नुसती बडबड करत होती..अन् ते ऐकून तर सुकन्या अन् पार्वती बाई दोघी ही अगदी चिडल्या होत्या पण तीथे त्यांना काही बोलता ही येत नव्हते.
त्यांना तर असे वाटत होते कि का बोलावले यांना लग्नासाठी....म्हणतच त्या दोघीही अगदी गप्प बसून राहील्या ती जे काही बोलली ते ऐकत......
त्यांना तर असे वाटत होते कि का बोलावले यांना लग्नासाठी....म्हणतच त्या दोघीही अगदी गप्प बसून राहील्या ती जे काही बोलली ते ऐकत......
पुढे..............
तेवढ्यात बाहेरून पृथ्वी येताना दिसला तशी सुकन्या त्याला पाहतच बोलली.
"तो काय आलाच कि तो..."म्हणतच ती उठून त्याच्याकडे गेली...तिला काही तरी बोलून तिथून सटकायचे जे होते..रमाचे बोलणे तिला खूपच लागत होते...अन् त्याने तिला जुन्या दिवसांची आठवण येत होती..पण त्यांना आता दुःखी व्हायचे नव्हते...
एका मुलाच्या दुःखात दुसऱ्या मुलाचे सुख घटवायचे नव्हते.. अन आता परत त्या पृथ्वी ला ही तसेच बोलतील म्हणून त्याचं तिथून उठल्या व पृथ्वी ला पाहतच त्याला बोलू लागल्या...
एका मुलाच्या दुःखात दुसऱ्या मुलाचे सुख घटवायचे नव्हते.. अन आता परत त्या पृथ्वी ला ही तसेच बोलतील म्हणून त्याचं तिथून उठल्या व पृथ्वी ला पाहतच त्याला बोलू लागल्या...
"अरे किती वेळ केला यायला, पुजा पण झाली दोघांची आता फक्त फेरे बाकी आहेत ....."म्हणतच त्या त्याला बोलत होत्या...तसा तोही तिला पाहतच बोलला.
"लग्न तर झाले नाही ना मी आलो ना वेळेवर मग... झाले...तर...."म्हणतच तो आजूबाजूला पाहत होता ..तशी त्याची नजर त्याच्या वडिलांकडे गेली अन् त्यात त्यांच्या कडेवर असलेल्या त्या चिमुकल्या कडे तसे त्याचे डोळे पाण्याने भरून आले अन् तो ते आतल्या आत आडवतच त्याला पाहतच बोलला.
"आई....विराज आला.....कोण कोण आलेय...बाबापण आल्यात का...."
तशी तीही तिकडे पाहतच बोलली.
तशी तीही तिकडे पाहतच बोलली.
"नाही ते आले नाहीत..रमा ताई अन् निता दोघीच आल्यात...."म्हणतच त्या दोघीकडे पाहत परत बोलल्या.
"अन् पृथ्वी हे बघ त्या काहीही बोलल्या तर ते मनाला जाऊन घेऊ नको ऐकून न ऐकल्यासारख सोडून दे उगाच तोच तोच विचार करून स्वतः लाच त्रास करून घेऊ नको..."म्हणतच त्या त्याला समजावून सांगत होत्या....
अन् इकडे रमा निता ला पाहतच हळूहळू आवाजातच बोलू लागली..
"अगं बघत काय बसलीस जा ना बोल जाऊन..."
तशी ती बोलली.
तशी ती बोलली.
"मम्मी.....मी काय म्हणून बोलू आधीच मला त्यांची भिती वाटते कसे बघतात ते माहित आहे ना....त्यांचे डोळे बघूनच मला धडकी भरते...मी तुला आधीच बोलले होते कि मला यात ओढू नको .."
तशी ती तिला गप्प बसवतच बोलली.
तशी ती तिला गप्प बसवतच बोलली.
"अगं ये मला शहाणपण शिकवू नको जेवढे सांगितले तेवढे कर उठ जा ते बघ ते इकडे बघत आहेत जा जाऊन बोल.."
"पण मम्मी..."
