Login

दोष कुणाचा तिचा.. त्याचा की परिस्थितीचा.? भाग 3 अंतिम

Dosh kunacha

दोष कुणाचा तिचा त्याचा की परिस्थितीचा

भाग 3 अंतिम

क्रमशः भाग 2 

त्या रात्री घरच्यांच बोलणं माझ्या कानावर पडल... आई बाबा बोलत होते..
“अहो काय करायच आता, त्यांनी आधी आपल्याला काहीच कल्पना दिली नाही..  आणि आता हे सगळं काय होऊन बसलं, साखरपुडा मोडला तरी बोलण आपल्यालाच ऐकावं लागेल आणि नाही मोडला तरी भोग आपल्यालाच भोगावे लागतील."

“साखरपुडा मोडायचा नाही, साखरपुडा मोडला तर पुन्हा पोरीशी लग्न कोण करेल?.. समाजात बदनामी होईल ती वेगळीच…. साखरपुडा मोडलेल्या पोरीशी कोण लग्न करणार?
 आपली परिस्थिती अशी हलाखीची,  तिच्या पाठच्या तीन बहिणी आहेत, तीच ऐकल्यावर त्यांची लग्न नाही जमणार.

“अहो पण आता आपल्याला सगळं कळलय ना..”
 
“कळलंय तर कळलंय, काही फरक पडत नाही आपण करूया आपल्या पोरीचं लग्न, तिचं लग्न झालं की तिच्या पाठच्या तीन बहिणीचं लग्न होईल.
 त्यांच्या तोंडातला  एक एक शब्द माझ्या हृदयाला चिरा पाडून जात होता.. पायाखालची जमीन सरकली.. डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या पण त्यावेळी काहीच करता आलं नाही...
मी तिथे तशीच उभी होती...निशब्द: 
 
त्यांनी पण साखरपुडाच्या आधी काही नाही सांगितलं, आधी सांगितलं असत तर जमलेलं लग्न मोडता आलं असत..पण साखरपुडा झाल्याच्या नंतर सांगितलं कारण त्यांनाही माहीत होतं साखरपुडा झाला की हे लोकं काहीही करू शकणार नाही, त्याचाच फायदा त्यांनी उचलला...फसवलं आम्हाला.. आम्ही गरीब... आमची परिस्थिती गरीब.. याचाच फायदा त्यांनी घेतला..
 
 पण मी गप्प राहिले आणि लग्नाला उभी राहिले, खरं तर लग्नाला फक्त माझ शरीर उभं होत कारण आत्मा तर आधीच मेला होता..
 सुमितने फक्त माझ्या शरीराशी लग्न केलं,  लग्नानंतरही त्याच्या वेश्या व्यवसाय सुरूच होता. जसा बाहेर इतरांच्या शरीरासोबत खेळायचा तसाच माझ्याही सोबत..
 
मुक्ताचे डोळे पुन्हा पाणावले.. मन भरून आलं...थोडं पाणी प्यायली आणि पुन्हा बोलायला सुरुवात केली.

मला वाटलं लग्नानंतर सुधारेल, माझ्या वर प्रेम करेल पण अस काहीच घडलं नाही, दिवसा त्याला माझी गरज भासायचीच नाही, गरज होती ती फक्त रात्रीची.


 मला खूपदा वाटलं ,सोडून जावं...कुठेतरी पळून जावं..पण माझा नाईलाज होता.. आणि सुमितनी जरी मला सोडलं असतं तरी तेच सगळं घडलं नसत कशावरून.


आता मला असच आयुष्य जगायचं आहे हे मी स्वीकारल.
 मुक्ताचं सगळं बोलणं ऐकून डॉक्टरच्या डोळ्यात पाणी आलं.. शेवटी डॉक्टरही एक माणूसच आहे, तीच मन भरून आलं.. तिनी मुक्ताला शांत केलं आणि धीर दिला.


“तुझ्यासोबत जे काय घडलय  ते जाऊ दे पण आता या बाळासोबत आपल्याला हे सगळं होऊ द्यायचं नाहीये ...तू तुझ्या बाळाला यातून वाचवू शकतेस पण त्यासाठी तुला सुमितला दूर कराव लागेल.


 आता तू सुमितसोबत नाही राहायचं.. मी आहे तुझ्यासोबत मी सगळं करेल तुझं...
हे बाळ सुदृढ जन्माला यायला हवं, तुला या बाळासाठी सुमितला दूर करावं लागेल, तुला कळतंय का मी काय बोलतीय."
“ पण मॅडम मी एकटीच कशी?"


मुक्ता बोलता बोलता थांबली.


 “तू एकटी नाहीयेस , मी तुझ्यासोबत आहे... राहिला प्रश्न सुमितचा तर ते मी सगळं करेल.. सुमितला त्याच्या केलेल्या चुकीबद्दल शिक्षा नक्की होईल.. त्यानी तुला फसवलं आणि त्याची शिक्षा त्याला कोर्टातून मिळेल.
 मुक्ता तोंडावर हात ठेवत
 “कोर्टकचेरी... नाही.. नाही.. मॅडम आमच्याकडे तेवढा पैसा नाही."


 मुक्ता तुला आता मी सांगितले ना तुला काळजी करायची गरज नाहीये तुझा आणि तुझ्या बाळाचा काय करायचे ते मी बघेल.
 तू फक्त आता आनंदी राहायचं स्वतःसाठी नाही तर त्या चिमुकल्या जीवासाठी.. तू जे भोगलस ना ते त्या निष्पाप जीवानी नाही भोगायचय, ते बाळ जन्माला येईल आणि सुदृढ येईल...
 
 आता समोरचे सहा महिने मी तुझी काळजी घेईल, तू घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
 असा म्हणत डॉक्टरने तिच्या पाठीवर हात ठेवला आणि तिची आणि तिच्या बाळाची संपूर्ण जबाबदारी घेतली.


 समाप्त:


अशा कितीतरी मुक्ता या जगात असतील ज्या तोंड दाबून बुक्क्यांचा मार खात असतील. चूक कोणाचीही असो भोगाव मात्र स्त्रीलाचं लागतं...इथे चूक मुक्ताची नव्हती तरी तीच आयुष्य पणाला लागलं.. मग चूक कोणाची?..
तिची..त्याची...की परिस्थितीची?

0

🎭 Series Post

View all