भुतकाळातील घाव भाग - ३

Aie hya Nidhnanantar tiche Patar hatat maline Vacyalyvar Manachi Kay avastha hote.
"भुतकाळातील घाव भाग - ३

न कळवता संध्याची आई संध्याला घेऊन आली खरी पण तिथे तिचे स्वागत
दारातच भाकर तुकडा ओवाळून न टाकता शाब्दिक लाखोली ओवाळून टाकून झाले.

"आले का परत?"खायला काळ नि भुईला भार." झेपले नाही वाटत बापाला?

रोज काही ना कारणाने मला अपमानित केले जायचे. मी सहन करत होते कारण शेवटी माहेरची अब्रू महत्वाची होती.

माहेरची ख्याली खुशाली कोणान् कोणाकडून कळत होती. कालांतराने तुझ्या मावशीचे मामाचे देखील लग्न झाले. पण मला जाता आले नाही.

सासुबाईंनी स्वत:हाच आजारपण उकरून काढत. नाहीतर काहीतरी निमित्त मुद्दाम म लग्नाला जाण्यात व्यत्यय आणत.शेवटी येथूनच मावशी व मामावर अक्षदा टाकल्या. काळ पुढे सरकत होताच. कोंबडं झाकले म्हणून काय सूर्य उगवायचा राहणार? तद्वतच .

एक नशीब चांगले होते कि, तु दिसायला चांगली होतीस आणि चुणचुणीत, मुलांचे पाय पाळण्यात दिसतात तद्वत तुझे अंगचे गुण मला दिसत होते.

ओढणी गुंडाळून तु आरश्यासमोर ऊभी राहून नाचायचीस, छान ठेका घ्यायचीस,मी ओळखले तुला आवड आहे कथ्थकची. मग घरात विषय काढला.तेंव्हा घरात खुप मोठे रामायण घडले. मग तो विषय तिथेच संपला.

शेवटी तुला शाळेत कोणत्या घालायचे यावरूनही घरात वातंक माजलं.मला तर व्हाईस नव्हता.

कारण मुलगी परक्याचे धन काय करायचे शिकवून? वाईट वाटायचं पण काय करणार होते मी? पण तु हुशार होतीस. शेवटी तुझ्या हुशारीने नाव कमवत होतीस.

दिवस सरत होते तुझ्यात ऊद्याचा ऊष:काल मी बघत आलेला दिवस ढकलत होते.तुझ्यानंतर मात्र दुसऱ्यांदा माझी कुस उजवलीच नाही. त्यांचे खापर परत माझ्यावरच.

तुझ्या बाललीलात माझा दिवस सरत होता.बाबांशी तु कधी मोकळे पणाने नव्हतीस. एक कर्तव्य म्हणून तो करत होता.आपलेपणा कुठेच नव्हता.

दिवसामासी दिवस सरत होते, तु शाळेत जाऊ लागली. कधीच पहिला नंबर सोडत नव्हतीस.पण याचे कोणाला कौतूक नसायचे.

पण तिकडे आजोळी आज्जी,आजोबा मामा मावशीला भारी कौतुक.मग ना शाळेच्या रस्त्यावर एक टेलिफोन बुध होते.तो भाऊ मोठा प्रेमळ होता. त्याच्या बुधवरून मी आई बाबांना तुझे यश, प्रगती कळवायचे कधी मनातलं बोलायचे.

ते खुप खुश होतं तुझ्या बाललीला आणि कौतुक ऐकून.मग तुला बक्षीसा खातर तुझ्या नावाने काही रक्कम पैशांच्या रूपात बॅंकेत जमा करत.

दिवस सरले वयानुसार तुलाही समज आली. चांगले वाईट तुला समजू लागले.

चांगल्या मार्काने दहावी पास झालीस. पुढे मात्र तु देखील मागे वळून पाहिले नाहीस. स्कॉलरशिप वरच पुढचे शिक्षण घेतलेस.खुप पुढे गेलीस, आणि मग बाबांशी 'आरे ला कारे' करण्याची हिंमत मिळवलीस.

सतत तुम्हा दोघांत खुपदा वाद व्हायचे. मी देवाला प्रार्थना करायचे,"देवा माझं आयुष्य संपलं पण पोरींच नशीब बदलव रे!' माझी थोडीफार पुण्याई आहे ना ती तिच्या ओटीत घाल."

देवाने गार्‍हाणं ऐकले.चांगल्या पगाराची नोकरी तुला मिळाली. त्यावेळी खुप रडले मी अग पण ते आनंदाश्रू होते..

मग यथावकाश स्वतःहाच्या हिमतीवर तु जोडीदार देखील शोधलास. बाबाने त्यावेळीही खुप तमाशा केला.

शिव्याशापाची लाखोली व्हायली आणि माझ्या संस्कारचे धिंदवडे देखील काढले.

पण मी खुष होते. मी तुला घरातुन निघून जाण्याची हिंमत दिली.कारण ह्या बापाच्या मनात शिजत असलेल्या दाळीचा मला वास आला होता.

कारण त्याने तुझ्यासाठी बिजवर शोधला होता.त्याच्या बदल्यात वराकडील मंडळी तुझ्या बाबाला भरपूर पैसा देणार होते. एकंदरीत तो तुला विकणार होता.

ही बातमी मला त्या टेलिफोन बुथवाल्या भाऊनेच दिली. तिथूनच हा माणूस त्या स्थळासाठी फोन करत होतात.खरच हा बुथवाला देवमाणूस मला मात्र भावाच्या रूपातच भेटला होता.

माझा निर्णय योग्य कि,अयोग्य मला माहीत नव्हते.जावाई भला कि बुरा हि पारख पण मी केली नव्हती. पण तुझी निवड योग्यच असणार हे मला माहीत होते.

पुढे तुला मी जगण्याचा वेगळा मार्ग दाखवला व तु घरातुन गेलीस आणि इकडे घरात नित्य नवा तमाशा सुरू झाला.

आईबाबांना तुझ्या बाबतीत समजले. मग पुढे कोडकौतुक तुझे आजोळी झाले.

पुढे मात्र मी खचत होते. शरीरावर याचे परिणाम दिसू लागले आणि मग तब्येत खुपच खराब झाली.

मी अंथरूण धरले.मग उठलेच नाही.फक्त थोडी आशा तुझ्यात होती. एकदा डोळे भरुन तुला पाह्यचे होते.

आताशी शेवटी शेवटी बाबाला पश्चाताप झाला होता. कारण आता तो घरचा ना घाट का झाला होता.

सतत त्याला सपोर्ट करणारे त्याचा सहपरिवार पण आता विरक्त झाला होता.कोणीच त्याला विचारत नव्हते.

मग त्याला माझी साथ हावी वाटू लागली. पण वेळ निघून गेली होती. आता तो माझ्या निचेतन शरीरावर प्रेम करत होता.

कारण तो एकटा पडणार होता म्हणून तो मला इमोशनल ब्लॅकमेल करत होता. आता माझ्या कडून तुझ्या कडे पोहचण्याचा मार्ग तो शोधत होता. कारण आता सगळे मार्ग संपले होते.

शेवटी आता निर्णय तुझा आहे. पण जाता जाता एवढेच सांगते, "एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये." आपल्यात फरक ठेवावा. माझे संस्कार पोकळ नाहीत यावर माझा ठाम विश्वास आहे. निरोप घेते.
तुझीच आई

तळटीप : माझे हे पत्र तुझ्या हाती पडेल तेव्हा मी या जगात नसेल, पण नक्कीच तुझ्या बरोबर कायम असेल.

आई गेली पण खुप काही मागे ठेवून पत्र परत पर्स मध्ये ठेवले. त्या देवदूताचे आभार मानले कारण त्या टेलिफोनवाला मामाच माझ्या सुखदुःखाचा खरा साक्षीदार मला वाटू लागला.

काय करावे हेच सुचतं नव्हते. बाबाला माफ करावे का?बदला घ्यावा? मग आईचे संस्कार आठवले. पण माफ केले तर हा माणूस उलट्या काळजाचा आहे. "गरज सरो वैद्य मरो" त्यामुळे माझा निर्णय मात्र होत नव्हता.

समाप्त
©️®️सौ. ऊज्वला रवींद्र राहणे

🎭 Series Post

View all