Login

इथे भूतकाळ अजून जिवंत आहे:- भाग नववा

It Is A Story Of Four Friends Who Accidentally Enters Into A Place Where They Found So Many Mysterious Things
इथे भूतकाळ अजून जिवंत आहे – भाग नववा
©® डॉ अमित मेढेकर

तळघराच्या निखळ अंधारात तलवारीची पात शुद्ध वाऱ्यात चमकली आणि प्रथम रक्ताचा तुषार हवेत फिरला—काळसर लालसर थेंब, चांदीच्या वर्तुळावर अलगद झिरपणारे. जोरदार विजेच्या कडकडाटात त्या थेंबांनी जणू स्वतःचा मंत्र उच्चारला: भिंतींमधून कुजबुज, जमिनीखालून हलके कंपन, आणि खोलीच्या छतावर फिरणाऱ्या सावल्यांचं विकृत नर्तन सुरू होते.

जयच्या खांद्याला त्या आकृतीची कट्यार चाटून गेली होती; बोटांनी घर्षण केलेल्या मातीचा ओलसर गंध आणि त्यांच्या अंगाचा जळका घाम – या दोहोंचं मिश्रण हवेत फिरू लागलं.

पण त्यापेक्षा भयानक होता तो आवाज, तो आवाज जो आता छताला ठोकत खाली घसरत होता.
त्या आकृतीने संपूर्ण तळघरात जे काही दगडी मूर्ती यांना हलवत जो उच्छाद मांडला होता त्यांचा आवाज येत होता.

रक्ताचे थेंब ज्या क्षणी चांदीच्या रेघांवर टेकले, त्वरित तिथले वर्तुळ उजळून निळ्या ज्वाळांमध्ये पेटलं. त्या अग्निमंडलातून फडकणारा एक नकाशा तिथे प्रकट झाला.
रक्तरेषांनी कोरलेला, जणू शेकडो वर्षांपासून अंगाखांद्यावर चरतरलेला जुनाट रेखाट नकाशा.

मध्यभागी सिंहासन आणि त्यावर एक मोरपिस, त्याभोवती तीन चिन्हे होती. तलवार, फुलपाखरू, आणि एक टोकदार वर्तुळ बांधलेलं पान.

तोंडातला थरकाप दडवत लक्ष्य म्हणाला, “हे पाहा, ते तलवारचिन्ह राजघराण्याचं, पण इथलं फुलपाखरू—हवेतून उडणारं हे त्या आत्म्याचं रूप असावं काय?”

जयने रक्ताने ओथंबलेल्या कट्यारीचा टोक नकाशावर रोवला. जणू आणखी रक्त झिरपताच नकाशाच्या बाहेरचा अंधार आता हलू लागला. काही क्षण गेले आणि वर्तुळ पटापट विखुरलं...!

जमिनीशेजारून भिंतीत एक दरवाजा उघडला. त्यातून पसरलेलं अरुंद जिना दुसऱ्या तळघराकडे जात होता.

ती आकृती पुढे सरकली आणि त्याच्या मागोमाग हे चौघेजण.

तेवढ्यात जय त्या आकृतीला थांबवत म्हणाला, " तू का खालती येत आहेस? तुला माहिती आहे ना तुझ्या शोधात राणी देवयानी आहे... कदाचित तू परत बाहेर पडू शकणार नाहीस.. तू इथे कसा बंदिस्त होत आहे मला माहिती नाही पण तू तळघरात गेलास तर निश्चित बंदी राहशील हे विसरू नकोस"

तशी की आकृती हसली आणि म्हणाली, "जर माझ्या बलिदानाने हा शाप संपत असेल तर पुढच्या येणाऱ्या अनेक पिढ्या या शाप मुक्त होतील" आणि तो खालती उतरायला लागला.

या सगळ्यांना हे जाणवले की खालच्या पायऱ्या उतरता उतरता आसपासचं तापमान इतकं घसरलं की श्वास झटकन गारठून गारसर बनू लागले.

त्यांनी दार उघडताच तळघराच्या मध्यभागी एक भला मोठा रक्त ताल दिसला.
तिथे पाण्याऐवजी गढुळ द्रव, ज्यातून मंद मंद लाल रंगाची प्रभा झिरपत होती.
तिथे भोवती मोरपिसांच्या कोरीव दगडी मूर्ती होत्या आणि प्रत्येक मूर्तीच्या हातात साखळीला बांधलेले सोनेरी साखळदंड होते.

