सुधाताई रागाने काव्याला म्हणाल्या.
“सासूबाई, मी कुठे दिखावा करतेय? घरात कार्यक्रम आहे म्हणून नीट आवरायला नको का? नाहीतर नंतर तुम्हीच म्हणता की आमच्या घराची इज्जत मातीमोल केली,”
काव्याने उत्तर दिलं.
“घालायचं असेल तर आवडीने घाल. पण नणंदेला हे सांगायची काय गरज आहे की हा सोन्याचा हार आहे की नकली, त्याची किंमत किती आहे,”
सुधाताई चिडून म्हणाल्या.
“सासूबाई, मी स्वतःहून कधीच ताईंकडे जाऊन सांगत नाही की मी काय घातलंय, किती किमतीचं आहे. त्या स्वतः येऊन विचारतात आणि मग तुमच्याकडे येऊन काय-काय सांगतात. शेवटी मी किती सहन करू? प्रत्येक कार्यक्रमाला हेच चालू असतं,”
काव्याही बोलून गेली.
सुधाताईंनी सुनावलं.
दोघींचाही मूड खराब झाला. काव्या शांतपणे आपापल्या कामात गुंतली, तर सुधाताई नातेवाइकांमध्ये जाऊन बसल्या. पण मनातील कटुता दोघींच्याही चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. कारण हे सगळं नेहमीचंच होतं.
राजेशचं उत्पन्न ठीकठाक होतं,आणि मानसीपण नोकरीं करत होती.पण बचतीच्या नावाखाली काहीच नसायचं.
सासू-सासरे त्यांच्या सवयींनी हैराण झाले होते. वारंवार समजावूनही काही उपयोग झाला नाही, म्हणून त्यांनी गप्प राहणंच पसंत केलं. एकुलती एक सून असल्यामुळे तिला वेगळंही करत नव्हते.
मात्र मानसीची सवय पाहून सुधाताईंनी आपले दागिने स्वतःकडेच ठेवले होते. मानसीच्या माहेरकडून जे दागिने चढवले होते, तेवढेच तिच्याकडे होते.
दुसरीकडे मनीष आणि काव्या दोघंही नोकरी करत होते. काव्या लहान मुलगा असल्यामुळे एका शाळेत अर्धवेळ शिक्षिका होती. महिन्याला सुमारे पंधरा हजार रुपये कमवत होती. दोघंही सुरुवातीपासून विचारपूर्वक खर्च करत होते.
काही महिन्यांपूर्वी समीर कमवू लागला, तेव्हा त्याने स्वतःच सांगितलं—
“वहिनीची कमाई घरखर्चात वापरू नका. आम्ही दोघं भाऊ मिळून खर्च पाहू.”
मानसीला नेहमी तक्रार करायची सवय होती. सासरच्यांनी दागिने दिले नाहीत, उलट चढवलेलेही स्वतःकडेच ठेवले, असं ती सतत म्हणायची.पण तसं काही नव्हतं.
असं म्हणत ती टोमणे मारायची.
आणि मग सुधाताईंकडे जाऊन रडारड करायची,
“आई, वहिनी मुद्दाम नवीन दागिने घालून मला चिडवतात.”
हे ऐकून सुधाताईंनाही राग यायचा आणि त्या काव्याला सुनावायच्या,
“तुला माहिती असताना तिच्यासमोर दागिने का घालतेस?”
आजही तसंच झालं. समीरच्या साखरपुड्याचा कार्यक्रम होता. काव्याने आपल्या बचतीतून सोन्याच्या नेकलेस घेतलं होतं आणि तोच आज घातला होता. मानसीची नजर हारावर पडताच तिने विचारलं—
“वहिनी , नवा हार आहे वाटतं. सोन्याचा आहे का?”
काव्याला उत्तर द्यायचं नव्हतं, पण पुन्हा विचारल्यावर ती म्हणाली—
“हो ताई , नवीन घेतलाय.”
“कितीला घेतला?”
मनातल्या मनात जळत मानसीने विचारलं.
“फार महाग नाही. फक्त पेंडंट सोन्याचं आहे, बाकी मोती आहेत. पेंडंटही पातळच आहे. साधारण पन्नास हजारांचा पडलाय,”
काव्या सहज म्हणाली.
“आई, हे काय योग्य आहे का? वहिनीकडे सगळे दागिने आहेत, तरीही त्यांच्यासाठी नवा हार आणलात. माझ्याकडे तर फक्त लग्नातले दागिने आहेत. मला द्यायचं म्हटलं की तुला अडचण होते. मुलगी लग्नानंतर परकी होते ना!”
सुधाताई शांतपणे म्हणाल्या—
“तो हार आम्ही घेतलेला नाही. काव्याने स्वतःच्या कमाईतून घेतलाय.”
“तुला कसं माहीत? दादानेच घेतला असेल. मला टाळण्यासाठी सगळं. आता वहिनीची कमाईचं कारण काढाल.”
असं म्हणत मानसी डोळ्यात पाणी आणून निघून गेली.
“मानसी, प्रत्येक वेळी हे नाटक कशासाठी? तुझ्या सासरी काही कमी आहे का?”
“माझ्यासाठी काहीच नाही, पण वहिनीसाठी हार आहेत,”
मानसी चिडून म्हणाली.
“तो हार काव्याने स्वतः घेतलाय. मग हा तमाशा कशासाठी?”
मनीष समजावून सांगत होता.
तेवढ्यात समीर म्हणाला—
“तुला हार हवा असेल तर नवऱ्याकडून माग.तू स्वता कमावते.
आमच्याकडून काय अपेक्षा ठेवतेस? लग्नात आम्ही कर्ज काढून सगळं केलं. आता आयुष्यभर आम्हीच खर्च करायचा का?आणि आम्ही करू पण.
समीरच्या लग्नालाही ती तशीच रुसलेली आली. पण तिच्या रुसव्याने काहीही बदल झाला नाही.
कारण धाकटा भाऊही तितकाच स्पष्टवक्ताच होता—खरं सांगणारा, कोणालाही न घाबरणारा.
" दीपाली, हे घे बिल. यात सर्व हिशोब आहे. हे तुझ्या वडिलांना पाठव आणि लवकर पैसे पाठवायला सांग. " देवकीबाई हातातलं बिल दीपालीच्या हातात देत म्हणाल्या.
पंधरा दिवसांचे बिल
" जेवणाचे पैसे *****. "
" जेवणात एक्सट्रा तूप वापरलेलं पैसे ******. "
" हॉस्पिटल मध्ये नेण्या आणण्याचे पैसे *****. "
" कपडे धुण्याचे पैसे *******. "
" टोटल = 7000"
दीपाली बिल पाहतच राहिली. तिने आपल्या सासूबाईंकडे पाहत विचारलं, "आई, हे सर्व काय आहे ? "
" काय आहे म्हणजे ? वाचलं नाहीस का ? तुझ्या वडिलांना इथे आणायला माझा नकार असताना, तू इथे आणून ठेवलं होतस ना ? मग त्याचे पैसे नको का ? पैसे काय झाडाला लागतात का ? इतरांचे खर्च करायला ? उद्या उठसुठ कोणी येईल. आपण खर्च करत बसणार का ? त्यामुळे तुझ्या वडिलांना पैसे पाठवायला सांग. " असं म्हणत त्या आपल्या खोलीत गेल्या.
दीपालीला ऑफिसला जायची घाई होती. त्यामुळे त्यावेळी ती काही न बोलता ऑफिसला निघून गेली. दीपाली आणि सागर माधवरावांची दोन मुलं. सागरच पाच वर्षांपूर्वी लग्न झालं होत. एका प्रोजेक्टच्यानिमित्ताने त्याला तीन वर्ष अमेरिकेला राहावं लागत होत. सहा महिन्यांपूर्वी आई वारली तेव्हा सागर सहपरिवार आला होता. त्यामुळे वडील आजारी असताना त्याला लगेच भारतात यायला जमणार नव्हतं. म्हणून वडिलांचे हाल होऊ नयेत म्हणून दीपाली सासूबाईचा विरोध असताना त्यांना घरी घेऊन आली. वेळेवर डॉक्टर, औषध, चेकअप, पथ्यच जेवण त्यामुळे ते पंधरा दिवसात बरे झाले आणि आपल्या घरी परत गेले. या सर्वात ट्रेंटमेन्टसाठी लागणारा पैसा त्यांनीच लावला.
संध्याकाळी सर्व जेवायला बसल्यावर देवकीबाईंनी परत विषय काढला, " दीपाली सकाळी दिलेल बिल तुझ्या वडिलांना पाठवलंस का ? "
" कसलं बिल ? " प्रज्ञेश ( दीपालीचा नवरा ) दीपालीकडे पाहत म्हणाला.
" माझे वडील पंधरा दिवस इथे राहून गेले. त्याच बिल. " दीपाली भाजी पुढे करत म्हणाली.
" आई काय प्रकार आहे हा ? असं कोण वागत ? तुला माहित नाही की..... " प्रज्ञेश रागात बोलतच होता, की दीपाली त्याला मध्ये थांबवत म्हणाल, " थांब प्रज्ञेश, तू आता मध्ये पडू नकोस आज सर्व बिल क्लिअर करणार आहे मी. "
असं म्हणत तिने आत जाऊन तीन बिल आणले आणि देवकी बाईंच्या हातात देत म्हणाली, " मला या आधी, तीन वर्षात माहित नव्हतं की या घरात बिल सिस्टिम आहे. सकाळी कळालं. तर मी सुद्धा ही बिल्स तयार केली आहेत. माझ्या वडिलांकडून...
पूर्ण कमेंटमध्ये
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा