रहस्यमय टेकडी भाग-५

टेकडीवरील खुनांच रहस्य
सकाळ होताच अमित व जय तयार होतात ..
गावात अजूनही भितीच वातावरण अ त दोघेही शहरात जायला निघतात.कमिशनरला भेटणं तस सोप नसत पण,जयच्या ओळखीने ते कमिशनला भेटून‌ सर्व झालेला प्रकार सांगतात व त्याप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी राञी तेथे साफळा रचला जातो...

सायंकाळ होण्याआधीच पोलिसांची तुकडी झाडामध्ये लपुन बसते ..ठरल्याप्रमाणे राञी बारा वाजता भगव्या कपड्यांधारी महाराज येतात...काही तासात तेथे दोन व्यक्ती गप्पा मारत येत असतात..जय व अमित ही पोलिसतुकडीसह असतात..त्यातिल एक व्यक्ती अमितच्या ओळखीचा असतो ..तो म्हणजे पोलिस पाटिल..
व दुसरा व्यक्ती गावाबाहेरील असतो...

पाटिल व ती नविन व्यक्ती महाराजांना नमस्कार करते पिंपळाच्या झाडाखाली तिघेही बसतात.काही काळानंतर महाराज त्या व्यक्तीच्या व पाटलांच्या हातावर काहीतरी ठेवतो.ती व्यक्ती महाराजांनी दिलेली गोष्ट तोंडात टाकते काही क्षणात भोवळ येऊन व्यक्ती जमिनीवर कोसळते ..

तोच" वत्सा लाग कामाला" असा हुकुम महाराज सोडतो पाटिल उठणार तोच पोलिस त्यांच्यावर छापा टाकतात व दोघांनाही पकडतात ..बेशुध्द व्यक्तीलाही पोलिस आपल्यासोबत नेतात...राञीच्या वेळी गावात होणारा गोधळ बघून गावलाले जागे होतात.पोलिस गाडी व पकडलेले दोघ बघून आता काय?,झाल हा प्रश्न गाववाल्यांना पडतो..

जय व अमित दोघेही खुश होतात..जय गाववाल्यांना सगळा झालेला प्रकार कथीत करतो..आता गावातील लोकांचा पाटलांवर खुप संताप होतो पण,पाटिलांना पोलिसांनी नेलेल असतं..

दुसर्या दिवशी बेशुध्द असलेला व्यक्ती शुध्दीवर येतो श त्याला त्याच्या घरी सोडण्यात येत.पाटिल व महाराज हे झालेल्या आकरा खुनाची कबुली देतात ..तो जबाब असा

"पाटलांना स्वप्नात टेकडीजळील पिंपळाच्या झाडाखाली धन आहे व तो धनाचा साठा एक महाराज शोधून देतिल अस दिसत त्याप्रमाणे ते ह्या महाराजांना भेटतात.महाराजही त्यांना निम्म्या धनाचे मालकी द्याल तर मदत करतो म्हणुन तयार होतात ..त्यानुसार ते मग खुनाच सञ सुरू करतात..आकरा बळी देण्याच ठरत व त्यानुसार दर पौर्णिमा किंवा आमावश्येला भक्ष सापलं कि बळी दिला जातो...देवाचा बळी देण्याच नक्की नसत .पण त्या दिवशी देवा मळात गेलेला असतो त्याला थोड असवस्थ वाटत असल्याने तो घराकडे परतत असतो ..त्याचवेळी एका व्यक्तीचा हे दोघे बळी देत असतात ते देवा बघतो..देवाने सगळ बघितल व आता गावात चर्चा होईल ह्या भितीखाली मग ते दोघे देवाचा बळी देतात .पण त्यांनी आणलेला बळी अधीच बेशूध्द असतो त्यामुळे ते त्यालाही संपवतात..

आजवर बळी दिलेल्या सगळ्यांना वापरलेली हत्यारे झाडाखालीच भुयारात लपवलेले असतात..दवाखान्यातील पोस्टमार्टम करणारे डाॅक्टरही ह्यात सामिल असल्याने रिपोर्ट हे अकस्मात मृत्युचे येतात.."

पोलिसांना बर्याच दिवसापासून सुरू असलेल्या ह्या खुनाचा शोध घेण्यासाठी मदत करणार्या जय व अमितच नाव गुपित ठेवण्यात येत व गावातील खुनाच सञ थांबत..
पोलिसपाटिल व खुनासाठी मदत करणारे त्यांचे मिञ ,डाॅक्टर,महाराज यांना अजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली जाते...

आघोरी गोष्टींमुळे आकरा जीव आज जीवनाला मुकलेले असतात ..रहस्यमय टेकटीला आता त्या आकरा जीवांची समाधीस्थळ म्हणुन घोषित करतात...

समाप्त..

🎭 Series Post

View all