Login

माझा देश मराठी निबंध (Maza Desh Essay In Marathi)

मराठी निबंध
माझा देश

"भारत" माझा देश आहे आणि मला माझ्या देशाचा अभिमान आहे. मला नेहमीच माझ्या देशाची संस्कृती, परंपरा यांचा खूप अभिमान वाटतो. भारत हा जगातील पहिला सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. भारताला भारत,इंडिया, हिंदुस्तान असेही म्हणतात. पौराणिक कथेनुसार आपल्या देशाचे नाव प्राचीन हिंदु राजा भरत यांच्या नावावर होते. काही काळाने "भरत"चे "भारत" असे नाव उदयास आले. तसेच "इंडिया"हे नाव इंडस या शब्दापासून तयार झाले आहे,जे अप्रत्यक्षपणे "सिंधू"या शब्दापासून देखील आले आहे.
"अनेकता मे एकता
यही भारतकी विशेषता"
या उक्ती प्रमाणेच भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. जो हिंदू मुस्लिम,शीख आणि ख्रिशचन अशा सर्व धर्मातील लोकांना समान मान्यता देतो. आपल्या भारत देशाची राजधानी दिल्ली आहे, तर आर्थिक राजधानी मुंबई आहे. भारतचे राष्ट्रपती हे राष्ट्राचे प्रमुख आणि भारतीय सैन्याचे कमांडर-इन-चीफ देखील आहेत.त्याचबरोबर पंतप्रधान हे सरकारचे प्रमुख असतात आणि कॅबिनेट मंत्रालय तयार करणाऱ्या मंत्रिमंडळाच्या पाठिंबाची कार्यालय चालवतात.भारतीय संविधान हा भारतीय कायदेशीर व्यवस्थेचा सर्वोच्च पाया आहे.भारतात एकूण २९ राज्ये आहेत, आणि त्या सर्व राज्यांची त्यांची एक खास भाषा आहे. आणि ८ केंद्रशासित प्रदेश आहेत.तरीही आपण सारे भारतीय एका धाग्यात बांधलेले आहोत.
भारतातील राज्यांची नावे आंध्रप्रदेश,आसाम, अरुणाचल प्रदेश,बिहार,छत्तीसगड,गोवा, गुजरात,हरियाणा,हिमाचल,प्रदेश,झारखंड, कर्नाटक,केरळ, मध्यप्रदेश,महाराष्ट्र,मणिपूर,मेघालय,मिझोरम,नागालँड,पंजाब,ओडिसा,राजस्थान, सिक्कीम,तमिळनाडू,तेलंगणा,त्रिपुरा,उत्तराखंड,उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल इत्यादी आहेत. या सर्वांमध्ये मध्यप्रदेश हे सर्वात मोठे राज्य आहे आणि गोवा हे सर्वात लहान राज्य आहे.आठ केंद्रशासित प्रदेशांची नावे अंदमान-निकोबार बेट, चंदिगड,दादरा,नगर हवेली, दिव दमन. राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली, जम्मू आणि काश्मीर,लक्षद्वीप,लडाख आणि पुदुचेरी इत्यादी आहेत.
भारताची हडप्पा आणि मोहोंजोदारो संस्कृती ही अजूनही जगप्रसिद्ध आहे. तसेच रामायण, महाभारत आणि भगवत गीता यांसारखे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. आपल्या देशाची संस्कृती आणि इतिहास संपूर्ण जगाला आकर्षित करतो. ऐतिहासिक वास्तु इमारतींचे नमुने त्यांचा जुना वारसा पर्यटकांना भुरळ घालतो. भारत हा संस्कृती आणि परंपरा जपणारा देश आहे.
भारतातील प्रत्येक राज्यात मंत्रमुग्ध करणारी अशी पर्यटनस्थळे आहेत. जे सर्वांची मने जिंकतात.भारतातील सर्वात लोकप्रिय इमारत म्हणजे ताजमहल आहे.शहाजहानने त्यांची पत्नी मुमताज यांच्या स्मरणार्थ ही वास्तु बांधली आहे. ताजमहल हे जगातील ७ आश्चर्यापैकी एक आहे.हैद्राबादमधील चारमिनार, अमृतसर मधील सुवर्ण सुवर्ण मंदिर, दिल्लीतील लाल किल्ला, इंडिया गेट, अजंठा,वेरुळ,एलोरा लेणी या वास्तु प्रसिद्ध आहेत.पर्यटनासाठी काश्मीर,सिमला,उटी,मनाली, गोवा, कलकत्ता,बेंगळुरू, चेन्नई हे प्रसिद्ध आहेत.तसेच हरिद्वार,ऋषिकेश,केदारनाथ,अमरनाथ,काशी, तिरुपती बालाजी इत्यादी धार्मिक स्थळे प्रसिध्द आहेत. गंगा नदी ही हिंदू लोकांसाठी पवित्र नदी मानली जाते. तसेच गोड्या पाण्यातील डॉल्फिन मासा गंगा नदीत आढळतो.
भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे. राष्ट्रीय प्राणी वाघ, राष्ट्रीय फुल कमळ तर राष्ट्रीय फळ आंबा आहे. भारताचा ध्वज तिरंगा आहे. ज्यामध्ये भगवा,पांढरा आणि हिरवा असे तीन रंग आहेत. आणि त्यात अशोकचक्र आहे. भारताचे राष्ट्रगीत"जन गण मन"आहे.जे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहीलेले आहे. कोणताही राष्ट्रीय कार्यक्रम किंवा समारंभ राष्ट्रगीताशिवाय पूर्ण होत नाही.तसेच "वंदे मातरम्" हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे. जे बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहीलेले आहे. भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे. पण बऱ्याच लोकांना क्रिकेट जास्त आवडतो. भारताचे राष्ट्रीय चिन्ह हे अशोस्तंभ आहे.
"सर्व धर्म समभाव"या उक्ती प्रमाणेच भारतात विविध भाषा आणि विविध धर्म असूनही लोकांच्या मनात आपलेपणा प्रेम आणि बंधुता आहे. लोक आपल्या धर्मानुसार सण साजरे करतात.भारतात प्रामुख्याने रक्षाबंधन,दिवाळी,दसरा,होळी,ईद ख्रिसमस, लोहरी,पोंगल, गणेश उत्सव, दुर्गा पुजा यांसारखे सण साजरे केले जातात.
भारतीय खाद्य पदार्थ तर जगभर प्रसिद्ध व लोकप्रिय आहेत. त्यामधे भारतीय मसाले हे खूप प्रसिद्ध आहेत आणि त्यांची जगभर मागणी देखील जास्त आहे. प्रत्येक राज्याच्या भाषा,धर्म,संस्कृती निरनिराळे आहेतच पण खाद्यसंस्कृती देखील वेगळी आहे. महाराष्ट्रामध्ये पुरणपोळी, ज्वारीची भाकरी, ठेचा प्रसिद्ध आहे तर दक्षिण भारतात इडलीडोसा, पंजाबमध्ये मोहरीची हिरवी भाजी आणि मक्याची भाकरी चालाते तर काश्मीर मध्ये बिर्याणी आणि सगळे मांसाहारी पदार्थ चालतात. सर्व भारतीय या विविधतेने नटलेल्या आपल्या संस्कृतीचा ,अन्नपदार्थांचा आस्वाद घेतात.
भारतामध्ये अनेक महान सुपुत्र जन्माला आले आहेत. आदर्श राजा राम, अहिंसेचा मार्ग दाखवणारे वर्धमान महावीर, भगवान गौतम बुद्ध, जनाहितराजा शिवाजी महाराज अशा थोर व्यक्तीं लाभलेला आपला भारत देश महान आहे. तसेच थोर व्यक्तींनी,साधू संतानी सांगितलेले तत्त्वज्ञान आचरणात आणणारा भारत देश आहे. संत ज्ञाेश्वरां, संत तुकाराम, संत नामदेव, संत रामदास, बसवेश्वर महाराज, संत कबीर,थोर संत मीरा ईत्यादी महान संतांच्या विचारांनी भारतभूमी पवित्र झाली आहे.