" अगं उठ ...उठ म्हणतेय ना..जा..."म्हणतच त्याने तिला तिथून जबरदस्तीने उठायला लावले व तिला पृथ्वी कडे पाठवले..
तशी तीही घाबरतच तिकडे गेली...
अन् त्याला पाहतच ती त्याच्या समोर जाऊन थांबली...पण तिच्या तोंडातून काही आवाज निघत नव्हता..तशी ती तिचा सगळा धीर एकवटत बोलणार कि तोच बोलला.
" अगं उठ ...उठ म्हणतेय ना..जा..."म्हणतच त्याने तिला तिथून जबरदस्तीने उठायला लावले व तिला पृथ्वी कडे पाठवले..
तशी तीही घाबरतच तिकडे गेली...
अन् त्याला पाहतच ती त्याच्या समोर जाऊन थांबली...पण तिच्या तोंडातून काही आवाज निघत नव्हता..तशी ती तिचा सगळा धीर एकवटत बोलणार कि तोच बोलला.
"निता...कधी आलात...."
तशी ती त्याला पाहतच बोलली.
तशी ती त्याला पाहतच बोलली.
"ते..आताच आलोत.... तुम्ही आता येताय का...उशीर का केलात...."म्हणतच ती त्याला पाहत होती...तशी त्याने तिच्यावर एक कटाक्ष टाकला तशी ती घाबरली...व तिची नजर त्याच्यावरून वळवली...अन् तो परत स्वतः लाच सावरत बोलला.मला काम होत थोड.....म्हणतच तो तिच्याकडे दुर्लक्ष करत सुकन्या कडे पाहतच बोलला.
"आई..मी आलोच.हं..."म्हणतच तो त्याच्या वडिलांकडे निघून गेला...अन् निता त्याला जाताना पाहून परत रमाकडे आली....
तशी रमा तिला पाहतच बोलू लागली.
तशी रमा तिला पाहतच बोलू लागली.
"काय ग..... काय बोललीस कि नाही..... अन् लगेच परत का आली.... आणखी थोडा वेळ बोलायचे ना..."
तशी ती बोलली.
तशी ती बोलली.
"मम्मी...काय तुझं ..इथे बसुन सांगतेय नुसती....समोर गेलयावर कळते काय बोलायचे अन् किती ते....असू दे बस झाले मी बोलले तितके.."
म्हणतच तीही तावातावाने बोलत होती..तशी रमा ही तिला पाहत रागातच पृथ्वी कडे पाहू लागली...
'याला परत माझाच जावई करेन... शेवटी विराज साठी का होईना पण या जहागिरदार घराची थोरली सून माझी लेक होती, अन् पुढे ही माझी लेकच असेल..'म्हणतच त्या मनातच विचार करत होत्या....
तिकडे माया अगदी छान तयार झाली होती आता तिने ती नऊवारी साडी काढून छानसा शालू घातला होता... तोही तिच्यावर अगदी खुलून दिसत होता...ती तिचे आवरत होतीच कि तिची आत्या व आत्याचे मिस्टर तिला घ्यायला खोलीत आले..सोबत तिचे मामा (आईचे भाऊ)ही होतेच आपल्या भाचीला कडेवर घेऊन जायला....अन आत्या तर तिला पाहतच राहील्या.
"अगं बाई...माया अगं किती छान दिसतेयस..."म्हणतच त्या तिला निरखून पाहत होत्या...
तसे दिलीपराव (कुसुम चे मिस्टर)... ही तिला साथ देतच बोलले..
तसे दिलीपराव (कुसुम चे मिस्टर)... ही तिला साथ देतच बोलले..
" हो खरंच खूप छान दिसतेयस माया...." म्हणतच तिचे कौतुक करत होते...तशी ती तर तयारच झाली होती अन् आता तिची धडधड ही वाढत होती .
नव्या नात्याची नव्या आयुष्याची सुरुवात जी होणार होती अन् त्या कल्पनेनेच तिला धडधडायला होत होते..
तसे बाहेरून गुरूजी स्पिकरवर हाका मारू लागले..
"नवरीचे मामा नवऱ्या मुलीला घेऊन या...नवऱ्याचे मामा नवऱ्या मुलाला घेऊन या.... मुहूर्ताची वेळ जवळ आली या लवकर...."
म्हणतच ते बोलवत होते...तशी अनिता व माया च्या मैत्रिणी ही मायाच्या रूममध्ये गेल्या .तसे अनिताच्या भावाने म्हणजेच माया च्या मामाने तिला कडेवर उचलून घेऊ लागले... तशी ती तर तयारच होत नव्हती पण तरी ते काही ऐकायला तयारच नव्हते हा....ना.....हा...ना..... करत शेवटी तिच मागे सरली व त्यांनी तिला उचलून घेऊन मांडवात आणले....व आणून तिला त्या गुरूजी च्या समोरच्या पाटावरती उभं केले...पण तिथे तीच आधी पोचली होती नवरा मुलगा अजून आलाच नव्हता तसे सगळे बोलू लागले..
"आज पहिल्यांदाच असं घडतेय कि नवऱ्याला जास्त वेळ लागतोय तयार व्हायला..अन् नवरी अगोदर तयार होऊन पोचली...." तसा तिथे हशा पिकला पण तरी तो का बाहेर आला नाही म्हणतच सुकन्या विचार करतच शिवराज कडे गेल्या व त्यांना पाहतच बोलल्या.
"अहो...प्रेम का आला नाही....अजून कोण गेलेय त्याला आणायला.... तुम्ही जा ना त्याला घेऊन या ...बघा सगळे कसे हसत आहेत. जा लवकर घेवुन या त्याला..."म्हणतच त्यांनी त्यांच्याकडून विराज ला आपल्या कडेवर घेतले व ते आत त्याला आणायला निघून गेले....
अन् तेवढ्यात पृथ्वी ही बाहेरून आला जो त्याचा एक महत्त्वाचा फोन कॉल रिसिव्ह करायला बाहेर गेला होता...
तसा तो सुकन्या कडे पाहत बोलला.
तसा तो सुकन्या कडे पाहत बोलला.
"आई काय झाले हे असे सगळे हसत का आहेत अन् हा प्रेम का आला नाही अजून.....इतका का वेळ लावतोय...तो..."
तशा त्याही काळजीत बोलल्या...
तशा त्याही काळजीत बोलल्या...
"काय माहित कसली तयारी करतोय ते मला तर आता टेंशन च आलंय..."
तसा तो तिला समजावतच बोलला.
तसा तो तिला समजावतच बोलला.
"आई तू ना उगाच कशाच ही टेंशन घेतेस, येतच असेल तो नको टेंशन घेऊ..थांब मीच पाहून येतो..."म्हणतच तो ही प्रेम ला आणायला त्याला दिल्या गेलेल्या रूमकडे निघाला...
अन् इकडे रूममध्ये आलेला प्रत्येक माणूस मध्येच थांबत होता, बाहेर यायचे नावच घेत नव्हता... शेवटी मायाचे वडिलच न राहवून तिकडे प्रेम च्या रूमकडे निघाले...
शेवटी त्यांच्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न होता...त्यांची मुलगी मांडवात उभी होती वरमाला घेऊन....अन् नवरा मुलगा येतच नव्हता...अशा परिस्थितीत प्रत्येक बापाची काळजी अन् चिंता अगदी शिगेला पोचलेली असते...
आता तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर काळजी, चिंता दिसत होती...अन् सगळे अगदी लक्ष लावून बसले होते..कि प्रेम कधी येईल याची वाट पाहत....
अन् माया ती तर अगदी गोंधळून च गेली होती कि का इतका वेळ लागतोय त्यांना यायला काही घडले असेल का आत...म्हणतच...
तिच्या चेहऱ्यावर चा आनंद ही आता मावळायला होता तिचा उजळणारा चेहरा आता कोमेजायला लागला होता.....
तिच्या चेहऱ्यावर चा आनंद ही आता मावळायला होता तिचा उजळणारा चेहरा आता कोमेजायला लागला होता.....
Keep reading............
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा