मोह मोह के धागे भाग - सहा

लवस्टोरी
         मधु शिवांश तिला भेटायला येईल याची
ती वाट बघत होती. त्यादिवशी जे काही झाल त्या
दिवसापासून त्याने मधुला त्याच तोंडही दाखवल
नव्हत. तिही यामुळे खुप परेशान झाली होती.
आपण चुकीच वागलो का याच तिलाच कसतरी
वाटत होत, पण त्याला हव ते आपण दिल का
तर माझ त्याच्यावर खुप मनापासुन प्रेम आहे.
त्याचही प्रेम आहे, त्याने तस प्रपोझ केल
आणि तुझ्याशी लग्न करेन अस म्हणणारा व्यक्ती
अचानक भेटायतही नाही याचा अर्थ मी काय
घ्यायचा. पण कामामुळे तिला वेळच भेटत
नव्हता आणि ती हे कुणाशी बोलूही शकत नव्हती.
एकच तिची मैत्रिण जीवाभावाची मिताली जी
आई आजारी होती म्हणून तिच्या गावी गेली होती.
आज तिला सुट्टी होती म्हणून मधुने त्याच
थेट घरच गाठल, तिथे त्याला सुमित आणि शशांक
जे दोघे जवळचे मित्र ते ही दिसले नाही नाही तर
तिथेच असतात. तिने चौकीदारला विचारल,
घरात काम करणार्‍या सिमा मावशींना विचारल,

" शिवांश सर कुठे गेले आहेत ? " तर सगळे
कामासाठी ते बाहेर गेले आहेत हेच सांगत होते.
तिथे तिला प्रशांत दिसला. तो लॅपटाॅपवर काम
करत बसला होता. ती शिवांशला विचारत होती
त्याची नजर तिच्याकडे गेली. तस तो उठून
लगेच तिच्याजवळ आला. त्याने आदराने तिला
गुड माॅर्निंग विश केल. तिने त्याला शिवांशच
विचारल.

     प्रशांतने पहिल्याच नजरेत तिला ओळखल की
खरच हि किती निरागस आहे, शांत आहे अगदी
पण या शिवाला ही इतकी चांगली मुलगी कशी
पटली आणि त्याला तर प्रेमात पडायच नव्हत
मुलगी घरापर्यंत शोधत आली म्हणजे नक्कीच
काहीतरी आहे.

"हॅलो दादा, लक्ष कुठे आहे तुझ ?" मी काहीतरी
विचारल तुम्हांला ? ते शिवांश सर कुठे गेले
आहेत आणि कधी येतील मला तेवढ सांगाल
का प्लीज, खुप अर्जंट आहे हो त्यांना भेटण
मला... ?" मधूच्या बोलण्याने प्रशांत भानावर
आला त्याला शिवाला भेटण्याची तळमळ समजली. त्याने त्वरित शिवांशला फोन लावला.

तिकडून शिवांश, " बोल काय कान आहे पश्या,
तुला एक काम सांगितलेल पूर्ण होत नाही
कारे तुला सांगितल होत ना मी महत्वाच काम
आहे मला फोन करू नको " 


" भैय्या, ऐकुन तर घे माझ काम नाही तुझ्याकडे
मी सांगितलेली काम पूर्णही केल आहे. तर
तुला भेटायला मधू नावाची मुलगी आली आहे
आणि तिला तुला आताच भेटायच आहे म्हणते "

" बर बर, तिला सांग दोन दिवसांनी ये म्हणून "
एवढ बोलून शिवाने काॅल ठेवून दिला.


        मधु मोठ्या आशेने प्रशांतकडे बघत होती.
पण प्रशांतने दोन दिवसांनी भेटायला बोलवलय
म्हटल्यावर तिची निराशा झाली ती तशीच घरी
निघून गेली. घरी आल्यावर तिने शिवाला खुप
फोन केले मेसेज केले पण त्याने त्याचा फोन
बंद करून ठेवला होता. मग तिने सुमितला
फोन केला तेव्हा ते बिझनेस संदर्भात महत्वाच्या
कामासाठी गेलेत आणि उद्या तौ तुला भेटेल
अस सांगितल्यावर मधुला बर वाटल. तिने स्वतःला
धीर दिला आणि समजावल. दोन दिवस मधुही
खुप बिझी होती. त्यादिवशी ती तिची ड्युटी
संपवून शिवाच्या ऑफीसमध्ये गेली. तिला त्याला
समोर बघून खुप बर वाटल आनंद झाला.
त्याच्या चेहर्‍यावर मात्र बारा वाजले. ति त्याच्या
समोर गेली. त्याने बाहेर फोन करुन सांगितल
की मी सांगेपर्यंत कुणालाही आत पाठवू नका.

" बोल मधु काय काम आहे माझ्याकडे, सारखे
फोन, मेसेज करत होतीस ? " शिवांश

" हो मला फक्त एवढच सांग त्यादिवशी जे काही
झाल त्याच तुला वाईट वाटतय का कींवा तु
माझ्यावर नाराज आहेस का ? " , मधु.

" मी कश्याला नाराज होऊ आणि मला काय
बाकीची काम नाहीत का ? आणि जे काही झाल
त्याच मला वाईट का वाटेल तुही मला साथ
दिलीस ना तुलाही तेव्हा ते हव होत ना " , शिवा.

" हो कारण मी मनापासून तुझ्यावर प्रेम करते.
तुला त्या गोष्टीसाठी विरोधही केला पण तु मला
लग्नाच वचन दिलेल आहे. आणि हो मी याआधी
कुणाशी अर वागले नाही आणि यानंतरही मी
तु सोडून कुणाचा विचार करू शकत नाही
मी फक्त तुझा विचार करते आणि मला तुझ्यासोबत
आयुष्य जगायच आहे " , मधु.

" कसल प्रेम मधु , मला आता सद्या माझा
बिझनेस महत्वाचा आहे आणि मला खुप मोठ
बनायच आहे. बाकीच्या गोष्टींसाठी वेळ नाही
माझ्याकडे आणि हो त्यादिवशी जे काही झाल
ना ते दोघांच्याही मर्जीने झाल. ते सगळ विसरून
जा आणि यापुढे मला भेटायचाहु प्रयत्न करू
नको " , शिवांश तिला ओरडून बोलत होता.


   मधु खुप रडायला लागली शिवांश अस का
बोलतोय तिला कळत नव्हत. तो खुप रागवला
होता तिच्यावर आणि तिच ऐकुनही घेत नव्हता.
हायपर झालेला दिसत होता. तिला त्याच सगळ
बोलण ऐकून हार्टॲटॅक यायचाच बाकी होता.
तो सगळ एका दमात बोलून गेला पण ते शब्द
जणू तिच काळीज आरपार चिरून गेले.

       थोडावेळ जाऊ दिला. मधुने उठून शिवाला
पाणी दिल आणि त्याच्या पाठीवर हात ठेवून
तिने त्याला शांत राहायला सांगीतल. त्याने तिचा
हात झटकुन टाकला. तिला थोडी वेदना झाली.
तिने स्वतःला सावरल. आणि त्याला म्हटली,

" शिवा , मला फक्त एवढ सांग तुझ माझ्यावर
खर प्रेम आहे की नाही ? , मधु.

" माझ तुझ्यावर प्रेम नाही, त्यादिवशी जे झाल
ते कस झाल मला नाही माहीती पण मी तस
करूही शकत नाही आणि हो ज्याला लहानपणा
पासुन आईवडीलांच प्रेम नाही मिळाल, तो
कश्याला कुठल्या मुलीच्या प्रेमात पडेन, तिच्यावर
विश्वास ठेवेन. वेडा आहे का मी ? स्वतःचे
आईवडील सोडून जाऊ शकतात तर दुनियेचा
काय भरोसा. त्यादिवशी मला जरा जास्तच
झाली होती त्यामुळे नशेत झाल. पण तु ही
मला त्यावेळी साथ दीली त्यामुळे तक्रार दाखल
केली तरी तुझीच बदनामी होईल म्हणुन विचार
कर काय करायच ते ? " , शिवांश.


" नालायक माणसा, माझ तुझ्यावर खुप
मनापासून प्रेम होत आणि कायम असेल. म्हणून
झाल माझ्याकडून हे सगळ आता मला कळतय
तुझ प्रेम नव्हतच माझ्यावर तर ते फक्त काही
क्षणांपुरतच आकर्षण होत. तुला मी हवी होते
ते फक्त एका दिवसासाठी सगळच समजलय,
तु फसवलय मला याची शिक्षा तुला मी नाही
दिली तरी देव नक्कीच देईल " , मधु तिथुन
निघाली तिथे थांबण्यात काहिच अर्थ नव्हता,
त्याने तिला जाताना सांगितल की तु मला
परत भेटायच नाही.


       शिवांश आणि मधु एकमेकांसमोर जरी आले
तरी शिवा तिच्याकडे बघतही नव्हता. त्याला
कुठल्याही गोष्टीचा पश्ताताप नव्हता उलट काही
झालच नाही अश्या ऐटित तो वागायचा.

      मधु अजुनही त्याच्यावर प्रेम करत होती.
तो असा का वागतोय हे तिला कळत नव्हत.
अस एका दिवसात सगळ कस बदलू शकत.
मधुला शिवाची साथ आयुष्यभरासाठी हवी
होती. तो तिला भेटल्यापासुन तिच जगच
बदलल होत. ती नव्याने जगायला लागली होती.
ति त्याच्या प्रेमात पडली आणि खुप विश्वास
ठेवला त्याच्यावर, प्रेमात विश्वास असावा पण
आंधळा विश्वास नसावा.

      मधुने ठरवल होत की आज जरी तो आपल्याला नाकारत असला ना एक दिवस
तरी त्याला माझ प्रेम समजेन... तो माझ्याजवळ
परत येईल आणि प्रेमात सगळ माफ असत मी
ही त्याला माफ करून टाकेल आणि पुन्हा आम्ही
एक होऊ... असा भाबडी आशा घेऊन ती
आलेला दिवस जगत होती.

    मधु लहानपणापासुन अनाथ होती, त्यामुळे
तिला पहील्यांदाच शिवांशमुळे कुणीतरी फक्त
आपली काळजी घेणारा आपला माणुस भेटला
आहे हे फिल त्याच्यामुळे झाल. आणि तो
अचानक तिला इग्नोर करू लागला. तरी ती
त्याला काॅल मेसेज करायची. पण तो काही
प्रतिसाद देत नव्हता. तो तिच्यापासून दुर जात
होता याचा तिला खुप त्रास होता मधु बिचारी
त्याच्या प्रेमात वेडी झाली होती.

     हे सगळ काय कमी होत म्हणून मधुच्या
आयुष्यात अस काही घडल...ज्याचा तिने तर
विचारही केला नव्हता. आता काय करायच हा
प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला....


    म्हणतात ना... काही गोष्टी आयुष्य बदलून
टाकतात मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या
तरीही...


       अस काय झाल असेल मधुच्या आयुष्यात
कोणती घटना घडली असेल तिने अस काही
होईल याचा विचारही केला नव्हता. विचार करा
अंदाज लावा आणि मला कमेंट मध्ये नक्की
सांगा. कथा वाचुन कमेंट करून नक्की सांगा.
तरच मी पुढचा भाग लवकर पोस्ट करेल.
पुढचा भाग खुप महत्वाचा आहे त्यामुळे आधी
जे काही मधु आणि शिवांशच्या आयुष्यात घडलय
ते नक्की वाचा आणि कस वाटली ते नक्की
सांगा.