नावात काय आहे भाग १
तुषार ची सकाळची ऑफिसला जायची गडबड चालू होती.
तुषार "आई , माझा डबा भरलास का?"नाष्ट्याची प्लेट तयार ठेव .. मी आलोच " नुकताच अंघोळ करून आल्या नंतर आवरता आवरता आईशी बोलत होता
बाबा बाहेर पेपर वाचत होते आणि थोडीशी थकलेली आई तुषारची सर्व तयारी करण्यात मग्न होती. वय झाले होते पण तुषार ला कोणतीच मुलगी पसंत न आल्यामुळे अजूनही घरातल्या सगळ्या जवाबदाऱ्या आईवरच होत्या. तुषार जवळ जवळ आता ३०शी झाला होता आणि स्थळं बघून बघून घरातले थकले होते पण कितीतरी चांगल्या चांगल्या मुलींना तो नकारच देत होता
बाबा रिटायर्ड झाले होते . म्हातारपणाची सगळी व्यवस्थित सोय त्यांनी केली होती . स्वतःचे घर होते शिवाय एक फ्लॅट भाडयाने दिला होता . पेन्शन चालू होती . एकुलता एक तुषारचे शिक्षणही व्यवस्थित झाले होते . त्याला चांगल्या पगाराची नोकरी पण लागली होती . कमी होती ती फक्त एका सुनेची.
सून आली कि तिघांचे चौघे होतील आणि आईला थोडीफार मदत होईल .
बाबा " तुषार , अरे किती दिवस अजून आईच्या हातचे जेवण जेवणार आहेस ? लग्न करून मोकळा हो.. आमच्यात नसलं राहायचं तरी आमची काही हरकत नाही . आता वय वाढत चाललंय "
आई " अहो , थांबा ना .. आता नको तो विषय .. पुन्हा ऑफिसला जातना चीड चीड नको "
बाबा " अग , सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी झाल्या पाहिजेत .. आता आपण नातवंडाबरोबर वेळ घालवला पाहिजे .. अजूनही ह्याचच करतोय .. बघ तुला झेपत नाहीये आता "
तुषार " आई तुला किती वेळेला सांगितले .. घरातल्या सगळ्या कामाला बाई लाव "
बाबा रागातच " मी जिवंत असे पर्यंत बाई च्या हातच जेवण जेवणार नाही "
तुषार " आई , मग माझ्या जेवणासाठी बाई लाव "
बाबा " मूर्खारसारखे बोलू नको " आवाज वाढला होता त्यांचा
आई " दोघे हि थांबा .. गप्प एकदम .. मला काही त्रास होत नाहीये ..माझा मुलगा मला जड नाहीये "
तुषार लेगच आईच्या गळ्यात हात घालून " थँक्स आई .. माझी बाजू घेतल्या बद्दल .. सॉरी .. " कुठेतरी त्याला पण त्याची चूक कळत होती . त्याच्या बरोबरच्या मुलांची लग्न होऊन एक एक लेकरू झाले होते . त्यांच्या आया सुनेकडे संसार देऊन मस्त म्हतारपण एन्जॉय करत होत्या . सून आली कि जबाबदाऱ्या बदलतात . तिला जॉब ला सपोर्ट करायचा असतो , पुरी भाजी ची जागा पिझ्झा , मॅग्गीने घेतलेली असते . रस्स्याची जागा सुपने घेतलेली असते . घरात लहान मुलांचा वावर असतो . आणि थोडा वेगळा विचार केला तर आई आणि बाबांना बऱ्याच दिवसांनी स्वतः साठी थोडा वेळ मिळालेला असतो . थोडीशी जवाबदारी कमी झालेली असते कारण मुलाने संसाराची जवाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली असते .
इकडे तुषार नावाच्या विश्वामित्राला कोणत्याच मेनकेची भुरळ पडत नव्हती
आई बाबा त्रस्त आणि तुषार थोडासा का होईना पण आतून अस्वथ होताच .
नकोच वाटायची त्याला कोणीही.. का? हा मोठा प्रश्न होता .
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा