©®प्रज्ञा बो-हाडे
अनोळखी दिशा भाग ६
आपण पाहिले की अक्षयाला पाहायला घरी पाहुणे येणार होते. रिदांश आता कुठे आजारातून उठला होता. त्याने अक्षयाला फोन लावला. तिने फोन उचललाच नाही. शेवटी रिदांशने अक्षयाच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. घरी गेल्यावर अक्षयाच्या आई-वडिलांना आमच एकमेकांवर खूप प्रेम आहे याची कबूली दिली.
अक्षयाच्या घरचे भयंकर संतापले होते. अक्षयाचा भाऊ तर रिदांशला मारायला उठला होता. अक्षयाच्या वडिलांनी स्वत:च्या मुलाला जागीच थांबवले. आततायी पणा करुन प्रश्न सुटत नसतात. समजुतीने घ्यायचे असते थोडे.वातावरण थोडे शांत होते. अक्षयाचे वडिल रिदांशला विचारतात तु अजून शिकतो आहेस. कमवणार कधी? माझ्या मुलीची जबाबदारी कशी घेणार आहेस तू. त्यात घरची परीस्थिती सध्या कशी आहे हे देखील अक्षयाने सांगितले आहे. पण फक्त केवळ प्रेम आहे म्हणून कुठे संसार चालतो का? जीवनाश्यक गरजा ह्या पूर्ण जरी करता आल्या तरी खर्च हा वाढतच जातो. तो कसा हाताळणार आहात.
रिदांश : काका, तुम्ही नका काळजी करु. कालच मी कामाची थोडी चौकशी केली. फार काही नाही पण आमच्याच शेजारी राहणा-या काकांच्या मदतीने एका कंपनीत मॅनेजरच्या असिंटंटची नोकरी ओळखीने मिळाली आहे. दोन दिवसात कामावर रुजू होणार आहे मी. दिवस कोणाचे थांबून राहत नाही. हळूहळू पोस्ट वाढत जाईल माझी.
रिदांश : मी अक्षयाला फुला प्रमाणे जपेन. तिच्या डोळ्यात कधीच अश्रू येवू देणार नाही.
अक्षया : हो बाबा. रिदांश बरोबर मी खरच सुखी राहिल. माझ त्याच्यावर तितकचं प्रेम आहे.
रिदांश मनातल्या मनात काहीतरी पुटपुटत,\"लग्न कस लावतात स्वत:च्या पोरीच पाहतोच मी.\"अचानक उभा राहतो आणि घराबाहेर निघून जातो.
तो दिवस अखेर उजाडला होता. अक्षया हिरव्या रंगाची साडी नेसून तयार होती. डोळ्यात आसवे जमा झाली होती. खिडकीतून बाहेर डोकावत रिदांश येईल आणि सर्वांसमोर घेवून जाईल अशी वेडी आशा लावत खिडकीच्या पाहत होती. पाहुणे मंडळींच आगमन झाले. ओळख करुन देणे, गप्पा मारणे यात पंधरा मिनिटे झाली होती. आता मुलीला बोलवा असे पाहुण्यांनी सांगितले.
अक्षया पोहे घेवून पाहुण्याच्या दिशेने जाणार त्याच क्षणी खिडकीतून कोणाचा तरी जोरजोरात ओरडाआरडा ऐकू येत होता. बघ्यांची गर्दी जमा झाली होती. अक्षयाला आवाज तर ओळखीचा वाटत होता. घरातले बाहेर कोण ओरडत आहे म्हणून बाहेर येतात.
हा., तर रिदांश आहे. पण तो दारु प्यायलेल्या अवस्थेत इथे काय करतोय? हा प्रश्न सर्वांना पडला. सगळ्यांना पाहून,
रिदांश : अक्षया फक्त माझी आहे. आमच एकमेकांवर जिवापाड प्रेम आहे. ती माझ्या शिवाय इतर कोणाचीच होवू शकणार नाही. जो कोणी आमच्या मध्ये येईल त्याला मी सोडणार नाही.
अक्षयाचे बाबा : काय बोलतो आहेस तू.
पाहुणे झाला प्रकार पाहून एक क्षणही न थांबता तिथून निघून जातात.
अक्षयाला रडू आवरेनासे होते, ती घरात जावून रडू लागते. अक्षयाचा रडण्याचा आवाज ऐकून रिदांश घरातल्यांना विनंती करतो. फक्त एकदाच मला शेवटचे सगळ्यांसमोर बोलायच आहे अक्षयाशी.
काही महिन्यातच अक्षयाच लग्न फिक्स होते. अक्षयाच नाव आता दुस-या कोणाशी तरी जोडल जाणार हे रिदांश सहन करु शकत नव्हता.
रिदांशने कोणत पाऊल टाकले असणार पाहुया पुढच्या भागात.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा