एक संसार असाही.. भाग २
“मला तुम्ही दिलेलं भिकारी सासर सुद्धा अजिबात आवडत नाहीय …”
दामिनीच्या बोलण्यावर उचललेला घास तसाच हातात राहिला. आपली लेक आपल्याच सासरला भिकारी म्हणतेय म्हणजे नेमकं काय झालं असेल? आपली लेक नक्की भांडून तर आली नसेल ना? समोर भरलेलं ताट तसच होतं. उचललेला घास ही बिचाऱ्या आई वडिलांना गिळवेना.
“दामू तू नाराज आहेस कळतं मला. तू माहेरी आल्यापासून एका शब्दाने देखील बोलली नाहीस. आपण यावर निवांत बसून बोलूया…” वसंतराव तीला समजावत बोलले.
“बस बाबा! मला आता यावर काहीच बोलायचं नाही आहे. मी परत मुंबईला जाणार नाही म्हणजे नाही.”
काय मुलगी आहे ही, आयुष्य म्हटलं की प्रॉब्लेम असणारच त्यात संसार म्हणजे दोन चाकांचे आयुष्य असतं. एका चाकावर थोडीच चालणार आहे. विश्वास आणि साथ या दोन गोष्टी संसारात महत्वाची भूमिका बजावत असतात. आणि विश्वासास एकदा का तडा गेला की सुखी संसाराची राख रांगोळी व्हायला वेळ लागत नाही.
“ठीक आहे. तुला जितके दिवस राहायचे तेवढे रहा कोणालाही अजिबात कोणता प्रॉब्लेम नाहीय.”वसंतराव शांतपणे बोलले.
समोर भरलेलं ताट असताना आपण एखाद्या गोष्टीचा राग जेवणावर कधीच काढायचा नाही या मुल्ल्याने वसंतराव वागत असत. जेवताना शांतपणे अन्न ग्रहण करावं त्या अन्नाचा अपमान होईल अस वागू नये. जे काही असेल ते शांतपणे बोलून घ्यावं. खासकरून जेवताना बोलण्याची ही सगळ्यांची पहिलीच वेळ होती.
वसंतरावांच्या बोलण्यावर मग दामिनीनेही शब्द वाढवला नाही. खाली मान घालून ती जेवू लागली. पण एवढी आवडीची शेपूच्या भाजीला तिने हातही लावला नाही. पोळी वरणात बुडवून खाऊ लागली. दयमंती ताईंना काही न बोलण्याचा डोळ्यांनी इशारा करून त्यांनी जेवणावर लक्ष केंद्रित केले.
वसंतरावांच्या बोलण्यावर मग दामिनीनेही शब्द वाढवला नाही. खाली मान घालून ती जेवू लागली. पण एवढी आवडीची शेपूच्या भाजीला तिने हातही लावला नाही. पोळी वरणात बुडवून खाऊ लागली. दयमंती ताईंना काही न बोलण्याचा डोळ्यांनी इशारा करून त्यांनी जेवणावर लक्ष केंद्रित केले.
सर्वांची जेवणे आवरली. कायम जेवलेली खरकटी भांडी उचलणारी दामिनी आज जेवून झाल्याबरोबर आपल्या रूम मधे गेली. वसंतराव सारं डोळ्यांनी पहात होते. दयमंतीताईंचे जेवून होताच त्यांना खरकटी भांडी उचलण्यासाठी वसंतराव मदतीला पुढे धावले. दयमंतीताई नको म्हणत असतानाही वसंतराव त्यांना भांडी घासण्यासाठी मदत करू लागले.
“आहों…”
“दयमंती तुला जे जे प्रश्न पडलेत ते मलाही पडलेत. पण खरं सांगू.. आपण दामुच्या सासरी फोन करून विचारणा केल्याशिवाय आपल्याला काहीही समजणार नाही. मी जावईबापूशीं बोलून बघतो.”
“हो चालेल”
वसंतरावांनी आपल्या जावयांना फोन लावला आणि ते दारातील लॉन मधे जाऊन बसले. दयमंतीताईही सर्व काम आवरून त्यांच्या समोरच्या खुर्चीवर येऊन बसल्या.