भारताने दीडशे वर्षे गुलामगिरी सहन केली. नंतर सर्व भारतीयांनी एकजूट होऊन गुलामगिरी विरुद्ध लढा दिला व १९४७ साली स्वातंत्र्य मिळविले.स्वातंत्र्य लढ्याच्या चाल चळवळीत अनेक महान लोकांनी आपले बलिदान दिले.भगतसिंग, सुखदेव,राजगुरू या भारतमातेच्या पुत्रांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.तसेच स्वामी विवेकानंद, दयानंद सरस्वती, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, चंद्रशेखर आझाद महात्मा गांधी यांचे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये खूप मोठे योगदान आहे.
स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारताने विविध क्षेत्रांत विकास साधला. आपाल्या देशाचे मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी भारताची राज्यघटना लिहीली. त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात.देशाशी संबंधित सर्व प्रश्नांची सखोल तपासणी करण्यासाठी आणि सर्व समस्याचे निवारण करण्यासाठी संविधान सभांच्या ३८९ सदस्यांनी समित्या गठीत केलेल्या आहेत. आपल्या देशाच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान आधिकर दिलेले आहेत. आपला देश हा लोकशाही प्रदान देश आहे, जेथे प्रत्येक सामान्य नागरिकाला आपली मते मांडण्याचा आधिकार आहे. नेपाळ,पाकिस्तान,श्रीलंका,बांगलादेश,म्यानमार,अफगाणिस्तान,भूतान आणि मालदीव अशी भारताच्या शेजारील देशांची नावे आहेत.
भारतात भौगोलिक विविधता आहे.भारतातील हवामान वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असल्याने धान्ये,फळे,भाज्या,फुले यांच्यातही विविधता आढळते. भारतातील विविध ऋतूंचे आगमन सर्वांनीच पाहिले आहे. प्रत्येक ऋतूचे वेगवेगळे महत्व आहे.आणि ऋतुमानानुसार भारतातील काही लोकांचे सण देखील असतात. भारतात सौंदर्यपूर्ण आणि मनाला भिडणारा असा हिमालय पर्वत व त्याच्या पर्वत रांगा आहेत. हिमालय हा सर्वात उंच पर्वतांपैकी एक आहे. जो नेहमीच बर्फाने आच्छादलेला असतो. गंगा नदीचा उगम हा हिमालय पर्वत रांगा मधूनच होतो.
आपण आज भारतात स्वतंत्रपणे आणि मोकळेपणाने फिरत आहोत याचे श्रेय आपल्या देशाच्या सर्व सुरक्षा दलांना जाते. ज्यात भारतीय लष्कर सेनेचा महत्त्वाचा वाटा आहे. भारतीय लष्कराचे प्रमुख तीन विभाग आहेत. त्यामध्ये भारतीय स्थळसेना, भारतीय नौदलसेना आणि भारतीय वायुदलसेना हे आहेत. या तीन विभागातील जवान किंवा सेना रात्रंदिवस आपल्या संरक्षणासाठी सज्ज असतात. त्याचबरोबर भारतातील स्थानिक संरक्षण यंत्रणा देखील आपली सुरक्षा करते. त्याचे उदाहरण म्हणजे पोलीस दल जे आपल्या सर्व समस्यांचे निवारण करते व आपले संरक्षण करते.
आपण वेगवेगळ्या भाषा बोलतो आणि अनेक देव देवतांची उपासना करतो. तरीही आपल्या सर्वांच्या शक्ती सारख्याच आहेत. अशा साधेपणाची ओळख या देशापेक्षा कुठेही चांगली होणार नाही. या आपल्या देशात विभिन्नता असूनही आम्ही सर्व एक आहोत. ज्याप्रमाणे फुलांच्या हारांमध्ये अनेक प्रकारची फुले असतात, प्रत्येकाचा रंग आणि सुगंध वेगळा असतो, त्याचप्रमाणे भारत देशातील लोक देखील राहतात. विविधते मध्ये आपल्या देशाचे महान ऐक्य वसलेले आहे. म्हणूनच मला माझ्या भारत देशाचा खूप अभिमान वाटतो.
"जय हिंद! जय भारत!"