निलूचा फोन म्हणजे नीताला एक संकटच वाटलं. जिला आपण कधी पाहिलीही नाही ती आता का येऊन उभी राहते ? तिला कळेना या बाबतीत काय विचार करावा आणि या नवीन संकटाचा सामना कसा करावा. रमेश आल्यावर बोलता येईल असं ठरवून तिने विषय मनातून काढून टाकायचा ठरवला. पण विषय असे संपत नसतात, निदान नको असलेले तरी. मग तिच्या मनात आलं रमेश यायच्या आतच ही बया येऊन उभी राहिली तर ? जसं जमेल तसं करीन असं म्हणून तिने कामाकडे लक्ष द्यायचं ठरवलं. पण पोळी जळायची ती जळलीच. काकांची मात्र तिला कमाल वाटली. असल्या माणसाशी संबंध नकोच. मध्येच श्रेया आली आणि म्हणाली, " आजोबा आले ? " तिला मात्र त्यांची आठवण येत असावी. नीताने उत्तर दिले नाही. पण तिच्या डोक्यातून हे आजोबा काढायलाच पाहिजेत हे नक्की. कसे ते तिला सध्या सुचत नव्हतं. निलू हे संकट येणार हेच तिला भारी वाटू लागलं. आपल्या लग्नातही ती आली नाही. .....कसातरी नीताने दिवस ढकलला. रमेशचे फोन येतच होते. तेवढीच एक चांगली बातमी. अजून काकांचा पत्ता नव्हता. निदान फोन तरी करायला काय हरकत होती. पण घराची सवय नसलेल्या माणसाकडून अपेक्षा तरी ती किती करणार ? दिवस तर गेला. अजून असे एकटीने किती दिवस काढायचे , कोण जाणे. ह्याच निलूची पत्र सुद्धा भांडणं निर्माण करीत . का येत्ये ही ? तिला खरंतर निलूने उगाचच पछाडलेलं होतं.
रात्री झोपण्याच्या गडबडीत असतानाच दारावरची बेल वाजली. या वेळी कोण असावं , असा विचार करीत नीताने घड्याळ पाहिलं. दहा वाजत होते. तिने कोण आहे विचारलं . पण बाहेरच्या व्यक्तीने उत्तर दिले नाही. मग थोडं घाबरतच तिने दरवाज्या उघडला. दारात एक प्रौढ स्त्री उभी होती. आणि बरोबर एक दहा बारा वर्षांचा मुलगा होता. बरोबर सामान होतं. सामानावरून हीच निलू असावी असं तिला वाटलं. मग नीता उगाचच हसली. आणि या म्हणाली. आत येत निलू म्हणाली, "सॉरी वहिनी , पण गाडी सहा तास लेट झाली . रमेश दादा घरात नाही का ? " नीताच्या उत्तराची आणि प्रतिक्रियेची वाट न पाहता ती आत शिरली . नीताला रमेश घरी नाही का असं विचारलेलं आवडलं नाही. एखादा माणूस कुठे आहे विचारणं ठीक आहे. पण सुरुवातीलाच नकारघंटा वाजवणारी माणसं तिला आवडत नसत. अर्थातच ती काही बोलली नाही. निलू सोफ्यावर बसली . स्वतःचे आणि मुलाचे जोडे काढीत ती म्हणाली, " सौरभ ही तुझी मामी आहे, ती आली की तिला नमस्कार कर बरं का ? " तो मानेनेच हो म्हणाला. नीता आतून एका ट्रे मध्ये पाण्याचे ग्लास आणि खायला एका प्लेटमध्ये फरसाण घेऊन आली. ट्रे टीपॉयवर ठेवून तिने निलूला नमस्कार केला. निलूला जरा बरं वाटलं. ती आत वळणार तोच सौरभने तिला नमस्कार केला. त्यावर नीताने "अरे राहू दे. " असं म्हटलं. आत लपून बसलेल्या श्रेयाला घेऊन ती बाहेर आली. आणि श्रेया आत्याला नमस्कार कर असं म्हणाली. नवखी स्त्री पाहून तिने नकार दिला. त्यावर निलू म्हणाली, " अगं राहू दे. मी कधी आलेली नाही ना. पण शिस्त लावायलाच हवी. " या शेऱ्याची गरज काय होती नीताला कळेना तिला फारसं आवडलं नाही. तिने मग त्यांना फ्रेश व्हायला सांगितलं. आणि ती जेवणार की पोहे किंवा उपमा खाणार ? असं विचारलं. निलू म्हणाली, " काहीही चालेल. तुला मी अवेळी आलेलं आवडलं नाही का ? " ....... खरंतर नीताला आवडलं नव्हतं. पण तिने "अहो काहीतरीच ! " असं म्हटलं. असो. संवाद तेवढ्यावरच थांबला. अर्ध्या तासात मग नाश्ता झाला. सगळ्यांनीच मग झोपेची तयारी केली. अजूनही नीता अस्वस्थ होती. निलूने निदान केव्हा येणार ते कळवायला हवं होतं. सरळ येऊन आपली उभी राहिली. किती दिवस ही राहणार , कोण जाणे. तिला झोप लागेना. काही वेळातच तिला ग्लानीसारखी झोप लागलीं. निलूने येऊन वातावरण खराब केलं .
असे तत्परतेने म्हणाला. मग घाणेरड्या चेहऱ्यावर किंचित मार्दव आणीत किक्ला म्हणाला, " देखो, हम खून खराबा नही चाहते. चुपचाप पैसा हमारे हवाले कर दो.
" ............ त्याच्या तोंडातून येणाऱ्या दारूच्या भपका टाळीत सगळं धैर्य एकवटून नीता म्हणाली , " यहां पैसा वगैरे कुछ नही है . और काकाजी पुलिसके ताबेमे है. आठ दिनसे घर आयेही नही. " तिच्यावर दुसऱ्या दोघांचा विश्वास बसला. पण किक्लाचा बसला नाही. तो म्हणाला, " देख. घरमे जितना भी पैसा है , हम लेके जायेंगे , खुद होकर देदो, वरना इस कबूतरको ढूंढनेको बोलेंगे. ". पण घरात पैसे नव्हतेच. किंबहुना काकांचे पैसे नीताला माहीत नव्हते. काण्याने न सांगताच सगळी कपाटं रिकामी करायला सुरुवात केली. त्याला काहीच सापडले नाही . आत जाऊनही त्याने सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त भिरकावल्या. थोडेफार दागिने मिळाले. आणि तो गॅलरीत शिरला. तिथले लहान कपाटाचे कुलूप त्याने जोर लावून उघडले. कुलुपात फार जोर नव्हता. अजूनही त्या दोघी त्यांच्या जागेवरून हलल्या नव्हत्या. अचानक लहान कपाटात काण्याला एक पिशवी मिळाली , ती उघडल्यावर नोटाच नोटा बाहेर पडल्या. तो आनंदाने पिशवी घेऊन बाहेर येऊन म्हणाला, " बॉस आपका अंदाजा सही निकला. इसमे एक दो लाख तो जरूर मिलेंगे. " असे म्हणून त्याने पिशवी जमिनीवर उलटी केली. शंभराची वीस बंडलं बाहेर पडली. ती पाहून नीताला काकांचा राग आला. आपल्यापासून हे सगळं लपवतच आले. कोणत्यातरी गुन्हेगारी टोळीमध्ये ते
******** ************ **************** **************** ************** ********
बराच वेळ झाला पण नीता आणि निलू यांना झोप लागेना. लाइट मालवून अर्धा तास होऊन गेला होता. खरंतर लगेचंच घरातलं विस्कटलेलं सामान नीट लावायला हवं होतं. पण नीताला काही सुचेना. तिला निलूचा रागही आला होता. हिच्या समोर हे सगळं घडलं. काही वेळ तरी ती तिला शिव्या शाप देत राहिली. मग मात्र मनाने तिच्यापुढे एक विचार सरकवला. ती होती म्हणून जास्त काही घडलं नाही . नाही म्हंटलं तरी" एकसे भले दो ". ती बोलो का न बोलो तिचं अस्तित्व थोडा फार तरी दबाव त्यांच्यावर आणीत होतं. कदाचित हेच बरोबर असेल , आता असं तिला वाटू लागलं. मग तिने थोडा वस्तुनिष्ठ विचार केला. सध्या आपण झोप घालवून आवरणार आहोत का ? मग आपण कांगावा कशाचा करत आहोत ? हे सगळं या काकांमुळे घडलं. त्यांच्यामुळे असली लोफर माणसं आपल्या घरी आली. त्यांची तोंडं एकेक करून तिच्या डोळ्यासमोर आली तसतशी तिला किळस वाटू लागली. पुन्हा एकदा भावनांना दाबून तिने निदान आत जाऊन
(क्रमशः)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा