" आव धनी,बगा आपलं लेकरू यवढ्याश्या दिव्याच्या अंधारात बी पुस्तक वाचतया."
" व्हय. तुजं म्हणणं समजतंय मला.आपण टाकू त्याला शाळेत."
गावच्या सरपंचांच्या घरी,
" नमस्कार सरपंच साईब. हा माझा छोकरा.अभ्यासात लई हुशार हाय.शाळेत टाकू म्हणतोय त्याला.जरा पैशाची नड व्हती. देता का उसनं?"
" नमस्कार सरपंच साईब. हा माझा छोकरा.अभ्यासात लई हुशार हाय.शाळेत टाकू म्हणतोय त्याला.जरा पैशाची नड व्हती. देता का उसनं?"
" काय रं सुभाण्या? तुझं डोंगराएवढ कर्ज फेड की आधी! पोराला शाळेत टाकायचं म्हणतो! हा.हा.हा.. अरे तूमच्यासारख्या गरीब लोकांची लायकी हाय का शाळेत जायची? रोज हातावर काम करणारा तू,काय पोराला शिकवणार? १० रुपायला सोनं समजणारे तुम्ही माझ्यासारखे श्रीमंत कधीच होणार नाही! म्हणून तुमची आणि तुमच्या खानदानाची माझ्याकडं नेहमी न फिटणारं कर्ज घ्यायचीच वेळ येणार! १० रुपये सोडून तुम्हाला समजतं तरी का पैशातल काही? माझ्याकडं गडगंज संपत्ती आहे. ती तुम्हाला मोजतासुद्धा येणार नाही,कारण तुम्ही अडाणी आणि गरीबच राहणार. म्हणून अंथरूण पाहून पाय पसरायला शिक. मागचं कर्ज फेडल्याशिवाय तुला एक रुपया बी मिळणार नाही.चल जा घरी.म्हणे पोराला शाळेत टाकायचं."
सूरज ,सुभाण्याचा मुलगा सर्व ऐकत होता. त्या लहान जीवाला मात्र आपल्या वडिलांचा अपमान झालाय हे सम जल होतं.. तो घरी गेल्यावर जेवला नाही आणि त्याला शांत झोपही आली नाही.तेव्हाच त्याने कोणालाही न सांगता मनोमन एक निश्चय केला, ‘मी या सरपंचाला शिकवून दाखवणार.त्याने माझ्या बापाला अडाणी म्हटले,तुम्हाला पैशातलं काय कळतं असही म्हटलं .ठीक आहे.. मी आता स्वतः काम बी करणार आणि शिकणार बी!’
सूरज जिद्दीला पेटला होता.त्याने शहरात मामाकडे जायचे ठरवले. दिवसभर पेपर टाकणे, गॅरेजवर काम करणे,मेसचे डबे पोचवणे अशी कामे करून रात्रशाळेत प्रवेश मिळवला.त्याला पैसे जपून वापरायची तसेच बचतीची सवय लागली.तो खूप शिकला.उपजतच शिक्षणाची आवड असल्याने तो स्कॉलरशिप मिळवत गेला आणि अनेक स्पर्धा परीक्षा खूप लहान वयापासून देऊ लागला. त्यातून त्याला अभ्यासाचे तंत्र उमगत गेले आणि एक दिवस तो एम पी एस सी परीक्षा पास होऊन पंचायत समिती कार्यालयात ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून सिलेक्ट झाला. योगायोगाने त्याला आपल्याच गावच्या पंचायत समितीत काम करण्याची संधी मिळाली.
तो गावी गेला. सर्वप्रथम सरपंच त्याचे स्वागत करायला फुलांचा गुच्छ घेऊन आले. सत्कार झाला आणि त्याने त्याच्या आईवडिलांना तिथे बोलवले. तो म्हणाला,
" सरपंच, ह्याच सुभाण्याचा मी मुलगा बरं का.काही आठवतं का तुम्हाला ?तुम्ही म्हणाला होता की तुमच्या खानदानाची माझ्याकडं कर्ज घ्यायचीच लायकी आहे, तुमच्यासारख्या अडाणी लोकांना पैशातल काय कळतं?आठवले का काही?"
सरपंच आता थोडे शरमले होते.त्यांच्या डोळ्यासमोरून अचानक एक फ्लॅशबॅक गेल्यासारखं झालं..
सरपंच त्यांच्या तंद्रीतच होते.पुढे सूरज म्हणाला,
" म्हणून आता मी माझ्या हाताखाली तुम्हाला चांगलं राबवणार आणि चांगलंच वठणीवर आणनार.गावातल्या सगळ्या जमिनींचा हिशोब आजच्या आज मला द्यायचा,विकास कामांची यादी दाखवायची.चला पटकन लागा कामाला."
" म्हणून आता मी माझ्या हाताखाली तुम्हाला चांगलं राबवणार आणि चांगलंच वठणीवर आणनार.गावातल्या सगळ्या जमिनींचा हिशोब आजच्या आज मला द्यायचा,विकास कामांची यादी दाखवायची.चला पटकन लागा कामाला."
सुरजच्या आईवडिलांना मात्र आज त्याचा खूप अभिमान वाटला.आपल्या होतकरू लेकराने आपल्या अपमानाचा बदला घेतला आणि सरपंचाच्या श्रीमंतीचे गर्व हरण केले हे पाहून ते मनोमन खूप सुखावले.सूरजची आई आज खऱ्या अर्थाने भरून पावली कारण बाळाचे पाय पाळण्यात दिसताच तिने आपल्या पतीच्या सहाय्याने मुलाच्या भवितव्याचा योग्य निर्णय घेतला होता.
©® सौ प्रियंका कुणाल शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा