प्रसाद वॉकिंगला तर बाहेर पडला होता. पण त्याच लक्ष मात्र फिरण्यात नव्हत तो सतत त्या दिव्य स्वप्नात गुंग होता. चालता चालता ही त्याला ते जंगलच दिसत होत.
खर तर हा अनुभव त्याच्या साठी नवा नव्हता तो स्वप्नात कित्येकदा त्या ठिकाणी जाऊन आला होता. पण प्रत्येक वेळेस त्याचा उद्देश असफल व्हायचा आणि काही ना काही कारणाने त्याच स्वप्न अपूर्णच रहायच.
पण असं का होत होत? त्याला काही संकेत मिळत नव्हते? नक्कीच मिळत होते. पण तरी ही त्याचा उद्देश सफल होत न्हवता आणि याच कारण होत त्याचा दैवी शक्तीवरचा अविश्वास.
हो. प्रसादच म्हणण होत. "देव वगैरे काही नसत आपण घडतो ते आपल्या कर्तृत्वाने."
आणि त्याचमुळे तो घरी नेहमी बोलणी देखील खायचा. अस होत तर मग हे स्वप्न यालाच का पडत होत? यालाही कारण होत. \"पूर्व पुण्यायी\" आणि \"पूर्वजांची पुण्यायी\" ते म्हणतात न पुण्यायी असल्या शिवाय चांगल्या गोष्टी घडत नसतात अगदी तसच.
प्रसाद आपल्यातच मग्न होता. आणि भर भर पावल टाकीत नुसता फिरत होता. जस काही त्याला एक ओढ लागली होती त्या दिव्य शक्तीला पहायची. हा ही एक प्रकारे संकेतच होता त्या विश्वासावर विश्वास ठेवायला लावणारा. देवच तस करून घेत होते त्याच्या कडून.
अर्धा तास झाला... एक तास झाला... आणि आज चक्क दोन तास झाले प्रसाद नुसताच गार्डनमध्ये फिरत होता. न खायची शुद्ध न प्यायची. हे सगळ त्याचा मित्र सहस्त्रबुद्धे मात्र अगदी लक्ष देऊन बघत होता आणि मनात विचार करत होता.
"याला आज झालय काय हा असा का वागतोय."
न रहाऊन तो त्याला अडवतोच आणि विचारतो.
"प्रसाद अरे थांब काय करतोएस तु वर्षभराच फिरणं एकाच दिवशी करून टाकणार आहेस का?"
प्रसाद लगेच भानावर येतो पण खूपच थकलेला असतो सहस्त्रबुद्धेना ते जाणवत आणि ते प्रसादला घरी सोडतात व सांगतात.
"हे बघ काही लागल तर कळव आणि आज सुट्टी आहे तर आराम कर."
एवढ बोलून ते निघून जातात. इकडे प्रसाद जरा वेळ आराम करतो.
वेळ दुपारची एक वाजताची...
प्रसादचा थकल्यामुळे नुकताच डोळा लागला होता. तेवढ्यात दाराची बेल वाजते आणि मनात नसताना ही त्याला उठाव लागत.
तो दार उघडतो तोच त्याची कामवाली आलेली असते. आधीच त्याला पडलेल्या स्वप्नामुळे प्रसाद त्रस्त असतो तो त्या स्वप्ना मागचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करतच असतो. त्यातच तीला उशिरा आलेलं बघून त्याला तिची तिडीकच भरते आणि तो कामवाली वर आपला राग काढतो.
पण ती मात्र त्या वेळेस सगळ निमूटपणे ऐकून घेते. तीला प्रसादचा स्वभाव माहीत असतो आणि आपले साहेब आपल्यावर नेहमी रागवत नाहीत जेव्हा त्यांना ते स्वप्न पडत तेव्हाच ते अस वागतात याची तिला जाणीव असते.
काही वेळा नंतर...
रत्नमाला (कामवाली) आपल्या कामात व्यस्त असते तेवढ्यात प्रसाद येतो आणि म्हणतो.
"माफ करा ताई मी जरा वेगळ्या विचारात होतो त्यामुळे सगळा राग तुमच्यावर निघाला."
आपली काम करता करताच रत्नमाला म्हणते.
"राहू द्या, साहेब मी काय तुम्हाला आज ओळखते का अहो नियमीत पणे गेली दहा वर्षांपासून तुमच्याकडे कामाला हाय मी. होतच असत अस. एक विचारू का मी तुम्हाला? तुम्हाला राग येणार नसेल तर."
प्रसाद सोफ्यावर बसत बसतच बोलतो.
"हो.. हो.. ताई विचारा की, राग कसला त्यात."
रत्नमाला विचारतात.
"तुमचा देवावर विश्वास हाय का? मी एका ताईंकडे कामाला जाते त्यांच्या मुलाला ही अशीच काही काही स्वप्न पडायची त्यांनी एक पारायण सुरू केलं आणि काही दिवसातच त्याला स्वप्ने येण बंद झाली आता तो आपल्या आयुष्यात खूप सुखी आहे."
प्रसाद अगदी शांतपणे सगळं ऐकून घेतो आणि खळखळून हसू लागतो. त्याला ती फक्त एक मजा वाटते आणि हसत हसतच तो म्हणतो.
"सॉरि, सॉरि ताई मी जरा जास्तच हसलो पण अहो अस काही नसत. ते आज मी तुम्हाला जरा जास्तच ओरडलो म्हणून म्हणताय न काळजी करू नका मी ठीक आहे."
एवढं बोलून प्रसाद मोबाईल चेक करण्यात मग्न होतो आणि रत्नमाला आपल्या कामात मग्न होते.
काही वेळा नंतर...
रत्नमाला आपली काम आटपून निघून जाते आणि प्रसाद दार लावून घेतो.
प्रसादच कुटुंब तस मोठं असत. त्याच्या घरात त्याची लहान बहीण काका काकू आई बाबा आणि आजी आजोबा असे सगळेच रहात असतात. पण प्रसाद मात्र आज घरी एकटाच असतो. कारण आज सगळे देव दर्शनासाठी कुलदेवी मंदिरात गेलेले असतात. आणि प्रसादचा देवावर विश्वास नसल्याने तो घरीच थांबलेला असतो.
थोडक्यात सांगायच तर प्रसादच मन विश्वास आणि अविश्वास या दोन टोकांवर डोलत होत. त्याला देवांवर विश्वास तर नव्हता पण त्याला स्वप्ना बद्दल स्वप्नात दिसणाऱ्या त्या दिव्य शक्ती बद्दल मात्र जाणून घ्यायचे होते. आणि त्याच्या याच परिस्थिती मुळे त्याला कुणाच्या तरी मार्गदर्शनाची गरज आहे. हे माहीत असून देखील तो ते मान्य करत नव्हता.
आपल्याला सगळ काही माहीत आहे. आपल्याला कुणाच्या ही उपदेशाची गरज नाही. असा त्याचा हेकेखोर स्वभाव होता.
त्याच दिवशी...
संध्याकाळची वेळ..
प्रसादचा मूड जरा चांगला होता. आपली दिवसभरातली सगळी टेन्शन्स विसरून तो फ्रेश झाला आणि बाहेर फिरायला पडला आज संध्याकाळचा त्याचा प्लॅन त्याने ठरवून ठेवलाच होता. मस्त शॉपिंग, मुव्ही, आणि बाहेरच जेवण.
प्रसाद आपली बाईक काढतो कानाला हेडफोन लावतो आणि मॉलकडे निघून जातो.
काही वेळा नंतर...
एका सिग्नलजवल प्रसाद आपली गाडी थांबवतो. कानाला हेडफोन्स लावलेले एकदम स्टायलिश असा देखणा प्रसाद खूपच छान दिसत होता. त्याच सगळं लक्ष सुटणाऱ्या सिग्नलकडे होत. तो सिग्नल सुटण्याची वाटच पहात असतो की, त्याला कुणीतरी आवाज देत आणि तो मागे वळून पहातो.
त्याच्या मागे एक ड्रायव्हर उभा असतो तो त्याला विचारतो.
"नमस्ते, तुम्ही प्रसाद कुलकर्णी का?"
हे ऐकताच एक क्षण प्रसाद चक्रावूनच जातो आणि विचारतो.
"हो, मीच प्रसाद कुलकर्णी पण माफ करा मी तुम्हाला ओळखल नाही कोण आपण? आणि मला कस ओळखता."
ड्रायव्हर एक स्मित हास्य करतो आणि म्हणतो.
"अहो, मी नाही माझे मालक तुम्हाला बोलावत आहेत मागे."
खर तर हा अनुभव त्याच्या साठी नवा नव्हता तो स्वप्नात कित्येकदा त्या ठिकाणी जाऊन आला होता. पण प्रत्येक वेळेस त्याचा उद्देश असफल व्हायचा आणि काही ना काही कारणाने त्याच स्वप्न अपूर्णच रहायच.
पण असं का होत होत? त्याला काही संकेत मिळत नव्हते? नक्कीच मिळत होते. पण तरी ही त्याचा उद्देश सफल होत न्हवता आणि याच कारण होत त्याचा दैवी शक्तीवरचा अविश्वास.
हो. प्रसादच म्हणण होत. "देव वगैरे काही नसत आपण घडतो ते आपल्या कर्तृत्वाने."
आणि त्याचमुळे तो घरी नेहमी बोलणी देखील खायचा. अस होत तर मग हे स्वप्न यालाच का पडत होत? यालाही कारण होत. \"पूर्व पुण्यायी\" आणि \"पूर्वजांची पुण्यायी\" ते म्हणतात न पुण्यायी असल्या शिवाय चांगल्या गोष्टी घडत नसतात अगदी तसच.
प्रसाद आपल्यातच मग्न होता. आणि भर भर पावल टाकीत नुसता फिरत होता. जस काही त्याला एक ओढ लागली होती त्या दिव्य शक्तीला पहायची. हा ही एक प्रकारे संकेतच होता त्या विश्वासावर विश्वास ठेवायला लावणारा. देवच तस करून घेत होते त्याच्या कडून.
अर्धा तास झाला... एक तास झाला... आणि आज चक्क दोन तास झाले प्रसाद नुसताच गार्डनमध्ये फिरत होता. न खायची शुद्ध न प्यायची. हे सगळ त्याचा मित्र सहस्त्रबुद्धे मात्र अगदी लक्ष देऊन बघत होता आणि मनात विचार करत होता.
"याला आज झालय काय हा असा का वागतोय."
न रहाऊन तो त्याला अडवतोच आणि विचारतो.
"प्रसाद अरे थांब काय करतोएस तु वर्षभराच फिरणं एकाच दिवशी करून टाकणार आहेस का?"
प्रसाद लगेच भानावर येतो पण खूपच थकलेला असतो सहस्त्रबुद्धेना ते जाणवत आणि ते प्रसादला घरी सोडतात व सांगतात.
"हे बघ काही लागल तर कळव आणि आज सुट्टी आहे तर आराम कर."
एवढ बोलून ते निघून जातात. इकडे प्रसाद जरा वेळ आराम करतो.
वेळ दुपारची एक वाजताची...
प्रसादचा थकल्यामुळे नुकताच डोळा लागला होता. तेवढ्यात दाराची बेल वाजते आणि मनात नसताना ही त्याला उठाव लागत.
तो दार उघडतो तोच त्याची कामवाली आलेली असते. आधीच त्याला पडलेल्या स्वप्नामुळे प्रसाद त्रस्त असतो तो त्या स्वप्ना मागचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करतच असतो. त्यातच तीला उशिरा आलेलं बघून त्याला तिची तिडीकच भरते आणि तो कामवाली वर आपला राग काढतो.
पण ती मात्र त्या वेळेस सगळ निमूटपणे ऐकून घेते. तीला प्रसादचा स्वभाव माहीत असतो आणि आपले साहेब आपल्यावर नेहमी रागवत नाहीत जेव्हा त्यांना ते स्वप्न पडत तेव्हाच ते अस वागतात याची तिला जाणीव असते.
काही वेळा नंतर...
रत्नमाला (कामवाली) आपल्या कामात व्यस्त असते तेवढ्यात प्रसाद येतो आणि म्हणतो.
"माफ करा ताई मी जरा वेगळ्या विचारात होतो त्यामुळे सगळा राग तुमच्यावर निघाला."
आपली काम करता करताच रत्नमाला म्हणते.
"राहू द्या, साहेब मी काय तुम्हाला आज ओळखते का अहो नियमीत पणे गेली दहा वर्षांपासून तुमच्याकडे कामाला हाय मी. होतच असत अस. एक विचारू का मी तुम्हाला? तुम्हाला राग येणार नसेल तर."
प्रसाद सोफ्यावर बसत बसतच बोलतो.
"हो.. हो.. ताई विचारा की, राग कसला त्यात."
रत्नमाला विचारतात.
"तुमचा देवावर विश्वास हाय का? मी एका ताईंकडे कामाला जाते त्यांच्या मुलाला ही अशीच काही काही स्वप्न पडायची त्यांनी एक पारायण सुरू केलं आणि काही दिवसातच त्याला स्वप्ने येण बंद झाली आता तो आपल्या आयुष्यात खूप सुखी आहे."
प्रसाद अगदी शांतपणे सगळं ऐकून घेतो आणि खळखळून हसू लागतो. त्याला ती फक्त एक मजा वाटते आणि हसत हसतच तो म्हणतो.
"सॉरि, सॉरि ताई मी जरा जास्तच हसलो पण अहो अस काही नसत. ते आज मी तुम्हाला जरा जास्तच ओरडलो म्हणून म्हणताय न काळजी करू नका मी ठीक आहे."
एवढं बोलून प्रसाद मोबाईल चेक करण्यात मग्न होतो आणि रत्नमाला आपल्या कामात मग्न होते.
काही वेळा नंतर...
रत्नमाला आपली काम आटपून निघून जाते आणि प्रसाद दार लावून घेतो.
प्रसादच कुटुंब तस मोठं असत. त्याच्या घरात त्याची लहान बहीण काका काकू आई बाबा आणि आजी आजोबा असे सगळेच रहात असतात. पण प्रसाद मात्र आज घरी एकटाच असतो. कारण आज सगळे देव दर्शनासाठी कुलदेवी मंदिरात गेलेले असतात. आणि प्रसादचा देवावर विश्वास नसल्याने तो घरीच थांबलेला असतो.
थोडक्यात सांगायच तर प्रसादच मन विश्वास आणि अविश्वास या दोन टोकांवर डोलत होत. त्याला देवांवर विश्वास तर नव्हता पण त्याला स्वप्ना बद्दल स्वप्नात दिसणाऱ्या त्या दिव्य शक्ती बद्दल मात्र जाणून घ्यायचे होते. आणि त्याच्या याच परिस्थिती मुळे त्याला कुणाच्या तरी मार्गदर्शनाची गरज आहे. हे माहीत असून देखील तो ते मान्य करत नव्हता.
आपल्याला सगळ काही माहीत आहे. आपल्याला कुणाच्या ही उपदेशाची गरज नाही. असा त्याचा हेकेखोर स्वभाव होता.
त्याच दिवशी...
संध्याकाळची वेळ..
प्रसादचा मूड जरा चांगला होता. आपली दिवसभरातली सगळी टेन्शन्स विसरून तो फ्रेश झाला आणि बाहेर फिरायला पडला आज संध्याकाळचा त्याचा प्लॅन त्याने ठरवून ठेवलाच होता. मस्त शॉपिंग, मुव्ही, आणि बाहेरच जेवण.
प्रसाद आपली बाईक काढतो कानाला हेडफोन लावतो आणि मॉलकडे निघून जातो.
काही वेळा नंतर...
एका सिग्नलजवल प्रसाद आपली गाडी थांबवतो. कानाला हेडफोन्स लावलेले एकदम स्टायलिश असा देखणा प्रसाद खूपच छान दिसत होता. त्याच सगळं लक्ष सुटणाऱ्या सिग्नलकडे होत. तो सिग्नल सुटण्याची वाटच पहात असतो की, त्याला कुणीतरी आवाज देत आणि तो मागे वळून पहातो.
त्याच्या मागे एक ड्रायव्हर उभा असतो तो त्याला विचारतो.
"नमस्ते, तुम्ही प्रसाद कुलकर्णी का?"
हे ऐकताच एक क्षण प्रसाद चक्रावूनच जातो आणि विचारतो.
"हो, मीच प्रसाद कुलकर्णी पण माफ करा मी तुम्हाला ओळखल नाही कोण आपण? आणि मला कस ओळखता."
ड्रायव्हर एक स्मित हास्य करतो आणि म्हणतो.
"अहो, मी नाही माझे मालक तुम्हाला बोलावत आहेत मागे."
नोट :- कधी कधी आपला ज्या गोष्टीवर विश्वास नसतो त्याच गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात. अगदी तसच प्रसादाच्या आयुष्यात ही घडत होतं. त्याचा ज्या दिव्य शक्तीवर विश्वास नव्हता तीच दिव्यशक्ती त्याला स्वप्नाच्या माध्यमातून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत होती. आता हेच स्वप्न त्याला नास्तिकतेतून बाहेर काढेल का? आणि ती व्यक्ती कोण आहे? ज्याला प्रसाद ओळखत नाही पण ती व्यक्ती मात्र प्रसादला ओळखते पाहुत पुढील भागात.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा