©®प्रज्ञा बो-हाडे
अनोळखी दिशा भाग ४
घरातल्यांशी खोट बोलून मनात भिती तर वाटत होतीच. पाच दिवस मोकळ्या वातावरणात मित्रांना भेटून नव्या उत्साहात घरी परताव अशी भावना रिदांशच्या मनात होती.
रिदांशला ह्या गोष्टीचा सुरुवातीला राग येत होता. तो गाडीतच बसून राहिला. दोन दिवसांनी मात्र रिदांशची देखील सिगरेट ओढण्याची इच्छा झाली. तीन दिवस सतत सिगरेट ओढून रिदांशला बर वाटायला लागले होते.
स्वार्थी दुनिया झालीये हल्ली. स्वत:च्या मनाप्रमाणे इतरांना वागवायला पाहतात. दारुवर भांडण इतकेच नव्हे तर रिदांशकडे सर्व मित्रांनी मिळून पन्नास हजारांची मागणी केली होती.
आधीच वडिल गेल्यामुळे घरातली जबाबदारी अंगावर होती. वडिलांनी एका बिजनेसच्या गुंतवणुकीत कर्ज काढले होते. ते फेडायचे होते. पूर्वीसारखी परीस्थिती आता राहिली नव्हती. सर्व जबाबदारी भावावर पडली होती. त्याच्या नोकरीवरच सध्या घर चालत होते.
अक्षया : मला कळले, काकांचा अपघातात मृत्यू झाला. मी तुझ्याशी बोलण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. तू फोन उचलत नव्हता. आपल्या मित्रांना देखील विचारुन पाहिले. ते ही मला रुचेल अस उत्तर देवू शकत नव्हते. तुझी वाट बघण्या खेरीज दुसरा कोणताच उपाय नव्हता.
रिदांश : अस्वस्थ वाटत होत मला. कोणाशी काहीच बोलण्याची इच्छा नव्हती. एकट्याला काही महिने राहायचे होते.
अक्षया : या महिन्यात खूप गोष्टी घडून गेल्या. ज्या तुला सांगायच्या आहेत.
रिदांश : काय झाल? ठिक आहे ना सगळे. आज काॅलेजला येताना तुझ्याशी बोलायच ठरवलच होत मी. बर झाल तू गेट जवळच भेटली.
अक्षया : घरचे माझ्या लग्नाच पाहतात. मला तुला सोडून इतर कोणाशीच लग्न करायच नाही.
रिदांश : माझ पण प्रेम आहे तुझ्यावर. पण इतक्यात लग्न नाही करु शकणार. भावच आणि बहिणीच आत्ताच लग्न झाल. त्यात वडिल गेल्यामुळे परीस्थिती नाजूक आहे. काही वर्ष थांबता नाही का येणार.
एकिकडे तू देखील फोन उचलत नव्हता. कोंडीत पकडले गेल्यासारखे माझा जीव कासाविस होत होता. तूच सांग काहीतरी.
एकिकडे तू देखील फोन उचलत नव्हता. कोंडीत पकडले गेल्यासारखे माझा जीव कासाविस होत होता. तूच सांग काहीतरी.
रिदांश : मला विचार करायला वेळ दे.
असे बोलून रिदांश तिथून निघून जातो.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा