कथेचे नाव- चिकटवलेली अभिधानं
कॅटेगरी - राज्यस्तरिय कथामालिका
सब कॅटेगरी - सामाजिक कथा
"सत्य एक दिवस समोर येतचं" या उक्तीप्रमाणे ते समाजासमोर आलचं . प्रसंग होता रेवाच्या माहेरी तिच्या मुलीच्या \"नामकरण विधीचा .\"
राजशने दारू पिऊन कार्यक्रमात धिंगाणा
घातला . मनातले घाणेरडे विचार त्याच्या ओठावर आले," मुलगी झाली . तिचं काय नाव ठेवायचं .मला वंशाचा दिवा हवा होता . माझ्या उद्योगाला माझ्या मुलाचं नाव मला द्यायचं होतं "आमोद मसाले " . या कारटीला इथेच ठेवं . माझ्याघरी आणायचे नाही".
रेवाच्या मनात विचार आला, "कळत कसं नाही या अविचारी माणसाला याला एका स्रीनेच जन्म
दिला .स्त्रीमुळेच यानी जग बघीतलं तरी याला मुलगी नको . किती दारिद्री विचाराचा नवरा मिळाला मला ".
आलेले पाहुणे तमाशा पाहून जेवण न करताच निघून गेले . रेवाच्या बाबांना हदयविकाराचा झटका आला . तातडीने त्यांना डॉक्टरांकडे नेण्यात आले . डॉक्टरांनी रेवाच्या वडिलांना मृत घोषित केले .
वडिलांच्या मृत्यूनंतर रेवाची आई सतत आजारी असायची . दोघींच्याही जीवनात आनंद उरला
नव्हता . रेवाच्या माहेरी नोकर चाकर तिच्या आईची काळजी घ्यायचे तरीपण रेवाच्या आईची तब्येत दिवसें दिवस खालावत चालली होती . बाबांच्या दुःखातून रेवा पुरती सावरली नव्हती तर वर्षभरातच तिला आई सोडून गेली.
काहिशे राजेशसोबत झाले .
सासू सासऱ्यांसोबत रेवा दवाखान्यात पोहचली . तालुक्यावरून राजेशचा मोठा भाऊ मनोजही आला . राजेश ऑन दि स्पॉटच गेला होता . त्यानी ज्यांचा गाडीला ठोस दिली होती त्या गाडीतील दोघं गंभीर जखमी झाले होते .
त्यातील एक किरकोळ जखमी झाला होता .
त्यानी घडलेली हकीकत सांगीतली ,
राजेश बारमधून पिऊन निघाला, तशी त्याची वेगात असलेली गाडी आमच्या गाडिला येवून धडकली . त्यानंतर जे झाले ते तुम्ही बघतच आहात .
महिनाभरातच रेवा तिचा व्यवसाय सांभाळायला लागली . पाच वर्षात रेवानी पवार मसालेंना एवढया उंचीवर नेवून ठेवले की, यावर्षी तिला "उद्योजिका ऑफ दि ईयर " पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले .
" तुला काही समजत नाही हिणवून
करू नका स्त्रीचा अवमान….!
स्त्रीनेच घडविले जगात ओळखल्या,
जाणारे सर्व व्यक्ती महान……!! "
स्त्री माणूस व पुरुष माणूस असा लिंगभेद
केला . याही पुढे जावून स्रीच्या नावापुढील माणूस काढून टाकून बाई व माणूस अशी अभिधानं बोलण्यातून प्रचलित झाली . मग बाई बाईच झाली ती माणूस राहिली नाही . तिच्याकडे भोगवस्तू म्हणून पाहिल्या जातयं आजही तीच स्थीती आहे. काही प्रमाणात झालाही असेल बदल परंतु कित्येक स्त्रीया आजही शारिरिक, लैंगीक, मानसिक अत्याचाराला बळी पडतात.
अठरा हाताची जगदंबा देवी हे स्त्री शक्ती स्वरूप आहे. स्त्री एकावेळी अनेक आघाड्यावर काम करू शकते ह्याचं प्रतिक आहे.
तिला मोकळे आकाश मिळाल्यास घरात डांबून न ठेवल्यास ती संस्कार सांभाळून आकाशी उंच झेप घेवू शकते हे कित्येक स्रीयांनी सिद्ध करून दाखविले आहे.
निर्धार तिचा…..!
निर्धार तिचा संस्कृतीला जपून,
आकाशी झेप घेण्याचा….!!"
भित्री- धीट, परावलंबी- स्वावलंबी अशी पुरुषी व बायकी अभिधानं कर्तृत्वानी चिकटवा. लिंगभेद करून स्त्रीला परावलंबी हे अभिधान चिकटवणं बंद करा . हीच आज माझी या सभागृहाला विनंती आहे. कर्तृत्वान स्रियांचा खरा पुरस्कार हाच की समाजानी आपली विचारधारा बदला .
देवू चला मुलांसारखीच मुलीला…!
श्रेष्ठ- दुय्यम कर्तृत्वानी ठरवावं ,
थारा न उरावा भेदभावाला…!!"
पुरस्कार समजेल .
रेवाची जीवनगाथा व तिचे विचार ऐकूण सभागृह विचारमग्न झालं….
समाप्त !
कशी वाटली रेवाची गाथा कमेंन्ट करून जरूर सांगा . लाईक व शेअर लेखिकेच्या नावासह करा .
खरंच स्त्री परावलंबी आहे का? अभिप्राय द्या .
तुमच्या अभिप्रायान माझं लिखान समृद्ध होतं .
धन्यवाद !
©® ऍड. निता प्रफुल्ल कचवे
टीम - अमरावती