ते रक्तताल पाहून सगळेच आश्चर्यचकित होते.
“हे कोणाचं रक्त आहे?” जितूच्या आवाजात ओतप्रेत भीती होती.

“राजघराण्याचा आणि वजीरांच्या पिढ्यांचा शापाने मिसळलेला ठेवा असावा तो.” विकी म्हणाला.

तेवढ्यात ती आकृती पुढे सरकली आणि त्याने हातातील कट्यार हवेत फिरवत एक मंत्र पुटपुटला. मूर्तींचे हात एकमेकांत गुंफले तश्या साखळ्या खडखडल्या आणि ते तळघर कातरस्वरांनी गुंजून उठले, “रक्तात मिसळलेले रक्तच शाप तोडतील.”

याआधीच्या भागांमधली तीच ओळ; पण आता तिला अजून गूढ अर्थ मिळाला. त्या क्षणाला रक्ततळाच्या आत भेसूर लाटा उठल्या. लाटांच्या वर क्षणभर एका बाळाची सावली दिसली... राजकुमार वीरेंद्रची. पुढच्याच क्षणी ते प्रतिबिंब विरलं आणि पृष्ठभाग पुन्हा स्थिर झाला.

हुडहुडी भरलेला जितू मागे सरकला. राणी देवयानीच्या तारणाचा दैवी वंश कुठे आहे? हा प्रश्न त्याच्या बेसावध मनात वणव्यासारखा उठला.

त्याच वेळेस अंधारानं कुशीत ठेवलेल्या भिंतीवर एका बाजूला काही कोरून ठेवलेलं स्पष्टरूपात चमकलं. तो एक काठेवजा उभा शिलालेख होता; त्यावर फारसी-देवनागरी मिश्रलिपीत ओघवती चार ओळी लिहिल्या होत्या.

“वजीराचा वारस, राजाचा छायेसखा
रक्तबंध जुळे, श्रापावर कुणाचा दावा,
परकी तलवार असे जेंव्हा जलकळीतून येई तारा
तेव्हा राणीचा उरला अश्रू
जीवांमध्ये उठी नवा झरा.”

ती भाषा सहज कळल्या सारखी नव्हती. जयने तो शिलालेख मधील आशय त्याच्या पद्धतीने सोडवायचा प्रयत्न केला.

आणि एकदम त्याला कळले की जिथे शिलालेख संपतोय तिथे एक गोलाकार वर्तुळ आहे अगदी जसेच्या तसे जे त्यांनी रक्ततळाच्या आधी पाहिले होते.

का कुणास ठाऊक पण त्याला असे वाटले की त्याच्यावरती हात ठेवणे अपेक्षित आहे.

त्याने जोरानं आपला हात त्या वर्तुळाच्या खुणेवर ठेवला. आणि त्या क्षणाला एक भिंतीत कोरलेल्या शिलालेखातील एक फलक सरकला आणि चणचणीत आवाजात दगड मागे ओढला गेला.

त्यांनी आत डोकवण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे लक्षात आले आत भरपूर सोनेरी प्रकाश होता.
तिथे काचेचं नाजूक पात्र आणि त्यात लहानशा काठ्या होत्या. त्या काठांच्या भोवती मोरपंखात गुंडाळलेली लाल मखमली पोतडी होती.

तेवढ्यात त्या आकृतीने आपल्या कट्यारीच्या टोकानं काच फोडून पोतडी उचलली. आतली गाठ सोडताच एक चांदीचा बारीक दोरा उघडला गेला आणि त्यावर गोंदलेली देवयानी-वीरेंद्राची मोहर चमकली.

तो दडपशाहीचा मोर म्हणजेच ती आकृती त्या मोहराकडे लक्ष देऊन बघायला लागली... काही वेळ निरीक्षण करून ती आकृती म्हणाली,"अच्छा हीच त्या देवयानीच्या घराण्याची अखेरची शपथ का? पण यावर माझी मोर चिन्हिका कशी आली... त्यावर तर राजवंशाची मोहरच असायला हवी होती.”

“कदाचित तू आणि देवयानी या दोघांनाही तुम्ही एकमेकांसाठी हवे आहात...शाप संपवण्यासाठी.” जय सहज म्हणाला.

तशी ती आकृती त्या मोहोर ला घेऊन रक्तताळाकडे गेली.

त्या तळ्याकडे पहात ती आकृती म्हणाली, "देवयानी तुझा शाप हा कायम तुझ्यासाठीच राहील कारण मी एवढा सक्षम आहे जो तुझ्या सगळ्या शापांचा नायनाट करेल."

तळ्यातल्या लाल पृष्ठभागावर काळसर लाटा उमटल्या, आणि प्रतिबिंबातून देवयानीचा चेहरा वर झिरपला—पहिल्यांदा तितका शांत. तिच्या डोळ्यांत दुःखाचा बांध फुटलेला, पण क्रौर्याऐवजी करुणा ढवळत होती.

देवयानीची सावली तिथे म्हणाली, “अरे मुर्खा, शाप फक्त रक्त सांडून समाप्त होत नसतो, त्याला वेगळा उपाय असतो."

देवयानीचा आवाज तळघरात घुमताच तळीच्या कडांवरील मोरपिस मूर्तींनी साखळ्या तोडल्या. त्यांच्या हातातली लोखंडी साखळदंड सुद्धा एकदम तुटून रक्तात कोसळले. ते रक्तताळ एकदम वेगळ्या लाटांनी ढवळून यायला लागलं.

त्या आकृतीच्या चेहऱ्यावरचं पशुत्व क्षणार्धात विरलं; आणि ती आकृती डोळ्यांत जळजळीत पश्चात्ताप घेऊन उभी राहिली. कट्यार म्यानात टाकून एक कर्दनकाठी दणादण छातीवर मारू लागली—जणू पापाचा आवरण फोडायला निस्तेज हतबल प्रयत्न ती आकृती करत होती.

जय घाबरून झेपावत म्हणाला, “थांब! स्वतःला मारून काही साधणार नाही.”

ती आकृती म्हणाली, “आता मला कळून चुकलं तुम्ही मला मारण्यासाठी आलात आणि एवढ्या वेळ सोबत राहून माझ्याकडून सगळ्या गोष्टी काढून घेत आहात कारण माझ्या नसांत भळभळणारं पापच देवयानीच्या शिशुचा आकांत जगवतंय. मी संपलो तर तिचा वारसा शांत होईल.”

"पण अजूनही तूच शेवटचा वारसा आहे कुठे सिद्ध झाले आहे" विकी त्या आकृतीकडे बघून म्हणाला.

"जर मी नाही तर माझ्या या मोराची चिन्हिका त्या वर्तुळात कशी आली?"

त्याचं उत्तर कोणाकडेच नव्हते.

त्या आकृतीने कर्दनकाठीचे टोक आपल्या छातीवर मारले, तसे एकदम पहिल्या रक्ताचा थेंब उसळला आणि दुसरा थेंब झटकन त्या रक्ततळ्यात पडला.

लाल थेंब तळीच्या पृष्ठभागावर थरथरले, आणि काय आश्चर्य, पाणी गडद निळं होऊ लागलं. एकेक लाल लाट हिरकी होत पसरली.

देवयानीचं प्रतिबिंब वेदनेच्या हुंदक्यात बदललं, पण ती भीती नव्हती तर होता अश्रूंचा ओलावा. तिच्या ओठांवर मंद हसू उमटलं.

देवयानी चा आवाज परत तिथे घुमायला लागला, “अरे वारसा, तू स्वतःला त्रास देऊन आता तुझा आत्मदाह करून उपयोग नाही कारण तुझे आत्मभानच माझ्या श्रापाचं उत्तर आहे. तू जेव्हा तुझे पाप स्वीकारलंस—तेव्हाच पहिला तुषार निरर्थक झाला. दुसरा तुषार पवित्र झाला.”

तळीचं पाणी आता आरस्पानी निळं होतं. लाल वाफेच्या जागी शुभ्र वाफ उमटत होती, आणि खोलीच्या भिंतींवर रक्ताने उमटलेले ठसे हळूहळू गळून जावू लागले—जणू काळीज धुवून निळ्या अस्तित्त्वात विलीन होत होतं.

पण अचानक मोरपिस मूर्तींच्या बाकड्यांखालून काळसर धूर बाहेर निघाला. धुरट लाटांमधून राजाची कापलेली वेदनादायक आकृती तरळली...ती होता देवयानीचा पती, राजप्रताप.

“थांबा! तुम्हाला थांबावच लागेल कारण माझ्या कापलेल्या शिराचे श्रापित रक्त अजून जमिनीवर जिवंत आहे. माझ्याही पापाला तुम्हाला पूर्णपणे निस्तरावे लागेल!”

असे म्हणून तो समोर यायला लागला. जागा थरथरली, कट्यारीचा निखरा अजून रक्तरंगात चमकल्यागत झाला.

जयने एक क्षण विचार न करता स्वतःच्या तळहातावर कर्दनकाठी घासली. तिसरा रक्तबिंदू थेट राजाच्या छायेकडे उडाला. बिंदू हवेत फुटला, आणि ती भेसूर छाया कशाच्यातरी जंजाळात अडकून दिशाहीन होऊ लागली. त्या अंधुक काळोखात एक लहानसे वीरेंद्रचं रूप पुढे येऊन पित्याच्या छायेला कवटाळताना दिसलं.

त्याचवेळी अनेक गोष्टी तिथे घडल्या. रक्ताचा नाळ एकाच वेळी तुटला आणि जुळला. भूतकाळाचा उरलेला अंश, आताच्या पवित्र तुषारानं प्रदीप्त झाला. निळ्या पाण्याच्या पृष्ठभागावर तीन पांढरी फुलपाखरू उगवली—देवयानी, राजप्रताप, आणि वीरेंद्र यांचा मोक्षरूप त्या फुलपाखरांमध्ये होता.

चौघे मित्र मित्र स्तब्ध झाले होते. हळूहळू तळघरावरचा अंधार विरघळू लागला, निळ्या प्रकाशात रूपांतर पावला. भिंतींवरील भयाभास चित्रे हळुवार उत्तम मूर्तीत बदलली..देवयानीचा दर्शनीय शीलपट, राजप्रतापाचं अभयवदन, आणि हसरा वीरेंद्र.

भिंतींमधून आकृतीचे किनारे विरले, पूतळ्यांच्या साखळ्या आपोआप तुटल्या, आणि तळघराचं दार परत उघडलं. वरच्या जिन्यातून आजूबाजूच्या जंगलातला निसर्गमय आवाज पुन्हा घुमू लागला—पानांची सांजझुळूक, पडणाऱ्या पावसाचा मंद ठोका, आणि दूरवर वानरांचे येणारे आवाज.

ती आकृती म्हणजे तो वारस डोळ्यांत पाणी घेऊन, कर्दनकाठी जमीनीवर ठेवून परावृत्त झाला.

“माझ्या पिढ्यांनी स्वतःचा इतिहास मिटवला, पण शाप स्वीकारूनच मोकळा होतो. त्यांच्याकडून चुका झाल्या त्या मी माझ्या पद्धतीने सावरण्याचा प्रयत्न केला”

जय आणि मित्रांनी त्याला खांद्याला धरून वरच्या जिन्याकडे वळवलं. पावलांआडून कुजकट जमीन थरथरली, पण आता भीती नव्हती.

त्या जागेबाहेर पाय ठेवल्यावर पहाटेचा पहिला धूसर प्रकाश तोंडावर पडला. विजांचा कडकडाट निवळला, ढगांची शीळ ओसरली, आणि चंद्रानं लपवलेलं स्वरूप एका शुभ्र कडेने पुन्हा उजळलं.

“देवयानीचा वारसा फक्त रक्तात नव्हता—तो पश्चात्तापात, स्वीकारात होता. आणि आपण त्याचे साक्ष बनलो.” जय मोठ्याने म्हणाला.

वारसाने हातातली कट्यार तुटलेल्या मोहरांसमोर टेकली. हळुवार नमन करत म्हणाला, “राजाला, राणीला, आणि राजकुमाराला माझ्या वंशाकडून अखेरचा सलाम. आता या जंगलाला शांती लाभो.”

त्याच्या या बोलण्यानंतर चौघा मित्रांनी एकमेकांकडे समाधानानं पाहिलं.

राणी देवयानीचा अनंत टाहो निस्तब्ध झाला, मोरपिसावरची दहशत शांत हास्यात विलीन झाली, आणि जंगलानं पहाटेच्या निळ्या दवबिंदूंमध्ये नवीन गाणं गायलं—भूतकाळ अजूनही जिवंत होता, पण आता तो आहुती नव्हे … उध्दार बनून होता.