Login

अनपेक्षित बंधन..भाग ८

अनपेक्षित बंधन
माया ती तर अगदी गोंधळूनच गेली होती कि का इतका वेळ लागतोय त्यांना यायला काही घडले असेल का आत...म्हणतच...
         तिच्या चेहऱ्यावर चा आनंद ही आता मावळला होता तिचा उजळणारा चेहरा आता कोमेजायला लागला होता.....

पुढे.............


इकडे प्रेमच्या रूममध्ये अगोदर तर त्याच्या मित्रांला पाठवले होते त्याला आणायला तो ही आत‌ येऊन त्याला चहूकडे पाहू लागला पण तो तिथे कुठेच नव्हता, तर त्याला वाटले तो वॉश रूममध्ये असेल म्हणतच तो त्याला आवाज देत तिथेच बसून राहिला...त्यात ही थोडा वेळा गेला होता कि शिवराज स्वतः च त्याला घ्यायला आले.... म्हणजे सुकन्या नेच त्यांना पाठवले होते तसे ते आत येतच प्रेम घ्या मित्रांला बोलू लागले..


     "अरे असा का बसला आहेस अन् प्रेम कुठे आहे..बाहेर सगळे त्याची वाट पाहत आहेत...कधीचा त्याला घ्यायला म्हणून आलास अन् तूही इकडेच बसला आहेस...चल उठ कुठेय तो..झाले का आवरून..." म्हणतच ते त्याला पाहत बोलत होते.....तसा तो बोलला.

       "काका ते मला वाटले तो फ्रेश होतोय म्हणून मी त्याची वाट पाहत बसलो होतो..."तसे ते ही लगेच त्याला  पाहतच बोलले.

        "बरं.बर बघ झाले का त्याचे कधीपासून तयार होतोय...पोरींच्या वरचे करतोय हा तर...."म्हणतच ते थोडे चिडतच बोलले...

तसा तो ही बाथरूम कडे जातच दार वाजवून बोलू लागला..

"प्रेम... प्रेम..अरे यार झाले  का आवरून पटकन ये बाहेर काका चिडलेत खूप...".म्हणतच तो आतून काही बोलतोय का याचा अंदाजा घेत होता....
पण आतून तर काहीच रिस्पॉन्स येत नव्हता...

तसा त्याने दाराला थोडासा धक्का दिला...तसा तो दरवाजा लगेच मागे सरकला गेला...तसे त्याला आश्चर्य वाटले कि हा आत नाही का ...अन् मी तर तो आतच आहे म्हणून त्याची वाट पाहत बसलोय......म्हणतच तो आत जाऊन सगळीकडे शोधून बाहेर आला व शिवराज कडे पाहतच घाबरून‌ बोलू लागला..

"काका....ते....."तसे ते त्याच्याकडे पाहत बोलले.

  "काय झाले आवरले नाही अजून त्यांचे..."
तसा तो घाबरत बोलू लागला....त्यांच्या तर तोंडून शब्द ही निघतो नव्हते.

   "नाही काका ते ..तो... आत नाही...."म्हणतच त्याने कसेतरी एकदाचे सांगून टाकले..
अन् त्याचे ते‌ शब्द ऐकून तर त्यांच्या पायाखालची जमीनच हादरली....

   "काय..... नाही.... म्हणजे कुठे गेला मग तूच म्हणालास ना कि तो आत आहे म्हणून मग आता कुठे गेला तो....."म्हणतच ते त्याच्यावर चिडत होते....तसा तोही घाबरतच बोलला..

"नाही काका ते मी त्याला इथे पाहिले नाही म्हणून मला वाटले कि तो आत असेल.... म्हणून..." म्हणतच तो अडखळत बोलत होता.....तसे ते जास्त चिडले व त्याला पाहतच रागात बोलु लागले....

"काय‌.... तू त्याला पाहिलेच नाही...अरे मग त्याची वाट पाहतोय असं का बोलला....

