Login

मायाजाळ (२)

ती त्याच्या तावडीतून वाचू शकेल का ? कोण असेल तो ? जाणून घेण्यासाठी वाचा मायाजाळ
सर प्रश्न विचारणार हे ऐकून आता अनन्याची बोबडीच वळली. तर इथे तिला अस बघून एका व्यक्तीला खूपच मज्जा येत होती. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर क्षणाक्षणाला हसू पसरत होत.

सरांनी अनान्याला प्रश्न विचारल्यावर ते शांत झाले आणि तिच्या उत्तराची वाट बघत तिथेच तिच्याकडे रोखून बघत उभे होते. सरांना समोरच बघून अनन्याला काही सुचत नव्हतं. तिला आणखी भीती वाटू लागली. त्यात काळजीने भेरलेले मन तिला सेकंद सेकंदाला अस्वस्थ करत होत. ती इतकी घाबरली होती की आता तिच शरीर थरथरायला लागलं होतं. तिचं थरथरणार शरीर बघून बाजूला बसलेल्या निशाने तिच्या हातावर हात ठेवून तिला शांत करण्याचा प्रयत्न केला.

निशाचा प्रेमळ हात आपल्या हातावर फिरताना बघून अनन्याच्या मनातली भीती कमी होत होती. थोडीफार भीती कमी झाल्यावर अनन्याने सरांनी विचारलेल्या प्रश्नाच उत्तर दिलं. तिच्या उत्तराने समजल होत की तिचं लक्ष होत म्हणून सरांनी पुढे तिला काही विचारल नाही.

अनन्याच उत्तर देऊन झाल्यावर नंतर सरांनी पुढे शिकवायला सुरुवात केली. शिकवून झाल्यावर सरांनी अचानक मोठा बॉम्ब टाकला ज्याने सर्वांच्या कपाळावर दरदरून घाम फुटला होता. सगळे एकमेकांकडे बघून कुजबुजत होते.

चाललेला गोंधळ बघून सरांनी जोरात टेबलवर डस्टर मारला त्यामुळे वर्गात शांतता पसरली. सगळे आवंढा गिळून समोर रागाने लालबुंद उभ्या असलेल्या सरांकडे बघत होते. सर सगळ्यांचा चेहरा बघून काय ते समजून गेले आणि त्यांच्या चेहरा आता रागाने लालबुंद झालेला.

मराठे सर मोठ्याने ओरडत " मला आजच वह्या पूर्ण झालेल्या पाहिजे. वह्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही इथेच बसणार आहात. कितीही वेळ झाला तरी चालेल मला वह्या पूर्ण हव्यात. मीही इथेच थांबणार आहे. कोणीही पळून जाण्याचा प्रयत्न नाही करायचा. चला काढा वह्या आणि लिहायला घ्या. " एवढं बोलून ते तिथेच ठाण मांडून बसले.

सर आपल काही ऐकणार नाही समजून सगळ्यांनी पटकन वह्या काढून लिहायला घेतलं. तर इथे अनन्या आणखीनच काळजीत आली. ती हळूहळू आपल्या बॅगेतून वही काढत होती.

तिला काळजीत बघून निशा " अनन्या काळजी नको मी आहे तुझ्या सोबत आपण ट्रेनने जाऊ घरी. "

अनन्या " अग.. वातावरण बघ बाहेर. मला नाही वाटत आपण लवकर घरी पोहचू. "

निशा " अनन्या नकारात्मक विचार नको करुस. आपण पाऊस येण्या अगोदरच घरी पोहचू. त्यासाठी लवकर वही पूर्ण कर. "

निशाच्या बोलण्यावर अनान्याला थोडा धीर आला. ती सोबत आहे म्हणून काही काळजी नव्हती. तरीही तिच मन अस्वस्थ का होत होतं ? हे तिला समजत नव्हत. आपल्या अस्वस्थ मनाला दूर्लक्ष करून  तिने वही पूर्ण करायला घेतली.

थोड्याच वेळात काही जणांच्या वह्या पूर्ण झाल्या. त्यात निशा आणि अनन्या पण होत्या. काही जण अजूनही लिहीत होते. ज्यांच्या वह्या पूर्ण झाल्या ते लगेच सरांना सांगून वर्गाबाहेर पडले.

वर्गाबाहेर पडल्यावर निशा आणि अनन्या मोठी मोठी पाऊले टाकत बस स्टॉप वर आल्या. त्यांच्या घरापर्यंत जाणाऱ्या बस बंद करण्यात आलेल्या कारण दोघींनाही घरी जायला मध्येच घाट लागायचं. अस वातावरण बघता घाटावरून जाणाऱ्या बसेसनां बंद करण्यात आलेल्या. बस बंद मंटल्यावर दोघींना स्टेशनला जायला बसमधून जावं लागणार होतं. दोघींसोबत काही मुलं आणि मुली पण होत्या. आपल्यासोबत अजूनही मुलं आहेत समजल्यावर दोघींना हायस वाटल. बसची वाट बघत असताना अनन्याच सहज घड्याळावर लक्ष गेलं. बघते तर  रात्रीचे आठ वाजायला अर्धा तास बाकी होता.

अनन्या " निशा.. आठ वाजायला अर्धा तास बाकी आहे. आणि शेवटची ट्रेन आठची असते. त्यानंतर कोणतीच ट्रेन नसते. "

निशा " अनन्या शांत हो. आपण पोहचू आठच्या आधी. "

अनन्या " अग.. कस ? माणसं बघ किती आहे ? आणि आता येणारी बस तीही शेवटची. "

निशा " अनन्या.. "


दोघी बोलत असतानाच अचानक बस येते. ही शेवटची बस असल्याने सगळे पटापट बसमध्ये चढतात. त्यात दोघी पण असतात. बस पूर्ण भरली होती तरीही काही उरलेली माणसं चढण्याचा प्रयत्न करत होती. पण जागा शिल्लक नसल्याने काही माणसं खालीच राहिली. त्या माणसांना आता पायी चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे कोणताच विचार न करता ते मोठं मोठी पावले टाकत पायी चालत जात होते.


बस निघाली तस या दोघींच्या जीवात जीव आला. बस आता वेळेवर रेल्वे स्टेशनवर पोहोचायच होतं. त्यासाठी दोघींनी मध्ये कोणतंच अडथळा येऊ नये म्हणून प्रार्थना केली. पण जे नको व्हायला हवं होतं ते झाला. बस मध्येच बंद पडली आणि इथे दोघींच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली.