Login

अनैतिक

अनैतिक
अनैतिक....... ©®विवेक चंद्रकांत

वयाची पन्नाशी पार केल्यावर त्या छोट्याश्या गावी बदली होईल असे त्याला वाटलेच नाही.पण ती झाली तसा तो थोडा घाबरलाच. तरुणपणी झाल्या होत्या बदल्या तेव्हा काही वाटले नव्हते.पण आता निवृत्तीला थोडी वर्ष राहिली आणि आता हे सगळे एकदम....आता सवय पण नाही राहिली. कित्येक वर्षात एकच ठिकाणी राहून सुखासीन आयुष्याची सवय झाली.

बदली रद्द व्हावी म्हणून प्रथम तो साहेबांना भेटला.साहेबांनी समजवले.
" तुम्हाला प्रमोशन मिळाले आहे.. पगारात वाढ होईलच आणि सगळ्यातच. म्हणजे निवृत्तवेतन.. प्रोवि्डॅन्ड फंड.तुमची बदली रद्द होऊ शकते पण तुम्ही आहे त्याच जागी राहाल.. मोठा financial loss होईल. 2-3 वर्ष काढा. ते तुमच्याच फायद्याचे आहे. "

त्याने घरी सांगितलं. तसें सगळे जण म्हणजे त्याची बायको मनेका.. मुलगा विश्वास.. मुलगी आश्लेषा त्याला बदलीच्या गावी रुजू व्हा हे सांगायला लागले. पण जेव्हा त्याने सगळे कुटुंब तिथे हलवायला सांगितले तेव्हा सगळ्यांनी नकार दिला.
विश्वास नौकरीसाठी प्रयत्न करत होता.त्यामुळे तो शहर सोडायला तयार नव्हता. आश्लेषाचे कॉलेज चालू होते.. ती येणे शक्यच नव्हते. पण पत्नी मनेकानेही नाही सांगावे हे त्याला जरा दुखावणारे होते. गेल्या कित्येक दिवसात मनेका त्याच्याकडे फारसे लक्ष देत नव्हती. शारीरिक संबंध तर तिने बंदच केले होते. पण पत्नी म्हणून काही गोष्टी तिने करायला हव्या तेही ती धड करत नव्हती. आता या वयात त नेमक काय करावे हेही त्याला समजत नव्हते. तिने अधूनमधून शरीरासूख द्यावे एवढी माफक अपेक्षा होती त्याची. बाकी तर तो सगळे ऍडजस्ट करतच होता. पण तिने साफ नकारच दिला. तिची इच्छा मेली होती... पण त्याची जिवंत होती. तो मन मारत होता.

नाईलाजाने तो एकटाच बदलीच्या गावी आला. शहरापेक्षा लहान गावात सुविधा कमी असल्या तरी मदत करणारे जास्त असतात हे त्याने पुन्हा अनुभवले. त्याच्यासाठी एक रूम attached संडास बाथरूम स्टाफने शोधून ठेवली होती. त्यात थोडे जुने furniture ही होते.. एका बंगलाच्या वरती होती ती खोली.खानावळ होतीच. त्याने फारसे सामान आणले नाही तरी त्याचे काम भागले. पहिल्या आठ दहा दिवसातच त्याला समजले की तसें सगळे चांगले आहे इथे. स्टाफ सपोर्टिव्ह आहे. त्याचे घरमालक आणि शेजारी काळजी घेणारे आहेत, ऑफिस मध्ये कामही फारसे नाही. छोटया गावाच्या असुविधा होत्या पण हळू हळू त्याचीही सवय होत गेली.

एकदा ऑफिस सुटल्यावर तो रमतगमत निघाला. अचानक एक रिक्षा त्याच्या बाजूला येऊन थांबली. आतून एक बायकी आवाज आला
"तू जयेश ना? Millenium school ?"

ह्याने आश्चर्याने बघितले. आत एक कृष चणीची बाई बसलेली. त्याला ओळख लागेना.
"अरे मी सुलोचना. तुझ्याबरोबर होते शिकायला. तुमच्या मागच्या आळीत राहायची."

"अरे सुली तू? बापरे किती वर्षांनी? इथे कशी काय?"

"मी इथेच राहते. Husbund इथलेच आहेत. चल घरी."

"नको ग. आता नको. नंतर येईन ना फुरसतीत."

"आता किती वर्षांनी भेटला. चहा घे. मी जास्त थांबवणार नाही."

तिने पुन्हा आग्रह केला. तिचा आग्रह मोडवेना. तो रिक्षात बसला. गावाच्या थोड्या बाहेर तिचे बऱ्यापैकी मोठे घर होते.
घरी फक्त कामवाली मावशी होती. तिने मावशीला चहा करायला सांगितला. तिचा नवरा कुठेतरी बाहेरगावी कामाला होता. तो शनिवार रविवार यायचा.. तेही जमले तर. मुलीचे लग्न होऊन ती सासरी होती हैदराबादला. ती खूप माहिती सांगत होती. थोड्या वेळाने हा निघाला तशी सुलोचना म्हणाली.
"जयू तुला सांगू? तू जुनिअर कॉलेजला होता ना .. इतका handsom दिसायचा.. मी मरत होती तुझ्यावर."

"असं? मला काही समजले नाही. "

"अरे बाबा. मी दिसायला अशी तशीच. तू कशाला मला पाहशील?"

" बर.. पण आता कसा दिसतो? " त्याने गमतीत विचारले.

"अजूनही maintain आहे. छान दिसतोस तू."
निघतांना मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली. तो निघाला.

दुसऱ्या दिवशीच तिचा गुडमॉर्निंग मेसेज. त्याला आश्चर्यही वाटले आणि आनंदही झाला. चला कोणीतरी गप्पा मारायला तर मिळाले. ती मनमोकळे चॅटिंग करायची. जुने शाळेतले दिवस . जुनिअर कॉलेजच्या आठवणी.त्यालाही बरे वाटायचे.
पण तो थोडा जपून बोलायचा.. न जाणो तिचा नवरा वाचेलबिचेल....

नंतर पुन्हा एकदा तिच्या आग्रहामुळे तो तिच्याकडे जाऊन चहा पिऊन आला. यावेळेस अनेक गोष्टी त्याच्या लक्षात आल्या. ती सुखी वाटत नव्हती. ती बारीक होती. स्त्री म्हणून असणाऱ्या काही गोष्टीची तिच्या शरीरात कमतरता होती. जाऊद्या आपल्याला काय करायचे? म्हणत त्याने ते सोडून दिले.

एकदा तिचा मेसेज आला. "बुधवारी येशील भेटायला? दुपारी 2 नंतर ये, मावशी नसतात त्यावेळी."

" का ग? मावशी का नको? "

"अरे त्यांच्या समोर मनमोकळे बोलता येत नाही "

ती घरात एकटी असतांना बोलावते आहे... म्हणजे? त्याला उगाच धडधडल्या सारखे झाले.

"येतोय ना?"

"हो " तो कसाबसा म्हणाला. पण अस्वस्थ झाला. हा काही ट्रॅप तर नाही. पण ट्रॅप कसा असेल? तिला आपण ओळखतो. तिचे आईवडील भाऊ सगळे ओळखीचे.. आता संपर्क नसला तरी पत्ता मिळविता येईल त्यांचा...

त्याला ते पटेना. असे काही ती करेल असे वाटत नव्हते. तिची पहिली भेट, तिला झालेला आनंद ....

मग एकांतात भेटायला का?

बुधवारी तब्येतीचे कारण देऊन तो ऑफिसामधून लवकर सटकला. अगदी शार्प दोनला तो तिच्याकडे पोहचला. बेल वाजवायचे काम पडले नाही. तिने लगेचच दरवाजा उघडला.
तो आतमध्ये येताच तो बंद केला. त्याची धडधड वाढली.
ती रिलॅक्स वाटली.
तिने पाणी आणले.
"बघ जयू. मी काही लपवणार नाही.. तुझ्यापासून. शाळेत असतांनापासून मी तुझ्यासाठी वेडी होते. पण दिसायला सुंदर नसल्याने बोलायची हिम्मत झाली नाही. लग्न झाले .. तेही बापाने भरपूर हुंडा देऊन केले. नवरा काही दिवस बरा वागला.. मग हळूहळू अलिप्त होत गेला. मुलीच्या जन्मानंतर तर जास्तच. मला डायरेक्ट म्हणायचा तुझ्याशी सेक्स करावे असे तुझ्या शरीरात आहेच काय? मुलगी असल्याने मी तिच्यात मन रमवायची. ती लग्न होऊन गेली आणि या माणसाने बदली करून घेतली. आता कर्तव्य म्हणून येतो आठ पंधरा दिवसात. सेक्स तर मी किती वर्षात केलेलाच नाही. मला निर्लज्ज म्हणून की आणखी काही... मला फक्त एकदा शरीरसूख दे. मी तुझी आजन्म ऋणी राहील. प्लीज नाही म्हणू नको."

तो सुन्न होऊन ऐकत होता.मग म्हणाला

"तुला खरं सांगू? मलाही कित्येक दिवसात शरीरासूख मिळालेले नाही. पण मी याच्या मानसिक शारीरिक तयारीने आलेलो नाही. मी उद्या आलो तर चालेल का?"

"चालेल. तुला माझ्याबद्दल काही शंका असेल तर मी स्पष्ट सांगते. मी बदचलन नाही... मला कोणताही आजार नाही. तू विचार कर. पण फक्त एकदा... Pls.
मी उद्या वाट बघते. याच वेळेस ये. या वेळेला आजूबाजूला कोणी नसते."

तो घरी आला तेव्हा काहीसा तंद्रित होता. जे झाले ते नेमके स्वप्न का सत्य त्याला समजत नव्हते. त्याच्या बायकोशिवाय त्याने इतर कोणाशीही संबंध केला नव्हता.
आपण खरंच तिच्याशी संबंध ठेऊ शकू? त्याला बायकोचा मान्सल देह आठवला. सुलीच्या कृष देहाकडे बघून आपल्याला उत्तेजना होईल? खरंच जायचे उद्या? आणि ही गोष्ट
कुणाला कळली तर? तशी शक्यता कमी वाटते. नाहीच. एकदाचाच प्रश्न आहे. पण सुख मिळाले तर परत जाणार नाही कशावरून?



अगदी लख्ख आठवत त्याला...तो तिच्या मिठीत .

"काय बघतोस?" तिने विचारले

त्याने उत्तर दिले नाही. तिच्या ओठावर ओठ टेकवले.
चुंबनापासूनच तर सुरूवात झाली आज..चुंबन इतके सुंदर मधुर असते ह्याची कल्पनाच नव्हती त्याला.तो वेड्यासारखा झाला .वस्त्रांचे अडथळे केव्हा दूर झाले समजलेच नाही.उत्तेजना..उथ्थापन..नंतर प्रवेश ..संभोग आणि स्खलन. हे टप्पे अगदी शांतपणे व्यवस्थित झाले. एकमेकांसाठी ते ओळखीचे असले तरी शरीर अनोळखी होते.पण काही तसे वाटलेच नाही.जणू खूप वर्षापासून ते देह एकमेकांशी रत होत होतो असे वाटले.इतकी सहजता कशी आली? एकमेकांवरच्या आत्यंतिक प्रेमामुळे की वासनेमुळे ? माहित नाही ...पण तिच्या मिठीत अगदी शांत..वाटत होते.त्याने तिच्या चेहऱ्यावरून नजर हटवली नाही.त्याला तिच्या मांड्या,नितंब पाहण्यात रस नव्हता...कदाचित वयाचा परिणाम झाला असावा .त्याला ती पूर्णपणे मिळाली..अगदी समर्पण भावनेने तेच खूप होते.

तिने चाळवाचाळव केली.

"खायला करू काही?" तिच्यातली गृहीणी जागृत झाली.'

"नको.मी नाश्ता करून आलोय."

"कॉफी?"

"काहीच नको.तू माझ्या मिठीतून उठू नको."
त्याने तिला पुन्हा जवळ ओढले...त्याच्या शरीरातून वीज सळसळत गेली.त्याने तिचे चुंबन घेतले.

तो अगोदरपासून तिच्या प्रेमात नव्हता पण आज पडला.तिच्या मिठीत तो तृप्त होऊन झोपला..डोक्यात कोणतेच विचार नव्हते.आपण काहीतरी अनैतिक केले असेही वाटले नाही. तिच्याकडे येतांना पुरूषी वर्चस्वाच्या भ्रामक कल्पना होत्या मनात.परस्त्रीशी संग म्हणजे खरा पुरूषार्थ..किंवा शारीरिक संबंध केल्याने येणारी त्या स्त्री वरची स्वामीत्वाची भावना..वगैरे वगैरे
पण तिच्या सहज वागण्याने ते सगळेच मागे पडले.खूप तृप्त शांत वाटत होते.

"अरे उठतोस ना? पाच वाजत आले." तिने हाक मारल्याने डोळा उघडला.

"पाच ?" तो एकदम उठला.ती अगोदरच कपडे घालून तयार होती.त्याने घाईघाईने कपडे चढवले

"ओके"

"चहा ठेऊ?" तिने विचारले.

"नको गं ..खरच काहीच नको."

त्याने भराभर चेहरा धुतला.ब्रश केला. तयार झाला.
पुन्हा तिला जवळ घेत म्हणालो

" एक शेवटचा कीस"

हा कीस बराच लांबला.अखेर वेगळे झाले.

"परत कधी येशील?" तिने विचारले

"काहीच सांगता येत नाही आणि आलो तरी आजच्या सारखे निवांत क्षण मिळतील याचीही शाश्वती नाही.बघतो.नाहीच जमले तर हेच क्षण मनाच्या कुपीत आयुष्यभरासाठी जपून ठेवू."

तिने मान हलवली.


त्याला जाग आली तेव्हा बराच उशीर झाला होता... म्हणजे स्वप्नच होते सर्व.... त्याला एकाचवेळेस हायसेही वाटले आणि वाईट ही. काय करावे आज? जावे का न जावे? बऱ्याच वेळाने उठून त्याने सगळे आवरले.
त्याने ऑफिसला फोन करून येत नसल्याचे कळवले. त्याचे डोके कलकलू लागले. आपण तिला sexually satisfied करू शकू? ऐनवेळी आपले अगोदर स्खलंन तर नाही होणार?
मग त्याला आठवले आपल्या कडे एक व्हिस्की पडलेली आहे.
एक वाजेच्या आसपास तिचा मेसेज आला. त्याने दुर्लक्ष केले. त्याने व्हिस्की काढली.. एक पेग बनवला. तिचा फोन आला..
"अरे येतोय ना?"

"थोडी भीती वाटतेय.... एक व्हिसकीचा पेग घेतला तर चालेल ना?"

"चालेल. पण एकच घे आणि जास्त उशीर करू नको. संध्याकाळी शेजारी नौकरीवरून परत येतात."

त्याने एका दमात पेग खाली केला. थोडया वेळात व्हिस्कीने काम सुरु केले. त्याच्या अंगात उष्णता येऊ लागली. त्याला वाटले बायकोला एक फोन करावा आणि सांगावे.. तू जे सुख द्यायला नखरे करतेस ते द्यायला बाकी बाया तयार आहेत. अजून एक पेग घ्यायच्या इच्छेला त्याने आवर घातला.

व्हिस्कीची बाटली त्याने व्यवस्थित कपाटाच्या आत ठेवली. निघतांना त्याने सवयीने पाकीट उघडले तसा आतल्या बाजूला असलेला महाराजांचा फोटो त्याला दिसला. त्या महाराजांना हा खूप मानायचा.
"पर स्त्री गमन म्हणजे पाप."
अचानक महाराजांचे वाक्य त्याला आठवले आणि तो थबकला. त्याच वेळेस पुन्हा त्याच्या मोबाईलवर सुलोचनाचा फोन वाजू लागला.... आणि काय करावे हे न कळून तो गोंधळल्या सारखा उभा राहिला.
©®विवेक चंद्रकांत....