Login

अनपेक्षित बंधन..भाग ४

अनपेक्षित बंधन
चेहऱ्यावर चे भाव तर असे बदलले जणू तो खूप आनंदी आहे त्यांच्या भावाच्या लग्ना ने.... पण मनात खुप काही जमवून ठेवले होते..अन् त्याच्या आई च्या अन् आजीच्या सुखासाठी तो ही सुखी आनंदी असल्याचे दाखवत होता त्या खोट्या हसऱ्या चेहऱ्यामागे तो त्याचा खरा चेहरा लपवून फिरत होता...

पुढे...........

  सुकन्या च्या मनात अजूनही प्रेम चे वागणे घुमत होते. तो असा का वेगळा वाटतोय या बद्दल विचार सुरू होते, अन् ती त्याच धुंदीत फिरत होती..कि तेवढ्यात तिची सासू.. पार्वती बाई जहागिरदार यांनी आवाज दिलेले ही तिच्या कानावर पडले नाही अन् ती तशीच पुढे निघाली..
तशा त्या परत बोलल्या..


     "सुकन्या...अगं तुझ लक्ष कुठे आहे मी कधीची आवाज देतेय पण तू आपल तुझ्यातच गुंग आहेस..." म्हणतच ती समोर बसलेल्या आप्पा ना पाहतच बोलल्या..

      "पाहताय ना अप्पा तुमची लेक मला कशी दुर्लक्ष करतेय ते...अन् तसंही आता तिला नवीन सुन येणार ती सासू होणार तर मला कशाला लक्ष देईल नाही का..."म्हणतच ती भोळा चेहरा करतच बोलली...

तसे अप्पा म्हणजेच सुकन्या चे वडिल (प्रेम चे आजोबा)ते ही त्यांच्या लेकिकडेच असायचे त्यांची एकुलती एक मुलगी होती सुकन्या अन् तिची आई वारल्या पासून ते तिच्याकडेच राहत होते...
अन् ते ही सुकन्या कडे एकदा तर पार्वती बाई कडे पाहत हसू लागले.....

तशी सुकन्या लगेच भानावर येतच  बोलली..

     "अहो आई काही काय बोलताय मी का दुर्लक्ष करेन तुम्हाला, अन् तसं ही मला जरी सून येत असली तरी मी तुमची सून आहे हे नाही विसरणार मी..."

म्हणतच ती बोलली व नंतर तिच्या वडिलांकडे पाहत बोलली.

     "अन् अप्पा तुम्ही का हसताय उलट तुम्ही माझी बाजू घ्यायला हवी तर तुम्ही ही आईची साथ देताय.."

तसे ते हसतच बोलले.

    "अरे ..मी कधी काय बोललो अन् साथ कुठे दिली..."
तशी ती त्या दोघांना पाहतच बोलली.

   "बरं तुम्ही दोघांनी नाश्ता केला का..आणि हो तुमच्या गोळ्या ही घेतल्या का ?
नाही तर या लग्नाच्या गोंधळात राहून जातील...."

तशा पार्वतीबाई बोलल्या..

    "अगं आम्ही केला नाश्ता अन् गोळ्या ही घेतल्या...पण तु केला का नाश्ता तू ही खाऊन घे थोड नंतर वेळ भेटणार नाही आता लगेच आवरून निघावे लागेल...."म्हणतच त्या बोलल्या अन् नंतर ती असा कोणता विचार करत होती ते विचारू लागल्या

   "पण काय ग तु इतका कशाचा विचार करत होती काही राहिले का आणायचे...."
तशी ती बोलू लागली.

    "अहो नाही हो आई तो प्रेम ....."
म्हणतच ती बोलत होती कि त्यांनी तिला मध्येच अडवले व  त्या मध्येच बोलल्या..
"त्याच काय..."

    "अहो आई..तो ना मला वेगळाच वाटतोय... नेहमीप्रमाणे वागत नाही ना धड बोलतोय नाही त्याचा तो पूर्वी सारखा आनंदी चेहरा.... काही झाले म्हणून विचारले तर तेही सांगत नाही....काय करावे ते कळतच नाही.... म्हणून मग मी पृथ्वी ला बोलले तर तो बोलतो कि मीच जास्त टेंशन घेतेय जास्त विचार करतेय म्हणून..."

म्हणतच त्या बोलल्या तसे आप्पा तिला पाहत बोलले.

    "अगं त्याला कशाला बोलली.....तो परत चिडचिड करेल त्याला, अन् दोघांचे परत वाजेल मग त्यावरून उगाच दोघात वाद होतील.... जाऊ दे मी बोलतो त्याच्याशी...."

म्हणतच ते उठून उभे राहतच त्यांच्या खिशातून एक छोटे पॉकेट काढतच ते सुकन्या समोर धरतच ते बोलले.

"हे घे.... हे तु तुझ्याजवळ ठेव नंतर लग्न लागल्यानंतर दोघांनाही दे माझ्या वतीने.."

तशी ती व पार्वती बाई ही त्या पॉकेट कडे पाहू लागल्या..अन् सुकन्या ने ते उघडून पाहीले तर आत दोन सेम सोन्याच्या चेन होत्या.... अन् ती आप्पा ना पाहत बोलली.

      "अप्पा अहो हे काय  याची काय गरज होती अन् हे कधी आणले... अन् कसे...."

तसे ते बोलू लागले...

    "अगं गरज कशी नाही ..जर आज तुझी आई असती तर तिने हौशेने काय काय केले असते...आता  ही नाजूक आहे पण फूल ना फुलाची पाकळी गोड मानून घ्या...."तशा पार्वतीबाई लगेच उठत बोलल्या.

     "अहो असे का बोलताय.. अन् ही असली भाषा बोलायची नाही हं... तुम्ही काय परके आहात का घरातले च आहात ना.... मग काय गरज ही औपचारिकता करायची...."

म्हणतच त्या सुकन्या कडे पाहतच बोलल्या...
"सुकन्या ते दे परत यांना.."तसे ते पार्वती बाई कडे पाहत बोलले.

    "अहो तसं नाही हो ताई...."म्हणतच तो समजावत होते...कि
तशी सुकन्या मध्येच बोलली.

   "पण आप्पा तुम्ही हे कसे आणले..म्हणजे पैसे....."म्हणतच ती अडखळत बोलली.

तसे ते तिला पाहत बोलले.

   "अगं ते माझी एक एफडी होती ती तोडली अन् हे ....."तशी ती परत बोलली...

"आप्पा पण काय गरज होती का  राहू द्यायचे ना ...अहो तुमचा आशीर्वाद तोच मोलाचा आहे..उगाच कितीतरी करत बसता ...अन् तेही मला न सांगता..."

तसे ते तिला पाहतच बोलले.

      "अगं गरज म्हणून केलं नाही, माझी हौस माझा आशिर्वाद.... म्हणून केलं अन् तसंही जे माझं आहे ते तुमचचं तर आहे, तसं ही मला कशाला काही लागेल ,अन् लागलंच तर तुम्ही आहातच कि..

                अन जर मी तुला बोललो असतो तर तू मला काही करूच दिलं नसतं म्हणून तुला कळवले नाही......जा आता  ठेव ते नीट सांभाळून.... मी जातो प्रेम कडे तो तयार झाला का पाहतो...."

म्हणतच ते त्या दोघींना काही बोलू न देता तिथून निघून गेले....
तशा सुकन्या ही पार्वती बाईना पाहतच बोलल्या...

    "आई.. तुम्ही ही तयार व्हा मी ही आवरते लगेच निघू आपण...."म्हणतच ती आत निघुन जात होती....
तशा पार्वतीबाई तिला पाहत विचार करू लागल्या...

हिचा चेहरा लगेच पडला आईची आठवण आली असेल....
कितीही माणसे, कितीही नाती असली तरी आई ची उणीव तिची कमी कोणीच पूर्ण करू शकत नाही...त्यासाठी आईचं लागते...दुसरा कोणीच तिची जागा घेऊ शकत नाही....

अप्पांच्या बोलण्याने सुकन्या ला तिच्या आईची आठवण झाली त्याने ती थोडी उदास झाली हे पार्वतीबाई ना लक्षात आले होते तशा त्या तिला पाहत च बोलल्या.

   "सुकन्या आता आत जाऊन रडत बसू नको..तू सासू होणार आहेस अन् सासूचा चेहरा रडवेला छान दिसत नाही... अन् हो मला माझ्या सुने सोबत फोटो काढायचा आहे... तर मला माझी सून सुजलेल्या डोळ्यांची नकोय हं...फोटो त अगदी फ्रेश दिसली पाहिजे नवरी ची सासू कोन आहे बोलले कि तू उठून दिसायला हवी  आहेस तर लवकर मस्त पैकी तयार होऊन ये..,..." तशी ती हसली व बोलली.

     "आई...काही काय मी का रडेन..आलेच मी..." म्हणतच ती आत निघुन गेली...व पार्वती बाई ही  तिला जाताना पाहतच मनात बोलल्या 'ही काही शांत बसत नाही ......'म्हणतच त्याही त्यांचे आवरायला निघून गेल्या...

इकडे पृथ्वी ही प्रेम चे आवरले का बघायला आला होता, तसा तो अजूनही तसाच बसला होता अन् पृथ्वी चा  आवाज ऐकून तो त्याचे आवरू लागला..

       "प्रेम काय झालेय..."म्हणतच तो प्रेम कडे पाहत होता.
तसा तो त्याची नजर दुसरीकडे वळवतच बोलला..

  "कुठे काय काहीच नाही..."

   "प्रेम मी नीट विचारतोय काय लपवतोय तू...काही घडलेय का..."
तसा तो परत बोलला.

     "अरे नाही रे दादा.... काही काय बोलतो काही च नाही झाले.....तू बस मी आलोच चेंज करून.." म्हणतच तो त्याच्या समोरून आत जात होता कि पृथ्वी ने त्याला अडवले ..

       "काय चाललेय तूझ वर बघ माझ्याकडे माझ्या नजरेला नजर का देत नाहीस मग...काय सुरू आहे तुझ्या डोक्यात...."

तसा तो काही बोलणार कि आप्पा तिथे येतच बोलले.

      "अरे झाले का नाही नवरदेवाचे आवरून..."
तसा प्रेम ने पृथ्वी च्या हातातून त्याचा हात सोडवून घेतला..
व तो आप्पा कडे पाहतच बोलला.

    "आप्पा या ना बसा मी आलोच चेंज करून झालेच माझे.." म्हणतच तो चेंज करायला निघुन गेला...
तसे आप्पा पृथ्वी ला पाहतच बोलले.

    "पृथ्वी तू ही जा आवर तुझे....निघू सगळे एकदाच..."तसा तो ही त्यांचे ऐकून बोलला
"हो आप्पा निघतो...तुमचे झाले का आवरून.."
तसे ते बोलले...

     "हो झाले तू जा मी थांबतो याच्या पाशी..."तसा त्याचा नाईलाज झाला व तो तिथून निघून गेला...अन् आप्पा ने मुद्दाम त्याला पाठवून दीले कारण तो प्रेम ला धारेवर धरणार होता हे त्यांना पक्के कळले होत... म्हणून तर त्याला तयार व्हायला जा म्हणून पाठवून दिले..अन् ते तिथे प्रेम ची बाहेर येण्याची वाट पाहत बसून राहीले.....


Keep reading..............


काय होईल पुढे जाणून घेण्यासाठी वाचत रहा
अनपेक्षित बंधन.
आणि कमेंट्स नक्की द्या

🎭 Series Post

View all