हजारो मुली चालायला शिकतील. हा गरुडाचा आत्मविश्वास होता.
झाशीची राणी लक्ष्मीबाई…
ब्रिटिश सत्तेच्या प्रचंड ताकदीसमोर उभी राहिलेली एक स्त्री. अनेकांनी साथ सोडली, काहींनी भीतीपोटी पाठ फिरवली. पण राणी थांबली नाही. कारण तिला माहीत होतं, इतिहासात नाव कोरण्यासाठी संख्येची नाही, धैर्याची गरज असते. तिची झेप एकटीची होती, पण तिचा प्रभाव आजही हजारोंच्या मनात आहे.
ब्रिटिश सत्तेच्या प्रचंड ताकदीसमोर उभी राहिलेली एक स्त्री. अनेकांनी साथ सोडली, काहींनी भीतीपोटी पाठ फिरवली. पण राणी थांबली नाही. कारण तिला माहीत होतं, इतिहासात नाव कोरण्यासाठी संख्येची नाही, धैर्याची गरज असते. तिची झेप एकटीची होती, पण तिचा प्रभाव आजही हजारोंच्या मनात आहे.
वीर सावरकर…
काळ्या पाण्याची शिक्षा, एकाकी कारावास, मानसिक आणि शारीरिक छळ. तेव्हा त्यांच्यासोबत कोण होतं? ना थवा, ना टाळ्या, ना पाठ थोपटणारे शब्द. होते ते फक्त त्यांचं विचारस्वातंत्र्य आणि देशासाठी जळणारी आग. एकटेपणात त्यांनी इतिहास लिहिला, कारण त्यांना माहीत होतं, स्वातंत्र्याचं स्वप्न पाहणारे नेहमी आधी एकटेच असतात.
काळ्या पाण्याची शिक्षा, एकाकी कारावास, मानसिक आणि शारीरिक छळ. तेव्हा त्यांच्यासोबत कोण होतं? ना थवा, ना टाळ्या, ना पाठ थोपटणारे शब्द. होते ते फक्त त्यांचं विचारस्वातंत्र्य आणि देशासाठी जळणारी आग. एकटेपणात त्यांनी इतिहास लिहिला, कारण त्यांना माहीत होतं, स्वातंत्र्याचं स्वप्न पाहणारे नेहमी आधी एकटेच असतात.
नेताजी सुभाषचंद्र बोस…
मुख्य प्रवाहाच्या राजकारणाशी मतभेद, स्वतःचा वेगळा मार्ग, वेगळं धाडस. अनेकांनी विरोध केला, अनेकांनी गैरसमज केले. पण नेताजी थांबले नाहीत. त्यांनी स्वतःचा मार्ग निवडला, कारण त्यांना माहीत होतं, थव्यात राहिलं तर सुरक्षितता मिळेल, पण देशाला दिशा देण्यासाठी एकट्यानेच पुढे जावं लागतं.
मुख्य प्रवाहाच्या राजकारणाशी मतभेद, स्वतःचा वेगळा मार्ग, वेगळं धाडस. अनेकांनी विरोध केला, अनेकांनी गैरसमज केले. पण नेताजी थांबले नाहीत. त्यांनी स्वतःचा मार्ग निवडला, कारण त्यांना माहीत होतं, थव्यात राहिलं तर सुरक्षितता मिळेल, पण देशाला दिशा देण्यासाठी एकट्यानेच पुढे जावं लागतं.
हे सगळे इतिहासातील गरुड आहेत.
त्यांनी एकटेपणाला शाप मानला नाही, तर ताकद मानली. त्यांनी भीतीला मित्र बनवलं आणि संघर्षाला शिस्त.
त्यांनी एकटेपणाला शाप मानला नाही, तर ताकद मानली. त्यांनी भीतीला मित्र बनवलं आणि संघर्षाला शिस्त.
आज आपल्या आयुष्यातही आपण अनेकदा एकटे पडतो. मित्र कमी होतात, साथ सुटते, अपेक्षा अपूर्ण राहतात. तेव्हा आपण स्वतःलाच दोष देतो, कदाचित मी अपुरा आहे. पण खरं तर तो काळ असतो तुमच्या घडणीचा. गरुड जेव्हा उडायला शिकतो, तेव्हा त्याला थव्यात बसून शिकवलं जात नाही. त्याला कड्यावरून ढकललं जातं. खाली पडण्याची भीती असते, पण त्याच क्षणी पंखांची खरी ताकद बाहेर येते.
थव्यात उडणारे पक्षी सुरक्षित असतात, पण ते कधीच आकाशाची मर्यादा ओलांडत नाहीत. त्यांचं उडणं ठरलेलं असतं. गरुड मात्र स्वतःची उंची स्वतः ठरवतो. तो एकटा उडतो, कारण त्याला माहीत असतं, माझी झेप वेगळी आहे.
आपण एकटे आहोत याचा अर्थ आपण अपयशी आहोत असा होत नाही. कधी कधी देव, नियती किंवा काळ आपल्याला एकटं करतो, कारण आपल्याकडून काहीतरी वेगळं घडवून घ्यायचं असतं. मोठी स्वप्नं नेहमी एकट्या मनातच टिकतात; गर्दीत ती लवकर मावळतात.
आज जर तुम्ही संघर्षात एकटे असाल, तर इतिहास आठवा. बाबासाहेब, सावित्रीबाई, झाशीची राणी, सावरकर, नेताजी यांना पण तोच प्रश्न पडला असेल, मी एकटा आहे, पुढे जाऊ शकतो का? आणि उत्तर एकच होते, होय !
म्हणूनच,
एकटेपणाला घाबरू नका.
कदाचित तुम्ही गरुड आहात…
आणि आकाश तुमची वाट पाहत आहे.
एकटेपणाला घाबरू नका.
कदाचित तुम्ही गरुड आहात…
आणि आकाश तुमची वाट पाहत आहे.
थव्याने उडणारे पक्षी क्षणभर दिसतात,
पण काळाच्या आकाशात झेप घेणारा गरुड
नेहमी अजरामर होतो.
पण काळाच्या आकाशात झेप घेणारा गरुड
नेहमी अजरामर होतो.
सुनिल जाधव पुणेTM, 9359850065, topsunil@gmail.com
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा