Login

लेखिका अनुराधा आंधळे पालवे : प्रतिभेतून शब्दांचा जागर

लेखणीचे एक स्वाप्न असतं समाजाचे चित्रण करुन वाचकांना बहाल करण्याचं ..त्यामुळे लेखकांना मिळणारा आनंद अमर्याद आहे.
लेखिका अनुराधा आंधळे पालवे : प्रतिभेतून शब्दांचा जागर ..!!

ईराच्या भव्यदिव्य निर्मितीत लेखिकांंचा वाटा मोलाचा आहे. जबाबदारीचे ओझे पेलताना कधीही न वाकणारी स्री समाजाचे चित्रण लेखणीतून करताना तिच्यातील प्रगल्भ विचारसणी दिसून आली. आपल्या व्यस्त दिनचर्येतून स्री जेंव्हा समाजात डोकावते तेंव्हा तिला समाजातील अनेक विषयांना वाचा फोडायची असते आणि हे काम आपल्या अफाट निरिक्षणणामुळे ती सातत्याने करत आहे. याचे प्रत्यंतर ईराच्या व्यासपीठावर लेखिकांंच्या कसदार लेखनातून स्पष्ट होते. अशाच ईरावर आपल्या विचारांचा पगडा लेखनातून वाचकांच्या मनावर बिंबवण्यात आदरणीय लेखिका अनुराधाजी यशस्वी झाल्या आहेत.

आपल्या नोकरी व कौटुंबिक जबाबदारीतून त्यांनी खुमासदार लेखन केले आहे. यासाठी कुठेच क्षमा नाही ,उशीर झाला तुला, ती थोरली आई आहे तुझी, राजी खुशी, आईची समजूत घालताना,मरण यातना, जळले तारुण्य सारे, मृगजळ आभास,तु फक्त लढ म्हण, फसवा एक मोह, स्वाभिमानी,सुनांची परिक्षा ,काकूसासू,कंजूस नवरा,खेळ जाणिवांचा,नवरा भाग्याचा, तूच सखा माझा,एक अनामिक गाठ अशा कथामालिकेतून त्यांनी समाजातील विविध विषय हाताळले आहेत. वेगळ्या विषयांना न्याय द्यायचे काम सातत्यपूर्ण लेखनातून त्या करत आहेत. ईराच्या चॕम्पियन स्पर्धेत व इतर अनेक स्पर्धेत त्यांचा सहभाग मोलाचा आहे.

कसदार लेखणी, क्रियाशिलता आणि तत्परता, बोलका स्वभाव,उत्तम निरिक्षणशक्ती, आदर व सन्मान याची कृतीशिलता अशा विविधांगी लेखिकेला वाढदिवसाच्या या सोनेरी क्षणाला खूपसा-या शुभेच्छा ..!!