“अमनराव कसे अहात?” वसंतरावांनी बोलायला सुरुवात केली.
“हो बाबा ठीक आहे.” अमन बोलले.
“जेवण वैगिरे झालं का?”
“हो आताच केलं आईला हॉस्पिटल मधे ऍडमिट केलं आहे. त्यामुळे आज थोडा उशीर झाला.”
“काय ss काय झालय वहिनींना?” वसंतराव काळजीने बोलले .
“तिला थोडा श्वसनाचा होत होता.. म्हणून घेऊन गेलो होतो.”
“आता ठीक आहेत ना त्या?”
“हो, बाबा ठीक आहे. दामिनी कशी आहे?”
“ती बरी आहे अमन तुमच्यात काय बिनसले आहे का? नाही म्हणजे ती आम्हाला एका शब्दाने काही बोलली नाही. आणि इकडे आल्यापासून तिने स्वतः ला रूम मधे कोंडून घेतलं आहे. म्हणून आम्हालाही काळजी वाटते. काय झालं आहे ते आम्हालाही कळू द्या.”वसंतराव काळजीच्या सुरात म्हणाले.
“बाबा मागच्या महिन्यात कामावरून घरी परत येत असताना माझा एक मित्र भेटला. त्याला नवीन फोन घ्यायचा होता. आणि त्याने मला सोबत येण्याची विनंती केली. आणि मी त्याच्यासोबत मॉलला गेलो. मित्राची शॉपिंग सुरू असताना माझं लक्ष एका गोष्टीकडे गेलं अन् क्षणभर मी स्तब्ध झालो.” अमन सांगत होता.
“कोणती गोष्ट?” वसंतरावांनी विचारलं.
दामिनी एका तरुणाला मिठी मारून उभी होती. ते बघून क्षणभर मी गोंधळलो. असेल कोणीतरी नातेवाईक म्हणून मीही त्याकडे दुर्लक्ष केलं आणि मित्राचा फोन पाहू लागलो. पण दामिनी मिठीतुन बाहेर आल्याबरोबर त्या तरुणाच्या हातात हात देवून मॉलभर फिरत होती. मी वरच्या माळ्यावरून सगळ पहात होतो. तिथल्याच कॅन्टीन मधे दोघांनी खाऊन घेतलं जेवताना दोघे एकमेकांना भरवत होते. ते पाहून मला राग येत होता. आपली आपली बायको दुसऱ्या सोबत एवढी फ्रीडली वागत आहे हे पाहून कोणत्या नवऱ्याला राग येणार नाही? मलाही राग येत होता. त्याच्यासमोर जावं तर सोबत माझा मित्र होता. त्यामुळे मी मित्रासोबत घरी निघून आलो.”
“तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात अमन” वसंतरावांना देखील आपल्या जावयाचं बोलणं पटत होतं. पण ते पटकन विश्वास ठेवणाऱ्यातले गृहस्थ नव्हते. आपल्या मुलीचे म्हणणे देखील ते जाणून घेणार होतेच.
“बाबा मी घरी येऊन दोन तास झाले तरीही दामिनी घरी आली नव्हती. त्यामुळे टेन्शन आणि राग सोबतच उफाळुन आले. एकीकडे कधीही एकटी बाहेर न जाणारी दामिनी एकटीच कोणालाही न सांगता बाहेर गेली होती. आणि एका परपुरुषासोबत अस मॉलमध्ये भटकत होती. जर मी मित्रा सोबत तिथे गेलो नसतो तर ही गोष्ट दामिनी माझ्या पासून लपवून ठेवली असती नाही का?”
“ तो तरुण कोण होता?”
“मला नाही माहित बाबा.. मी कधी त्यांना भेटलो सुद्धा नाही. कधी पाहिलं आहे.
वसंतराव आता टेन्शनमध्ये आले होते. दामिनी वाट चुकली तर नसेल ना? या काळजीने त्यांनाही घाम फुटला होता..
दामिनी नेमकी कोणाला भेटली होती आणि कोणाला दामिनीने कोणाला मिठी मारली होती? पाहू पुढच्या भागात….
क्रमशः….