ओंजळीत माझ्या २
केतकी आणि शशांक डॉक्टरांकडे जाऊन येतात. पण आई होण्यासाठी केतकीची शारिरीक स्थिती नीट नव्हती. आता घरी काय सांगायचे? या विचाराने ते दोघं त्रस्त झाले होते.
पाहुया पुढे.....
"काय झाले? काय म्हणाले डॉक्टर."
"आई तुला कसं कळलं! आम्ही डॉक्टरांकडे गेलो होतो ते? "
"अरे, अशा गोष्टी लपून राहतात का? तुमच्या हालचालींवरून आणि केतकीच्या गोळ्या बघून मला कळले."
"आई, सध्या तरी आम्हाला चान्स नाही घ्यायचा. डॉक्टरांनी सांगितले आहे की सध्या सहा महिने तरी ट्रीटमेंट चालू द्या. काही प्रोग्रेस असेल तर बघू. नाही तर दुसरे मार्ग निवडू."
"अरे, शशांक काय बोलतोस तू? अरे, पण अस किती दिवस चालणार ! काहीतरी तर करावेच लागेल."
"अलका जरा शांत हो. ते बघीतल ना काय करायचं ते ?" शामराव
"अहो, ते काय बघतील? इतके दिवस वाट बघीतलीच ना. आता परत तेच... आता मला वाट नाही बघायची."
"पण आई.... आता तर कुठे ट्रीटमेंट सुरू केली आहे. कमीत कमी सहा महिने लागतील. नाही तर..."
"नाही तर काय?"
"आम्ही एखादे बाळ दत्तक घेऊ."
"काय!"
"नाही. मला ते चालणार नाही. कोण कुठल ते बाळ आणायचं. मला फक्त..."
"आई, काय म्हणतेस तू? आजच्या काळात सुध्दा तुझे असे विचार.."
"काय चुकीचे बोलले मी. माझी काही अवास्तव अपेक्षा तर नाहीच आहे. हीच गोष्ट लग्न झाल्या झाल्या लक्षात आली असती. तर आतापर्यंत घरात गोकुळ नांदले असते."
"अग, अलका शांत हो."
इकडे केतकीच्या डोळ्यात पाणी आले.
"नाही, यांचा निर्णय मला मान्य नाही. हे जर बाळ दत्तक घेणार असेल तर माझा एक निर्णय यांना मान्य करावा लागेल. केतकी या घरात राहणार नाही. तिने शशांक पासून दूर झाले पाहिजे. मी शशांकचे दुसरे लग्न लावून देईल."
"आई, आता अती झाले. मला हे मान्य नाही. मी केतकीला सोडून दुसऱ्या कोणत्याही मुलीचा विचार सुध्दा करू शकत नाही. तुला आमचा निर्णय मान्य नसेल तर आम्ही वेगळे राहू ."
"शशांक... " अलकाताईंचा आवाज वाढला होता.
"अलका, काय चाललंय तुझं. जरा शांत हो. वाट्टेल ते काय बोलत आहे?"
"ठीक आहे. मी वेगळा राहायला तयार आहे."
"अहो, काय बोलता तुम्ही? मी हे घर तोडायला नाही तर जोडायला आले होते. पण जर माझ्यामुळे जर या घराचे दोन भाग होणार असेल तर मी स्वतः तुमच्या पासून वेगळ व्हायला तयार आहे. मी एक वेळ माझ्यावरचा अन्याय सहन करेल. पण तुम्ही आणि तुमचे कुटुंब वेगळे होऊ नका. कारण मी आईच होऊ शकत नसेल तर जगातील सर्वात वाईट सून ठरेल."
"केतकी, तोंडाला येईल ते बोलू नको. तुझा निर्णय मला मान्य नाही. तुझी काय चूक ? तू तुझा संसार तुझ्या हाताने का मोडायला निघालीस?"
"अहो, पण जर माझ्यामुळे या घराला सुख आणि आनंदच जर देऊ शकत नाही. तर माझं आयुष्य काय कामाचं?"
"नाही, नाही. ही गोष्ट तर मला कदापि मान्य नाही."
"केतकी, शशांक तुम्ही दोघेही थांबा. या विषयावर वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. मला माहित आहे. तुम्ही बाळा विषयी योग्य तो निर्णय घेणार."
"ते काही नाही. मी शशांकचे दुसरे लग्न लावून देणारच. केतकी तू आत्ताच्या आत्ता माहेरी निघून जा. तुला घटस्फोटाचे पेपर मिळून जातील. नाही तर शशांक माझे मेलेले तोंड बघशील."
"आई, तू एकदा नीट विचार कर ना. जर केतकी या घरात राहणार नसेल तर मी सुध्दा निघून जातो. तू स्वतः सोबत आमचे आयुष्य सुध्दा पणाला का लावते."
" ते काही नाही. मी जे बोलले ते करून दाखवू शकते. उद्या सकाळीच तू माझं मेलेले तोंड बघशील."
"अलका, का उतावीळपणे निर्णय घेते. एवढं टोकाला जायची गरज नाही. एवढी सोन्यासारखी सून मिळाली आहे. कदर कर तिची. विनाकारण कोणतेही खूळ डोक्यात घालून घेऊ नकोस. आता या विषयावर चर्चा नको. सगळेजण जा आपापल्या कामाला." शामरावांनी मध्ये पडून हे प्रकरण समजूनतदारीने तिथेच संपवले. परत सगळ्यांचे रुटीन सुरू झाले.
परंतु, तेव्हापासून अलकाताईंच्या डोक्यातून बाळाचा विचार जातच नव्हता. आता तर त्या उठता बसता केतकीला टोमणे मारू लागल्या. सगळ्यांसमोर त्या चांगल्या आणि एकटी असतांना त्या तिला घालून पाडून बोलू लागल्या. काही दिवस केतकी या सगळ्यांकडे दुर्लक्ष करत होती. पण सतत तिला एक जाणीव करून दिली जात होती. की तू आई बनू शकत नाही. तुझ्या मुळे माझ्या मुलाचे आयुष्य वाळवंटासारखे रुक्ष होईल. त्यामुळे माझ्या मुलाच्या आयुष्यातून निघून जा. सतत सतत टाकून बोलण्याला केतकी कंटाळली होती. त्यामुळे एके दिवशी केतकी आणि अलकाचे खूप मोठे भांडण झाले. त्या भांडणात अलका ताईंने तिचा खूप अपमान केला. त्यामुळे शामराव आणि शशांक खूप दुःखी झाले. त्या आता एकही शब्द ऐकून घेत नव्हत्या. त्यामुळे केतकीच्या तोंडून सुध्दा अपशब्द निघाले. आईचा झालेला अपमान सहन न झाल्याने त्याचाच राग धरून शशांकने तिला हात धरून घराच्या बाहेर काढले.
पाहुया केतकी कुठे जाते...
© अश्विनी मिश्रीकोटकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा