Login

मांजरीचे दात लागतात

Manjriche
मांजरीचे दात लागतात

त्याचे आणि त्यांच्या आईचे भांडण झाले ,आई मुलावर रुसली ,मुलगा दुसऱ्या खोलीत जाऊन बसला आणि म्हतारी बराच वेळ रुसून बसली...

मुलगा बोलला आणि म्हणून आईला राग आला ती।मुलावर ओरडू लागली..त्याला हाक मारू लागली..

पण तिचे हे रोजचे झाले होते ,रोजच राग आणि रोज ओरडणे ,रडणे ..शिव्या देणे असायचे..तो मुलगा म्हणून तिला खूप सांभाळून घेत होता ,तिचे लहानमुला प्रमाणे लाड कोड पुरवत असायचा पण तरी तिचा रडण्याचा सूर ,त्याला घालून पाडून बोलण्याचा तोरा ,राग काही केल्या कमी होत नसायचा..ओरडणे असे की शेजाऱ्यांच्या घरात ऐकू जाई.. घरात बसने नको नको होई..घरात सून ही असत ,तिला तर ते बऱ्याचदा नको नको होई..

आज ही तेच ओरडणे आरडणे ,गदारोळ करून भांडाऊन सोडणे..थोडा थोडा वेळ झाला की रडणे ओरडणे ह्यात घरातले वैतागून जात ,इतर मुले ही होते पण त्यांनी सरळ नकार देऊन हात वर करून जबाबदारी मोठ्या भावावर अशी टाकली जणू ती त्याची एकट्याची आई..तू तुझी सांभाळ ती आमच्या कडून सांभाळली जात नाही ,ती इथे येताच नुसता त्रास देते.. म्हणून कोणी घेऊन जात नसे...इतकेच काय कोणी साधी चौकशी ही करायला मागत नसे...

मुलावर ओरडणे तर नित्याचे झाले होते ,सुनेला ही रागात बघायचे ,ओरडायची आणि त्रास द्यायची...मदतनीस होती तिला घाण बोलून चिडचिड करून नको नको करत..

आज मुलगा वैतागून खोलीचे दार लावून डोळे मिटून बसला होता ,हा असा प्रकार होता की सोडता ही एईंना आणि घरात सहन ही करणे शक्य होईना..

सुनेला सासूच्या ओरडण्याचा आवाज येताच ती बाहेर आली आणि समोर नवरा नाही ,कुठे गेले हे म्हणून दुसऱ्या खोलीत बघू लागली ,तर नवऱ्याने अंधार करून घेतला होता ,त्याला हे ओरडणे आता सहन करण्या पलीकडे होत चालले असल्याने निपचित डोळे झाकून घेऊन पडून होता..

सुनेला हाक मारल्या पण सुनेला आपल्या नवऱ्याची ही अवस्था बघवत नसल्याने ती त्यांना बघून टेन्शन मध्ये आली,तोच सासू सुनेच्या नावाने जोरजोर्यात ओरडू लागली ,तिला शिव्या देऊ लागली ,तुझे चांगले होणार नाही म्हणून शाप देऊ लागली..

ही बाब सुनेला मनाला खूप लागली ,ह्यांच्याशी कसे ही किती ही चांगले वागले तरी नेहमी शिव्या नी शाप आपल्यालाच ?? इतर जबाबदारी घेत नाही त्यांना वाईट शब्द ही नाही..ह्या मुळे तिला आता सासूबाईंचा राग आला होता ,ती चिडली आणि त्यांना जाब विचारायला गेली ,त्यांनी तिला शाप द्यायचे काय कारण ,ती तुमचे काय घेणे लागते..तुमच्या घरातले खात नाही..तुमचे काही घेतले नाही उलट तुमची काळजी करते तर तिच्या लेखी हे शाप...का शाप द्यायचे..?

तेव्हा सून नवऱ्याकडे गेली तो त्यावर काहीच शब्दाने ही बोलता झाला नाही..हे पाहून नवऱ्याचा राग येत होता...ह्या जबाबदारी मुळे त्यांच्या नात्यात आता अंतर पडत चालले होते ,त्याने वेळोवेळी तिची बाजू कधीच घेतली नव्हती..कारण समोर जी व्यक्ती होती ती त्याची आई होती ,ती शिव्या देवो ,शाप देवो..भांडण लावून देवो तो तिला दुखावणार नव्हता हे त्याने स्वतःशी ठरवले होते..

सुनेला आता ही तिची बाजू घेणारे कोणी नव्हते ,तेव्हा ती डायरीत लिहीत राहिली

----

ज्यांच्या मुली सुखात आनंदात आहेत त्यांनी इतरांच्या मुलींचे सुख आणि आंनद हेरवून घेतांना विचार करावा..

ज्यांना वाटत असेल आपली मुलगी सासरी सुखी रहावी तिला त्रास होऊ नये..कोणी तिला शिव्या श्राप देऊ नये त्यांनी इतरांच्या मुलीला ही ह्या पासून दूर ठेवावे

ज्यांना वाटते तिच्या नवऱ्याने तिला ही वेळ द्यावा तिची काळजी घ्यावी ,तिची जबाबदारी घ्यावी त्यांनी आपल्या आयुष्यात आलेल्या स्रीसोबत ही हीच वर्तवणूक ठेवावी..

ज्यांना वाटते आपली लेक जिला आपण शब्दाने ही दुखावले नाही तिला सासरी ही दुखावले जाता कामा नाही त्यांनी कोणाच्या मुलीला ही तसे वागणूक देऊ नये..

कारण आपण जे जे करू ते तेच आपल्या ही मुलीच्या पदरात देव देत असतोच...रडायला लावले तर तो ही रडायला लावणार असतो..हसायला लावले तर तो ही तिला हसायला लावत असतो...

आपण जखमा दिल्या तो ही जखमाच देत असतो... इथे जी जी कमी कमतरता ,शिव्या श्राप देशील ते ते तुझ्या ही मुलीला मिळतील...

आयुष्याचे गणित ह्यावर अवलंबून असते..तू म्हणशील तसे होत नसते ,तू जे करशील तसे होत असते.. पेरले तेच तर उगत असते हे वेगळे सांगायला नको..

डायरी लिहून झाल्यावर नवरा तिला मेसेज करून सांगतो ,आई आहे ,वय झालं आहे ,तिला समजून घेऊ...तसे ही मांजरीचे दात पिल्लाला कुठे लागत असतात , तेव्हा ती म्हणाली मांजरीचे दात फक्त आपल्या पिल्लांना लागत नसतात ,इतरांचे पिल्लू घरात आल्यावर ती त्याला मारून टाकायला ही मागे पुढे बघत नसते...सबब किती ही दे देवापुढे खरा न्याय होत असतोच...

त्यावर तो ओरडून म्हणतो मी माफी मागतो.

ती मग म्हणाली इतके वर्ष तुम्ही तुमच्या घरचे मला त्रास देत आला आहात त्यावर माझ्या आईवडिलांनी तर किती शिव्या शाप द्यायला हवे होते ,पण लेकीच्या आनंदासाठी त्यांनी ते दिले नाहीत...पण तुझ्या आईने हा विचार कधीच केला नाही की लेकाच्या आंनदासाठी तरी निदान आपले तोंड बंद ठेवावे..पण उलट शिव्या शाप देत राहिल्या...

तो म्हणाला हवं ते समज, मी आईला उलट बोलून दुखावणार नाही..मला इतकेच वाटते की मांजरीचे दात लागत नाहीत..

इतक्यात ती म्हणाली माझ्या आई वडिलांनी जर हेच केले तरी तू हे असेच म्हणशील !!! तेव्हा इतक्याच थंड आवाजात माझे हेच शब्द ऐकून तिथेच माझ्या माहेरी थांबू शकशील..?

तो निरुत्तर होता...त्याला आठवले तिच्या वडिलांनी तिची बाजू घेतली तेव्हा तो अहंकार आणि स्वाभिमानाला ठेच लागली आपला अपमान झाला म्हणून तडक निघून आला होता ,बरेच दिवस बरेच वर्ष ह्याच कारणामुळे तो तिच्या आई वडिलांसोबत तुटक तुटक बोलत होता..

मग जर आपला तो स्वाभिमान ,आपला तो अपमान म्हणणतो तर एका सुनेने कैक वर्ष हेच सहन करून पुन्हा सासरी कसे थांबावे ,कशी मान अपमान गिळून ह्या मांजरीचे सेवा करते ,का करावी..आणि सेवेचा हे फळ मिळावे ? असे फळ मिळावे..?
©®अनुराधा आंधळे पालवे
©®अनुराधा आंधळे पालवे