Login

लग्नानंतर होईल का प्रेम ? - अंतिम भाग

Its A Story Of Bad Side Of Love
आजच्या घडीला...

ठरल्या प्रमाणे सोनल आणि पार्थच्या लग्नाचा दिवस उजडला..
सोनल मेकअप रूममध्ये मेकअप करत असताना पार्थ तिला पहायला आला... सोनलला पाहून पार्थला खूप आनंद झाला.. बाजूला असलेली काजळाची डबी उघडून त्याने त्यातील काजळाचे एक बोट सोनलच्या काना जवळ लावले...

" किती सुंदर दिसतेय माझ्या घरची होणारी लक्ष्मी.. असं वाटतं पाहतच रहावं तूला... माझीच नजर नको लागायला माझ्या बायकोला म्हणून हे काजळचं बोट लावतोय " पार्थ सोनलकडे प्रेमळ भावनेने बघत म्हणाला...

थोड्याचवेळात मगलाष्टक सुरु झालेले...

" स्वस्ति श्री गणनायकं गजमुखम, मोरेश्वरम सिद्धीधम ।
बल्लाळो मुरुडम विनायकमहम चिन्तामणि स्थेवरम। "

मंगलाष्टक सुरु असताना पार्थ चोरट्या नजरेने हळूच सोनलकडे बघत होता आणि गालातल्या गालात हसत होता... मंगलाष्टक संपल्यावर रीतीप्रमाणे नववधु वराच्या पाया पडली आणि त्याचा आशीर्वाद घेतला... आपला नवरदेव बायकोच्या प्रेमात इतका बुडाला होता की तोही लगेच नववधूच्या पाया पडला.. सोनलला थोडं अवघडल्यासारखं झालं... सोनलच्या मैत्रिणी म्हणू लागल्या

" आई शपथ कसला भारी नवरा भेटलाय तूला सोनल, चक्क बायकोच्या पाया पडतोय, लकी आहेस तू सोनल "

" असा का खेळ खेळतोय देवा तू माझ्यासोबत...इतका छान माणूस माझ्या आयुष्यात आणलाय पण माझं प्रेम तर दुसऱ्यावर आहे हे जेव्हा त्याला कळेल तेव्हा काय होईल याचं.. मला माफ कर पार्थ " सोनल भरल्या डोळ्यांनी पार्थकडे पाहत होती...

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सत्यनारायण पूजा होती... त्यानंतर सोनल आणि पार्थ हनिमूनला काश्मीरला जाणार होते...पण पार्थच्या मोबाईल वर मेसेज आलेला की काश्मीर मधील पुलवामा मध्ये होणाऱ्या अतिरेकी हल्ल्यामुळे काही दिवस फ्लाइट्स बंद राहतील..

सोनलला खूप टेन्शन आलेलं.. तिने तिच्या फोनवरून इरफानला मेसेज करून कळवलं.. इरफान देखील निराश झाला आणि काही दिवसांनी मुंबईला परत आलेला..

पूजा झाल्यापासून पार्थ आणि सोनलचा जरी संसार सुरु झाला असला तरी दोघे अजून जवळ आलेले नव्हते... सोनलने पार्थला सांगितलेलं जेव्हा आपण हनिमूनला बाहेर जाऊ तेव्हाच मी माझं मन तुमच्याकडे मोकळं करेल.. तेव्हापासून पार्थ हनिमूनच्या दुसऱ्या डेस्टिनेशनचा विचार करत होता...

एकदिवशी सोनलच्या नावाने तिच्यासाठी आणि पार्थसाठी एक पत्र आलेलं त्यात तिच्या कंपनीकडून तिच्यासाठी मेघालयातील हनिमून पॅकेजचे तिकीट्स होते... ते तिकीट्स पाहून ती खूप खुश झालेली.. पार्थ लगेच तयारीला लागला.. एका आठवड्यानी दोघे मेघालयासाठी रवाना झालेले...



सोनल आणि पार्थ मेघालयला गेल्यापासून त्यांचा फोन बंद लागत होता म्हणून घरचे अस्वस्थ होते.. ज्या हॉटेलचे बुकिंग होते तिथे फोन करून चौकशी केली तर ते दोघे तिथे पोहचलेच नव्हते.. सोनलच्या बाबांनी तिच्या कंपनीच्या साहेबांकडे चौकशी केली हनिमून पॅकेजच्या पार्सल बद्दल.. तेव्हा सोनलच्या बाबांना कळालं की असे कोणतेही तिकीट्स आणि पॅकेज सोनलच्या नावावर कोणीही कंपनीकडून पाठवलेले नव्हते... सोनलच्या बाबांना सोनल आणि इरफान बद्दल शंका येऊ लागलेली.. त्यांनी इरफानचा पत्ता शोधून त्याचं घर गाठलं, तिथं गेल्यावर कळलं की इरफान एक आठवड्यापासून घरी आलेला नाही, कुठे गेलाय कोणालाच माहित नाही...

सोनलच्या बाबांनी आणि पार्थच्या बाबांनी शेवटी पोलीस कम्प्लेंट केलेली.. पोलिसांच्या अथक परिश्रयानंतर सोनल, पार्थ आणि इरफानच्या फोनच्या ट्रेस वरून ते कोणत्या भागात असतील याची शोधाशोध झाली आणि एका होटेल मध्ये सोनल आणि इरफान पोलिसांना सापडले...पोलिसांनी दोघांना जाब विचारला.. पार्थ कुठं आहे याची चौकशी केली...सोनल खूप रडत होती.. तिने केलेल्या गुन्ह्याबद्दल ती कबून झाली आणि बोलू लागली..

" मला हे लग्न अजिबात मान्य नव्हतं, माझ्या घरच्यांनी माझ्यासोबत घरातल्या सगळ्यांच आयुष्य संपवण्याची मला धमकी दिलेली... म्हणून मी लग्नाला तयार झालेले पण माझ्या मनात इरफानच होता.. मला वाटलं आम्ही हनिमूनला बाहेर जाऊ तेव्हा पार्थला सगळं खरं काय ते सांगू आणि पार्थ इतका समजूतदार आहे की मला आणि इरफानला साथ देईल... पण झालं उलटंच.. जेव्हा मी आणि पार्थ मेघालय मध्ये पोहचलो तेव्हा आम्हाला पीक करण्यासाठी इरफान ड्रायवर बनून आलेला, मी काही सांगायच्या आत पार्थ गाडीत बसल्यावर मला म्हणाला की, " अबे लैला मजनू तुम्हे क्या लगा की मेरेको तुमलोग उल्लू बनाओगे ? मेरेको च्युत्या बनाके इधर आशिकी लडाओगे ?... मला सगळं माहित आहे हा ड्रायवर कोण आहे आणि तुझं आणि त्याचं नातं काय आहे ते..."
पार्थ असं बोलल्यावर मला धक्काच बसला.. मी त्याला म्हणाले की,
" अरे तूला सगळं माहित असताना तरीही तू का माझ्याशी लग्न केलं? लाज नाही वाटली असं करताना! "

" ए चूप बस.. मला तू आधीपासून आवडायची... लग्न ठरल्यानंतर मी तुझ्या मागावर होतो.. तू जिथं जिथं जात होती तिथं मी तुझ्यावर नजर ठेवून होतो.. तेव्हा मला कळलं की हा पोरगा तूझा बॉयफ्रेंड आहे ते... पण काय आहे ना.. मला जर काही हवं असेल तर ते मी मिळवतोच.. आता बघ याच्यासमोर मी तूला किस करणार, तुम्ही माझं काहीही बिघडवू शकत नाही... " पार्थ रागात सोनलशी बोलत होता

पार्थचं बोलणं ऐकून इरफानने सोबत असलेला चाकू काढला आणि गाडी थांबवून मागे वळून पार्थच्या छातीत घुसवला..

"मी खूप घाबरले होते.. इरफानने एका निर्मनुष्य ठिकाणी गाडी नेली आणि तिथे डोंगराच्या पठरावरून डेड बॉडी सोबत गाडी खाली ढकलून दिली... तेव्हापासून आम्ही पोलिसांपासून लपत होतो.. पण शेवटी आज आम्ही सापडलो... आम्ही केलेल्या गुन्ह्यासाठी जी शिक्षा मिळेल ती भोगायला मी तयार आहे..."



जनहितार्थ : आजकाल लग्न करताना घरच्यांनी, मुलीने आणि मुलाने एकमेकांवर दबाव न टाकता लग्न करायला हवे नाहीतर हे आणि असे गुन्हे प्रेमाच्या हव्यासापोटी समाजात वाढतच रहातील..


समाप्त..