डार्लिंग डॉट कॉम : अंतिम भाग
सुदर्शन घराबाहेर गेला. त्याच्या कपड्यांच्या आत तो काळा धागा बांधलेला होता, आणि त्याच्यातील मंत्र काम करण्यास सज्ज झाला होता. पार्वतीच्या वडिलांनी आपले मंत्रोच्चार सुरू केले:
"नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः "
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः "
त्याचा प्रभाव सुदर्शनवर पडू लागला. गाडी चालवताना अचानक त्याला रस्त्यावर एक भयाण अंधार जाणवला. रस्त्याच्या कडेला एक स्त्री उभी होती. काळी साडी घातलेली ती स्त्री सुदर्शनला एका क्षणातच आकर्षित करून घेत होती. तिचं सौंदर्य, तिचं व्यक्तिमत्व, सर्व काही मोहक होतं.
सुदर्शनने गाडी थांबवली आणि तिला लिफ्ट दिली. ती स्त्री त्याच्यासोबत गाडीवर एकदम चिटकून बसली. "कुठं जायचंय?" सुदर्शनने विचारलं.
"तू जिथं नेशील, तिथं," तिने गूढ हसत उत्तर दिलं.
ती स्त्री सुदर्शनशी गप्पा मारायला लागली, आणि तिने सुदर्शनच्या खांद्यावरून आपला हात फिरवला बघता बघता तीने त्याच्या मांडीवर हात पुढे सरकवला .सुदर्शनचं मन आता पूर्णपणे विचलित झालं होतं. त्याने तिला थेट विचारलं:
"तू इंटरेस्टेड आहेस का? एकांतात भेटायचं का?"
ती म्हणाली, "होय. मला तुझ्यासोबत एकांत हवाय. चल, माझ्या घरी."
सुदर्शनने गाडी तिच्या सांगितलेल्या दिशेने वळवली. त्याला ती स्त्री अनोळखी वाटत होती, पण तिचं सौंदर्य त्याला खूप आकर्षक वाटत होतं. काही अंतरानंतर, ती म्हणाली, "हेच माझं घर."
सुदर्शनने गाडी थांबवली. तो खाली उतरला आणि तिला सोडण्यासाठी मागे पाहिलं. पण ती स्त्री तिथं नव्हती. सुदर्शन घाबरला. त्याने तिचं घर उघडलं आणि आत गेला. घरात पाऊल ठेवताच, त्याला जमिनीवर पांढऱ्या कपड्याने झाकलेले मृतदेह दिसले. एक-एक मृतदेह पाहून त्याचा श्वास थांबला. त्या सर्व मृतदेहांवरचं पांढरं वस्त्र रक्ताने माखलेलं होतं.
सुदर्शनच्या पायांखालची जमीनच निघून गेल्यासारखी वाटली. त्याला एका कोपऱ्यात त्या बाईचा फोटो दिसला, ज्याला हार घातलेला होता. ती स्त्री मरण पावलेली होती, आणि तिचा आत्मा त्याच्याशी आत्तापर्यंत बोलत होता हे त्याच्या लक्षात आलं.
घाबरलेल्या सुदर्शनने तडक बाहेर पळून जायचा प्रयत्न केला. तो गाडीवर बसला आणि जोरजोरात गाडी पळवू लागला, पण रस्ता संपतच नव्हता. तो ज्या दिशेने जाई, तिथं अंधार, रस्त्यावरचं दुर्गम वातावरण आणि त्याच रस्त्याचा फेरफटका. त्याला कधीही बाहेर पडता येणार नाही, याची जाणीव झाली.
इकडे पार्वती घरी एकटीच होती. सुदर्शन अजूनही घरी परतला नव्हता. तिच्या मनात एक विचित्र भावना आली, पण तिने तो विचार झटकून टाकला. काही वेळानंतरही सुदर्शन घरी न आल्याने तिचं मन अस्वस्थ झालं. तिने फोन केला, पण सुदर्शनचा फोन बंद लागला. घाबरलेली पार्वती शेवटी रडू लागली.
तिने संपूर्ण गावात आरडाओरड सुरू केली. "सुदर्शन कुठे गेला? कुणी त्याला पाहिलं का?" तिच्या या ओरडण्यामुळे गावकरी एकत्र जमा झाले.
सुदर्शन गायब झाल्याने संपूर्ण गावच हळहळलं होतं. त्यांच्यासाठी सुदर्शन केवळ एक साधा ब्राह्मण नव्हता, तर तो एक मार्गदर्शक, एक गुरू, आणि त्यांच्या जीवनातील आदर्श होता. सुदर्शनच्या गायब होण्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता: "सुदर्शन गेलाच कुठे?"
गावकरी एकत्र जमले होते. प्रत्येकजण आपल्या डोळ्यात अश्रू घेऊन सुदर्शनच्या आठवणींमध्ये हरवले होते.
गावकरी एकत्र जमले होते. प्रत्येकजण आपल्या डोळ्यात अश्रू घेऊन सुदर्शनच्या आठवणींमध्ये हरवले होते.
शेवंताबाई, ज्यांचं कुटुंब आर्थिक अडचणींमध्ये होतं, आठवण सांगत म्हणाल्या, "सुदर्शन गुरुजींनी माझ्या पोरांच्या शिक्षणासाठी मदत केली होती. त्यांनी दिलेल्या आशिर्वादानेच आज माझे पोरं शिकलेत."
शंकर आपले अश्रू आवरत म्हणाला, "गुरुजींनी माझं घर वाचवलं होतं. ते नसले असते, तर आम्ही रस्त्यावर आलो असतो."
किसन महाराज, ज्यांची तब्येत खूपच खालावली होती, आठवून म्हणाले, "गुरुजींनी माझ्या आजारपणात मला मार्गदर्शन केलं होतं. त्यांच्या आशिर्वादानेच मी आज इथे उभा आहे."
गावातील प्रत्येक माणसाला सुदर्शनचा काही ना काही उपकार आठवत होता. सुदर्शनने त्यांच्या जीवनात अनेक चमत्कार केले होते. त्याच्या आशीर्वादाने अनेकांना नवसंजीवनी मिळाली होती, अनेकांचे संसार सावरले होते, अनेकांचे आयुष्य बदलले होते.
सगळ्यांनी मिळून सुदर्शनचा शोध घ्यायला सुरुवात केली. पोलीस आले, शोध मोहीम चालली, पण सुदर्शनचा पत्ता काही लागेना.
पार्वती दिवसेंदिवस अधिकच अस्वस्थ झाली. सुदर्शनच्या आठवणींनी तिचं मन ठिकाणावर नव्हतं. ती रडत-रडत घराच्या कोपऱ्यात पडून राहिली. तिचं आयुष्य सुदर्शनशिवाय शून्य वाटत होतं, पण तिला आपले वडील आणि त्यांची काळी जादू आठवत होती म्हणून ती गावकऱ्यांदेखत सुदर्शन नसल्याचे दुःख दाखवत होती.
अखेरीस, एक वर्षाचा कालावधी निघून गेला. सुदर्शन कुठेच सापडला नाही. गावकऱ्यांनी त्याला मृत घोषित केलं आणि त्याच्या आठवणींचं एक स्मारक गावाच्या चौकात उभारलं. सुदर्शनचा पुतळा उभारला गेला, आणि त्यावर 'देवमाणूस' असं लिहिलं गेलं. सगळे गावकरी त्या पुतळ्याला वंदन करत होते.
पार्वतीचं आयुष्य आता एकदम बदललं होतं. तिच्या वडिलांच्या काळ्या जादूमुळे सुदर्शन कायमचा त्या भयानक जगात अडकून गेला होता...
समाप्त.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा