"काळजी करू नको. लवकरच तू रुळशील घरात. सध्याची परिस्थिती, अवस्था पाहता तुला एकटीला सोडून येणं मला योग्य वाटलं नाही आणि आपल्या आयुष्यात येणारी माणसं आपल्याला काहीतरी शिकवून जातात. बघ तू, ही फेज निघून गेली की तुला बरं वाटेल." मावशीने आर्याला जवळ घेतलं.
--------------------------------
लवकरच आर्याने ऑफिस पुन्हा जॉईन केलं. मनोहर काका तिला सोडून ऑफिसला जात आणि येताना घेऊन येत. वडीलांच्या मायेने तिच्यावर लक्ष ठेवत. काय हवं, नको ते बघत. याचाही कस्तुरीला राग आला. मावशीचा मुलगा , निशांत आर्याशी फारसा बोलत नव्हता. बोलला तर अगदी जुजबी बोलायचा. टाळायचा तिला. मग आर्यालाही अवघड वाटायचं.
हे पाहून आर्या मावशीला म्हणाली, "आता मी बऱ्यापैकी सावरले आहे. घरी जाईन म्हणते."
हे पाहून आर्या मावशीला म्हणाली, "आता मी बऱ्यापैकी सावरले आहे. घरी जाईन म्हणते."
पण डिव्होर्सची प्रक्रिया नुकतीच सुरु झाली होती. जुन्या आठवणींचा त्रास होण्यापेक्षा उमा मावशीने आर्याला आपल्या घरीच ठेऊन घेतलं.
काही दिवसांनी कस्तुरीचं लग्न ठरलं. श्रीमंत कुटुंब, एकुलता एक मुलगा परदेशात होता. उत्तम कमवत होता. आता कस्तुरी हरभऱ्याच्या झाडावर चढली नसली तर नवलच होतं! लवकरच भव्यदिव्य साखरपुडा झाला. कस्तुरीशी पटत नसलं तरी आर्या या कार्यक्रमात मनापासून सहभागी झाली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने निशांतला आर्याचा स्वभाव जवळून अनुभवता आला. नकळत त्याला तिच्याविषयी ओढ वाटू लागली.
इकडे कस्तुरीला मात्र स्वर्ग दोन बोटं उरला. लग्नाची तयारी सुरू झाली आणि अचानक बातमी कळाली, कस्तुरीच्या होणाऱ्या नवऱ्याचं आधीच एका परदेशी मुलीसोबत लग्न झालेलं आहे आणि घरच्या दबावामुळे तो हे लग्न करतोय! उमा मावशीला आणि घरच्यांना मोठा धक्काच बसला. आणखी सखोल चौकशी करता मिळालेली माहिती खरी निघाली.
आता मात्र कस्तुरीचा तोरा उतरला. "मी तुझं दुःख समजू शकते." असं म्हणत ती रडत आर्याच्या मिठीत शिरली. म्हणतात ना, माणसाला एकमेकांच्या जवळ येण्यास आणि एकमेकांपासून दूर होण्यास एक छोटासा प्रसंग देखील पुरेसा असतो.
आता मात्र कस्तुरीचा तोरा उतरला. "मी तुझं दुःख समजू शकते." असं म्हणत ती रडत आर्याच्या मिठीत शिरली. म्हणतात ना, माणसाला एकमेकांच्या जवळ येण्यास आणि एकमेकांपासून दूर होण्यास एक छोटासा प्रसंग देखील पुरेसा असतो.
"नशीब, हे सगळं लग्न होण्याआधी समजलं. नंतर कळलं असतं तर काय झालं असतं देव जाणे!" उमा मावशी अन् मनोहर काका मुलाकडे जाऊन साखरपुड्याचा खर्च वसूल करून घेऊनच घरी आले. "या अशा मुलांना आपलं डोकं चालवता येत नाही. आई जे म्हणेल तसंच वागतात आणि परदेशात गेली की मात्र यांना पाय फुटतात. सगळी बंधनं तोडून ही परदेशी फॅड आत्मसात करतात." निशांत तर मुलाला मारायला मित्र घेऊन जातो म्हणाला. पण काकांनी अडवलं.
आता निशांतलाही आर्याचं दुःख जवळून अनुभवता आलं अन् त्याचा मनात तिच्याविषयी भावना दाटून आल्या. आर्यालाही सहवासाने त्याच्याविषयी काहीशी ओढ वाटू लागली होती. पण हे तिचं तिलाच कळत नव्हतं.
आता निशांतलाही आर्याचं दुःख जवळून अनुभवता आलं अन् त्याचा मनात तिच्याविषयी भावना दाटून आल्या. आर्यालाही सहवासाने त्याच्याविषयी काहीशी ओढ वाटू लागली होती. पण हे तिचं तिलाच कळत नव्हतं.
आर्याला आपल्या आईची आठवण येत होती. मध्येच ती राहुलला फोनही करत होती. पण तो दाद देत नव्हता. "बरं झालं, तू राहुलला घटस्फोट देतेस. ही अशी मुलं आपल्या मतावर ठाम नसतात अन् घरच्यांनी कान भरले की बायकोला सोडून द्यायला मागं -पुढं बघत नाहीत. मग नुकसान आपल्यालाच सोसावं लागतं." लवकरच कस्तुरी आणि आर्याची गट्टी जमली.
काही दिवसानंतर आर्या आणि राहुल कायदेशीररित्या वेगळे झाले. मावशीच्या घरात रुळल्याने आर्याला हे वेगळं होणं फारसं जड गेलं नाही. सगळे नको म्हणत असताना देखील तिने आपल्या घरी निघायची तयारी सुरू केली.
एक दिवस संध्याकाळी आर्या आपलं सामान भरत असताना उमा मावशी तिच्या खोलीत आली. मावशीला काहीतरी सांगायचं होतं. पण कसं सांगायचं हेच कळत नव्हतं.
"आर्या, इथं सगळ्यांनाच वाटतं तू या घरातून जाऊ नयेस."
"हम्म. तुझ्या घरी मी किती दिवस राहणार मावशी? तुमच्यावर भार होऊन मला आणखी इथं राहायचं नाहीय." आर्या
" मी हा भार आयुष्याचा सांभाळायला तयार आहे. माझी सून म्हणून!" मावशी तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाली.
"काय?" आर्याच्या डोळ्यांत आश्चर्य दिसत होतं.
"हो. निशांतला तुझ्याशी लग्न करायचं आहे आणि काळजी करू नकोस आम्ही सगळे तुला तुझ्या भूतकाळासह स्वीकाराला तयार आहोत." असं म्हणत मावशीने खोली बाहेर उभ्या असणाऱ्या निशांतला हाक मारली.
"मला माहिती आहे, जे घडलं त्यात तुझी काहीच चूक नव्हती. मला तू या घरात आल्यापासून आवडत होतीस. पण तुझी डिव्होर्सची प्रक्रिया पूर्ण व्हायची होती आणि नवीन नात्याला तू कशी रिऍक्ट होशील हेही मला माहिती नव्हतं. खरंच मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तुझ्यासारखी सुंदर, हुशार, समंजस अशी जोडीदार मला मिळाली तर मला खूप आवडेल आणि काळजी करू नकोस, तुझा भूतकाळ आपल्या नात्यात कधीही येऊ देणार नाही. ही माझी जबाबदारी असेल." निशांत आत्मविश्वासाने बोलत होता. हाच आत्मविश्वास आर्याला भावला. नकळत तिचं मन राहुल आणि निशांतची तुलना करू लागलं. त्यात निशांत उजवा ठरला.
मात्र आर्याने विचार करण्यासाठी थोडासा वेळ मागून घेतला. निशांतचं वागणं, बोलणं सगळं कसं नीटनेटकं होतं. त्याने कधीही आपली मर्यादा ओलांडली नव्हती. आर्याविषयी वाटणारी ओढ त्याने उघडपणे व्यक्त केली नव्हती. आईला विश्वासात घेऊन आर्याच्या कलाने घेत आपल्या भावना हळुवारपणे मांडल्या होत्या.
आर्याने बराच विचार करून अखेर निशांतला होकार दिला. "जोडीदाराची खरी ओळख लग्नानंतरच होते, सहवासाने प्रेमही होतं. तुझा होकार आला. पण प्रेमासाठी मी वाट पाहीन." निशांत विश्वासाने म्हणाला.
अचानक आर्याच्या मोबाईलवर मेसेज आला. राहुलने आपल्या दुसऱ्या लग्नाचा फोटो पाठवला होता, सोबत त्याचं संपूर्ण कुटुंब होतं.
अचानक आर्याच्या मोबाईलवर मेसेज आला. राहुलने आपल्या दुसऱ्या लग्नाचा फोटो पाठवला होता, सोबत त्याचं संपूर्ण कुटुंब होतं.
"हा इतक्या लवकर सगळं विसरून नवीन आयुष्याला सुरुवात कशी काय करू शकतो? खरंच याचं माझ्यावर प्रेम होतं की फक्त आकर्षण?" आर्या एकसारखी रडत होती. "एका क्षणात भूतकाळ विसरून नवं जग स्वीकारणं एका स्त्रीसाठी खचितच सोपं नसतं." निशांतने तिच्या पाठीवर हात ठेवताच ती त्याच्या मिठीत शिरली. आता तिला फक्त आधार हवा होता. त्याची आश्वासक मिठी खूप काही सांगून गेली. त्यात आधार होता अन् नव्या आयुष्याची सुरुवातही.
लवकरच आर्या आणि निशांतचं लग्न झालं. उमा मावशीच्या घरात तिचं नव्याने स्वागत झालं. सून म्हणून आर्या घरात रुळली देखील. दिवस सरत होते तसं निशांत आणि आर्याचं नातं अधिकच खुलून येत होतं.
एक दिवस राहुलच्या वॉलवरचा ब्रेकअपचा स्टेटस पाहून तिला धक्काच बसला. कारण त्याचं दुसरं लग्नही अयशस्वी झालं होतं. म्हणतात ना, आपल्या कर्माची फळं ही इथेच भोगावी लागतात. तसंच काहीसं वाटलं तिला.
आपल्या संसारात रमलेल्या आर्याने मात्र राहुलला आज कायमचं अन्फ्रेंड केलं. एक राहून गेलेलं अखेरचं काम आज तिने पूर्ण केलं होतं. आर्याला या जुन्या क्लेशदायक आठवणी कायमच्या पुसायच्या होत्या. आता ती निशांतच्या मदतीने एक नवं जग शोधण्याचा प्रयत्न करत होती. स्वतःसाठी अन् आपल्या नव्या संसारासाठी सुध्दा!
समाप्त.
©️®️ सायली जोशी.
©️®️ सायली जोशी.