Login

तुझ्याच आयुष्याची वाटेकरी व्हायचे आहे भाग ५०

सायलीने तिच्या पद्धतीने मामा मामींचे डोळे उघडले होते. तर दोन्ही जोड्यांच लग्न झाल्यावर फर्स्ट नाईट ची वाट पण लावली होती.

मागील भागात. 

राधीकाने काका काकूंची, आत्याची, बाकी ग्रुपची गळाभेट घेतली. नंतर ती सायली जवळ आली.

“आजपासुन विजयला तुझ्याकडे सोपवतेय. वेडा आहे तो. निट संभाळ त्याला” राधीकाने डायरेक्ट तिच्यासमोर हात जोडले.

“अगं ताई” सायलीला आॅकवर्ड फिल झाल. तिने तिचा हात पकडला. “अशी काय हात जोडतेस. तुझे हात फक्त कान ओढायला आणि आशिर्वादासाठी ठेव. त्यांची काळजी नको करुस.” सायली ने तिला मिठी मारली.

“विजय कुठे राहीला??” विजयचे काका

“माहितीये मला कुठे असेल तो, आलीच मी” राधीका बोलुन मागच्या बाजूला गेली.

“मला निरोप पण नाही देणार का??” राधीकाचा आवाज आला तसा विजय मागे फिरला. तिचे भरलेले डोळे पाहुन तो तिच्या गळ्यातच पडला.

“हे बघ मी जरी नसली, तर आता तुझ्यावर कोणीतरी विसंबून आहे. त्यामुळे निट वागायच हं.” राधीकाने विजयला प्रेमाने दटावले. दोघ बाहेर आले.

“अरे येईल ती दोन दिवसात परत, बाकीचे अश्रु त्या दिवसासाठी ठेव” सोनालीने विजयचाच डायलॉग त्याला ऐकवला.

“हो, माहीती आहे मला, मी थोडीच रडतोय??” विजय त्याची बत्तीशी दाखवत होता. पण भरलेले डोळे कधी खोट बोलतात का??

राजेश येऊन विजयला भेटला. “चल तिकडे, वरात नाचवायची आहे आपल्याला.” तसा विजय हसला.मग राधीकाची पाठवणी केली होती. प्राजक्ता तर तिथेच होती. त्यामुळे राधीका सोबत दुसऱ्या कोणाला पाठवायची गरजच पडली नाही.

थोड्यावेळाने घरातल थोडफार आवरुन, विजयने त्याची गाडी काढली. बाकी ग्रुपला सोबत घेत राधीका च्या सासरी पोहोचला. दिड तासावर तर होत, तिच सासर. मग तिथेही उशीरापर्यंत सगळेच नाचले होते. रात्री २ वाजता सगळे परत घरी आले होते. सगळा ग्रुप त्या रात्री पण विजयच्या घरीच मुक्काम थांबला होता.

आता पुढे. 

दुसऱ्या दिवशी बाकी ग्रुप तर घरी गेला. तिथे फक्त विजय, त्याचे काका काकु, आत्या आणि जिया होती. सायलीच तर मनच नव्हत निघायच, पण मग जायला तर लागतच होत न. तिकडे तिच्या घरी पण सगळेच वाट बघत होते. मग विजयने तिला समजावून तिच्या घरी पाठवल.

प्रणालीच्या मनातही हुरहुर लागुन राहीली होती. चार पाच दिवसच का असेना, इतक भरभरुन ती आयुष्य जगली होती. ती अनाथ असल्याची पुसटशी जाणीवही तिला झाली नव्हती. आता हॉस्टेलवर तिला एकटीला रहायला जीवावर आल होत. तस तिला सायलीच्या आजोबांचा विचार आठवला, पण मग अस अचानक कोणाकडे कस जायच रहायला म्हणून तिने तो टाळला होता.

“आपल्या आयुष्यात जे काही होत, ते त्याच्या मर्जीने होत आणि काहीतरी कारण असल्याशिवाय होत नाही.” विजयने प्रणालीचा खांदा पकडुन बोलला. “तुला ऑप्शन भेटलाय. त्याचा विचार करायला हरकत नाही तुला.”

प्रणालीने विजयकडे पाहील. “कस कळत रे तुला, आमच्या मनातल?? इतक खोलवर कस काय कोणी कोणाला वाचु शकतो??”

“रिश्ते बनाता हु
खयाली पुलाव नहीं,
थाम लु जिसका भी हाथ
मुझसे छुटकारा उसका मुमकीन नही…” विजय हसत बोलला

“लग्न होईपर्यंत तरी तु तिकडे रहावस, अस मला वाटत.” विजयने प्रणालीच्या गालावर हात ठेवले. “तुला आई वडीलांच प्रेम मिळेल आणि त्यांना त्यांच स्वप्न पूर्ण करता येईल.”

“पण त्यांना आवडेल का मी अस त्यांच्या घरी जाऊन राहीलेल??” प्रणाली.

“ते तर कधीचे तयार आहेत, फक्त तुझ्या होकाराची वाट बघत आहेत.” विजय

“म्हणजे आतापण सगळ तुच जुळवून आणले न?” प्रणाली

“मी नाही, सगळी त्याची कृपा” विजचने हात वर करत बोलला.

“हो, हो” प्रणाली “तु तर काहीच करत नाहीस न.”

विजय फक्त हसला. मग प्रणालीही हॉस्टेल वर निघुन गेली.

“झाली ग रेडी ती” विजयने सायलीला मेसेज केला. तिने ओके चा रिप्लाय केला. पण नंतर लगेचच एक सॅड वाली स्मायली पाठवली. विजयने लगेच फोन केला होता सायलीला.

“काय झाल सरकार??” विजय

“आमच्या मातोश्री नाराज झाल्यात आमच्यावर” सायली

“मग आता??” विजय

“आता काय, काढते लहानपणाचा उपाय.” सायली

“किप इट अप” विजय

सायली सकाळी घरी आली होती. पण तिची आई तिच्याशी बोललीच नाही. जेव्हापासून ती विजयच्या घरी गेली होती रहायला, तेव्हापासून फक्त त्यांनीच फोन केले होते तिला. सायली ने स्वतःहुन असा फोन केलाच नव्हता. जस काय ती विसरलीच होती, अस त्यांना वाटू लागल होत. पण मग सायलीला ही तिच्या आईला कस मनवायच माहीती होत. मग किचनमधुन तो वास पुर्ण घरात पसरला. तसा सायलीच्या आईचा राग विरघळला होता. फक्त त्या दाखवत नव्हत्या.

“काहीही केल तरी आता काहीच फायदा नाही” सायलीची आई मुद्दाम मोठ्याने बोलली. “माझी दुसरी लेक आली न, तिच्याकडून मी माझे सगळे स्वप्न पूर्ण करुन घेईल. तु जा आत्ता पासुनच तुझ्या सासरी.” सायलीची आई मस्करी करत बोलली.

दुसऱ्या क्षणाला सायलीला जाणीव झाली की, ती पण थोड्या दिवसांनी ते घर सोडुन जाणार होती ते. तिला राधीका आठवली, जी घरातुन निघताना घरातल्या प्रत्येक वस्तुंवरुन हात फिरवत होती. सायलीचे डोळे लागलीच भरुन आले. तीने तिथेच बाजुला बसुन घेतल होत. सायलीच्या आजोबांच सायली कडे लक्ष गेल. तस त्यांनी सायलीच्या आईला इशारा केला. त्यांनी सायलीच्या डोळ्यात पाणी पाहील. तशा त्या पटकन सायली जवळ गेल्या.

“अग, गम्मत करत होती मी” सायलीच्या आईने सायलीला जवळ घेतल.

“सॉरी ग, मीच विसरुन गेली होती. आता नाही वागणार तस” सायलीने तिच्या आईला घट्ट मिठी मारली. 

सायलीने तिच्या हाताने बनवलेली साखरचपाती तिच्या आईला चारली. ती लहान असताना तिच्या हाताने बनवुन तिच्या आई बाबांना चारायची.

तिकडे राधीका ही तिच्या माहेरी आली होती. ती पण दोन दिवस थांबून परत तिच्या सासरी निघुन गेली. नंतर काका काकु, आत्याही गावी निघुन गेले. जिया पण हॉस्टेल वर परत गेली. आता विजय एकटाच रहात होता घरी. सुरवातीला विजयला त्याच्या ताई ची खुप आठवण यायची.

परत सगळ रुटीनवर आल. विजय पुर्ण दिवस सर्व्हिस सेंटर वर रहात होता. सायली तिच ऑफीस सुटल्यावर विजयच्या घरी जाऊन त्याच्या वाटच जेवण बनवुन तिच्या घरी जात होती आणि सकाळी तिच्या ऑफिसवर जाताना, त्याला टिफिन देऊन मग पुढे जायची.

दुसरीकडे प्राजाक्तानेही गुड न्यूज दिलेली होती. तिसरा महिन्यानंतर त्यांनी ऑफिशियल डिक्लेअर केल होत. राधीकानेही तिला मिळणाऱ्या पॅकेजच्या फायदा घेत, तिच्या सासरच्या सर्व वरिष्ठ मंडळींना घेऊन देवदर्शनाचा धडाकाच लावला होता.

एवढे दिवस त्यांच्या घरातले  संकेत आणि राजेशला सांगुन कंटाळलेले होते. पण राधीकाने आल्या आल्या त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण केल्या मुळे घरात आता त्यांच्यापेक्षा राधीका आणि प्राजक्ताचे लाड जास्त व्हायला लागले होते. प्राजक्ता ने गुड न्यूज जी दिली होती.

राधीका त्यांच्या कंपनीमधील सर्वात जुनी आणि फेवरेट कलीग होती. आता लग्न झाल्यामुळे तिला सारख टुरवर पाठवण कंपनीला बरोबर वाटत नव्हत. वरुन तिला बरीच वर्ष झाली असल्याने आणि तिची कामा प्रती असलेली निष्ठा बघुन कंपनीने राधीकाच प्रमोशन करायचे ठरवले होत. त्यामुळे ती आता टुर मॅनेजर होणार होती. तीचा जॉब आता स्थिरावणार होता. ते होण्याआधीच राधीकाने सगळ्यांच देवदर्शन, पीकनीक आटपून घेतलेल्या होत्या.

काही दिवसांनी सायलीच्या आई वडीलांनी प्रणालीला त्यांच्या घरी आणल होत. पहीले तिला थोड ऑकवर्ड वाटत होत, मग विजयने तिला आश्वस्त केल. मग ती शांत मनाने सायलीच्या घरी आली होती.

काहीच दिवसातच राहुल आणि आराध्यच लग्न ठरविण्यात आले होते. दोन्ही घरात हळद चांगलीच गाजवली होती. खासदारांच्या मुलीच लग्न असल्याने शहरातला मोठ्ठा हॉल बुक करण्यात आला होता. त्या दोघांतही लग्न धुमधडाक्यात लावुन देण्यात आल होत. मोठ मोठे बिझनेस मॅन, राजकारणातील नामांकीत व्यक्तींनी लग्नासाठी हजेरी लावलेली होती. कन्यादानाच्या वेळेस राहुलचा कान विजयने चांगलाच पिळला होता. मोहिते साहेबांनी विजयला त्यांचा मुलगा असल्याचा पुर्ण मान दिला होता आराध्याच्या लग्नात. राहुलच्या घरी गृहप्रवेश करताना आरती आणि सोनालीने दोघांची वाट अडवली.

“उखाणा घेतल्याशिवाय घरात एन्ट्री नाही” सोनाली

“हो आणि सोबत टोल पण” आरती

राहुलने त्याच्या वडिलांकडे पाहील.

“आता ते तुझ तु बघ” राहुलचे वडील “घरात यायच आहे की बाहेरच थांबायच आहे” ते पण आरती आणि सोनाली च्या नौटंकी मध्ये शामील झाले.

“तुला काय वाटलं? तुला बहीण नाही, म्हणून तु यातुन सुटशील??” सायली “मग आम्ही कशाला आहोत??.” सायली त्या दोघींच्या बाजुला जाऊन उभी राहीली.

मग दोघांनीही एक एक उखाणा घेतला. ते आत घुसणार तोच परत सोनालीने हात आडवा केला.

“टोल??” सोनाली

ह्यांच चालु होत तोवर बाकीचे मस्तपैकी घरात जाउन बसले होते.

“किती आहे तुमचा टोल??” राहुल

“अकरा हजार एकशे अकरा” आरती आणि सोनाली एकदम बोलल्या.

“काय?” राहुलला शॉक बसला “काय डोक्यावर पडल्यात काय??” राहुल “जमणार नाही, पाहीजे तर अकराशे अकरा रुपये देतो.”

“बस मग बाहेर तसाच” सायली “”फक्त आरुला त्रास झाला न मग मी तुला बघते.”

“ह्याला काय अर्थ आहे.” राहुल “विजय अरे तु तरी बोल.” शेवटचा प्रयत्न म्हणून त्याने विजय कडे पाहील.

“त्याला काय बोलतो, त्याचीच तर आयडीया आहे ही.” सोनाली

राहुल तोंड परत पडत. सगळे त्याला हसत असतात.

“अरे काय चाललय तुमच, आवरा लवकर” राहुल ची आई बाहेर येत बोलली. तसा राहुल ला धीर आला.

“ह्याने टोल दिला नाही अजुन.” आरती.

“बघ न आई, डायरेक्ट अकरा हजार मागत आहेत” राहुल बारीक आवाजात बोलला.

“किती? अकरा हजार??” राहुलच्या आईने पॉज घेतला मग बोलल्या, “बस्स? अकरा हजार??”

राहुल तर त्याच्या आईकडे बघतच राहीला.

“अरे तुझ्या ब्रांच ने पहील्या महीन्यातच दहा लाखाचा प्रॉफीट केला न. मला वाटल किमान लाखभर तरी मागतील.” राहुलची आई पण त्या दोघींच्या बाजुने झाली. “चल रे, पटकन देऊन टाक पन्नास एक हजार. उशीर होतोय.”

“काय चॉकलेट आहे पटकन द्यायला.” राहुल वैतागला “त्यापेक्षा अकरा हजार काय वाईट आहेत.”

राहुलने विजय कडे पाहील. त्याला माहीती होत सगळा त्याचाच उपद्व्याप होता ते. तो मस्त चहा पीत बसला होता.

“माझी पण पाळी येईल तेव्हा तुला बघतो मी” राहुल विजय कडे बघत बोलला. त्याने दोघींना अकरा हजार दिले तेव्हा कुठे त्यांना घरात एन्ट्री भेटली होती.

लागलीच सत्यनारायणाची पुजा देखील करुन घेतली होती राहुलच्या आई वडीलांनी. राहुल आणि आराध्याची पहीली रात्र होती.

दोघ एकमेकांच्या जवळ जसे आले तसा पानांच्या सळसळण्याचा आवाज आला. दोघ दचकले. भास झाला म्हणून त्यांनी दुर्लक्ष केल. ते परत एकमेकांच्या जवळ आले. थोड्या वेळाने कुकडुच कु SSSSSS असा जोरात आवाज आला. दोघ घाबरूनच उठले. मग वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज त्यांच्या रुममध्ये येऊ लागले होते. दोघ खुप गोंधळले. नंतर आराध्याला आठवल सगळ्यात शेवटी सायली त्या रुममधुन बाहेर पडली होती. तिने डायरेक्ट सायलीला फोन लावला.

“मग कस चालु आहे हनीमुन?? जंगलातला फिलिंग आला न??” सायली हसुन बोलत होती.

“काय हे सायु??” आराध्या वैतागून बोलली.

“बापरे इतकी घाई हनीमुनची??” सायलीने तिची खेचायला सुरवात केली.

“सायले जाम मार खाशील, बंद कर ते” आराध्या लाजून चिडली होती.

“काय राव, तुझ्या बेस्ट फ्रेंडला अशी त्रास देणार तु??” राहुल बारीक आवाजात बोलला.

“बोलली होती न, सगळा हिशोब क्लिअर करणार मी” सायली तिची कॉलर ताठ करत बोलली.

“सॉरी न बाबा, हव तर पाया पडते. पण ते बंद कर न??” आराध्या काकुळतीला येऊन बोलली.

“तुझ झाल आता तुझ्या साहेबांच काय??” सायली

“वहीनीसाहेब, आम्हा गरीबांवर कृपा करावी. आमची चुक झाली ती पदरात घ्यावी. पण ह्या ध्वनी पासुन आमची मुक्तता करा” राहुल फुल वैतागून बोलला होता.

आवाजच तसे चालु केले होते सायलीने. तशी सायली जोरजोरात हसायला लागली.
“मग कर की बंद, तुझाच मोबाईल तिथल्या स्पिकरला कनेक्ट आहे.” सायली परत जोरजोरात हसायला लागली.

तस आराध्याने तिचा मोबाईल पाहीला, तर तिच्याच मोबाईलमध्ये ते आवाज चालु होते. तेव्हा कुठे ते निट झोपले.

काही दिवसांनी विजयचे मामा मामी विजयच्या घरी उगवले. त्यांना बघुन विजयलाही जरा आश्चर्य वाटल होत.

विजयचा पगार चांगला वाढल्याच त्यांना समजले होत आणि आता तर राधीका पण घरात नव्हती. विजयकडे ते पैसे मागायला आले होते. आजवर कधी त्यांनी विजयची वा राधीकाची कधी विचारपुस केली नव्हती. आता त्याच्याकडे पैसे आले तर लगेच आले होते. त्यांना माहीत होत विजय कधीच नाही म्हणत नाही म्हणून. विजयने त्यांच चहा पाणी केल.

गप्पा मारता मारता मामांनी हळुहळु खर्चा कडे मोर्चा वळवला. पोरगी लग्नाला आलीये, घर पण सुधरवायचं आहे. वैगरे वैगरे. विजयला आता अंदाज आला होता की ते कशासाठी आले होते ते. खरतर विजयच्या पण खुप जीवावर आल होत. कारण राधीका च्या लग्नात ही बराच खर्च झाला होता. पण त्याच्या स्वभाव त्याला तस करू द्यायला मागत नव्हता. बाकीच्यांनी जरी मदत केलेली असली तरी त्यांचे पैसे विजयला त्यांना परत करायचे होते.

“जाम खर्च वाढला रे, आता आपली परीस्थिती तर तुला माहितीचा आहे” मामा “बरं पण तुझ निट चालु आहे बघुन खुप बरं वाटलं मला.”

“मग ताईच्या लग्नाला पण नाही आले तुम्ही??” विजय

“अरे, तुझ्या मामीच्या घरी कार्यक्रम होता न, तर तिकडे गेलेलो.” मामा

त्याचे मामा पैशांचा विषय काढणार तोच सायली येऊन पोहोचली तिथे.

शेजारच्या मावशींनी जस मामांना पाहील तस त्यांनी राधीकाला फोन लावला होता. मग राधीकाने सायलीला फोन लावून सगळी कल्पना देत घरी जायला सांगितलं होत. सायलीला पाहुन त्याला खुप हायस वाटल होत.

“मामा, ही सायली” विजयने सायली ची ओळख करुन दिली.

“गोड आहे रे मुलगी” मामी. तशी सायली दोघांच्या पाया पडली. मामा पुढे काही बोलणार तेवढ्यात सायलीच बोलली.

“अहो, ऐका न. ह्या बिलांच कस करायच??” सायलीने काही कागद विजयला दाखवत बोलली. “बाबा बोलले होते की ह्या महिन्याचा तुमचा पेयमेंट उशीरा होणार आहे. मग बिलवाल्यांना पुढच्या महिन्यात सांगु का??”

“हममम बघुया” विजय काहीतरी बोलायचे म्हणून बोलला.

आता मात्र सायलीच बडबड करत राहीली. ती मामा मामींना बोलुच देत नव्हती.

“तुम्ही किती वाजता निघणार??” सायलीने पहीले मामांकडे पाहील आणि नंतर विजय कडे बघत बोलली.

“हो निघतो आहे.” विजय “बर मामा आहात न, दोन चार दिवस??”

“नाही रे, आज संध्याकाळच्या गाडीला निघु. खरेदी बाकी आहे लग्नाची” मामा.
“बर, मी आलोच मग संध्याकाळी” विजय बोलुन निघुन गेला.

आता घरात सायली आणि मामा मामी होते.

“तु आत्तापासुन इथेच रहाते??” मामींनी जरा खोचकपणे विचारल.

“नाही हो, ताईंच लग्न झाल्यापासून ह्यांना फक्त जेवण बनवण्यासाठी येते. मग ते रात्री आले की डायरेक्ट जेवण करतात.” सायलीने ही तितक्याच कडक स्वरात उत्तर दिल.

“पण मग, तु तिथे श्रीमंतीत वाढलेली आणि ईथे हा असा. कस काय आवडला तुला??” मामांना विजय साठी एवढ चांगल स्थळ आलेल रुचलच नव्हतं.

सायली मनातच बोलली, ‘बरीच माहिती काढलेली दिसतेय'

“कस आहे न, पैसा येतो आणि जातो. तो नंतर कमवता पण येतो. पण ह्यांच्यासारख्या माणसांची किंमत सगळ्यांनाच नाही कळत. काम आली की आठवण तर कोणालाही येते, पण मग अडचणीत आठवण येण्याआधी दुसऱ्यांसाठी हजर होण, क्वचित लोकांनाच जमत, जसे हे. मला न त्यांच्यात माझे बाबाच दिसतात.”

सायलीने मारलेला टोमणा मामा मामींना बरोबर बसला होता. तिच उत्तर ऐकुन मामींनी त्यांच तोंड वाकड केल होत.

“बर, आजवर कधी पाहील नाही मी तुम्हांला??” कोणी बोलत नाही बघुन सायलीच बोलली, “इकडे येण होत नाही का?? ताईंच्या लग्नात पण दिसले नाहीत. येत जा ओ मध्ये मध्ये. आपल्या माणसांसोबत असल न की एकट पडल्याची फिलिंग येतच नाही.” सायली सहज बोलुन गेली.

मामींच्या पापण्या ओलावल्या. सायली तर सहज बोलली होती. पण नकळत खर बोलुन गेली होती. त्यांच्या गावात ते खरचं एकटे पडले होते. त्याला जबाबदार त्यांचा स्वभावच होता. त्यामुळे त्यांना मदत करायला सगळेच कचरत होते.

“हो ग, जरा जास्तच कामात होतो.” मामा कसतरी बोलले.

“बसा, आत्ता होईल स्वयंपाक” सायली किचनमध्ये निघुन गेली.

सायलीला राग तर आला होताच, राधीका कडुन मामांबद्दल ऐकुन. पण मग ते जरा प्रेमाने बोलले म्हणून ती पण प्रेमाने बोलली होती. पण तिच ते रोखठोक बोलण ऐकुन, ज्या कामासाठी ते आले होते, तेच विसरले होते. विजयलाही माहीती होत, की ते प्रेमाने बोलले म्हणून सायली काही त्यांना बोलणार नाही ते. म्हणून त्यानेही सायलीला काही सांगितले नव्हते.

काही गोष्टींची जाणीव करुन दिली न, की गैरसमजुतीचे वलय गळायला वेळ लागत नाही. सायलीने तेच केल होत. गोड गोड बोलून तिने मामा मामींना त्यांच्या चुकांची जाणीव करुन दिली होती.

मग मामी ही किचनमध्ये गेल्या आणि सायलीला मदत करू लागल्या.

“अहो, मी आहे न.” सायलीने मामींना अडवल “मी असताना तुम्हाला कशाला त्रास??”

“मला मेलीला कसला आलाय त्रास?? अशीच बसुन राहीली ना तर त्रास होतो. त्यापेक्षा कामात असल की बर वाटत.”मामी हसत बोलल्या.

मग दोघींनी मिळुन पिठल भाकरीचा बेत केला. सायलीने मामींकडुन भाक-या शिकुन घेतल्या होत्या. दोघांची मस्त गट्टी जमली होती. जेवणानंतर तिघांनी मिळुन खुप सा-या गप्पा मारल्या होत्या.

संध्याकाळी विजय आल्यावर विजय सोबतही खुप सा-या गप्पा मारल्या. मामा मामी जेव्हा गावी जाण्यासाठी निघत होते, तेव्हा न रहावुन विजयने विचारले.

“तुमच काम तुम्ही सांगितले नाही??” विजय

“फक्त काम असल का तेव्हाच भेटायच असत का??”मामा “कालपर्यंत जी गरज वाटत होती. ती फक्त चैनच होती रे. मुलगी छान आहे. काळजी घे.” मामां सायलीकडे बघत बोलले.

“काही लागल तर सांगा मला, अगदी हक्काने” विजय

“हो रे, माहितीये मला. तुझ्या दारातून कधीच कोणी रिकाम्या हाताने जात नाही.” मामी.

त्यांच्यातला बदल बघुन विजयने सायलीकडे पाहील. तिने परत फक्त खांदे उडविले. मग विजय सायलीला सोबत घेऊन मामा मामींना बसस्टँडला सोडायला गेला. त्याने त्याची गाडी काढली होती. त्यांना बसस्टँडला सोडून तो सायलीला सोडायला तिच्या घरी गेला होता. मग रात्रीच जेवणही त्याने तिथेच केल होत.

सायलीचे वडील तर त्याला तिथेच मुक्काम थांबवत होते. पण विजयला थोड ऑकवर्ड वाटत होत.

“मागच्या वेळेस मुक्कामाला आली होती तर रात्रभर झोपुच दिल नाही तिने मला.” विजय बोलुन गेला.

“काय??” सायलीचे आई वडील एकदाच दचकून बोलले.

“अय्यो, खरचं??” प्रणालीने पण शॉक लागायची अॅक्शन केली.

सायली ही गडबडली.

“अहो म्हणजे, रात्रभर गप्पा मारत बसली होती. बिचारी आराध्या पण झोपली नव्हती हिच्यापायी.” विजयने निट खुलासा केला. तेव्हा कुठे सायलीच्या आई वडीलांच्या जीवात जीव आला.

“अच्छा तस होय” प्रणाली सायलीला डोळा मारत बोलली. सायलीने प्रणालीला चिमटा घेतला

जेवण करुन विजय त्याच्या घरी निघुन गेला. आता सोनाली आणि रुद्र, आरती आणि संदेशाच्या लग्नाचा विषय चालु झाला होता. प्रणालीला तर तिच्या आई बाबांसोबत अजुन रहायच होत, म्हणून तिने तिच लग्न सध्या तरी लांबवल होत. विजयने तर सगळ्यांनाच तंबीच दिली होती. साखरपुड्यात सगळ केले, आता लग्नात काहीच करायची गरज नाही म्हणुन.

पुढच्याच महिन्यात दोन्ही जोड्यांच लग्न आठवडाभराच्या अंतरात उरकून घेण्यात आल होत. या वेळेसही सायली, आराध्या आणि अनुने चांगलेच पैसे लाटले होते, ग्रृहप्रवेशाच्या वेळी.

आरती आणि संदेशाच्या पहील्या रात्रीला तर सायलीने पाच मोबाईलवर दर पाच मिनीटांनी वाजणारे अलार्म लावुन दिलेले होते. दोघांनाही मोबाईल कुठे ठेवलेत हेच सापडत नव्हते. बिचारे रात्री एक वाजेपर्यंत ते मोबाईल शोधत होते. मग त्यांनी सग़ळ्यांना फोन लावले. तेव्हा त्यांना कळल की तो पराक्रम सायलीचा होता. मग आरतीने सायलीला फोन लावला.

“मग उद्या लवकर उठायच टेन्शन नाही न.” सायली

“तुझी पण पाळी येणार आहे” आरती वैतागून बोलली.

“वहीनीसाहेब, कशाला आम्हा गरीबांच्या रात्रीची वाट लावत आहात??” संदेशने सायलीच्या मनातल ओळखल होत.

तिकडे आरतीने त्याला चापट मारली, “काहीही काय बोलतोयस रे??”

“बघा न, वहीनीसाहेब. नव-याला काही किंमतच नाही” संदेशच्या अंगात आज सोनाली घुसली होती.

“सायु, प्लिज न. कान आता बधीर होतील.” आरतीने सायलीला आर्जव केली.

“सायु??” सायली

“सॉरी सॉरी, वहीनीसाहेब. ऐका न पण” आरती

“सॉरी वहीनीसाहेब, उद्या येऊन पाया पडून माफी मागतो. पण यापुढे विजय समोर तुम्हाला नाही उभ करणार.” संदेश सायलीच्या मनातल वाक्य बोलला. तेव्हा कुठे आरतीची ट्युब पेटली. की सायली नक्की कोणता बदला घेत आहे.

“हममममम आणि आरती आपल्या मध्ये नव-याला एकेरी नावाने हाक नाही मारत.” सायली

“हो, नक्की हो वहीनीसाहेब. आमच्या अहोंना आता अहो जाओच करेल.” आरती तर बोलुन गेली होती. पण बोलताना संदेशला चिमटा काढत होती. वरुन त्याला गप्प रहायचा इशारा पण करत होती.

“मग सांग अनुला, तिनेच मोबाईल सेट केलेत.” सायली

अनु दरवाजातून उभी राहून हसत होती. संदेश ने त्याच्या रुमच दार उघडल. तो तिला रागात बोलणार तोच ती बोलली, “निट बोलला नाहीस न, तर रात्रभर ते बंद करणार नाही मी.”

“याव माते, आमच्यावर कृपादृष्टी करा. आज आमचे हात अडकले आहेत न.” संदेश नाराजी च्या सुरात बोलला.

अनु आरती जवळ गेली, “मला टोल पाहीज् हे बंद करण्यासाठी.”

“ह्यांनी दिले न ग्रृहप्रवेशाच्या वेळी. आता परत??” आरती

“पैसे नकोत मला, वचन पाहीजे” अनु

“हमममम बोल.” आरतीने तिला जवळ घेतल.

“आपली एक टिम राहील. ह्याच्या विरुद्ध” संदेश कडे बोट करत अनु बोलली. तिकडे संदेश ने परत डोक्याला हात लावला.

“ति तर आहेच ग.” आरतीने तिच नाक ओढल.

अनु ने सगळे मोबाईल काढुन अलार्म बंद केले.

“पण मला न, वहिनीला सोडुन जावं वाटचत नाही. मी बसु का?? आपण मस्त गप्पा मारू” अनु

तिकडे संदेशने चेह-यावरुन हात फिरवला. त्याच्या चेह-यावर स्पष्ट राग दिसत होता. मग अनु हसतच रुमच्या बाहेर पडली.

रुद्रकडे पण सत्यनारायणच्या पूजेला सायली तिच्या आई वडीलांसोबत रुद्रच्या घरी गेलेली होती. तिथे पण रुद्रच्या रुममध्ये सायली विजय सोबत तिच्या सगळ्या नातेवाईकांना घेऊन बसली होती. कारण काय तर सोनाली आणि विजयची सगळ्यांशी ओळख. रुद्र आणि सोनाली एकमेकांकडे तोंड पाडुन बघत होते. विजय तर ओळख करुन घ्यायची अॅक्शन एवढा सिरीयस करत होता, की कोणाला वाटेल खुपच मनापासुन ओळख करुन घेतोय.

सोनालीला मात्र त्याची ही नाटक चांगलीच समजत होती. पण आता ते त्यांच्या घरी नव्हते न, तिच्या घरी असते तर तिने डायरेक्ट विजयची कॉलर पकडली असती. बाकी तर त्यांची मजा बघत होते. सायली आणि विजय त्यांच बोलण थांबवायच नावच घेत नव्हते म्हणून सोनालीने हळुच सायलीला चिमटा काढला.

“तुला सॉरी सॉरी, तुम्हाला जास्तच घाई झाली आहे का वहीनीसाहेब हनीमुनची.” सायली मासुम चेहरा करत बोलली.

तस तिथे हास्याचा स्फोट झाला. सोनालीने लाजुन तोंड झाकुन घेतल होत. रुद्र तर सायलीकडे केवीलवाण्या नजरेने बघत होता.

शेवटी आरतीने सोनालीला फोन केला. कारण तिला माहीती होत सोनालीच्या वेळेस पण सायली असच काही करेल म्हणून. मग सोनालीची ट्युब पेटली.

“माफी असावी माते. आता परत आमच्या गोष्टीसाठी तुम्हाला विजय पुढे ऊभ नाही करणार.” सोनाली तिच्या नौटंकीच्या रुपात येत बोलली.

“हममम ठिक आहे” सायली. “चला रे, झाल आपल काम.” तसे सगळे त्यांच्या रुमच्या बाहेर पडले.

सायलीला तिच्या साखरपुड्याचा हिशेब क्लिअर करायचा होता तो तिने सगळ्यांची पहील्या रात्री ची वाट लावुन केला होता.

त्यांनी मग विजयला मेसेज केले होते की, “वहीनीसाहेबांनी आमच्या पाहील्या नाईटची वाट लावली म्हणून.”

त्या दिवशी नेमकी सायली आणि विजय एकत्र होते. तो मेसेज सायलीने वाचला. मग तीने ग्रुपमध्ये मेसेज टाकला.

“ह्यांना का मेसेज करतायेत?? असे उपद्व्याप त्यांच्याशिवाय कोणी करेल का??”
मग सगळ्यांना कळल याचा मास्टरमाईंड तर विजयच होता. विजयने फक्त हसण्याची स्मायली टाकली.

“आयेगा बेटा, तेरा भी टाईम आयेगा” राहुल.

“लग्न होऊ दे तुमच मग बघतो” संदेश

“बर झाल, माझ नाही झाल ते” महेश

“तुझ्यासाठी तर स्पेशल ट्रिटमेंट रहाणार आहे” सायली.

सगळ्यांनी हसण्याची स्मायली टाकली. पण महेश पुढे काही बोलला नव्हता.

“आमच लग्न झाल की आपण सर्व जाऊ रे फिरायला मस्त “ विजय.