Login

लेखिका अपर्णा परदेशी : कार्यकुशल व कुशल संघटक व्यक्तिमत्व

लेखकांच्या प्रतिभेमुळे जीवन जगण्याची प्रेरणा मिळते.


ईरा व्यासपीठाने अनेक लेखकांना लिहण्याची संधी दिली. आपली प्रतिभा व चौफेर निरिक्षणक्षमता यामुळे लेखकांनी ईरावर आपले बहारदार लेखन सुरु ठेवले. लघुकथा,कथामालिका यामध्ये लेखकांनी खुमासदार लेखन करताना वाचकांना समृद्ध केले. ईरावरील या लेखन मांदियाळीत नवीन लेखकांनी सुंदर लेखन केले आहे. लेखनाचे हे कार्य ईरावर अव्याहतपणे सुरु आहे; पण ईराचे खास आकर्षण म्हणजे सातत्यपूर्ण भरवत असलेल्या स्पर्धा होय…! जलदकथालेखन, अष्टपैलू लेखक , अलक व कविता लेखन,राज्यस्तरीय अशा स्पर्धांचे आयोजन ईरा व्यासपीठ दरवर्षी करत असते. या सगळ्यात सर्वांना वेध लागतात ते चॕम्पियन स्पर्धेंचे ..! वेगळेवेगळे संघ , लेखनातील नाविन्यपूर्ण टास्क, अनेक प्रांतातून सहभागी झालेले लिखाणातील महारथी अशी क्रिकेटच्या धरतीवर साहित्यक्षेत्रातील ऐतिहासिक चॕम्पियन ट्राॕफी म्हणजे लेखकांच्यासाठी वरदान आहे.गेली दोन तिन वर्ष हा साहित्यिक कुंभमेळा ईरावर भरलेला असतो याच स्पर्धेतील एक हरहुन्नरी गवसलेली लेखिका म्हणजे अपर्णा परदेशी…!

यावर्षिच्या चॕम्पियन ट्राॕफीमुळे अपर्णाजी यांची ओळख झाली. स्पर्धा सुरु झाली. गीतांजलीजी , राखीजी, मुक्ताजी,विद्याजी , भाग्यश्रीजी रितिकाजी आणि मी असा संघ लिखाणास सज्ज झाला. या संघाची धुरा अपर्णाजी यांच्यावर सोपवली गेली. सुरवातीपासूनच अपर्णाजी यांनी जबाबदारीने संघात काम सुरु केले. विविध टास्क वेळेत पुर्ण करण्यात त्यांनी नेहमी मार्गदर्शन केले. सातत्यपूर्ण लक्ष ठेऊन संघात कायम संवाद व उत्साह निर्माण केला. कौटुंबिक जबाबदारीतून अतिशय काळजीपूर्वक लेखन केले. स्पर्धेत सर्वात जास्त साहित्य त्यांच्यातील उत्साहामुळे प्रसारीत झाले. संघातील प्रत्येक लेखकाला विविध पुरस्कार मिळाले. त्यांना उत्कृष्ट कॕप्टन पुरस्काराने गौरवण्यात आले. सर्वोत्कृष्ट यशस्वी संघ हा पुरस्कार त्यांच्या कल्पक नेतृत्वामुळे संघाला मिळाला आहे.चॕम्पियन स्पर्धेने आम्हाला त्यांच्या रुपाने एक शिस्तबद्ध व उत्कृष्ट कर्णधार मिळाला. संघासाठी त्यांनी अपार मेहनत व कष्ट घेतले. सांघीक लेखनातून त्यांच्या मार्गदर्शनातून खूप शिकायला मिळाले.

अपर्णाजी यांनी विविध व्यासपीठावर आपले लेखन कार्यरत ठेवले. रहस्यकथेत विशेष हातखंडा, आशयगर्भ कवितेत ज्वलंत प्रतिभा, उत्तम निरिक्षणशक्तीतून अनेक कथामालिका यामुळे त्यांचे लेखन भारदस्त वाटते. स्वभावाने अतिशय करारी, परखडता व सातत्यतता , मदत करण्याची भावना , सौहादपुर्ण संबध जोपासण्याची कला , साहित्यिक ज्ञानाची आवड अशा विविध गुणसंपन्नतेने नटलेल्या व्यक्तिमत्वाचा सहवास नेहामीच प्रेरीत करतो. अशा या दिलखुलास वा दिलदार लेखिका अपर्णाजी यांना वाढदिवसाच्या या सोनेरीक्षणाला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा …!! पुढील लेखन व जीवनप्रवास असाच बहारदार रहावा हिच सदिच्छा …!!


©नामदेवपाटील