गेल्या भागात आपण पाहिलं की, आजोबा पाय घसरून खाली पडतात आणि त्यांना हलकासा मार लागतो. त्यांचा मुलगा त्यांचा पाय चेपत असतो. राधा आणि राज ते बघतात. राज राधाची समजुत घालतो आणि तिला सकारात्मक विचार करायला सांगतो. राधा सुमित्राचा ब्लाऊज घेऊन तिच्या घरी जाते. आता पाहू पुढे.
"मावशी, तुम्हाला ब्लाऊज अर्जंटमध्ये पाहिजे होता, म्हणून मी शिवला. तुम्ही म्हणाला होता ना परवा ब्लाऊज पाहिजे, मला वाटलं तुम्हाला वेळ नसेल म्हणून मीच घेऊन आले."
"धन्यवाद राधा. खूपच छान ब्लाउज शिवला आहेस. तितक्यात आजोबा आले. जरा रागानेच ते सुमित्राकडे बघत होते."
" पहिल्यांदाच तू घरी आली आहेस. एक कप चहा तरी घे."
" नको मी नंतर केव्हातरी येईन."
"अगं बस गं. मावशी म्हणते आणि मावशीचं इतकंही ऐकणार नाही. सुमित्रा तिला फार प्रेमाने बोलत होती. राधा बसली."
सुमित्रा स्वयंपाक घरात गेली. इथे आजोबा राधाच्या बाजूला येऊन बसले. तिला वरून खालून निरखून पाहू लागले.
राधा देखील त्यांना अधून मधून पाहत होती. शरीरावरील सुरकुत्या सांगत होत्या की सत्तरी गाठली होती. पांढरे शुभ्र असे कपडे घातले होते. चेहऱ्यावर एक वेगळच तेज होतं.
सुमित्राने राधासाठी चहा आणला.
राधाला कप देणार तोच कप आजोबांनी उचलला.
"बाबा, काय हे आताच चहा घेतला ना?" सुमित्रा
"तू मला कुठे दिला चहा?"
"असू द्या मावशी. मला नको."
"अगं त्यांना चहा दिला आहे."
आजोबा काही ऐकणार नाही हे सुमित्रा ओळखून होती.
पुन्हा किचनमध्ये जाऊन तिने दुसरा कप आणला आणि राधाला दिला.
सुमित्रा गप्पा मारू लागली.
खरं तर आजोबांकडे इतकं लक्ष द्यावे लागत होतं की, त्यामुळे तिचं देखील बाहेर जाणं जवळपास बंदच झालं होतं, कारण जराही दुर्लक्ष केलं तर आजोबा काही ना काही उद्योग करून मोकळे होत.
खूप दिवसाने सुमित्रा कोणाशी तरी मन मोकळ्यापणाने बोलत होती.
" तुलाही एक मुलगाच आहे का?"
"हो अनुज नाव आहे."
"छान नाव आहे हो."
"माझाही मुलगा आहे. त्याचं नाव अथर्व."
"तो कुठे असतो."
"तो बाहेरगावी असतो. लग्न झालंय." तिच्या डोळ्यात पाणी आले.
"काय झालं मावशी?"
"मुलं दूर गेली की सर्वात जास्त त्रास हा आईला आणि वडिलांना होतो. अथर्व आणि माझी सून अर्पिता पुढच्या महिन्यात येणार आहे. म्हणून आम्ही इथे आलो आहोत."
सुमित्राला खूप काही सांगायचं होतं. तिच्या चेहऱ्यावरचं दुःख राधाच्या मनाला फार बैचेन करत होतं.
राज बरोबरच बोलत होता, आपल्याला काही गोष्टी जशा दिसतात तसं कधी कधी नसतं.
जे काही विचार करत होते तसं काहीच नव्हतं. उलट या मावशी किती मनमिळावू आहे आणि किती छान बोलतात.
तितक्यात नरेश देखील आला.
सुमित्रा, प्लिज एक कप चहा देशील का ? खूपच थकलो आहे मी."
सुमित्रा नरेशला चहा देऊ लागली, आजोबा स्वतःच्या जागेवरून उठले आणि पुन्हा कप उचलला.
" बाबा हे काय ? आता तर चहा प्यायला होता ना ?
"नाही तू कुठे मला चहा दिला?" ते रागात म्हणाले.
राधाच्या लक्षात आलं, खरा खेळ तर आजोबांच्या डोक्याचा आहे.
"बघितलं राधा? हे असं चाललंय; पण आता काय करणार ? जे आपल्या नशिबी आले ते करावं लागणार." सुमित्रा म्हणाली.
राधाच्या डोक्यात खूप सारे प्रश्न होते आणि तिला त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार होती.
सुमित्रा आणि राधा बेडरूममध्ये जाऊन बसल्या. राधा माझं लग्न झालं तेव्हा आमचा खूप छान परिवार होता. सासू , सासरा, नवरा. खूप छान असं कुटुंब होतं. आम्ही फार गुण्यागोविंदाने राहत होतो कसल्याही गोष्टीची कमी नव्हती. काळ लोटला. आजारपणामध्ये सासूबाई गेल्या आणि घरची जबाबदारी आमच्यावर आली.
सासूबाईंच्या जाण्याने सासरेबुवा खचून तर गेले; पण त्यांच्या डोक्यावर परिणाम होऊ लागला. सुरुवातीला लहान सहान वस्तू विसरायचे, आम्हाला वाटलं हे सगळं नॉर्मल आहे; पण नंतर नंतर अति होऊ लागलं. आम्ही डॉक्टरांना देखील दाखवलं; पण ते म्हणाले त्यांची स्मृती खरंतर गेली आहे. आपण काहीच करू शकत नाही. त्यांची अशी अवस्था पाहून आम्हालाही फार वाईट वाटतं. खरंतर असं कोणाच्याही बाबतीत होऊ नये. ते सर्वच विसरले आहे. त्यांना असं वाटतं की, आम्ही त्यांना डांबून ठेवतो, त्रास देतो. आता हे सगळं कसं हाताळावे काही कळत नाही. दरवाजा उघडा दिसला की, सरळ बाहेर निघून जातात आणि कुठेही चालत जातात. फार भीती वाटते बघ. सारखं त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं. अगदी दोन मिनिटं देखील त्यांना एकटं सोडू वाटत नाही. त्यांची अशी अवस्था होईल वाटलं देखील नव्हतं."
सासूबाईंच्या जाण्याने सासरेबुवा खचून तर गेले; पण त्यांच्या डोक्यावर परिणाम होऊ लागला. सुरुवातीला लहान सहान वस्तू विसरायचे, आम्हाला वाटलं हे सगळं नॉर्मल आहे; पण नंतर नंतर अति होऊ लागलं. आम्ही डॉक्टरांना देखील दाखवलं; पण ते म्हणाले त्यांची स्मृती खरंतर गेली आहे. आपण काहीच करू शकत नाही. त्यांची अशी अवस्था पाहून आम्हालाही फार वाईट वाटतं. खरंतर असं कोणाच्याही बाबतीत होऊ नये. ते सर्वच विसरले आहे. त्यांना असं वाटतं की, आम्ही त्यांना डांबून ठेवतो, त्रास देतो. आता हे सगळं कसं हाताळावे काही कळत नाही. दरवाजा उघडा दिसला की, सरळ बाहेर निघून जातात आणि कुठेही चालत जातात. फार भीती वाटते बघ. सारखं त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं. अगदी दोन मिनिटं देखील त्यांना एकटं सोडू वाटत नाही. त्यांची अशी अवस्था होईल वाटलं देखील नव्हतं."
हे सारं बोलत असताना सुमित्राच्या डोळ्यात पाणी दाटून आलं होतं. राधाला तर हे सगळं ऐकून शॉकच बसला.
हे सर्व चित्रपटात पाहिलं होतं; पण हे तर प्रत्यक्षात घडताना दिसलं होतं. काय होईल सांगता येत नाही.
सुमित्रा पुढे बोलू लागली.
" त्यादिवशी रात्री तसंच झालं मी कामात व्यस्त होते आणि चुकून दरवाजा उघडा राहिला. ते सरळ निघून गेले. ह्यांनी शोधून आणलं."
क्रमशः
अश्विनी ओगले.
अश्विनी ओगले.