एक संसार असाही…भाग 8
“मग पुढे काय झाले? तुला बाहेर कोणी काढले? वसंत रावांनी अगतिक होऊन विचारले. कदाचित ही गोष्ट वसंत रावांना माहित नसावी.
“ वेदांतने.. तो नुकताच घरी आलेला काम करणाऱ्या रंजना मावशींनी मम्मीने मला रूममधे कोंडून ठेवलं आहे म्हणून सांगितलं.”
“मग?”
“मग काय…त्याने क्षणाचाही वेळ न लावता रूमचे लॉक खोलले आणि माझ्याजवळ आला. तेंव्हा मी बेशुद्ध होऊन पडले होते. माझी अवस्था बघून त्याचा राग सातव्या आसमानावर पोहचला. रडून रडून सुजलेले डोळे आणि चेहरा, त्यात मी बेशुद्ध पडण्या आधी सुसाईड करण्याच्या बेतात होते. आणि नस कापून घेण्यासाठी हातात घेतलेली सुरी तशीच माझ्या हातात होती. त्यामुळे सर्वजण सुरुवातीला गोंधळले. नोकरचाकर घाबरले. मोठ्या बाईसाहेब आणि मोठे साहेब आल्यावर आपले काही खरं नाही म्हणून नोकरांना घाम फुटला. कारण मम्मी सांगून गेली होती की माझ्यावर जातीने लक्ष ठेवायचं. एक जरी चूक झाली तर गप्प बसणार नाही.”
“ तुझी मम्मी खूपच कडक…सुरुवातीलाच त्यांनी मला जेंव्हा धारेवर घेतलं होतं. तेंव्हा एक क्षण वाटलेले. प्रत्येक मुलीला कडक खाष्ट सासू मिळते…पण त्या मुलीचं नशीब असतं. देवा मी असा कोणता गुन्हा केलाय की तू मला या कडकलक्ष्मी च्या लेकीलाच माझ्या आयुष्यात आणून ठेवलंय..” वसंत राव हसत हसत बोलत होते.अन् त्यांचे ते हाव भाव बघून दयमती ताई देखील मोठमोठ्याने हसू लागल्या.
“ तुम्हाला आठवते? आपल्या प्रणवच्या वेळी मम्मी मला अजिबात सासरी सोडत नव्हती.जेंव्हा मला दिवस गेलेत अस तिला समजलं तेंव्हापासून ती आनंदाने हरखून गेली होती. कारण तिच्या मांडीवर तिचे पाहिलं वाहील नातवंडं खेळणार होतं..” दयमंती ताईंनी प्रणवची आठवण काढताच. हसणारे वसंतराव क्षणात गंभीर झाले.हे दयमंती ताईंच्या डोळ्यातून सुटले नाही.
“आहों…”
“ दयमंती काय चूक झाली गं?... काय चुकीचा निर्णय घेतला मी? जे मला वाटलं तेच मी केलं. मलाही खूप वाटायचं आपलं लेकरू चुकलं आहे. त्याला माफ करावं आणि आपल्या घरात पुन्हा बोलवावं.” वसंतराव भरलेल्या डोळ्यांनी बोलत होते. कोण म्हणत माणसं रडत नाहीत. तो प्रसंग घडल्यापासून आजपर्यंत हा बाप आपल्या पुत्र प्रेमाने रोज रडत होता. तेही शेतातल्या आंब्याच्या झाडाखाली बसून…आपल्या लेकराने लहान पणी लावलेले ते आंब्याचे झाड आता विस्तीर्ण मोठे झाले होते. त्याच झाडाखाली त्यांच्या आणि त्यांच्या प्रणवच्या खूप आठवणी होत्या.
वसंतराव काही शेतातले काम करत नसत. शेतावरून फेरफटका मारून कितीतरी वेळ या आंब्याच्या झाडाखाली बसून आपल्या लेकरांच्या आठवणीत रमत. सातासमुद्रापार असलेल्या आपल्या गोळ्याला आपल्या आई वडिलांची आठवण कशी येत नसेल?? विसरला असेल का तो आपल्या आईबापाला? सतत प्रश्नांनी वसंतराव गुंतलेले असत.
शेतावर हा बाप कितीही रडु दे…आपण रोज आपल्या पुत्र प्रेमाने रडतोय हे दयमंती ताईंना ते अजिबात कळू देत नसत. घरी येताना तोच हसतमुख आनंदी चेहरा दयमंती ताईंसमोर हजर होई. रोज सगळ्या नातेवाईकांशी दोघेही भरभरून बोलत असत. दयमंती ताईंना मनापासून रोज वाटे. आपल्या मुलाशी आपण दोघांनी बोलून घ्यावं. घ्याली खुशाली विचारावी, आपल्या नातवा सोबत बोलावं, त्याचा फोनवरच गालगुच्चे घ्यावे, आणि आपण आपल्या लेकराला हक्काने आपल्या घरी परत यायला दटावून सांगावं! पण हे शक्य नव्हतेच. बाप लेकातील मतभेद आणि विकोपाला गेलेला वाद…त्या माऊलीच्या सगळ्या स्वप्नावर पाणी फिरवत होते.
“नाही..नाही तुमची काहीही चूक नाही. आपणच कुठेतरी कमी पडलो आपल्या मुलावर संस्कार करायला…खरतर तुम्ही तुमच्या जागी बरोबर होतात. त्याला परदेशात जायचं होतं. आणि तुम्ही त्याला विरोध दर्शवला. आधीच माझ्या मम्मीने त्याचे जन्मापासून त्याचे सगळे हट्ट, लाड पुरवून त्याला खूप हट्टी बनवलं. लाडका नातू म्हणून आम्हीही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत गेलो. पण नंतर याचे परिणाम असे होतील याची कल्पना ध्यानी मनी नव्हती ओ…” दयमंती ताई वसंत रावांना समजावत बोलल्या.
“दयमंती…त्याला मी परदेशात जायला नको म्हणत नव्हतो…आधी इथेच राहून त्याने पूर्ण शिक्षण घ्यावं हा माझा नियम होता. कारण मी तेंव्हा जिल्ह्याच्या महाविद्यालयाचा प्रमुख प्रिन्सिपल होतो. आणि अर्ध्यातच माझ्या मुलाने इथले शिक्षण सोडून परदेशात जावं हे मला मान्य नव्हत. मीच जर माझ्या मुलांना परदेशात पाठवून दिलं असते तर इथल्या शिक्षणावर प्रश्न उपस्थित केले गेले असते…आणि इतर मुलांसमोर, पालकांसमोर आणि सर्व शिक्षण अधिकाऱ्यांसमोर माझी काय प्रतिमा उरली असती??”
“दयमंती…त्याला मी परदेशात जायला नको म्हणत नव्हतो…आधी इथेच राहून त्याने पूर्ण शिक्षण घ्यावं हा माझा नियम होता. कारण मी तेंव्हा जिल्ह्याच्या महाविद्यालयाचा प्रमुख प्रिन्सिपल होतो. आणि अर्ध्यातच माझ्या मुलाने इथले शिक्षण सोडून परदेशात जावं हे मला मान्य नव्हत. मीच जर माझ्या मुलांना परदेशात पाठवून दिलं असते तर इथल्या शिक्षणावर प्रश्न उपस्थित केले गेले असते…आणि इतर मुलांसमोर, पालकांसमोर आणि सर्व शिक्षण अधिकाऱ्यांसमोर माझी काय प्रतिमा उरली असती??”
“ बरोबर आहे तुमचं.. पण प्रणव खूप हट्टी निघाला. किती आणि किती तर्हेने आम्ही त्याला समजावलं पण त्याने ऐकलेच नाही. शेवटी आपलेच पण खरे करून गेलाच ना…” एका आईचं काळीज चिरत होतं कारण आपल्या पोटच्या गोळ्याला त्या माऊलीने किती किती समजावलं होता.पण त्याने तिच्या शब्दाला भीक घातलीच नाही.
प्रणव दामिनीचा मोठा भाऊ आहे. पाहूया नेमकं काय झालं? प्रणव परदेशात का स्थाईक झाला आहे.? वसंत राव आणि त्यांचा मुलगा प्रणव यांच्यात काय मतभेद आहेत?