स्वरूप ला इतकी ताकद, सकारात्मकपणा मिळत होता तरी कुठून? याचे उत्तर आपल्या सर्वां जवळ आहे. फक्त आपलं त्याकडे लक्ष नाही. स्वरूपच्या पंखात इतका बळ कुठून येत असावं? अगदी सोपं आहे. ते म्हणजे आपल्या अंतर्मनात दडलेल्या आपल्याच आवाजाने स्वरूप ला नवी उमेद दिसत होती.
स्वरूप ला दहावीत असताना उत्तम वर्ग शिक्षक लाभले. त्यांनी स्वरूप ला स्वतःच्या अंतर्मनात दडलेल्या मी शी ओळख करून दिली. सरांनी सांगितल्याप्रमाणे स्वतःचा लढा हा स्वतःच लढावा लागतो. युद्धात सैनिकांचे फौज बरोबर जरी असली तरी जो तो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. यामध्ये स्वतःचा जीव गमवावा लागल्यानंतर युद्ध करता स्वतःलाच उभे राहावे लागणार. अशावेळी सैनिकांची फौज देखील पाठीशी उभी असणार नाही. समोर येणाऱ्या प्रसंगाला जेव्हा स्वतः लढण्याची वेळ उद्भवते तेव्हा मात्र इतरांवर अवलंबून राहिल्यामुळे शत्रू निश्चितच विजय होईल.
स्वरूप एकुलता एक असल्याने त्याला डॉक्टर किंवा इंजिनियर बनवण्याचे आई-वडिलांचे स्वप्न अपूर्णच राहणार होते. कारण स्वरूप ला दहावीत जेमतेम ५५ टक्के मिळाले होते. एवढ्या कमी टक्क्यांमध्ये शास्त्र शाखेत प्रवेश मिळणे अशक्य होते. स्वरूपच्या सरांनी सांगितल्याप्रमाणे स्वरूप ला वाणिज्य शाखेत प्रवेश घेण्यात आला.
स्वरूपचे लग्न लावून देण्याचा निर्णय आई-वडिलांनी घेतला. नीता आपल्या घराण्यात शोभून दिसेल अशी मुलगी आहे. माधवरावांच्या मित्राची मुलगी असल्यामुळे घरच्यांच्या पाहण्यातली नीता आधीपासूनच होती. घरच्यांची पसंत तीच आपली पसंत म्हणत स्वरूपने लग्नाला मान्यता दिली.
या संसारामध्ये कोणत्या घटना घडत जातात ते आपण पुढच्या भागात पाहूया.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा