मला ही जगायचं
...
एक स्त्री जीचं जीवन तिच्या कुटूंबाच्या अवतिभवति फिरत असतं. सतत कुटूंबाचं भलं कस होईल, ह्याचा ध्यास उराशी बाळगून स्वत:ला विसरुन घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे घरातील सदस्यांना त्यांच्या कार्यात मदतीचा हातभार लावत असते. आपलं घर आणि घरातले वातावरण आनंदी, हसतं-खेळतं कस राहिल या करता तिच्या वेगवेगळ्या कल्पना आखण्याचा उपक्रम नेहमीच सुरू असतो. कोणी आजारी पडू नये, जीवनसत्व,प्रोटिन, प्रथिने असा पौष्टिक आहार जेवणात सामाविष्ट असतो. मुलांच भविष्य उज्वल व्हाव या करता मनाचा विचार न करता आपली हौस-मौज बाजूला सारुन त्यांना उपयोगी वस्तू कश्या पुरवता येतील याचा प्रयत्न सुरु असतो. आई-वडिल, सासू-सासरे, नणंदा, दिर अशी अनेक नाती जपत ती नात्यांना प्रेमाच्या धाग्यात गुंफत असते.
स्वत:ची चूक नसताना देखील वाद टाळले जावे म्हणून अपमान सहन करत राहते. आपलं मत मांडाव अस तीला वाटत असते, पण तीला सगळेच आपण घेतलेल्या निर्णयात गृहित धरुन तीचही मत तेच असणार अशी चुकीची समजूत करुन घेत असतात.
लहानपणा पासूनच घरात अनेकदा भेदभाव दृष्टीस पडतो. मुलाला चांगले अन्न पौष्टीक सकस आहार देण्यात येतो. तेच मुलींच्या बाबतीत मात्र रात्रीचे उरलेले अन्न खायला देण्यात यायचे. मुलाचा जन्म झाला तर घराला वंश मिळाला. त्याची आनंदाची बातमी सर्वत्र क्षणात पसरली जाते. मुलगी झाली तर घरातल्यांना आनंद न होता. आपल्यावर असणारं ओझ वाटू लागते.
स्त्री ला समजून घेण कठिण अजिबात नसते. तीला तीच्या आवडीच्या कामा करता दिवसभरातून वेळ दिला जावा हि घरातल्या सर्वच सदस्यांची जबाबदारी आहे. तीला सतत आपल्या कामां करता गृहित न धरता स्वावलंबी बनून प्रत्येकान आपली कामे केली पाहिजे.
स्त्री ला समजून घेताना तीला सन्मानाची, आदराची वागणूक दिली जावी. तीचही बोलण विचारात घेतल जाव. मुलगा - मुलगी भेद न करता समान वागणूक दिली जावी. मुलगा जर...., घराण्याचा वंश असेल तर....., मुलगी घराण्याची ज्योत आहे.
मुलगी दोन्ही घराची जबाबदारी स्विकारते.
या गोष्टी आता बदलल्या आहेत. कोणीही आजच्या काळात भेदभाव करत नाही. हे विधान सत्य जरी असले तरी आजही स्त्रीयांचा छळ केला जाण्याचे चित्र पाहायला मिळते. लग्न जमवताना आजही हुंडा वेगळ्या प्रकारे का होईना मागितला जातो.
संसारात कधी भांडण झाल्यास सगळी चूक तुझीच आहे. तू अस बोलायला नको होतं. मग माझाही बोलण्यावरचा ताबा सुटला. प्रत्येक वेळी स्त्री च चुकीची नसते. तीच्या कामाचे कधीच कौतुक घरात केले जात नाही. तीच्या वाट्याला सतत अपमानाचे बोल कानी पडत असतात.
तीच्यातही प्रत्येक कार्य प्रचंड उर्जेने परिपूर्ण करण्याची ताकद सामावली आहे. त्याकरता तीला आपल्या कडून मायेच्या शब्दांची साथ हवी आहे. घाबरू नको, होईल सगळ छान. तुला हे नक्कीच जमणार हि तीच्या विषयी वाटणारी आत्मियताच तीच्या मध्ये जिद्दीचे बळ निर्माण करते. आणि ती त्या झुंजीत विजयी ठरते.
मुलीच्या येण्याने घर हास्यांन फुलतं. तीच्या इवल्याश्या पायातल्या पैंजणाच्या आवाजाने तीची चाहूल लागते. दिवसभर घरात तीच्या बोबड्या स्वरांनी घराला घरपण लाभतं. घर समाधानाने भरुन पावते. सुखाची परिभाषा मुलीच्या येण्याने समजते. ती क्षणभर जरी घरात नसली तरी घर खायला उठते. घरात भकासपणा आणि रिकामा पणा जाणवायला लागतो.
वात्सल्याची किमया
मनातल्या भावनांना
हदयात साठवून ठेवणारी.....
सुखाची बरसात तू
तेजस्वी तेचा तारा तू
समाधानाची ग्वाही तू
सत्यातला खरेपणा तू
आकांक्षाचे पंख मिळावे तुजला
व्हावा तुझा सन्मान
हिच प्रार्थना सर्वांना!!!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा