Login

मायाजाळ (१)

कोण असेल तो ? ती त्याच्या तावडीतून सुटका करू शकले का ? जाणून घेण्यासाठी वाचा मायाजाळ
चहूबाजूंनी काळाकुट्ट अंधार पसरलेला. आभाळात जोरजोरात विजा चमकत होत्या. सोबत थंडगार वारा सुटला होता. अश्या वातावरणाला बघून वाटत होत की खूपच जोरात वादळी पाऊस पडणार आहे.

" अहो.. अस वाटतय की वादळी पाऊस पडणार आहे. मी तिला बोलली होती. आज नको जाऊस कॉलेजला. बातम्या मध्ये कालच सांगितले होते याबद्दल. तिला माहिती असून पण ती गेली. म्हणे खूप महत्वाचं प्रोजेक्ट आहे. ते नाही झाल तर परीक्षेला बसू नाही देणार सर. माहिती आहे प्रोजेक्ट महत्वाचं आहे. तिने सरांना विनवणी करून उद्या पूर्ण केल असत ना ? ते पण नाही तिला आजच पूर्ण करायची हौस."

शीतल काम करत आपल्या मुलीवर बडबडत होती. वादळी वातावरण बघून त्यांना आपल्या मुलीची काळजी सोबत अस्वस्थ पण वाटत होतं. ती फक्त सुखरूप घरी पोहोचू दे. हेच त्यांच्या मनात येत होत.

शीतलची अशी अवस्था बघून शांतनू " अग.. काळजी नको करू. येईल ती घरी वळेवर. तिथे ती एकटी कुठे आहे ? तिच्यासोबत आणखी पण मुलं, मुली असतील. सोबत शिक्षक पण आहेत त्यांचा. ते विद्यार्थ्यांना काही होऊ देणार नाही. हवं तर तुझ्या समाधानासाठी तिला कॉल करतो. " शांतनू शीतलला दिलासा तर देत होते. पण ते वरतून दाखवत नसले तरी आतून त्यांच मन अस्वस्थ वाटत होत.


शीतल " हो.. हो.. करा तिला कॉल आणि लवकरात लवकर घरी यायला सांगा."

शीतलच्या समाधानासाठी ते तिला कॉल करतात. समोरून रिंग वाजत असते पण कॉल उचलला जात नसतो. शेवटी रिंग वाजत वाजत कॉल कट होतो.

शांतनू शीतलकडे बघून " तिच लेक्चर असेल कदाचित म्हणून ती कॉल उचलत नसणार. तिचं लेक्चर संपल की करेल ती कॉल."

शीतल समजून " हो.. "


भैरव कॉलेज...

एका वर्गामध्ये इकॉनॉमिकच लेक्चर चालू होत. बाहेर काय चालू आहे हे कोणालाच माहिती नव्हत. पूर्ण वर्गात शांतता पसरली होती. सगळ्यांच लक्ष फक्त शिक्षकांच्या शिकवण्यावर होत.

इकॉनॉमिकचा तास म्हणजे मराठे सरांचा. मराठे सर कडक स्वभावाचे. त्यांना थोडासाही आवाज केलेला चालायचा नाही.जर आवाज केला तर ते कोणतीही शिक्षा द्यायचे. भलेही समोरच्याला त्रास झाला तरी चालेल.म्हणून त्यांचा तास असला की पूर्ण वर्ग शांत असायचा.


अनन्या तिसऱ्या बाकडावर खिडकीजवळ बसलेली. थंडगार वारा तिच्या अंगाला स्पर्शत होता. त्या वाऱ्यावरून तिला समजल होत की खूप जोरात पाऊस पडणार आहे. तिला बाहेरच्या वातातवरणाचा अंदाज घ्यायचा होता म्हणून तिने मराठे सरांच लक्ष नसताना हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून बाहेर बघितल. बाहेर बघताच तिला धडकी भरली.  बाहेर इतका अंधार पसरला होता की अस वाटत होत रात्रीचे बारा वाजले आहेत. सोबत वाऱ्याचा वेग आणि ठिकठिकाणी मोठमोठी झाडे जोरजोरात हलत होती. विजाही चमकत होत्या. या भयंकर दृश्याने अनन्याच्या मनात भीती निर्माण झाली होती.  या थंड वातावरणात पण भीतीने तिच्या चेहऱ्यावर घाम आलेला. इतकी ती घाबरली होती. पाऊस अजून पडला नव्हता. ही वादळापूर्वीची शांतता होती.


बाहेरचे भयंकर वातावरण बघून अनन्या मनात " पाऊस पडला तर आता घरी कस जाणार. आई बोलत होती सारखी नको जाऊ. आईचं ऐकायला पाहिजे होत. पण प्रोजेक्ट महत्वाचं होत म्हणून मला यावच लागलं नाहीतर सरांनी परीक्षेला बसू दिल नसत. वातावरण बघून अस वाटतय बस नाही भेटणार. ट्रेनने जावं लागेल आता."

अनन्या विचारात इतकी गुंतली होती की सरांचा आवाज तिला ऐकू येत नव्हता. सर तिला कधीपासून आवाज देत होते. पण तिचं सगळ लक्ष बाहेर होत. तिचा चेहरा काळजीने भरला होता हे तिच्या बाजूला बसलेल्या निशाने ओळखल होत आणि ती कशाची काळजी करत आहे हेही तिला समजल होत. पण आता तिला विचारातून बाहेर काढणं महत्वाचं होत.

निशाने कोणाला दिसणार नाही अश्या पद्धतीने अनन्याच्या हातावर पेनाचे टोक मारून तिला गहन विचारातून बाहेर काढलं.

अनन्या विचारातून बाहेर येताच मराठे सर तिच्याकडे रागाने बघत " लक्ष कुठे आहे तुझ ? तुला माहित आहे ना मला माझ्या लेक्चरला गोंधळ नको. इतकं कसला विचार करत होती ? "

अनन्या सरांचा राग बघून पटकन जागेवरून उठून " सॉरी.. सॉरी सर ते मी एका धड्याचा विचार करत होती. तो धडा समजला नव्हता. "

मराठे सर " मी इथे महत्वाचं काही बोलतोय आणि तुला त्या धड्याच पडलय. म्हणजे आतापर्यंत तुझ लक्षच नव्हतं हो ना ? "

अनन्या " नाही सर.. माझं लक्ष होत. "

मराठे सर " मग आता माझ्या एका प्रश्नाच उत्तर दे. बघूया किती लक्ष होत तुझ ? "

सर प्रश्न विचारणार हे ऐकून आता अनन्याची बोबडीच वळली. तर इथे तिला अस बघून एका व्यक्तीला खूपच मज्जा येत होती. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर क्षणाक्षणाला हसू पसरत होत.