Login

भांडण

पहा फुटला न दिला असता तर?
भांडण

. रात्री टेरेसवर वाढदिवसानिमित्त पार्टी होती त्यात फुग्यांच डेकोरेशन होते.त्यातला एक लाल फुगा सकाळी खाली आला त्यावरून चिनू आणि वैशू चभांडण चालले होते.

चिनू ने वैशूच्या हातातून फुगा खेचून घेतला तशी ती चिडली आता दोघं खेचाताणी करू लागले या खेचाखेचित फुगा फाट्कन फुटला .
चिनू ने जोरात भोकाड पसरले.

तशी रडारड ऐकुन वैष्णवी ची आई साधना बाहेर आली ."काय झालं का भांडता आहे?"
तेवढ्यात चिनू ची आई सुखदा पण आली "काय झालं का रडतोय ?"
वैष्णवीच्या हातात एक लाल फुगा होता त्यावरून दोघांचे भांडण चालले होते.
सुखदा रागाने म्हणाली "पहा फुटलां ना दिला असता त्याला तर?"
वाग sवा नेहमी हा याचच खरं करतो का द्यावा वैशू ने? तिला मिळाला होता.

मुलांचे बाजूला राहिले आता दोघी आया वाद घालू लागल्या .
"हा असाच हट्टी आहे नेहमी रडून भांडून आपलं खरं करतो ,अगदीतुझ्याच वर गेलाय "!
ए-- मला हवे ते बोलू नको हं मी नाही ऐकून घेणार ",तू काय कमी अकडू आहे?

" चल रे कोण हि च्या तोंडी लागेल" म्हणत चिनूचा हात खेचत सुखदा निघून गेली .

स्वतःला फारचसमजते म्हणत साधनाने धाडकन दार बंद केलं.

वैशू ला आपल्या आई आणि चिनू च्या आई ला काय झाले कळेना.

संध्याकाळी वैष्णवीला घरी कंटाळा येऊ लागला, बाहेर चिनू चा आवाज येत होता .

"आई-- मी जाऊ का खेळायला चिनू बरोबर?
' काही नको !आपण बाहेर जातोय बाबांबरोबर.'

वैष्णवी बाहेर निघाली चिनू दारातून तिच्याकडे पाहत होता,"
वैशू बघ माझं हेलिकॉप्टर म्हणत धावत दाखवू लागला तेवढ्यात साधना दार लावत "वैशू चल काही गरज नाही" म्हणत ,वैशूचा हात धरून निघाली.

चिनू हिरमुसुन पाहतच राहिला, घरात येऊन गुपचूप सोप्यावर बसला.
,," काय झालं चिनू रडायला?"जवळ बसलेल्या राधा आजींनी विचारले.
मी कोणाबरोबर खेळूं?
वैशू बाहेर गेली आई बरोबर..

वरदा बोलली "गेली तर गेली काही गरज नाही तिच्याबरोबर खेळायची काल किती कटकट करत होती ती साधना".

' अगं असं काय झालं? लहान पोरांचं भांडण ते, आज भांडतील उद्या एक होतील "आजी म्हणाल्या .

"तुम्हाला माहित नाही आई , जाताना ती साधना चिनूला काय वाट्टेल ते बोलली.मुळीच जाऊ नको ".
बडबडत सुखदा निघून गेली.

राधाआजींना त्यांचे बालपण आठवल.

राधाच्या बाबांचा वाडा होता,राजा पाटील त्यांना तीन मुलं त्यानंतर बऱ्याच वर्षांनी एक मुलगी झाली राधा, खूप कौतुकाची.
त्यांचे धाकटे भाऊ शंकर ही तिथेच राहत असत त्यांना तीन मुलीवर एक मुलगा झाला राजू .

राधा दिवसभर राजू बरोबर खेळायची दोघे एकाच वयाची.
दोघे छान खेळत, कधी कधी भातुकली वरून भांडणही होत असे पण थोड्याच वेळात भांडण विसरून खेळायला लागत. दोघांना एकमेकांशिवाय करमत नसे, दोन्ही भावांमध्ये खूप एकोपा होता पण दोनीजावांचे मात्र फारसे पटत नसे.
थोडीफार धुसफूस चालायची.

पण या सगळ्याची लहान मुलांना काहीच जाणीव नव्हती. ते निरागस पणे एकमेकांशी खेळायचे कधीकधी भांडायचे.
एकदा खाऊ वरून भांडण झालं राजू म्हणाला “मी बाप्या माणूस मला जास्त हवं”
“ राधा म्हणाली अर्धा वाटा माझा मी रांधल आहे म्हणून.”

आता दोघ हट्टाला पेटले, खेचाखेची त खाऊ खालीसांडला आणि धुळीत मिळाला
खाऊ सांडलेला पाहून राजुने रागाने हातातली वस्तू फेकून मारली ती राधाच्या कपाळावर लागली खोक पडली रक्त येऊ लागले .राधाच्या रडण्याचा आवाज ऐकून राधाची आई धावत आली .
"माझ्या लेकीला केवढं मारलं रक्त काढलं या राजूने म्हणून ओरडा करू लागली."

घरातले सर्व आले.

राजूची आई पण धावत आली. “काय झालं राजू ?चुकून लागलं असेल थांब हळद लावू म्हणू लागली”. पण राधाची आई ऐकेच ना. मग वादविवाद होत भांडण पेटलं .
जुने वाद हेवे दावे बाहेर निघाले आणि राजू आणि राधा दोघांचा खेळणं बंद पडलं
दोन दिवसांनी दोघांना करमेना पण घरातली ऐकच ना

एकाघरात राहूनही दोघी जावा एकमेकांशी बोलत नसत. छोट्या छोट्या गोष्टींवर तक्रारी होत या सगळ्याचा परिणाम वेगळं व्हायचं ठरलं

त्यानंतर एक दिवस राजूचे बाबा आणि सर्व दूर कुठेतरी राहायला निघून गेले. .

कितीतरी दिवस राधाला राजू ची आठवण यायची.

काळ कोणाकरता थांबतो?
अजूनही राधाआजींना राजूची आठवण दर राखी भाऊबिजेला यायची. त्याला येत असेल कां आठवण ?विचार करता करता आजींचे डोळे भरून आले
आज त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली, हे वेळिच थांबायला हवे असे आजींना वाटू लागले.


आई मला खूप कंटाळा येतोय काय करू मी जाऊ कां चिनू कडे? वैष्णवी ने विचारले!
नाही, चल तासभर बागेत जाऊ तिथे तुला खूप फ्रेंड भेटतील.

साधना वैशूला घेऊन निघाली दारात चिनू उभा होता. वैशू त्याच्याकडे पाहत होती पण आईच्या भीतीने बोलली नाही.
चीनू उदास होऊन घरात आला.आजी हे सर्व पहात होत्या.त्यानाही वाईट वाटले.

बागेत मुलं खेळत होती पण वैशूच्या ओळखीचं कोणीच नव्हतं ती त्या मुलांजवळ जाऊन उभी राहिली पण कोणी तिच्याकडे लक्ष देत नव्हते आणि तिला खेळात घेत नव्हते .

साधना बेंचवर बसली होती ,तेवढ्यात तिची क्लासमेट प्राची दिसली "अरे प्राची तू इथे "म्हणत दोघींच्या गप्पा सुरू झाल्या!
वैशू मुलांच्या मागेपुढे करत होती .
आता साधना चेही तिच्या कडे लक्ष नव्हते ती मैत्रीणी शी गप्पांमध्ये गुंग झाली.

बराच वेळ गेला.,बर साधना परत भेटू म्हणत प्राची निघून गेली.
अचानक बागेच्या दुसऱ्या कोपऱ्यात हल्ला ओरडा ऐकू येऊ लागला.
साधनाचे लक्ष गेले वैशू कुठे दिसत नव्हती ती घाबरली व वैशू वैशू करत आवाज देत शोधू लागली .
वैशू कुठे दिसेना तशी साधनाला रडू येऊ लागले .ती इकडे तिकडे पाहू लागली.

तेवढ्यात सुखदा बरोबर चिनू आणि वैशू तिला येताना दिसले. वैशू खूप घाबरलेली होती रडत होती.
कां ग काय झालं,? चिनू ते परत काही केले वाटतं तरी मी बोलले होते न--?

--तेवढ्यात बागेचा वॉचमन आला" ताई या लहानमुलामुळे तुमची मुलगी वाचली दोन बदमाश हिला पळवून घेऊन जात होते.

काय?

"हो साधना-- चिनू ला घरी कंटाळा आला म्हणून,मी चिनू ला बागेत घेउन येत होते . चिनू ने पाहिलं वैशूला तीदोन मुलं धरून घेऊन जात होती. चिनू ने मला दाखवलं आम्ही दोघांनी आरडाओरडा केला तशी ती मुलं पळून गेली .
बापरे-- चिनूला जवळ घेत साधना म्हणाली चिनू थँक्यू आणि सॉरी सुखदा.
" इट्स ओके साधना"जसा माझा चिनू तशिच वैशू ग माझ्यासाठी."
"हो पण-- त्या दिवशी मी --
' जाऊ दे ग ,मी पण जरा जास्तच बोलले मुलांची काय चूक "!

घरी आल्यावर सर्व हकीकत चिनू ने आजीला सांगितली

दुसरे दिवशी साधनाकडे सत्यनारायणाची पूजा ठेवली इतक मोठ संकट टळल म्हणून.
मेहूणअर्थातच सुखदा व तिचे मिस्टर . आणि राधा आजी

जेवण झाल्यानंतर
दोघी मैत्रिणी गप्पा मारत बसल्या होत्या .

तेवढ्यात चिनू आणि वैशू चा भांडण्याचा आवाज आला तशी साधना आणि सुखदा एक क्षण चमकल्या आणि मग हसायला लागल्या…

बाजुला बसलेल्या राधा आजींनी देवाला हात जोडले नी म्हणाल्या चला एक भांडण तरी वेळच्या वेळेत संपले दोन लहान निरागस नाती वेळीच सावरली गेली.
-----------------------------------