गेल्या भागात आपण पाहिलं की सुमित्रा आजोबाविषयी खरं काय ते सांगते. त्यांची स्मृती गेल्यामुळे ते असे वागत होते हे राधाला कळतं.
आता पाहू पुढे.
आता पाहू पुढे.
राधा सारंकाही मन लावून ऐकत होती. आभाळाने मोकळं व्हावं तसंच सुमित्रा देखील तिच्यासमोर मन व्यक्त करत होती. राधा फार मानसिक त्रास होतो, या अवस्थेत आपली माणसं जातात आणि आपण हतबल होतो. आपण काहीच करू शकत नाही. खरंतर आयुष्य हे यंत्रवत झाला आहे बघ. सतत दडपणाखाली राहते.
आम्ही आमच्या परीने त्यांचा सांभाळ चांगलाच करतो; पण कधी कधी शक्ती कमी पडते असंच वाटतं.
आम्ही आमच्या परीने त्यांचा सांभाळ चांगलाच करतो; पण कधी कधी शक्ती कमी पडते असंच वाटतं.
आधीचे दिवस आठवले ना तर फार वाईट वाटतं बघ. मला तर त्यांनी स्वतःच्या मुलीप्रमाणे जपलं आहे. कधीच कोणत्याही गोष्टीची कमी होऊ दिली नाही. त्यांनी मला मुलीप्रमाणे जीव लावला.
भविष्यात असं काही होईल वाटलं देखील नव्हतं."
तिने पदरानेच डोळे टिपले.
" मावशी, तुम्ही आणि काका किती काळजी घेताय त्यांची, खरंतर ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे."
" राधा हे आमचं कर्तव्य आहे. खरं तर त्यांनी जे प्रेम दिलं आहे, त्या प्रेमापुढे हे काहीच नाही. ते दिवस विसरता येतात का? आपल्याला मनापासून जीव लावणाऱ्या व्यक्तीचे हाल झालेले आपल्याला बघवतील का ? तुला खरं सांगू का आम्हाला अनेक जणांनी सल्ले दिले की, बाबांना वृद्धाश्रमात ठेवा पण आमचं मन झालं नाही. जे झाड कायम सावली देत राहिलं ते झाड सुकल्यावर कापून दुसरीकडे फेकणे म्हणजे निर्दयीपणा. आमच्यापासून त्यांना दूर करण्याची हिंमत झाली नाही. हल्ली तर खूप त्रास द्यायला लागले आहेत, चिडचिड करतात. त्यांना अगदी लहान मुलाप्रमाणे जपावं लागतं. प्रत्येक तासाला त्यांना काही ना काही खायला द्यावे लागतं. घरातल्या वस्तू सतत इथे तिथे ठेवत असतात. स्थिर बसत नाही. सतत त्यांच्या सोबत उभं राहावं लागतं. जेवले तरी पुन्हा जेवण मागत राहतात. म्हणतात मला तुम्ही लोकं उपाशी ठेवतात. ज्या लोकांना माहीत नाही त्यांना वाटते की आम्ही त्यांना खूप त्रास देतो.सर्वांनाच आपली परिस्थिती सांगता येत नाही. खरंतर तुझ्याशी बोलावं वाटलं म्हणून मी तुझ्यासमोर व्यक्त झाले नाही, तर सहसा मी या सर्व गोष्टी कोणाला सांगत नाही.
वयोमानानुसार आम्हाला हे सर्व झेपत नाही. दिवसा केअर टेकर आहे त्यामुळे थोडं निवांत राहता येते. नाहीतर फारच त्रास होत होता.
राधाला राजचा फोन आला.
"कुठे आहेस राधा? अनुज तुला शोधतोय."
"हो आलेच. इथे मावशीकडेच आहे."
"बरं मावशी मी निघते. खरंच तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. काही मदत लागली तर हक्काने सांगा."
राधा निघू लागली.
आजोबा खिडकीपाशी बसले होते.
नरेश त्यांच्या बाजूलाच उभा होता.
सुमित्रासोबत बोलणं झाल्यामुळे राधाला सर्व परिस्थिती समजली होती. डोक्यामध्ये किती आणि काय काय विचार येत होते. तिचे तिलाच आश्चर्य वाटलं. खरंच हे मन किती वेडं असतं ना? जे नसतं त्याचाच विचार करतं. कधी घरी जाते आणि राजला सगळं काही सांगते असं झालं होतं.
"काय राधा मॅडम? किती वेळ झाला? इथे मुलगा आणि नवरा तुमची वाट बघतोय."
"ते मावशींना त्यांचा ब्लाउज द्यायचा होता ना म्हणून गेले होते. "
"बरं."
"राज, त्या दिवशी तो अगदी बरोबर बोलत होता."
" काय बरोबर बोलत होतो?"
" हेच कधीकधी आपण नको त्या गोष्टीचा जास्त विचार करतो. गोष्टी तश्या नसतात तरी आपण विरुद्ध विचार करत असतो."
"ओके म्हणजे तू जो विचार करत होती तसं नव्हतं?"
"हो मी जसा विचार करत होते तसं काहीच नव्हतं. त्या आजोबाबद्दल बोलले होते ना तसं काहीच नाहीये. सुमित्रा मावशीसोबत बोलणं झालं आणि तेव्हा कळलं की आजोबांच्या लक्षात काहीच रहात नाही, मी स्वतः डोळ्याने पाहिले. दहा मिनिटापूर्वी चहा प्यायले आणि विसरून गेले. खरं तर त्यांच्यासाठी फार वाईट वाटलं. सुमित्रा मावशी खूप काही सांगत होत्या. सारं बोलतांना त्यांना गहिवरून आलं. मला तर सगळं ऐकून वाईट वाटलं. त्यांना अगदी लेकीप्रमाणे जीव लावला आहे म्हणून तर त्या अगदी लेकीसारखी काळजी घेतात. कसल्याही गोष्टीची कमी पडू देत नाही."
"राधा, चला गैरसमजाचा भोपळा फुटला ते बरं झालं. हे असंच होतं आपल्यासोबत, म्हणून जोपर्यंत पूर्ण गोष्ट माहीत पडत नाही तोपर्यंत तर्क वितर्क लावणं म्हणजे स्वतःलाच मुर्खात काढण्यासारखं होय. चला संवादाने सारे गैरसमज दूर झाले आहे. आता तू काहीच विचार करणार नाही याची मला पूर्ण गॅरेंटी आहे."
सुमित्राने मन मोकळं केल्यामुळे तिलाही बरं वाटलं होतं. नरेश आणि सुमित्रा एकमेकांच्या सोबतीने आजोबांची काळजी घेत होते.
इथे राधाचा गैरसमज दूर झाला.
समाप्त.
अश्विनी ओगले.