" कुठे गेला तो असे मध्येच जा बघ बाहेर कुठे आहे का..ते.."म्हणतच ते चिंता करत तिथेच थांबून त्या रूमभर येरझाऱ्या घालत होते......

अन् तो बाहेर धावतच निघून गेला शिवराज ला तर काही सुचतच नव्हते कि काय करावे अन् काय नाही बाहेर गुरूजी बोलवत होते...
नवऱ्या मुलाला घेऊन या....
म्हणून अन् हा प्रेम माहिती नाही कुठे गेला होता ते...तसा पृथ्वी त्या रूममध्ये आला...व आत येतच तो प्रेम ला आवाज देत होता...तशी त्याची नजर शिवराज वर पडली..व तो त्यांना पाहत बोलला.


   "बाबा प्रेम कुठे आहे...अन् तुम्ही एकटेच काय करताय इथे त्याच्या रूममध्ये..."तसे ते अचानकच खाली बसले.....
तसा तो त्यांना सावरायला पुढे धावला ..

   "काय झाले बाबा..... काय होतेय.... तब्येत ठीक नाहीये का..काय होतेय मी डॉक्टरांना बोलवतो..." म्हणतच तो त्याच्या खिशातून मोबाईल काढत होता कि त्यांनी त्याला अडवले व ते त्याला पाहत अगदी रडकुंडीला येत बोलू लागले...


   "त्याने माझे नाक कापले मला माझी मान खाली घालायला लावली...."
पण पृथ्वी ला त्यांचे बोलणे काही समजतच नव्हते..तसा तो विचारू लागला..

   "काय झाले बाबा.. नीट काय ते सांगा काय झाले. का असे बोलताय‌ कोण नाक कापले मला काहीच समजत नाही.."
म्हणतच तो त्यांना पाहत होता.
तसे ते त्याच्याकडे पाहतच त्यांच्या हातात असलेला कागद त्यांच्यासमोर धरतच अगदीच थरथरू लागले..
अन् तो त्यांनी दिलेला तो कागद समोर धरतच वाचू लागला...




   आई बाबा....
मला माफ करा...मला असं इथून तुम्हाला न सांगता जायचे नव्हते पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाही...मी एका मुलीवर प्रेम करतो अन् मी माया शी लग्न करून तिचे आयुष्य खराब नाही करू शकत....मी हे आधी काही  बोललो नाही कारण मीच माझ्या मनातील भावना समजून घ्यायला वेळ केला..मीच कनफ्यूज होतो माझ्या भावनेविषयी.....पण मला आता रियलाईज झाले कि माझे त्या मुलीवर प्रेम आहे ते....मग मी माया शी कसे लग्न करणार....ती खूप चांगली आहे पण मीच तिच्या योग्य नाही ...खरंच मला माफ करा मी हे लग्न नाही करू शकत... म्हणून मी कोणाला ही काही न सांगता इथून निघून जातोय....
तुमचा
    प्रेम....


अन हे सर्व वाचून तर पृथ्वी ला ही झटकाच बसला....त्याचे ही डोके अगदी सुन्न झाले..तसे शिवराज त्याला पाहतच बोलले..

     "काय करायचे रे आता हा असा कसा मध्येच सगळं सोडून निघून गेला .मी कसे तोंड दाखवणार आता...काय वेळ आणली याने माझ्यावर काय करायचे आता.."
म्हणतच ते अगदी काकुळतीला येऊन बोलत होते...तसा पृथ्वी ही विचार करू लागला कि काय करता येईल बाहेर तर प्रेमला घेऊन या म्हणून आवाज देत होते... तेवढ्यात मायाचे वडिल स्वतः प्रेमच्या रूममध्ये आले...अन् आत येऊन पाहतात तर पृथ्वी त्यांच्या वडिलांना आधार देत काहीतरी खोल विचारात मग्न होता तसे ते त्या दोघांच्या जवळ येतच बोलतात.

"काय झाले काही प्रॉब्लेम आहे का...अन
प्रेम.....कुठे आहेत त्याला गुरूजी बोलवत आहेत कुठे आहेत ते..." म्हणतच ते शिवराज कडे पाहत होते..

तसे ते जागेवरून उठले व त्यांच्या समोर जातच त्यांच्या पायातच खाली बसतच रडकुंडीला येत बोलू लागले..

"मला माफ करा .....मी माझ्या मुलाला नाही थांबवू शकलो..."
तसे ते ही चकीत होतच बोलले.

     "म्हणजे काय बोलताय.. काय झाले...
अन् तुम्ही असे माझ्या पायात का बसलात उठा उभे रहा काय झाले .."म्हणतच त्यांनी शिवराजला हाताला धरुन उठवले..तसे शिवराज बोलले..

"अहो प्रेम...तो...तो..हे लग्न सोडून निघून गेलाय.."
तशी त्यांची तर हालतच बेकार झाली अन् ते तर खालीच कोसळले अन् त्याच्या डोळ्यातून अश्रुच्या धारा वाहू लागल्या...

व ते त्याच्या मुलीचा विचार करूनच कासावीस झाले..
अन् ते तसेच रडतच बोलू लागले...

       "माया..... माझी माया ती काय करणार ती कधीची वाट बघतेय ..तिच्या होणाऱ्या नवऱ्याची...काय घडले हे असे...तिला भर मांडवातून परतावे लागेल काय झाले हे.."म्हणतच ते रडायलाच लागले..तसा पृथ्वी समोर येतच बोलू लागला..

    "हे बघा काका नका इतक टेंशन घेऊ मी शोधून आणतो त्याला ..."म्हणतच तो सावरत होता तसे ते बोलले ..

   "शोधून आणणार पण तोपर्यंत माझी माया तिथेच सगळ्यांचे टोमणे,सगळ्यांच्या नजरा झेलत बसेल का.….. काय घडले हे..
माझ्या पोरींचे आयुष्य तर विस्कटले कि अन् तो परत आला तरी तो लग्न करेल याची काय शाश्वती....मीच चुक केली चुकीचा व्यक्ती निवडला माझ्या लेकिसाठी...."म्हणतच ते तसेच रडत बसले होते...

     इकडे सुकन्या पृथ्वी व शिवराज ला आत जाऊन बराच वेळ झाला,पण ते दोघेही परत बाहेर का  आले नाहीत म्हणतच तीही काळजीने आत आली..अन् ती आत येतच पाहू लागली कि शिवराज नाराज होऊन बसतेल..अन् मायाचे वडिल तर रडतच होते अन् पृथ्वी फोन वर चौकशी करत होता कि प्रेम कुठे आहे का याची....अन

ती आत येतच बोलू लागली..
"भाऊ ..काय झाले..असे का रडताय... का बसलात इथे चला ना बाहेर.. सगळे किती काय काय बोलत आहेत..अन् प्रेम....तो..कुठे आहे ..तो अजून बाहेर का येत नाही..."म्हणतच ती आजूबाजूला पाहत होती.

तसा पृथ्वी त्यांच्या जवळ जातच बोलला.
"आई....प्रेम....तो.. नाही तो हे लग्न सोडून निघून गेला आहे..."तशा त्याही चकित झाल्या...

   "काय..."

   "हो आई..त्याने तसे लेटर लिहिले आहे अन् तो कुठे आहे तेच बघतोय मी...."म्हणतच तो परत कोणालातरी फोन लावत होता...

         तशी सुकन्या ची नजर मायाच्या वडिलांवर गेली अन् ती त्याचा विचार करुन तर हादरूनच गेली..

एका मुलीच्या बापाची काय गत होते हे तिला कल्पना करूनच दुःख होत होते.....तीही तशीच तिथे थांबून राहिली कि प्रेम परत येईल का ....म्हणतच.....काय करून ठेवले हे म्हणतच ती मनातच त्याला दोष देत होती...