# कादंबरी – मानसी # भाग ३०
तुषार ने आई ला मनवले
मानसी दुसऱ्या दिवशी लवकर उठली . सकाळी उठून सर्वांसाठी मस्त मऊ उपमा केला . आई ला गरम गरम उपमा खायला दिला . बाबा अन तिने पण नाश्ता केला .
बाबा मानसीला म्हणाले “ तू आज कॅन्टीन ला जेव मी आणि आई देसाई काकूंकडून डबा ऑर्डर करून खाऊ . म्हणजे तुझी गडबड होणार नाही. “
मानसी ने " हो बाबा " असे म्हणाली पण किचन मध्ये आली आणि कामाला लागली .तिने पटापट ८ /१० पोळ्या केल्या आणि भाजी केली . आणि जाता जाता कुकर लावून ऑफिस ला निघाली .
मानसीचा पण पाय ऑफिस ला जायला निघत नव्हता पण कालच तिची सुट्टी झाली होती .आज जाणं भागच होतं . नायडू सर पण तसे नवींन होते .
ऑफिस ला निघताना पुन्हा आई ला भेटून आली " आई गोळ्या वेळेत खाऊन घे , मी कॉल करेनच दुपारी आणि गप्पा मारत बसू नका दोघे जण . आज आराम कर .
मानसी ऑफिस ला वेळेत आली . नायडू सर जरा जास्तच शिस्तीचे होते ते पण वेळेत ऑफिस ला यायचे . मानसी आली आणि तिने पेंडिंग काम करायला सुरुवात पण केली .
कालच्या दिवसात नायडू सरांनी मानसीने केलेले प्रत्येक क्लायंट चे रिपोर्ट नीट तपासले होते . मानसी कामात किती परफेक्ट आहे ह्याचा त्यांना चांगलाच अंदाज आला .मानसीच्या कामावर नायडू सर एकदम खुश झाले होते . ऑफिस ला येताना नायडू सर खुश होऊन मानसीला एक मोठी कॅडबरी घेऊन आले आणि म्हणाले
मानसी " I like your all the reports . You are doing great work. This is gift for you . I am happy . "
नायडू सर कसे बसे त्यांच्या टोन मध्ये मानसीला तिच्या कामाची पावती देत होते .
मानसी " Thank you Sir ."
चला म्हणजे एक तर नक्की कि ऑफिस मध्ये बॉस बदललाय म्हणून काही एक्सट्रा टेन्शन नव्हतं .
नायडू सर म्हणले " Mansi I think we should add one extra staff to our department . What do you think on it ?"
मानसी " Why Sir ? "
नायडू " There is lot of work pressure for you "
मानसी " Ok Sir , we will get one more staff .
नायडू " Ok . Then we will take one more staff”
मानसीला पण जरा बरं वाटले खर तर तिच्यावर खरोखरच कामाचा लोड खूपच होता . आता ती छोटी छोटी काम हॅन्डओव्हर करू शकेल .
मानसी ने लगे हात सरांना सांगून टाकले कि सर माझ्या आई ची तब्बेत ठीक नाहीये तर कदाचित मला या आठवड्यात रजा घ्याव्या लागतील ,किंवा दुपारी वगैरे लवकर घरी जावे लागेल . मग जर स्टाफ वाढवायचा असेल तर लवकर वाढवू म्हणजे अडचण होणार नाही
मानसी मध्ये मध्ये बाबांना फोन करून आईच्या तब्बेतीची चौकशी करत होती . आई जेवली का ? झोपली का?आता कसं वाटतंय ? मी घरी लवकर यायचा प्रयन्त करते असे तिचे सतत चे कॉल घरी चालू होते .
आई बाबांना पण मानसीच्या जवाबदार वागण्याचा अभिमान वाटत होता . पोर इतकी लाडात वाढली होती पण वेळ आल्यावर कशी जवाबदारीने वागतेय . घरातील काम करून ऑफिस ला गेली . आणि जेवण पण छान करून ठेवले होते तिने .
मानसीला सत्य सांगून टाकायचं हे आईच्या डोक्याने पक्के केलं होतं पण बाबा अजून तयार झाले नव्हते.
आई ने पुन्हा बाबांशी हा विषय काढलाच
आई " अहो , ऐका ना आपण मानसीला घेऊन एकदा गावाला घेऊन जाऊ . तिला आपण एकदा पण गावी घेऊन नाही गेलोय . मी तसा गाव देवीला नवस पण बोलले होते पण अजून काही आपण तो पूर्ण केला नाहीये ."
बाबा -" अग , नाही कसा , दरवर्षी मी गावदेवीच्या उत्सवाला एकटा जातोय कि , नवस फेडायला काही तीच यायला पाहिजे असे काही नसते "
आई " पण तिच्या लग्नाआधी आपण एकदा जाऊन येऊ "
बाबा -" हो पण लग्न ठरलंय का ? नाही ना , जाऊ मी कुठे नाही म्हणतोय? . तू आज झोप , बाकीचे काही विचार करू नकोस “.
मी बघतो काय करायच ते "
बाबा आई च्या मनासारखं काही होऊन देईनात.
त्यांना आता मानसीला या सर्व प्रकरणात घ्यायचे नव्हते . एकदा का तिचे लग्न झाले किंवा १००% ठरले कि बघू असेच त्यांना वाटे .
त्यांच्या दृष्टीने ते हि बरोबरच होते . या वयात मुलींना टेन्शन आले कि त्यांच्या तब्बेतीवर परिणाम होतो आणि मग तब्बेत खालावते .
मानसीने ऑफिस मध्ये जे कामाचा तडाका लावला कि ती जेवायला पण जागची हल्ली नाही . डबा पण डेस्क वरच खाल्ला . संध्याकाळी चार वाजेपर्यंत काम उरकून घरी जायचं तिने ठरवलं होतं . मध्ये मध्ये फोन चेक करत होती. एखादा मेसेज येतो का ? एखादा कॉल येतो का ? वाट बघत होती .
कसं असते ना मुलींचं काल रात्री तिनेच तुषार ला सांगितले होते कि कॉन्टॅक्ट ठेवू नकोस आणि आज तरीही वेड्यासारखी त्याच्या कॉल ची वाट बघत होती . तिला हि त्याच्याशी बोलायची ईच्छा होत होती पण तरीही ती हि कॉल करत नव्हती कारण तिला माहित होतं तिने घेतलेला डिसिजन एकदम करेक्ट आहे . त्यावर ती ठाम होती.तुषार ची आठवण आली कि त्यांचा dp चेक करायची .
तुषार ने इकडे आज सकाळ सकाळी आई वडिलांना फोन केला होता आणि त्यांना पण त्याच्याकडे बोलावून घेतलं होतं . तुषारने एक फ्लॅट बघितला होता त्याला तो खूप आवडला होता . अमेनिटीस ,लोकेशन आणि २bhk फ्लॅट त्याने बुक करायचा ठरवलं होता . एकदा का आई बाबांकडून ग्रीन सिग्नल मिळाला कि तो लगेच बुक करणार होता .
गंमत अशी कि फ्लॅट लोकेशन मानसीच्या ऑफिस च्या जवळ होतं . मागे एकदा तिच्या ऑफिस बाहेर उभा होता ना तेव्हा तो फ्लॅटच पाहायला आला होता . त्याला मानसीला तो फ्लॅट दाखवायचा होता . पण मानसी शी जवळ जाऊन बोलायची तेव्हा त्याला डेअरिंग झाली नव्हती . तेव्हा तिचा आणि त्याचा तसा कॉन्टॅक्ट पण होत नव्हता .
तुषार ची गाडी तो हळू हळू रुळावर आणत होता नोकरी तर होतीच , छोकरी त्याने पसंत केलीच होती आणि आता फ्लॅट घेत होता . म्हणजे मोस्ट एलिजिबल बॅचलर बनत होता . त्यांचं असे म्हणणं होतं कि गाडी आणि घर लग्नाआधी आधी घेतलेले असले पाहिजे त्याचं कदाचित ते शॉर्ट टर्म गोल असेल . पण होणाऱ्या बायकोच्या ऑफिस च्या जवळ फ्लॅट घेत होता म्हणजे मोस्ट एलिजिबल हजबंड झाला होता . आई आली कि आईच्या लोटांगण घालून आई ला पटवायचं त्याने ठरवलं होत. त्याच्या जोडी ला तृप्ती होतीच.
संध्याकाळी ४ च्या दरम्यान मानसी सरांना सांगून घरी निघाली .
असाच रुटीन फॉलो ४ करत करत मानसी ने एक आठवडा काढला आई आता रिकव्हर झाली होती . आणि रोजची कामं हळू हळू करायला लागली होती .
मानसीच्या ऑफिस मध्ये अतुल नावाच्या नवीन स्टाफ ची एंट्री झाली होती . मानसी त्याला हळू हळू एक एक काम पण शिकवत होती.
नायडू सर मानसीच्या कामावर खूप खुश झाले होते. त्यांनी ज्या ज्या क्लायंट ला कॉन्टॅक्ट केला होता प्रत्येक क्लायंट मानसीचा तारीफ करत असे . नायडू सरांनी मानसी चे नाव प्रमोशन साठी पुढे पाठवले होते मानसीच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी पाईपलाईन मध्ये होत्या .
तुषार ने गुढी पाडव्याच्या निमीत्ताने आई वडिलांच्या पसंतीने २bhk फ्लॅट घेतला . तुषारच्या आई वडिलांनी पण फ्लॅट घ्यायला मदत केली . सांगायचा अर्थ असा कि सर्व जण आपापल्या परीने जवाबदाऱ्या पार पाडत होते .
तुषार ने आई चा चांगला मूड पाहून आई वडिलांशी मानसीचा विषय काढला .
तुषार " आई त्या मानसी च्या घरी आपण कॉल केला नाही ग . कदाचित ते लोक आपल्या फोन ची वाट बघत असतील ना !
तुषार चे बाबा " हो ना रे , त्याच दरम्यान तुझ्या आईची तब्बेत बिघडली त्यामुळे त्यांना कॉल करायचा राहून गेला ".
तृप्ती " बाबा मला तर ती मुलगी आपल्या दादासाठी एकदम सूट आहे असे वाटते "
तुषार ची आई " हो ना मुलगी ला नावं ठेवायला खरं तर जागा नाहीये .पण एकुलती एक आहे ना. तुषार तुला वाटते पण फार कठीण असतं या एकुलत्या एका लाडाच्या मुलीला सांभाळणे . शिवाय मुलगी जेव्हा तिच्या चाळीशी मध्ये येते तेव्हा तिला माहेरी जाऊन राहायचं असते आणि त्या दरम्यान जर आई वडील हयात नसले तर तिला माहेर उरत नाही , मग तिला एकाकी पण येते आणि त्या चिडचिड्या होतात . पण त्याच ठिकाणी जर एखादा भाऊ किंवा बहीण असेल तर ती दोन चार दिवस माहेरी जाऊन रिफ्रेश होऊ शकते .
तुषार " आई तुझा मुद्दा चांगला आहे . पण तीला एकाकीपणा वाटणार नाही याची जवाबदारी आपण घेऊ शकतो नाही का ?
तृप्ती " आई दादा बघ वाहिनीची बाजू घेतोय कसा ?"
आणि सगळे हसायला लागले . And Tushar is blushing .
तुषार ची आई " मला पण मुलगी पसंत आहे . ठीक आहे मी आणि बाबा एखादा चांगला मुहूर्त पाहून त्यांच्या घरी फोन करू .
तुषार आणि तुप्ती दोघांनी जाऊन आई च्या गळ्यात मिठी मारली .
तुषार ची आई " अरे तुम्ही खुश तर आम्ही पण खुश , शेवटी संसार तुम्हा दोघांना करायचा आहे . "
तुषार " आई थँक यु . तू खुश तर मी पण खुश , तुझ्या आशिर्वादाशिवाय मी काहीही करत नाही हे तुलाही माहित आहेच .
तुषार ची आई " हो रे बाळा .
तुषार ला राहवेना त्याला लगेच मानसी ला कॉन्टॅक्ट करून हि गोड बातमी तिला द्यायची होती पण त्याने हि आता सबुरीने घेतले. हि बातमी तिला आई बाबांकडूनच कळू दे .
मग मानसी च त्याला कॉल करेल या आशेवर तो थांबला.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा